‘रेप इन इंडिया’ प्रकरणी निवडणूक आयोगाची झारखंड मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाची खिल्ली उडवताना 'रेप इन इंडिया' अशी टिप्पणी केली होती.

'रेप इन इंडिया' प्रकरणी निवडणूक आयोगाची झारखंड मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस
Follow us
| Updated on: Dec 16, 2019 | 9:59 AM

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने झारखंड मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे उत्तर मागितलं (Jharkhand Chief Electoral Officer) आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाची खिल्ली उडवताना ‘रेप इन इंडिया’ अशी टिप्पणी केली होती. त्यानंतर स्मृती इराणी यांच्या नेतृत्वात भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभेत गोंधळ घातला. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने सुरुवातीला, निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावल्याचं वृत्त दिलं होतं. त्यानंतर झारखंड मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्याचं स्पष्ट करण्यात आलं.

‘इतिहासात प्रथमच अशी घटना घडली आहे की भारतीय महिलांवर बलात्कार केला जावा, असं वक्तव्य नेता करत आहेत. हा राहुल गांधींचा संदेश देशातील जनतेला आहे का?’ असा प्रश्न स्मृती इराणी यांनी उपस्थित केला होता. राहुल गांधी यांनी माफी मागावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी इराणी यांनी (Jharkhand Chief Electoral Officer) केली होती.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

‘भारत देश जगात बलात्काराची राजधानी म्हणून ओळखला जातो. परदेशी राष्ट्रं प्रश्न विचारत आहेत की भारत आपल्या मुली आणि बहिणींचा सांभाळ करण्यात सक्षम का ठरत नाही? उत्तर प्रदेशातील एका भाजपच्या आमदाराने एका महिलेवर बलात्कार केला आणि पंतप्रधान एक शब्दही बोलत नाहीत.’ अशा शब्दात केरळमधील वायनाडमध्ये खासदार राहुल गांधी यांनी टीका केली होती.

मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे, मरण पत्करेन पण माफी मागणार नाही : राहुल गांधी

‘आता जिकडे बघाल, तिथे रेप इन इंडिया. वर्तमानपत्र उघडा, झारखंडमध्ये महिलेवर बलात्कार, उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदींच्या आमदाराने महिलेवर रेप केला. त्यानंतर गाडीचा अपघात झाला, नरेंद्र मोदी एक शब्दही नाही बोलले. प्रत्येक राज्यात रेप इन इंडिया. नरेंद्र मोदी म्हणाले मुली शिकवा, मुली वाचवा, पण तुम्ही हे नाही सांगितलंत की कोणापासून वाचवायचं आहे. भाजपच्या आमदारांपासून वाचवायचं आहे’ असं राहुल गांधी झारखंडमधील गोडामध्ये बोलले होते.

राहुल गांधींच्या ‘रेप इन इंडिया’वरुन स्मृती इराणी संसदेत आक्रमक, कनिमोळींकडून बचाव

राहुल गांधींचा पाय खोलात

भाजप खासदारांनी राहुल गांधींच्या माफीनाम्याची मागणी उचलून धरली होती. त्यानंतर, भाजपची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. मरण पत्करेन पण माफी मागणार नाही, असा आक्रमक पवित्रा राहुल गांधी यांनी घेतला होता. त्यानंतर देशभरातून राहुल गांधींविरोधात संतापाची लाट पसरली होती. फक्त भाजपच नाही, तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही निषेध नोंदवला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी सावरकरप्रेमींनी राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं.

Jharkhand Chief Electoral Officer

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.