सरकार स्थापनेत कुणाला मदत करणार? बीजू जनता दलाकडून स्पष्ट संकेत

भुवनेश्वर : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे भाकीत करणाऱ्या एग्झिट पोलनंतर प्रादेशिक पक्षांनी 23 मेनंतरची रणनीती ठरवायला सुरुवात केली आहे. ओडिशातील प्रमुख पक्ष बीजू जनता दलाने (BJD) देखील निकालानंतर कुणाला पाठिंबा देणार याबद्दल स्पष्ट संकेत दिले आहेत. लोकसभा निकाल एक्झिट पोलच्या अंदाजानुसारच राहिला आणि NDA केंद्रात सरकार स्थापन करणार असेल, तर आपण सरकारमध्ये सहभागी होऊ, असेच संकेत बीजेडीने […]

सरकार स्थापनेत कुणाला मदत करणार? बीजू जनता दलाकडून स्पष्ट संकेत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

भुवनेश्वर : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे भाकीत करणाऱ्या एग्झिट पोलनंतर प्रादेशिक पक्षांनी 23 मेनंतरची रणनीती ठरवायला सुरुवात केली आहे. ओडिशातील प्रमुख पक्ष बीजू जनता दलाने (BJD) देखील निकालानंतर कुणाला पाठिंबा देणार याबद्दल स्पष्ट संकेत दिले आहेत.

लोकसभा निकाल एक्झिट पोलच्या अंदाजानुसारच राहिला आणि NDA केंद्रात सरकार स्थापन करणार असेल, तर आपण सरकारमध्ये सहभागी होऊ, असेच संकेत बीजेडीने दिले आहेत. बीजेडीचे वरिष्ठ प्रवक्ते अमर पटनायक यांनी सरकार स्थापनेतील आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “जे सरकार आमच्या वैध मागण्या पूर्ण करतील त्यांना आम्ही पाठिंबा देऊ. जर NDA सरकार बनवत असेल तर आम्ही त्यांना देखील पाठिंबा देऊ. आमच्या ‘स्पेशल कॅटिगरी’सारख्या समस्या जो पक्ष समजून घेईल, आम्ही त्याच्यासोबत राहू.” यावेळी त्यांनी केंद्रात सरकार बनवण्याच्या स्थितीत जो पक्ष असेल त्याला पाठिंबा देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ओडिशा दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री नवीन पटनायकांची भेट देखील लक्ष्यवेधी ठरली होती. त्यानंतर मोदींनी पटनायक यांच्यावरील टीकाही कमी केली आहे. मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टीका करताना ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या वादळातील बचाव कामाची प्रशंसा केली होती.

आज अखिलेश यादवही मित्रपक्ष बसपाच्या प्रमुख मायावतींना भेटण्यासाठी गेले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळजवळ 1 तास चर्चा झाली. चंद्रबाबू नायडूंनीही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींंची भेट घेतली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार देखील विरोधीपक्षांना एकत्र आणण्यासाठी सक्रीय झाले आहेत. काँग्रेसही निकालानंतरच्या शक्यतांची चाचपणी करण्यात व्यस्त आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.