भाजपला धक्क्यावर धक्के, NDA मधून आणखी एक मित्रपक्ष बाहेर

शिवसेना आणि अकाली दलाने एनडीएला रामराम ठोकल्यानंतर पश्चिम बंगालमधील गोरखा मुक्ती मोर्चाने देखील एनडीएमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे.

भाजपला धक्क्यावर धक्के, NDA मधून आणखी एक मित्रपक्ष बाहेर
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 10:39 PM

नवी दिल्ली :  भाजपला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. शिवसेना आणि अकाली दलाने एनडीएला रामराम ठोकल्यानंतर पश्चिम बंगालमधील गोरखा जनमुक्ती मोर्चाने (Gorkha janmukti Morcha) देखील एनडीएमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. (Gorkha janmukti Morcha Going to be out Of NDA)

गोरखा मुक्ती मोर्चाचे नेते बिमल गुरुंग यांनी आपण एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून (एनडीए) गोरखा जनमुक्ती मोर्चा बाहेर पडल्याने गेल्या काही काळातला एनडीएसाठी हा तिसरा धक्का आहे.

“भाजपने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. आम्ही त्यांच्यासोबत अनेक दिवस होतो. मात्र आम्हाला दिलेल्या आश्वासनांच्या दिशेने त्यांची पावले पडली नाही.  दुसरीकडे मात्र ममता बॅनर्जींनी आम्हाला दिलेली आश्वासने पाळली, आम्हाला दिलेले शब्द पाळले. म्हणून  2021 मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगालच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही तृणमुल काँग्रेसशी युती करुन लढणार आहोत”, असं बिमल गुरुंग यांनी जाहीर केलं.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी गोरख्यांना काही महत्त्वाची आश्वासने दिली होती. मात्र ती पूर्ण करण्यात त्यांना अपयश आलं आहे. त्यांनी आमच्या आश्वसनांची पूर्तता न केल्याने आम्ही एनडीएमधून बाहेर पडत आहोत”, असं गुरुंग म्हणाले.

थोड्या दिवसांपूर्वी अकाली दलाची एनडीएमधून एक्झिट 

मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून शिरोमणी अकाली दलाने मोठा निर्णय घेतला. अकाली दलाने थेट राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला. याआधी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात आपल्या कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अकाली दलाने थेट आघाडीतूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

शिवसेना-भाजपचा 28 वर्षांचा संसार मोडला

गेली 28 वर्ष शिवसेना भाजप एकत्र नांदत होती. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये दरी निर्माण झाली. याचं रुपांतर युती तुटण्यात झालं. अखेर महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याअगोदर केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सेनेने आपण एनडीमधून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं.

एकनाथ खडसेंचा भाजपला रामराम

तब्बल 40 वर्षांहून अधिक काळ पक्षासाठी झटणारे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी आज (बुधवार) भाजपचा गुडबाय केलं आहे. शुक्रवारी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपला मोठा फटका बसणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

(Gorkha janmukti Morcha Going to be out Of NDA)

संबंधित बातम्या

मोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा

वाढदिवशी पंतप्रधान मोदींना मोठा झटका, शेतकरी विधेयकाविरोधात महिला मंत्र्याचा राजीनामा

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.