T20 WC: ‘मी आपल्याच माणसांबरोबर….’, अखेस संजू सॅमसनच दु:ख आलं बाहेर

टी 20 वर्ल्ड कपची टीम जाहीर झाल्यानंतर एका खेळाडूच्या नावाची बरीच चर्चा झाली. ते नाव होतं संजू सॅमसन. ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या टीम इंडियात संजू हवा होता, असं अनेकांच मत आहे.

T20 WC: 'मी आपल्याच माणसांबरोबर....', अखेस संजू सॅमसनच दु:ख आलं बाहेर
संजू सॅमसनImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 4:35 PM

मुंबई: टी 20 वर्ल्ड कपची टीम जाहीर झाल्यानंतर एका खेळाडूच्या नावाची बरीच चर्चा झाली. ते नाव होतं संजू सॅमसन. ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या टीम इंडियात संजू हवा होता, असं अनेकांच मत आहे. सोशल मीडियावर संजूच्या समर्थनार्थ अनेकांनी टि्वट केलं. संजूला ऋषभ पंतच्या जागी संघात स्थान मिळायला पाहिजे होतं, असं मानणारा एक मोठा वर्ग आहे. संजूला प्लेइंग-11 मध्ये स्थान देण्याची अनेकदा मागणी झाली आहे. या सगळ्या मुद्यांवर संजू आता व्यक्त झाला आहे.

फॅन्सचं काय म्हणणं?

संजू सॅमसनवरुन बीसीसीआयवर सातत्याने आरोप झाले आहेत. बीसीसीआयने संजूकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होतो. सिलेक्शन कमिटी पंतला जास्त संधी देतेय आणि संजूकडे दुर्लक्ष होतय असं फॅन्सच म्हणणं आहे. संजूला काही संधी मिळाल्या. त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. तो टीममध्ये सतत आत-बाहेर होत राहिला. नुकतीच त्याच्याकडे इंडिया ए ची कमान सोपवण्यात आलीय. न्यूझीलंड ए विरुद्ध तो टीम इंडियाच नेतृत्व करणार आहे.

सहकाऱ्यांबद्दल संजूच मत काय?

पंत किंवा केएल राहुलच्या जागी आपली निवड झाली पाहिजे, असं संजूला वाटत नाही. “सध्या सोशल मीडिया आणि मीडियामध्ये चर्चा आहे, संजूने प्लेइंग 11 मध्ये कोणाच्या जागी खेळलं पाहिजे? पंत की केएल राहुल. माझ स्पष्ट म्हणणं आहे, राहुल आणि पंत दोघेही माझ्या टीमसाठी खेळतात. टीममधल्या सहकाऱ्यांसोबत स्पर्धा करुन उपयोग नाही” असं संजू म्हणाला. तो वर्ल्ड क्रिकेट चॅनलवर बोलत होता.

पाच वर्षानंतर कमबॅक ही नशिबाची गोष्ट

“पाच वर्षानंतर टीम इंडियात कमबॅक केलं. मी नशीबवान आहे. मी 15 खेळाडूंमध्ये असल्याचा आनंद घेतोय. मी पाच वर्षानंतर कमबॅक केलं. मी भाग्यवान आहे. टीम इंडियात पाच वर्षापूर्वी नंबर 1 होती. आताही आहे. टीम इंडियात 15 खेळाडूत निवड होणं, ही चांगली बाब आहे” असं संजू म्हणाला.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.