‘या’ कारणामुळे विंग कमांडर अभिनंदन यांची बदली

श्रीनगर : बालाकोट एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानी वायूदलाला चोख उत्तर देणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची बदली करण्यात आली आहे. काश्मीरमध्ये अभिनंदन यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची बदली श्रीनगर एअरबेसच्या बाहेर करण्यात आली आहे. आता पश्चिम सेक्टरमधील एअरबेसमध्ये ते काम करतील, असं म्हटलं जात आहे. अभिनंदन सर्वात पहिल्यांदा 27 एप्रिलला चर्चेत आले होते. ज्यावेळेस पाकिस्तानचे लढाऊ […]

'या' कारणामुळे विंग कमांडर अभिनंदन यांची बदली
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

श्रीनगर : बालाकोट एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानी वायूदलाला चोख उत्तर देणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची बदली करण्यात आली आहे. काश्मीरमध्ये अभिनंदन यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची बदली श्रीनगर एअरबेसच्या बाहेर करण्यात आली आहे. आता पश्चिम सेक्टरमधील एअरबेसमध्ये ते काम करतील, असं म्हटलं जात आहे.

अभिनंदन सर्वात पहिल्यांदा 27 एप्रिलला चर्चेत आले होते. ज्यावेळेस पाकिस्तानचे लढाऊ विमान एफ-16 ने भारतात घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना रोखण्यासाठी भारतीय वायूसनेने प्रतिउत्तर दिले होते. भारतीय वायूसनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी एफ-16 या विमानाला मिग विमानाच्या सहाय्याने पाडले होते. यावेळी अभिनंदन यांचे विमानही कोसळले आणि ते पाकिस्तानच्या हद्दीत पडले आणि त्यांना अटक करण्यात आली होती.

भारताच्या जवानाला पाकिस्तानमध्ये अटक झाल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. यावेळी भारत सरकारवरही मोठ्या प्रमाणात जनतेकडून दबाव टाकण्यात आला होता. भारत सरकारनेही पाकिस्तानवर दबाव टाकत अभिनंदन यांना सोडण्यासाठी मजबूर केले. पाकिस्ताननेही साठ तासानंतर अभिनंदन यांना सोडले.

पाकिस्तानच्या हद्दीत अभिनंदन फसल्यानंतर त्यांना तेथील स्थानिक रहिवाशांकडून मारहाणही झाली होती. पण वेळीच पाकिस्तान सैन्याने अभिनंदन यांना अटक केले. यावेळी पाकिस्तान सैन्याला विंग कमांडर यांनी रोखठोक अशी उत्तर दिली होती हे पाहून भारतीयांनाही गर्व वाटत होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.