दिल्ली पोलिसांना फटकारणाऱ्या न्यायमूर्तींची बदली, काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

दिल्ली हायकोर्टातील न्यायमूर्ती एस मुरलीधर (Justice Muralidhar transfer) यांच्या अचानक बदलीने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

दिल्ली पोलिसांना फटकारणाऱ्या न्यायमूर्तींची बदली, काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Feb 27, 2020 | 11:25 AM

नवी दिल्ली : दिल्ली हायकोर्टातील न्यायमूर्ती एस मुरलीधर (Justice Muralidhar transfer) यांच्या अचानक बदलीने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. न्यायमूर्ती एस मुरलीधर यांनी दिल्लीतील हिंसाचाराप्रकरणी बुधवारी झालेल्या महत्वाच्या सुनावणीवेळी दिल्ली पोलिसांना फटकारलं होतं. त्यांनतर दुसऱ्याच दिवशी न्यायमूर्ती मुरलीधर यांची बदली झाल्याने विरोधकांकडून मोदी सरकारवर आरोप केले जात आहेत. (Justice Muralidhar transfer)

न्यायमूर्ती मुरलीधर यांची बदली पंजाब आणि हायकोर्टाचे न्यायमूर्तीपदी करण्यात आली आहे. मुरलीधर यांनी दिल्ली हिंसाचाराची सुनावणी गुरुवारपर्यंत स्थगित केली होती. त्यानंतर ही सुनावणी मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंठपीठाकडे सोपवण्यात आली.

राष्ट्रपती भवनातून अधिसूचना जारी

न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या बदलीची अधिसूचना राष्ट्रपती भवनातून जारी झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर, न्यायमूर्ती मुरलीधर यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात करण्यात आली.

12 फेब्रुवारीलाच बदलीचा निर्णय

दरम्यान, न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या बदलीचा निर्णय हा काल किंवा आज झालेला नाही तर 12 फेब्रुवारीलाच झाल्याची माहिती मिळत आहे. न्यायमूर्तींची बदली ही सुप्रीम कोर्टाचे 5 ज्येष्ठ न्यायमूर्तींचं कॉलेजियम करत असतं. या कॉलेजियमने 12 फेब्रुवारीलाच मुरलीधर यांच्या बदलीची शिफारस करण्यात आली होती.

हायकोर्टाने पोलिसांना फटकारलं

दिल्ली हिंसाचारावर सुनावणी करताना हायकोर्टाने कडक ताशेरे ओढत दिल्ली पोलिसांना फटकारलं होतं. दिल्लीमध्ये दुसरा 1984 ची घटना होऊ देणार नाही , असं कोर्टाने म्हटलं होतं.

काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

दरम्यान, या बदलीनंतर काँग्रेसने  मोदी सरकारवर हल्ला चढवला. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्विट करत, “न्यायमूर्ती मुरलीधर यांची मध्यरात्री बदली हे सध्याचं सरकार पाहता आश्चर्यकारक नाही. मात्र निश्चितच हे दु:खद आणि लाजीरवाणं आहे. कोट्यवधी भारतीयांचा न्यायपालिकेवर विश्वास आहे. हा विश्वासघात करणे आणि न्यायपालिका पायदळी तुडवणे हे निंदनीय आहे” असं म्हटलं.

राहुल गांधींकडू न्यायमूर्ती लोयांची आठवण

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना, न्यायमूर्ती लोयांची आठवण काढली. “बहादूर न्यायमूर्ती लोया यांची आठवण येते, ज्यांची बदली केली नव्हती”, असं राहुल गांधी म्हणाले.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.