कर्नाटकात प्रसादात विष कालवल्याचा संशय, 11 जणांचा मृत्यू

बंगळुरु: कर्नाटकच्या चामराजनगर येथे प्रसाद खाल्ल्याने 11 जणांना मृत्यू झाला आहे. तर 80 जणांची प्रकृती बिघडली आहे, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी 12 जणांची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी चामराजनगर जिल्ह्यात एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान वाटण्यात आलेल्या प्रसादातून ही विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे या प्रसादात विष कालवण्यात आल्याची शक्यता आहे.   कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातील सुलीवडी गावात शुक्रवारी एका धार्मिक […]

कर्नाटकात प्रसादात विष कालवल्याचा संशय, 11 जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:50 PM

बंगळुरु: कर्नाटकच्या चामराजनगर येथे प्रसाद खाल्ल्याने 11 जणांना मृत्यू झाला आहे. तर 80 जणांची प्रकृती बिघडली आहे, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी 12 जणांची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी चामराजनगर जिल्ह्यात एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान वाटण्यात आलेल्या प्रसादातून ही विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे या प्रसादात विष कालवण्यात आल्याची शक्यता आहे.  

कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातील सुलीवडी गावात शुक्रवारी एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. हा प्रसाद खाल्ल्यानंतर अनेक भाविकांना उलट्या होऊ लागल्या, तर काहींच्या पोटातही दुखू लागले. त्यानंतर त्यांना उपचाराकरिता तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी 11 जणांना मृत घोषित केले. चमरानगरचे पोलीस अधीक्षक धर्मेंद्र कुमार मीणा यांनी याबाबतची माहिती दिली.

राज्य सरकार आणि पोलीस आयुक्तांनी मंड्या आणि म्हैसूरच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना चमरानगर आरोग्य विभागाला हवी ती मदत पुरवण्याचे आदेश दिले आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यासोबतच कर्नाटक सरकारने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली, तसेच इतर सर्व पीडितांच्या उपचाराचा खर्चही सरकार उचलणार आहे.

प्रसादातून विषबाधा झाल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रसादात विष कालवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. 

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.