2030 पर्यंत पृथ्वीवरुन स्मार्टफोन नामशेष होणार आणि त्याच्या जागी…. बिल गेट्स यांचा शॉकिंग दावा

2030 पर्यंत पृथ्वीवरुन स्मार्टफोन संपणार असा बिल गेट्स यांचा दावा आहे. स्मार्टफोनचा वापर पूर्णपणे बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

2030 पर्यंत पृथ्वीवरुन स्मार्टफोन नामशेष होणार आणि त्याच्या जागी.... बिल गेट्स यांचा शॉकिंग दावा
Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 11:39 PM

वॉशिंग्टन : स्मार्टफोनही प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्या वस्तु बनली आहे. संपर्काचे माध्यम असेलला स्मार्टफोनने आता याच्या पलीकडे आपले स्थान निर्माण केले आहे. यामुळे आता स्मार्टफोनशिवाय( smartphone) राहणारी व्यक्ती क्वचितच सापडेल. मात्र, स्मार्टफोन नामशेष होणार असल्याचा दावा केला जात आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स(Bill Gates) यांनी हा दावा केला आहे.

2030 पर्यंत पृथ्वीवरुन स्मार्टफोन संपणार असा बिल गेट्स यांचा दावा आहे. स्मार्टफोनचा वापर पूर्णपणे बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

स्मार्टफोनची जागा इलेक्ट्रॉनिक टॅटू घेतील असे बिल गेट्स यांनी आपल्या दाव्यात म्हंटले आहे. स्मार्टफोनची सर्व कामे हा इलेक्ट्रॉनिक टॅटू करणार आहे.

इलेक्ट्रॉनिक टॅटू ही एक प्रकारची चिप आहे. ही चिप मानवी शरीरात सहजपणे बसवता येईल. ही चीप दिसायला टॅटूसारखी असणार आहे. स्मार्टफोनची सर्व कामे हा इलेक्ट्रॉनिक टॅटू करणार आहे. इलेक्ट्रॉनिक टॅटू अर्थात चिप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला हातात स्मार्टफोन घेण्याची गरजच पडणार नाही असे बिल गेट्स यांचे म्हणणे आहे.

बिल गेट्स यांचा हा दावा खरा ठरल्यास मोबाईल हातात घेऊन फिरावे लागणार नाही. ज्याप्रमाणे स्मार्टफोन काम करतो त्याच प्रमाणे ही इलेक्ट्रॉनिक चीप युजरला संपूर्ण जगाशी कनेक्ट करणार आहे. चिपसेट टॅटू 2030 पर्यंत थेट मानवी शरीरात समाविष्ट केले जाऊ शकतात.

यापूर्वी नोकियाचे सीईओ पेक्का लुंडमार्क यांनीही स्मार्टफोन हद्दपार होणार असल्याचा दावा केला होता. 2030 पर्यंत स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानात अमूलाग्र बदल होणार आहेत.

स्मार्टफोनचा यूजर इंटरफेस, स्मार्ट चष्मा आणि इतर उपकरणे येणार आहेत. यामुळे मोबाईलचा वापर कमी होणार आहे. सध्या स्मार्टवॉचमुळे मोबाईलचा वापर कमी झाला आहे. मसेज अलर्ट, कॉल अलर्ट यासह अनेक स्मार्टवॉच कॉलिंगची देखील सुविधा आहेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.