दिल्ली : संसदेत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. याच दरम्यान कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भाषण केलं आहे. यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेचे अनुभव सांगत केंद्र सरकारच्याबद्दल लोकांच्या मनात काय सुरू आहे याचे काही उदाहरणं देत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. यामध्ये संपूर्ण देशात फक्त उद्योगपती गौतम अडाणी (Gautam Adani) यांच्याच नावाची चर्चा सुरू असल्याचा टोला लगावत त्यांचे आणि पंतरप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध काय आहे? असाही सवाल राहुल गांधी यांनी करत अडाणी हेच प्रत्येक व्यवसायात कसेकाय घुसतात असा सवालही केला आहे.