1984 ला झालं ते झालं, आत्ताचं बोला, शिख दंगलींवर सॅम पित्रोदांचं वक्तव्य

नवी दिल्ली : काँग्रेसचे मार्गदर्शक सॅम पित्रोदा यांच्या शिख दंगलीवरील वक्तव्याने नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे. 1984 च्या शिख दंगलींवर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की, तेव्हा जे झालं ते झालं, ते सोडा तुम्ही (मोदी सरकार) गेल्या पाच वर्षात काय केलं ते सांगा, असं ते म्हणाले. 1984 चं प्रकरण हा भूतकाळ आहे, […]

1984 ला झालं ते झालं, आत्ताचं बोला, शिख दंगलींवर सॅम पित्रोदांचं वक्तव्य
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:46 PM

नवी दिल्ली : काँग्रेसचे मार्गदर्शक सॅम पित्रोदा यांच्या शिख दंगलीवरील वक्तव्याने नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे. 1984 च्या शिख दंगलींवर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की, तेव्हा जे झालं ते झालं, ते सोडा तुम्ही (मोदी सरकार) गेल्या पाच वर्षात काय केलं ते सांगा, असं ते म्हणाले. 1984 चं प्रकरण हा भूतकाळ आहे, आत्ताचं बोला, असं वक्तव्य पित्रोदा यांनी केलं. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे.

पंजाबमधील प्रचारात 1984 ची शिख दंगल हा मुद्दा बनवला जात असून त्याला दिवंगत पंतप्रधान जबाबदार होते, असा भाजपचा आरोप आहे. यावर सॅम पित्रोदा यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यावर ते म्हणाले, “तुम्ही (सरकार) तर रोज खोटं बोलता, 1984 चं आत्ता काय आलं? तुम्ही पाच वर्षात काय केलं त्याविषयी बोला. 1984 ला जे झालं ते झालं, तुम्ही काय केलं? रोजगार निर्मितीसाठी तुम्हाला मत दिलं, ते तुम्ही केलं नाही. 200 स्मार्ट शहरांसाठी तुम्हाला मतदान मिळालं, पण तेही तुम्ही केलं नाही. तुम्ही काही केलं नाही म्हणून असे मुद्दे उकरुन काढले जात आहेत. थांबवा हे”.

नानावटी आयोगाने शिख दंगलींची चौकशी केली होती, जो भारताचा मोठा नरसंहार होता. लोकांना मारण्याच्या सूचना थेट पंतप्रधान राजीव गांधींच्या कार्यालयातून आल्या होत्या, असा आरोप भाजपने एका ट्वीटच्या माध्यमातून केलाय. यावर आरोप आणि प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर या निवडणुकीत राजीव गांधींच्या नावाची एंट्री झाली. मोदींनी राजीव गांधींना भ्रष्टाचारी नंबर वन असं संबोधलं होतं. त्यानंतर पुन्हा एक आरोप मोदींनी केला. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी युद्धनौका आयएनएस विराटचा वापर कौटुंबीक सुट्टी साजरी करण्यासाठी केला होता, असं मोदी म्हणाले.

VIDEO :

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.