यूपीएससीच्या मुलाखतीत नापास झालं तरीही नोकरी मिळणार!

नवी दिल्ली : देशातली सर्वात अवघड परीक्षा असलेल्या यूपीएससीमध्ये लवकरच नवे बदल होण्याची शक्यता आहे. दिवस-रात्र मेहनत करुन उमेदवार पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पास होतात. पण अनेक उमेदवार मुलाखतीमध्ये नापास होतात, काही जण अवघ्या एक ते दोन गुणांनीही संधी गमावून बसतात. त्यामुळे मुलाखतीत नापास झालेल्या उमेदवारांसाठी यूपीएससी लवकरच नवी योजना आणणार आहे. मुलाखतीत नापास […]

यूपीएससीच्या मुलाखतीत नापास झालं तरीही नोकरी मिळणार!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

नवी दिल्ली : देशातली सर्वात अवघड परीक्षा असलेल्या यूपीएससीमध्ये लवकरच नवे बदल होण्याची शक्यता आहे. दिवस-रात्र मेहनत करुन उमेदवार पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पास होतात. पण अनेक उमेदवार मुलाखतीमध्ये नापास होतात, काही जण अवघ्या एक ते दोन गुणांनीही संधी गमावून बसतात. त्यामुळे मुलाखतीत नापास झालेल्या उमेदवारांसाठी यूपीएससी लवकरच नवी योजना आणणार आहे. मुलाखतीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दुसरीकडे नोकरी दिली जाईल.

मुलाखतीत जे विद्यार्थी यशस्वी होत नाहीत, त्यांचीही भरती करण्यात यावी, अशी शिफारस केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीने केंद्रीय मंत्रालये आणि विविध एजन्सीजना केली आहे. यूपीएससीचा हा प्रस्ताव मान्य झाल्यास अवघ्या काही गुणांनी संधी हुकलेल्या मुलांसाठी नवी आशा निर्माण होईल.

न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, यूपीएससीचे चेअरमन अरविंद सक्सेन यांनी याबाबत माहिती दिली आहे. यूपीएससीने केंद्र सरकार आणि विविध मंत्रालयांना अशा विद्यार्थ्यांनी भरती करण्याचा प्रस्ताव दिलाय, जे नागरी सेवा आणि इतर परीक्षांच्या मुलाखतीच्या फेरीमध्ये बाद होतात. ओदिशामध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या संमेलनात बोलताना त्यांनी ही गोष्ट सांगितली.

अरविंद सक्सेना यांच्या मते, एक वर्षात जवळपास 11 लाख उमेदवार यूपीएससीच्या परीक्षेत सहभाग घेतात. नंतर पूर्व, मुख्य आणि मुलाखत झाल्यानंतर 600 उमेदवारांची निवड होते. अनेक उमेदवार शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतात, पण रँक येत नाही. सरकारकडून या मुलांबाबत विचार केला जाऊ शकतो. कारण, ते अगोदरच अत्यंत कठीण प्रक्रियेतून अंतिम टप्प्यापर्यंत आलेले असतात. हा प्रस्ताव मान्य झाल्यास परीक्षार्थींचा तणाव कमी करण्यास मदत होईल. शिवाय त्यांच्यात नोकरी करण्याची आशाही जीवंत राहिल, असं अरविंद सक्सेना म्हणाले.

यूपीएससीची परीक्षा अत्यंत साधी आणि फ्रेंडली बनवण्यासाठी विविध प्रयत्न केले जात असल्याचंही अरविंद सक्सेना यांनी सांगितलं. येत्या नागरी सेवेच्या पूर्व परीक्षेत परीक्षार्थींना अर्ज मागे घेण्याचाही पर्याय दिला जाणार आहे. शिवाय ऑनलाईन परीक्षा घेण्याचा प्रयत्नही यूपीएससीकडून केला जाणार असल्याचं ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.