नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन म्हणतात, जय श्री रामच्या घोषणा केवळ मारहाणीसाठी!
जय श्रीराम या घोषणेचा बंगालच्या संस्कृतीशी काहीही संबंध नाही. केवळ लोकांना मारहाण करण्यासाठी जय श्रीरामचे नारे देण्यात येत आहेत, असं अमर्त्य सेन म्हणाले.
कोलकाता: नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ यांनी जय श्रीरामच्या घोषणावरुन उठललेल्या वादंगावर भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या होत्या. त्याबाबत अमर्त्य सेन यांनी जय श्री रामचा नारा ही बंगाली संस्कृती नाही असं म्हटलं आहे. अमर्त्य सेन यांनी जाधवपूर विद्यापीठातील एका कार्यक्रमात संबोधित केलं. त्यावेळी अमर्त्य सेन यांनी देशातील सध्याच्या घडामोडींवर भाष्य केलं.
जय श्रीराम या घोषणेचा बंगालच्या संस्कृतीशी काहीही संबंध नाही. केवळ लोकांना मारहाण करण्यासाठी जय श्रीरामचे नारे देण्यात येत आहेत, असं अमर्त्य सेन म्हणाले.
“दुर्गा माता बंगाली नागरिकांच्या जीवनात सर्वत्र आहे. बंगालमध्ये दुर्गेची पूजा होते. जय श्री रामची घोषणा बंगाली संस्कृती नाही. मात्र आजकाल राम नवमी लोकप्रियता मिळवत आहे”, असंही सेन यांनी नमूद केलं.
Nobel laureate Amartya Sen in Kolkata: I haven’t heard Jai Shri Ram earlier. It is now used to beat up people. I think it is has no association with Bengali culture. Nowadays, Ram Navami is celebrated more in Kolkata which I haven’t heard earlier. (July 5) pic.twitter.com/s10MPWj9un
— ANI (@ANI) July 6, 2019
मी माझ्या चार वर्षाच्या नातीला तुझा आवडता देव कोणता हे विचारलं. त्यावर तिने दुर्गा मातेचं नाव घेतलं. त्यामुळे आपल्या आयुष्यात दुर्गामातेचं स्थान आहे. मला वाटतं जय श्रीरामचे नारे केवळ लोकांना मारहाण करण्यासाठी वापरले जात आहेत, असं अमर्त्य सेन यांनी सांगितलं.
कोण आहेत अमर्त्य सेन?
- अमर्त्य सेन हे भारताचे नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ आहेत.
- भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ अशी त्यांची ओळख आहे.
- बंगाली भाषिक असलेल्या अमर्त्य सेन यांना 1999 मध्ये ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात आलं आहे.
- ‘कल्याणाभिमुख अर्थशास्त्र’ आणि ‘सामाजिक पर्याय सिद्धांत’ या विषयातील कार्यासाठी 1998 मध्ये त्यांना अर्थशास्त्रातलं ‘नोबेल’ पारितोषिक मिळालं.
- अमर्त्य सेन यांचं शिक्षण कोलकात्यातील शांतिनिकेतन आणि प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पूर्ण झालं. त्यानंतर पुढील शिक्षण केंब्रिजच्या ट्रिनिटी विद्यापीठात घेतलं.
- भारत सरकारच्या नालंदा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी 2007 मध्ये बनवलेल्या ‘नालंदा मार्गदर्शक समूहा’चे ते अध्यक्ष आहेत.
- अमर्त्य सेन यांनी भारतासह परदेशी विद्यापीठांमध्ये लेक्चर्स दिली आहेत.