पराभव का झाला? कारणं शोधण्यासाठी राहुल गांधी अमेठीला जाणार

अमेठी हा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. पण हा पराभव काँग्रेससह राहुल गांधींच्याही जिव्हारी लागणारा होता. कारण, सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मतदारसंघात चक्क पक्षाच्या अध्यक्षालाच पराभव स्वीकारावा लागला होता.

पराभव का झाला? कारणं शोधण्यासाठी राहुल गांधी अमेठीला जाणार
Follow us
| Updated on: Jul 08, 2019 | 7:52 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी सर्वात धक्कादायक निकाल होता तो म्हणजे अमेठीचा. काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांचा या मतदारसंघातून पराभव झाला. या पराभवाची कारणं शोधण्यासाठी राहुल गांधी 10 जुलैला अमेठीत जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. अमेठी हा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. पण हा पराभव काँग्रेससह राहुल गांधींच्याही जिव्हारी लागणारा होता. कारण, सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मतदारसंघात चक्क पक्षाच्या अध्यक्षालाच पराभव स्वीकारावा लागला होता.

सूत्रांच्या माहितीनुसार, या एकदिवसीय दौऱ्यात राहुल गांधी मतदारसंघातल्या लोकांशीही चर्चा करतील. अमेठीमध्ये भाजपच्या उमेदवार आणि विद्यमान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विजय मिळवला होता. राहुल गांधींनी यावेळी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांनी केरळमधील वायनाडमधून विजय मिळवला.

काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सध्या ते पक्षाच्या कामासाठी विविध दौरे करत आहेत. पक्ष बांधणी करण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात, असं राहुल गांधींनी राजीनामा देताना म्हटलं होतं. काँग्रेसकडून आता नवा पक्षाध्यक्ष निवडला जाणार आहे.

राहुल गांधींनी नुकतीच राजीनाम्याची अधिकृत घोषणा केली होती. पण पक्षाने अधिकृतपणे त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. विशेष म्हणजे 10 जुलैलाच काँग्रेसच्या कार्यकारिणीचीही बैठक होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये राहुल गांधींचा राजीनामा स्वीकारण्याबाबत निर्णय होईल. नवा अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेणार नसल्याचं राहुल गांधींनी अगोदरच स्पष्ट केलंय.

संबंधित बातम्या :

अखेर अध्यक्षपदावरुन पायउतार, राहुल गांधींचं 4 पानी पत्र जसंच्या तसं

अध्यक्षपदाचा राजीनामा, आर्टिकल 15 पाहण्यासाठी राहुल गांधी थिएटरमध्ये

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.