भारतीय वायूसेना आणखी सक्षम, HAL चं लढाऊ हेलिकॉप्टर तयार

नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रात सध्या भारत नवनवीन प्रयोग करत आहे. दिवसेंदिवस आपल्या सुरक्षा उपक्रमांत वाढ होते आहे. शत्रूशी दोन हात करण्यासाठी भारताच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) वजनाने हलके असलेले लढाऊ हेलिकॉप्टर (एलसाएच) तयार करण्यात यश प्राप्त केले आहे. हे हेलिकॉप्टर आकाशातच शत्रूंच्या विमानांना मिसाईलने नष्ट करण्यात सक्षम आहेत. विशेष म्हणजे, या लढाऊ हेलिकॉप्टरमुळे आकाशात […]

भारतीय वायूसेना आणखी सक्षम, HAL चं लढाऊ हेलिकॉप्टर तयार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रात सध्या भारत नवनवीन प्रयोग करत आहे. दिवसेंदिवस आपल्या सुरक्षा उपक्रमांत वाढ होते आहे. शत्रूशी दोन हात करण्यासाठी भारताच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) वजनाने हलके असलेले लढाऊ हेलिकॉप्टर (एलसाएच) तयार करण्यात यश प्राप्त केले आहे. हे हेलिकॉप्टर आकाशातच शत्रूंच्या विमानांना मिसाईलने नष्ट करण्यात सक्षम आहेत. विशेष म्हणजे, या लढाऊ हेलिकॉप्टरमुळे आकाशात हालचाल करत असलेल्या टार्गेटवरही अचूक निशाणा साधता येतो. लवकरच हे हेलिकॉप्टर भारतीय वायूसेनेकडे सुपुर्द करण्यात येणार आहे.

‘देशात पहिल्यांदाच असं लढाऊ हेलिकॉप्टर तयार करण्यात  आलंय, ज्यातून आकाशातूनच शत्रूच्या विमानावर हल्ला शक्य आहे. या लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टरचे शस्त्रांसंबंधीचे सर्व परीक्षण पूर्ण झाले आहे. आता हे ऑपरेशन सेवांसाठी पूर्णपणे तयार आहे’, अशी माहिती एचएएलचे प्रमुख आर. माधवन यांनी दिली.

ओदिशाच्या चांदीपूर परीक्षण क्षेत्रावर या लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरचे यशस्वी परीक्षण घेण्यात आल्याची माहिती एचएएलचे प्रवक्‍ता गोपाल सुतर यांनी दिली. या परीक्षणादरम्यान हेलिकॉप्टरने यशस्वीरीत्या आपल्या ध्येयावर हवेत मिसाईलने निशाणा साधला. या परीक्षणात पायलट विंग कमांडर सुभाष पी जॉन (वीएम रिटायर्ड), एचएएलचे फ्लाईट इंजिनियर कर्नल रंजीत चितळे, भारतीय वायुसेनेचे टेस्‍ट पायलट ग्रुप कॅप्‍टन राजीव दुबे सहभागी होते.

मागील वर्षी या हेलिकॉप्टरने 20 एमएमची शक्तीशाली टुरेट गन आणि 70 एमएमच्या रॉकेटचेही यशस्वी परीक्षण करण्यात आले होते. हे हेलिकॉप्टर एकमेव असे हेलिकॉप्टर आहे, जे सियाचीनसारख्या दुर्मिळ उंची असलेल्या ठिकाणांवरही कार्य करण्यास समक्ष असल्याचा दावा एचएएलने केला आहे.

या हेलिकॉप्टरला एचएएलच्या रोटरी विंग रीसर्च अँड डिझाईन सेंटरने डिझाईन आणि विकसित केले आहे. याला भारतीय वायुसेनेच्या गरजा लक्षात घेत बनवण्यात आले आहे. याच्या वरील भागात विशेष इंफ्रारेड  साइटिंग सिस्‍टम लावण्यात आली आहे. यामुळे आत बसलेल्या पायलटला जमिनीवर आणि आकाशात असलेल्या शत्रूच्या कुठल्याही ठिकाणावर किंवा ध्येयावर निशाणा लावण्यात मदत मिळते.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणं असेलेल्या या हेलिकॉप्टरला पायलट न वळवताही निशाण्यावर मिसाईल सोडू शकतो. यातील मिसाईल हे मानवरहित विमान (यूएव्ही) तसेच अनेक लहान विमानांना नष्ट करण्यात सक्षम आहे. विपरित परिस्थितीतही हे हेलिकॉप्टर उडू शकतं. त्यासोबतच खालच्या उंचीवरही उडू शकतं.

डिफेंस एक्‍विजिशन काउंसिल (डीएसी)ने सध्या असे 15 हेलिकॉप्टर विकत घेण्यास मान्यता दिली आहे. यापैकी 10 हे भारतीय वायुसेना तर 5 भारतीय लष्कराला दिले जातील.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.