Photo : शेतकऱ्याच्या स्वप्नांचा चुराडा, शॉर्टसर्किटमुळे अडीच एकरातील ऊस भस्मसात

लासलगाव : ऊस गाळप हंगामाच्या अंतिम टप्प्यात ऊस साखर कारखान्यावर जाण्याऐवजी फडातच त्याची राखरांगोळी होण्याच्या घटना वाढत आहेत. महावितरणच्या गलथान कारभारामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. सध्या गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असताना शेतकरी वाढीव उत्पादनाचे स्वप्न पाहत आहे. मात्र, एका रात्रीतून शेतकऱ्यांच्या या स्वप्नांचा चुराडा होत आहे. कारण शार्ट सर्किटमुळे ऊसाला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे उत्पादन तर सोडाच पण झालेला खर्चही निघत नाही अशी अवस्था आहे. सिन्नर तालुक्यातील वल्हेवाडी शिवारातील निवृत्ती यादव यांचा अडीच एकरातील ऊस याच कारणामुळे जळाला आहे. त्यामुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

| Updated on: Feb 18, 2022 | 11:00 AM
पुढील आठवड्यात होती तोडणी: वर्षभर निवृत्ती यादव यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे ऊसाची जोपासणा केली होती. त्यामुळे किती टन ऊस होईल याची गणितेही यादव हे मांडत होते. पण एका ठिणगीमुळे क्षणार्धात त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.

पुढील आठवड्यात होती तोडणी: वर्षभर निवृत्ती यादव यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे ऊसाची जोपासणा केली होती. त्यामुळे किती टन ऊस होईल याची गणितेही यादव हे मांडत होते. पण एका ठिणगीमुळे क्षणार्धात त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.

1 / 5
ऊसावरच होते सर्वकाही अवलंबून: निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शिवाय रब्बी हंगामावर बदलत्या वातावरणाचा धोका आहेच. त्यामुळे ऊसातूनच उत्पन्नात वाढ होईल असा विश्वास यादव यांना होता. मात्र, तोड काही दिवसांवर आली असतानाच ही दुर्घटना घडली आहे.

ऊसावरच होते सर्वकाही अवलंबून: निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शिवाय रब्बी हंगामावर बदलत्या वातावरणाचा धोका आहेच. त्यामुळे ऊसातूनच उत्पन्नात वाढ होईल असा विश्वास यादव यांना होता. मात्र, तोड काही दिवसांवर आली असतानाच ही दुर्घटना घडली आहे.

2 / 5
अडीच एकरातील ऊसाचे नुकसान: निवृत्ती यादव यांनी अडीच एकरामध्ये ऊसाची लागवड केली होती. इतर पिकांचे तर नुकसान झाले पण ऊसातून निश्चित उत्पन्न मिळणार म्हणून त्यांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्याची जोपासना केली होती. अखेर आगीमुळे अडीच एकरातील ऊस जळून खाक झाला आहे.

अडीच एकरातील ऊसाचे नुकसान: निवृत्ती यादव यांनी अडीच एकरामध्ये ऊसाची लागवड केली होती. इतर पिकांचे तर नुकसान झाले पण ऊसातून निश्चित उत्पन्न मिळणार म्हणून त्यांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्याची जोपासना केली होती. अखेर आगीमुळे अडीच एकरातील ऊस जळून खाक झाला आहे.

3 / 5
नुकसान भरपाईची मागणी: महावितरणच्या गलथान कारभारामुळे केवळ नाशिक जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ऊसाला आग लागण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर होतेच पण वेळेत महावितरणकडून आर्थिक मदतही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होऊनही महावितरण कार्यालयाचे खेटे मारावे लागत आहेत.

नुकसान भरपाईची मागणी: महावितरणच्या गलथान कारभारामुळे केवळ नाशिक जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ऊसाला आग लागण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर होतेच पण वेळेत महावितरणकडून आर्थिक मदतही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होऊनही महावितरण कार्यालयाचे खेटे मारावे लागत आहेत.

4 / 5
शेतकऱ्यांचे डोळे मदतीकडे: यंदा निसर्गाचा लहरीपणा कायम राहिलेला आहे. याचा केवळ ऊसावर परिणाम झालेला नव्हता पण अशा दुर्घटनांमुळे ऊसाचीही सुटका झालेली नाही. त्यामुळे संबंधित साखर कारखान्यानेही आहे त्या ऊसाचे गाळप करुन शेतकऱ्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांचे डोळे मदतीकडे: यंदा निसर्गाचा लहरीपणा कायम राहिलेला आहे. याचा केवळ ऊसावर परिणाम झालेला नव्हता पण अशा दुर्घटनांमुळे ऊसाचीही सुटका झालेली नाही. त्यामुळे संबंधित साखर कारखान्यानेही आहे त्या ऊसाचे गाळप करुन शेतकऱ्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.