समद्र किनाऱ्यावर होतं कपल, वाटलं लाटेत पत्नी बुडाली, हेलिकॉप्टरने शोधूनही सापडेना.. मग आला व्हॉईस मेसेज, म्हणाली..
पत्नी साई प्रिया समुद्राकडे पाय धुण्यासाठी म्हणून गेली होती. मात्र ती परत आलीच नाही. श्रीनिवास यांच्या तक्रारीनंतर पोलीस आणि शहर प्रशासनाने नैदलाच्या हेलिकॉप्टरने आणि विशेष पोहणाऱ्यांकडून तिचा तपास केला. मात्र दोन दिवसांच्या तपासानंतर त्यांच्या पदरी निराशाच पडली. नंतर मात्र जे घडले ते अविश्वसनीय असेच म्हणावे लागेल.
विशाखापट्टणम- आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम (Vishakhapatnam)समुद्र किनाऱ्यावर (beach)एक विवाहित महिला बेपत्ता झाली होती. मा्त्र ती सुरक्षित असल्याचे एखाद्या फिल्मी ट्विस्टप्रमाणे (filmy twist)समोर आले आहे. बंगळुरुत ती तिच्या प्रियकरासोबत सुखरुप आणि सुरक्षित आहे. साई प्रिया आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी, पती श्रीनिवास यांच्यासोबत सोमवारी आर के बीचवर फिरण्यासाठी पोहचली होती. त्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली. पती श्रीनिवास यांना वाटले की समद्रातील लाटांमध्ये ती वाहून गेली आणि बुडाली. त्यांनी आपली पत्नी बुडाल्याची तक्राही नोंदवली. त्यांनी सांगितले होते की, ते दोघेही समुद्र किनाऱ्यावर असताना थोडा वेळ वेगवेगळे झाले होते. त्यावेळी पत्नी साई प्रिया समुद्राकडे पाय धुण्यासाठी म्हणून गेली होती. मात्र ती परत आलीच नाही. श्रीनिवास यांच्या तक्रारीनंतर पोलीस आणि शहर प्रशासनाने नैदलाच्या हेलिकॉप्टरने आणि विशेष पोहणाऱ्यांकडून तिचा तपास केला. मात्र दोन दिवसांच्या तपासानंतर त्यांच्या पदरी निराशाच पडली. नंतर मात्र जे घडले ते अविश्वसनीय असेच म्हणावे लागेल.
प्रशासनाची माफी मागते, महिलेने सांगितले
शहरातील पोलीस स्टेशनचे इन्सपेक्टर रामाराव यांनी सांगितले की, बुधवारी साई प्रिया यांच्या नातेवाईकांना व्हायट्स्पवर साई प्रियाचा व्हॉईस मेसेज आला. त्यात तिने सांगितले की, मी साई प्रिया बोलत आहे. मी जिवंत आहे आणि प्रियकर रवी याच्यासोबत सुरक्षित आहे. आम्ही दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांच्या प्रेमात होतो. आता आम्ही लग्न केले आहे. मला शोधण्याचा प्रयत्न करु नका. मी पळून पळून थकले आहे. जर जास्त दबाव टाकाल तर जीवाचं काहीतरी बरंवाईट करुन घेईन. घडलेल्या प्रकाराबाबत मी पोलीस आणि प्रशासनाची क्षमा मागते. रवीच्या कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रयत्न करु नका.या सगळ्यात त्यांचा कहीही दोष नाहीये.
मोबाईल डेटावरुन बंगळुरुत असल्याची माहिती
साई प्रिया हिच्या मोबाईल कॉल डेटाच्या माहितीवरुन ती आपल्या प्रियकरासोबत बंगळुरुत असल्याची पोलिसांची माहिती आहे. श्रीनिवास आणि साई प्रिया यांच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती. कॉम्प्युटर कोटिंग क्लासच्या नावाखाली प्रिया विशाखापट्टणम येथे राहत असे. हे दोघेही एकमेकांसोबत आनंदी नव्हते. मात्र या सगळ्यात साईप्रियाच्या सर्च ऑपरेशनसाठी प्रशाससाने सुमारे एक कोटींचा खर्च केल्याची माहिती आहे. या प्रकाराने प्रशासन आणि पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. साई प्रिया आणि रवीच्या प्रेमप्रकरणाचा फटका नाहक विशाखापट्टणमच्या पोलीसांना आणि प्रशासनाला बसला अशी चर्चा सध्या सुरु आहे.