निवडणूक काळात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्वत्र वाहनांची तपासणी (Diwakar Raote Vehicle checking in Election) केली जाते. यात अगदी व्हीआयपींच्या वाहनांचाही समावेश असतो. मात्र, व्हीआयपींच्या वाहनाची तपासणी करताना अनेक व्हीआयपींचा अहंकार दुखावला जात असल्याचंही पाहायला मिळतं.
हंसराज अहिर चंद्रपूरहून नागपूरला जात होते. त्यावेळी वर्ध्यातील जाम चौरस्त्याजवळ कांडळी नदी पार करताना ताफ्यातील सुरक्षा वाहन ट्रकवर आदळल्यामुळे गाडीचा चेंदामेंदा झाला.