राहुल गांधींची काश्मीर दौऱ्याची तयारी, पण अगोदरच ‘रेड सिग्नल’

कलम 370 हटवल्यानंतर राहुल गांधींचा (Rahul Gandhi) हा पहिलाच दौरा आहे, ज्यात ते अनेक नेत्यांना सोबत घेऊन जाणार आहेत. यापूर्वी काही नेत्यांना श्रीनगर विमानतळाहूनच परत पाठवण्यात आलं होतं.

राहुल गांधींची काश्मीर दौऱ्याची तयारी, पण अगोदरच 'रेड सिग्नल'
Follow us
| Updated on: Aug 23, 2019 | 9:32 PM

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 9 विरोधी पक्ष नेत्यांना घेऊन जम्मू काश्मीरला जाण्याची तयारी केली आहे. पण शनिवारसाठी नियोजित असलेला हा दौरा होणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. कारण, जम्मू काश्मीर प्रशासनाने कोणत्याही नेत्याला येण्यास मनाई केली आहे. कलम 370 हटवल्यानंतर राहुल गांधींचा (Rahul Gandhi) हा पहिलाच दौरा आहे, ज्यात ते अनेक नेत्यांना सोबत घेऊन जाणार आहेत. यापूर्वी काही नेत्यांना श्रीनगर विमानतळाहूनच परत पाठवण्यात आलं होतं.

काश्मीरच्या लोकांशी संवाद साधण्यासाठी राहुल गांधी जाणार असल्याचं काँग्रेसने म्हटलंय. या दौऱ्यात राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, सीपीआयचे डी राजा, सीपीआयएमचे सीताराम येचुरी, डीएमके नेता, राष्ट्रवादीचे माजिद मेमन, आरजेडीचे मनोज झा यांचा समावेश आहे. यापूर्वी जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी राहुल गांधींना भेट देण्याचं निमंत्रण दिलं होतं.

जम्मू काश्मीर प्रशासनाकडून रेड सिग्नल

राजकीय नेत्यांनी सध्या जम्मू काश्मीरमध्ये येऊ नये, असं आवाहन राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने केलंय. सरकारकडून लोकांना दहशतवादी आणि फुटीरतावाद्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, ज्यात हळूहळू सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये वरिष्ठ राजकीय नेत्यांनी सामान्य परिस्थितीमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. राजकीय नेत्यांना विनंती आहे, की त्यांनी श्रीनगरला भेट देऊन इतरांना अडथळा निर्माण करु नये. या नेत्यांकडून सध्या अनेक भागात लागू असलेल्या आदेशांचंही उल्लंघन केलं जाईल. कायदा आणि सुव्यवस्था राखणे, लोकांना सुरक्षित ठेवणे यालाच सध्या महत्त्व दिलं जाईल, याची वरिष्ठ नेत्यांनी नोंद घ्यावी, असं आवाहन प्रशासनाने केलंय.

गुलाम नबी आझाद दोन वेळा माघारी परतले

यापूर्वी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला होता. राहुल गांधी काश्मीरच्या परिस्थितीविषयी खोटं बोलत असल्याचं ते म्हणाले होते. तर कलम 370 हटवल्यानंतर गुलाम नबी आझाद श्रीनगरसाठी रवाना झाले, पण त्यांना श्रीनगर विमानतळाहूनच परत पाठवण्यात आलं. तर दुसऱ्या वेळी जम्मू विमानतळाहून दिल्लीला पाठवण्यात आलं.

केंद्र सरकारने जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन नव्या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करत कलम 370 मधील दोन तरतुदी हटवल्या होत्या. यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हजारोंच्या संख्येने सैन्य तैनात करण्यात आलं आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.