शिवरायांचा इतिहास अपमानित करण्याचे नियोजनबद्ध कारस्थान, राष्ट्रवादी आमदाराचा घणाघात! नवे वक्तव्य, नवा वाद!
मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची परत छेडछाड केली आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, असं अमोल मिटकरी म्हणाले.
मुंबईः छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) इतिहासाला अपमानित करण्याचे नियोजनबद्ध कारस्थान सुरु आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या आजच्या एका वक्तव्यानंतर अमोल मिटकरी यांनी अशा शब्दात संपात व्यक्त केला आहे. साताऱ्यात किल्ले प्रताप गडावर आज शिवप्रताप दिनाचा कार्यक्रम होता. यावेळी भाषणादरम्यान मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी छत्रपती शिवाजी महाराजी महाराज यांच्या आग्रा सुटकेच्या प्रसंगाची तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली. त्यावरून राजकीय वर्तुळातून तीव्र आक्षेप नोंदवले जात आहेत.
अमोल मिटकरी यांनी टीव्ही 9 बोलनाता प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले, ‘ अत्यंत दुर्दैवी वक्तव्य आहे. मंगल प्रभात लोढा आणि शिवरायांच्या इतिहासाचा काहीही संबंध नाही. त्यांच्याकडे पर्यटन खातं असलं तरीही त्यांच्याकडे तेवढी बुद्धीमत्ता असेल असं यातून जाणवत नाही…
हेच ते वादग्रस्त वक्तव्य-
छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यातून केलेली सुटका हे महाराजांचं कौशल्य होतं. पण महाराजांनी गद्दारी केली नव्हती. स्वराज्य वाचवण्याकरिता केलेलं नियोजन होतं. त्याची तुलना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाशी करणार असाल तर हे अत्यंत संतापजनक वक्तव्य आहे.
राज्यपालांनी जे वक्तव्य करून शिवरायांचा अपमान केला आहे. त्याच पद्धतीने चुकीचा संदर्भ देऊन मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची परत छेडछाड केली आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, असं अमोल मिटकरी म्हणाले.