लग्नानंतर, बहुतेक प्रकरणांमध्ये महिलांना वजन वाढण्याची समस्या भेडसावत असते. या प्रश्नाचे उत्तर म्हणजे अन्न आणि जीवनशैलीशी संबंधित काही चुका. काही चुकांबद्दल जाणून घेऊया, ज्या सुधारणे आवश्यक आहे.
खराब जीवनशैली : वजन वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जीवनशैलीतील बदल. लग्नानंतर वातावरण पूर्णपणे बदलते आणि नवीन घरानुसार स्त्रियांना जुळवून घ्यावे लागते. अशा स्थितीत वजन वाढणे स्वाभाविक असते.
बहुतेक महिलांना स्वयंपाकघरातील काम करावे लागते. स्वयंपाक झाल्यावर अन्न उरले तर ते वाया जाऊ नये असा महिलांचा प्रयत्न असतो. त्यामुळे त्या उरलंसुरलं अन्न संपवतात, हेही वजन वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे.
लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात तेव्हा स्त्रिया फिटनेस जास्त सीरियसली घेत नाहीत. फिटनेसची काळजी न घेतल्याने किंवा त्याबाबत बेफिकीर राहिल्यामुळे वजन झपाट्याने वाढू लागते.
लग्नानंतर हार्मोनल बदल होतात आणि त्यामुळेही वजन वाढू शकते. वाढत्या वजनाच्या टेन्शनमुळे ही समस्या आणखी वाढते. योगासने, व्यायाम किंवा चालून, वॉक करून महिला वजन नियंत्रणात ठेवू शकतात.