निवडणुकीच्या घोषणेसोबतच शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये येणार!

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. मोदी सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली. दोन-दोन हजार रुपयांच्या टप्प्याने वर्षातून तीन वेळा हे पैसे शेतकऱ्यांना मिळतील. रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. मोदी सरकारची ही घोषणा आणि निवडणुकीचं टायमिंग जुळून येणार आहे. कारण, […]

निवडणुकीच्या घोषणेसोबतच शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये येणार!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. मोदी सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली. दोन-दोन हजार रुपयांच्या टप्प्याने वर्षातून तीन वेळा हे पैसे शेतकऱ्यांना मिळतील. रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.

मोदी सरकारची ही घोषणा आणि निवडणुकीचं टायमिंग जुळून येणार आहे. कारण, 1 मार्चला नवीन वर्षाची सुरुवात होईल त्या दिवशीपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे येण्यास सुरुवात होईल. पहिला हफ्ता दोन हजार रुपयांचा येणार आहे. विशेष म्हणजे डिसेंबर 2018 पासूनचा लाभ दिला जाईल. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही टायमिंग जुळून येणार आहेत.

योजनेसाठी पात्रता काय?

अर्थमंत्री पियुष गोयल यांनी हे अंतरिम बजेट सादर केलं. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना असं या योजनेला नाव देण्यात आलंय. पैशांअभावी शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना या रकमेचा फायदा होईल. दोन हेक्टर म्हणजेच पाच एकर शेती असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात ही रक्कम जमा होईल.

नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांवरील संकट हटत नाही. जीवनावश्यक गरज भागवण्यासाठीही शेतकऱ्यांकडे पैसे नसतात. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना या रक्कमेमुळे हातभार लागेल, असं अर्थमंत्री म्हणाले. या योजनेचा फायदा देशातील 12 कोटी कुटुंबांना होईल. शिवाय योजनेचा वर्षाला एकूण खर्च 75 हजार कोटी रुपये असेल.

पैसे खात्यात कधीपासून येणार?

1 डिसेंबर 2018 पासूनच ही योजना लागू असेल. अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी रक्कमेचा पहिला हफ्ता 31 मार्च 2019 पासून दिला जाईल, असं पियुष गोयल यांनी जाहीर केलं. शेतकऱ्यांना हा पैसा देण्यासाठी नवीन खातं उघडण्याची गरज नसेल. जनधन योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी अगोदरच खातं उघडलेलं आहे आणि ते आधारशी लिंक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फार अडचण येणार नाही.

शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या दृष्टीने मोदी सरकार प्रयत्न करत असल्याचं पियुष गोयल म्हणाले. यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांना पिकाच्या खर्चाच्या दीड पट किमान हमीभाव देण्याची घोषणा केली होती.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.