Assam : आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, पूरग्रस्त लोकांना घेऊन जाणारी एक बोट उलटली
कोपिली नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील 55,150 हून अधिक लोक पूरग्रस्त झाले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या पुराच्या पहिल्या तडाख्यात जिल्ह्याला मोठा फटका बसला होता.
आसाम – मागच्या चोवीस तासात आसाम (Assam) राज्यात पूरस्थिती (flood water)अतिशय भयानक झाली आहे. 96 महसूल मंडळांसह 2,930 गावात पूर असल्याची माहिती प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे 18 लाख लोकांना पूराचा सामना करावा लागत आहे. पूरात अडकलेल्या 11,881 लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यात यश आले आहे. तसेच आत्तापर्यत झालेल्या मुसळधार पावसामुळे 54 लोकांनी जीव गमावला आहे अशी माहिती आसाम राज्य आपत्ती प्राधिकरणाने (Assam State Disaster Mgmt Authority) माहिती दिली आहे. मागच्या चार दिवसांपासून आराम राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक लोकांना बेघर व्हावं लागलं आहे. तसेच अजून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
In last 24 hrs, 28 districts have reported flood. 96 Revenue Circles & 2,930 villages affected by flood. About 18,94,373 people impacted. So far 11,881 people safely evacuated.54 people have lost their life due to flood & landslide this season: Assam State Disaster Mgmt Authority
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) June 18, 2022
पूरग्रस्त लोकांना घेऊन जाणारी एक बोट उलटली
आसामच्या होजाई जिल्ह्यात पूरग्रस्त लोकांना घेऊन जाणारी एक बोट उलटली. त्यामधील तीन मुले बेपत्ता झाली आहेत, तर 21 जणांना वाचवण्यात यश आले आहे अशी माहिती तिथल्या एका अधिकाऱ्याने जाहीर केली आहे. ते म्हणाले की 24 गावकऱ्यांचा गट शुक्रवारी रात्री उशिरा इस्लामपूर गावातून सुरक्षित ठिकाणी जात असताना रायकोटा परिसरात बुडलेल्या वीटभट्टीवर त्यांची बोट उलटली. आसाममधील 28 जिल्ह्यांमध्ये यावर्षी 18.95 लाखांहून अधिक लोक पूरग्रस्त आहेत. राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू झाला आहे.
Flood at Police Reserve, Barpeta!!#Assam #assampolice #floods pic.twitter.com/zrE0pi9mcb
— Dr. Pradip Saikia, APS (@pradipsaikia_) June 18, 2022
प्रशासनाशी संपर्क साधावा
होजईचे उपायुक्त अनुपम चौधरी यांनी पीटीआयला सांगितले की, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलच्या जवानांनी 21 लोकांना पाण्यातून वाचवले आहे.त्यापैकी तीन बेपत्ता मुलांचा शोध सुरू आहे. जर लोकांना सुरक्षित ठिकाणी जायचे असेल तर त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे चौधरी म्हणाले. आम्ही त्यांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या बोटींनी बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहोत.
A man tries to save his #livestock from the flood water of river Kopili in Kampur, #Nagaon.#Assam #AssamFlood pic.twitter.com/Lq4xLLVSLM
— G Plus (@guwahatiplus) June 17, 2022
पुराचा कहर
कोपिली नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील 55,150 हून अधिक लोक पूरग्रस्त झाले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या पुराच्या पहिल्या तडाख्यात जिल्ह्याला मोठा फटका बसला होता. जिल्ह्यातील 47 मदत छावण्यांमध्ये एकूण 29,745 लोकांनी सुरक्षितस्थळी आसरा घेतला आहे.