आधार कार्ड वापरायचं की नाही? निर्णय तुमचा

नवी दिल्ली : तुम्हाला जर आधार कार्डची गरज नसेल तर आता तुम्ही डी रजिस्टर करु शकता, मात्र यामुळे तुमचा सर्व डाटा डिलीट होणार आहे. केंद्र सरकार एका नवीन प्रस्तावावर काम करत आहे. या येणाऱ्या नव्या प्रस्तावानुसार आधार कार्डमधून जर आपलं नाव हटवले तर युजर्सची संपूर्ण माहिती डिलीट करण्यात येणार आहे. युजर्सची माहिती आणि बायोमॅट्रिक्स अशावेळी […]

आधार कार्ड वापरायचं की नाही? निर्णय तुमचा
सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे सरकारी योजनांपासून अगदी घरगुती कामकाजासाठी आधार कार्ड गरज भासते. सध्या बऱ्याच ठिकाणी आधारकार्डचा वापर हा मुख्य ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे.
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

नवी दिल्ली : तुम्हाला जर आधार कार्डची गरज नसेल तर आता तुम्ही डी रजिस्टर करु शकता, मात्र यामुळे तुमचा सर्व डाटा डिलीट होणार आहे. केंद्र सरकार एका नवीन प्रस्तावावर काम करत आहे. या येणाऱ्या नव्या प्रस्तावानुसार आधार कार्डमधून जर आपलं नाव हटवले तर युजर्सची संपूर्ण माहिती डिलीट करण्यात येणार आहे. युजर्सची माहिती आणि बायोमॅट्रिक्स अशावेळी घेतले जाते ज्यावेळी कोणी व्यक्ती आधारसाठी स्वत:ची नोंदणी करते.

सप्टेंबर महिन्यात आधार कार्डवर सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय देत, आधार कार्ड बँक सोबत लिंक करणे गरजेचे नाही आणि मोबाईल कंपन्यासुद्धा सिमसाठी आधार कार्ड मागू शकत नाही, असं स्पष्ट केलं होतं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आधार कायद्यातील कलम 57 नुसार आता खासगी कंपन्यांनाही व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड वापरण्याचा कोणताच अधिकार नाही.

आधार कार्ड धारकाचं 18 वर्षे वय झाल्यानंतर सरकार त्यांना सहा महिन्यांची मुदत देणार आहे. आधार कार्ड वापरायचे की नको हा त्यांचा निर्णय असेल. वृत्तानुसार भारतीय सरकारने आतापर्यंत 37.50 कोटी पॅन नंबर वाटले आहेत. हा आकडा मार्च 12/2018 पर्यंतचा आहे. त्यात फक्त 16.84 लोक असे आहेत ज्यांच्याकडे पॅन कार्ड सोबत आधार कार्ड आहे.

हा प्रस्ताव जर अमंलात आणला तर अनेकांना याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजही अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही किंवा त्यासाठी लागणारे पुरेसे कागदपत्रे नाहीत.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.