देशात पोलिसांची एकूण साडे पाच लाख पदं रिकामी

देशात कायद्यानुसार 24 लाख 84 हजार 170 पोलीस कर्मचारी असणे गरजेचे आहे. पण देशात केवळ 19 लाख 41 हजार 473 पोलीस कर्माचारी आहेत. याचा अर्थ मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या जागा भरणे गरजेचे आहे.

देशात पोलिसांची एकूण साडे पाच लाख पदं रिकामी
Follow us
| Updated on: Jul 08, 2019 | 11:39 AM

नवी दिल्ली : देशात सद्यस्थितीतला 24 लाख 84 हजार 170 पोलीस कर्मचारी असणे गरजेचे आहे. पण केवळ 19 लाख 41 हजार 473 पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. याचा अर्थ मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या जागा भरणे अवश्यक आहे. देशाची लोकसंख्या पाहता प्रत्येक राज्यात आणि शहरात पोलिसांचे संख्या बळ कमी पडते. ही माहिती डेटा ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटने संकलित केली आहे.

या माहितीनुसार 1 जानेवारी 2018 रोजीनुसार देशात पोलिसांची एकूण 5.43 लाख पदं रिकामी आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 1.29 लाख पोलिसांच्या जागा रिकाम्या आहेत. देशात एकमेव नागालँड असं राज्य आहे जिथे मर्यादेपेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आहेत.

2016 मध्ये देशात 22 लाख 80 हजार 691 पोलीस कर्माचाऱ्यांची गरज होती. तर 2017 मध्ये 24 लाख 64 हजार 484 आणि 2018 मध्ये 24 लाख 84 हजार 170 पोलिसांची गरज होती.

देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशात 4 लाख 14 हजार 492 पदं आहेत. पण यामधील 1 लाख 28 हजार 952 पदं रिकामी आहेत. बिहारमध्ये 1 लाख 28 हजार 286 पदं आहेत. पण 77 हजार 995 पदं भरलेली आहेत.  पश्चिम बंगालमध्ये 1 लाख 40 हजार 904 पोलीस कर्मचाऱ्यांची गरज आहे. पण येथे 48 हजार 981 पदं रिकामी आहेत.

देशाची राजधानी दिल्लीतही अशीच परिस्थिती आहे. दिल्लीतील पोलीस दलात 11 हजार 819 पदं रिकामी आहेत. दिल्ली, आंध्र प्रदेश, झारखंड, हरियाणा, तेलंगाना, केरळ आणि ओडिशासारख्या राज्यातही अशीच परिस्थिती आहे.

नागालँड देशातील एकमेव राज्य आहे. जिथे 21 हजार 292 पदं आहेत. पण येथे 941 पोलीस कर्मचारी अधिक आहेत. नक्षलग्रस्त प्रभाग छत्तीसगढमध्येही 11 हजार 916 पदं रिकामी आहेत. दहशतवाद्यांनी त्रस्त असलेले राज्य जम्मू-काश्मिरमध्येही 10 हजार 044 पदं रिकामी आहेत.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.