Viral Video : भरगच्च रिक्षा पोलिसांनी थांबवली, रिक्षातून उतरले तीन-चार नव्हे, 24 जण!

तेलंगणामध्ये वाहतूक पोलिसांनी एक भरगच्च रिक्षा थांबवली असता, त्यामधून एक-एक करुन तब्बल 24 जण उतरले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Video : भरगच्च रिक्षा पोलिसांनी थांबवली, रिक्षातून उतरले तीन-चार नव्हे, 24 जण!
Follow us
| Updated on: Aug 13, 2019 | 3:38 PM

Viral Video हैदराबाद : आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना गाडीत भरल्यास अपघाताला निमंत्रण मिळू शकतं, असा इशारा वाहतूक पोलिसांकडून वारंवार दिला जातो. मात्र वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवण्याचा प्रकार आपल्याकडे नवीन नाही. तेलंगणामध्ये (Telangana Rickshaw) सहाआसनी रिक्षात दाटीवाटीने भरलेल्या काही प्रवाशांना वाहतूक पोलिसांनी थांबवलं आणि पुढे जे घडलं, ते बघून तुमचीही बोटं तोंडात जातील.

तेलंगणातील करिमनगर पोलिस आयुक्तांनी ट्विटरवर शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ‘लोकांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी स्वतःच घ्यावी. भरलेल्या ऑटोरिक्षामध्ये बसू नये’ असं आवाहन हा व्हिडीओ शेअर करताना पोलिसांनी केलं आहे.

हा व्हिडीओ खरं तर डोळ्यात अंजन घालण्याच्या उद्देशाने शेअर करण्यात आला आहे. मात्र तो पाहून हसावं की रडावं, अशी काहीशी आपली स्थिती होती. दाक्षिणात्य भाषा तुमच्या डोक्यावरुन जात असली, तरी हा व्हिडीओ दृष्य स्वरुपात बोलका आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

तिम्मापूरमधील एका सहाआसनी रिक्षाला वाहतूक पोलिसांनी अडवलं. एकीकडे आसन क्षमतेपेक्षा अधिक जणांना बसवल्याबद्दल पोलिस त्याला फैलावर घेत होते. व्हिडीओ शूट करत करत रिक्षाचालकाची चौकशी सुरु होती. त्याचवेळी पोलिसांनी एक-एक करुन प्रवाशांना उतरायला सांगितलं. प्रवाशांचं काऊण्टडाऊन काही केल्या थांबायचं नाव घेईना.

प्रामुख्याने महिला प्रवासी या रिक्षात बसल्या होत्या, तर चिमुरडी पोरं त्यांच्या मांडीवर किंवा जागा मिळेल तिथे सामावून गेली होती. आधी हाताच्या बोटांवर मावतील, इतके प्रवासी असल्याचं पोलिसांनी वाटलं. मात्र रिक्षातून उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या काही संपेना. एकामागून एक, एकामागून एक महिला आणि लहानगी उतरतच होती.

सर्व जण उतरुन झाल्यावर संख्या मोजली तेव्हा ती भरली आठ-दहा नव्हे, पंधरा-वीस नाही, तर तब्बल 24! दोन दिवसात या व्हिडीओला पाचशेच्या घरात रिट्वीट्स मिळाले आहेत, तर जवळपास 25 हजार जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

गेल्याच आठवड्यात तेलंगणातील महबूबनगरमध्ये बारा कामगारांनी भरलेल्या रिक्षाला ट्रकने धडक दिल्यानंतर सहा जणांचा मृत्यू झाला होता. एकीकडे रस्ते सुरक्षा वाढवण्याच्या उद्देशाने कठोर नियम आखत दंड वाढवण्याची तरतूद असलेलं मोटार वाहन दुरुस्ती विधेयक राज्यसभेत पास झालं, तर दुसरीकडे निर्ढावलेल्या रिक्षाचालकांनी प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार सुरुच ठेवला आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.