Life | आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर या महत्वाच्या 5 गोष्टी नेहमीच फाॅलो करा…
आपण एक सुविचार नेहमीच ऐकतो. खरे चप्पल घालूपर्यंत खोटे संपूर्ण गावाला फिरून येते. मात्र, आज ना उद्या सत्य गोष्ट लोकांसमोर येतच असते. आयुष्यभरात कायमच एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, ज्या नात्याची सुरूवात खोट्या गोष्टीपासून होते ते नाते भविष्यात टिकत नाही.
मुंबई : आयुष्यामध्ये (Life) जीवन जगत असताना अनेक समस्यांचा सामना आपल्या सर्वांनाच करावा लागतो. यादरम्यान अनेकदा आपण स्वत: ला आणि इतरांना वाचवण्यासाठी खोटे बोलतो. मात्र, सर्वांनाच माहितीयं की खोटी गोष्ट जास्त काळ टिकत नाही. पण जर एकदा आपल्याला खोटं बोलण्याची सवय लागली तर ती आयुष्यभर राहते. एकदा बोललेली गोष्ट कधीना कधी पुढे येतच असते. यामुळे शक्यतो आपण खोटे बोलणे टाळायलाच हवे. एकदा का तुम्हाला खोटे बोलण्याचा डाग पडला की मग तुम्ही कितीही सत्य सांगितले तरी लोक तुमच्यावर विश्वास (Faith) ठेवत नाहीत. जीवनात सत्याची बोलणे अत्यंत महत्वाचे (Important) आहे.
स्वत: साठी किंवा इतरांसाठी कधीही खोटे बोलू नये
खोटे बोलणार्या व्यक्तीला आपण किती जबाबदारी घेतो हे माहीत नसते. कारण एक खोटे बोलण्यासाठी त्याला आणखी वीस खोटे बोलावे लागतील. यामुळे कधीच माणसाने स्वत: साठी किंवा इतरांसाठी खोटे बोलू नये. जर आपण एकदा खोटे बोललो आणि ती खरी गोष्ट समोरच्या व्यक्तीला समजली तर आपल्यावरील त्या व्यक्तीचा विश्वास नाहीसा होईल. यामुळे शक्यतो खोटे बोलणे टाळाच. भल्ले ही खरे बोलून आपले नुकसान झाले तरीही.
वेळ आली तर स्वत: नुकसान सहन करा
आपण एक सुविचार नेहमीच ऐकतो. खरे चप्पल घालूपर्यंत खोटे संपूर्ण गावाला फिरून येते. मात्र, आज ना उद्या सत्य गोष्ट लोकांसमोर येतच असते. आयुष्यभरात कायमच एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, ज्या नात्याची सुरूवात खोट्या गोष्टीपासून होते ते नाते भविष्यात टिकत नाही. यामुळे नेहमीच जर तुम्हाला एखादे नाते कायमचे टिकवायचे असेल तर सत्य बोलत राहा. आयुष्यात सावली आणि आरशासारखी मैत्री करावी, कारण सावली कधीच आपली साथ सोडत नाही आणि आरसा कधी खोटे बोलत नाही.