New IT rules : नवीन आयटी नियमांमुळे सोशल मीडियावर बंधने येणार; गुगल, फेसबूक सारख्या कंपन्यांना बसणार सर्वाधिक फटका!

केंद्र सरकारच्या वतीने आयटी कायद्यांमध्ये (New IT rules) काही सुधारणा घडून आणल्या जात आहेत. नवीन सुधारणांमुळे देशात जे सर्वोच्च सोशल मीडिया (Social media) माध्यम आहेत, त्यांच्यावर बंधने येण्याची शक्यता आहे.

New IT rules : नवीन आयटी नियमांमुळे सोशल मीडियावर बंधने येणार; गुगल, फेसबूक सारख्या कंपन्यांना बसणार सर्वाधिक फटका!
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 7:56 AM

मुंबई : केंद्र सरकारच्या वतीने आयटी कायद्यांमध्ये (New IT rules) काही सुधारणा घडून आणल्या जात आहेत. नवीन सुधारणांमुळे देशात जे सर्वोच्च सोशल मीडिया (Social media) माध्यम आहेत. ज्याचा वापर देशातील एका मोठा समूह करतो त्याच्यावर बंधने येण्याची शक्यता आहे. म्हणजे जर एखाद्या वापरकर्त्याने एखाद्या सोशल मीडिया साईटवर एखादी पोस्ट, फोटो टाकला असेल आणि तो वादग्रस्त असेल तर तो तात्काळ हटवण्याची जबाबदारी ही संबंधित सोशल साईटची असणार आहे. याचा सर्वाधिक फटका हा फेसबुक (Facebook), गुगल, इंस्टाग्राम यासारख्या सोशल साईटला बसणार आहे. आयटी मंत्रालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवे नियम लवकरच अंमलात येण्याची शक्यता आहे.समोर येत असलेल्या माहितीप्रमाणे सुधारीत नियम लागू झाल्यानंतर जर सरकारला एखाद्या वापरकर्त्याचे खाते वादग्रस्त वाटत असेल किंवा त्यामुळे जर समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असेल तर असे खाते तातडीने हटवण्याचे आदेश सरकार सोशल मिडीया साईटला देऊ शकते. तसेच ते खाते ताडीने हटवले जाणे अपेक्षित आहे.

मजकूराची जबाबदारी संकेतस्थळांची

अनेकदा आदेश देऊन देखील एखादा वादग्रस्त मजकूर सोशल मीडिया साईटवरून हटवण्यास नकार दिला जातो. अशा कंपन्यांविरोधात कठोर कारवाईची आवश्यकता असल्याचा विचार पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आयटी कायद्यांमध्ये काही सुधारणा घडून आणण्यात येणार आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका हा प्रमुख सोशल मीडिया साईट असलेल्या फेसबूक, ट्विटर, इस्टाग्राम आणि गुगल सारख्या माध्यमांना बसण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे संबंधित साईटवर अपलोड होणाऱ्या पोस्टची सर्व जबाबदारी ही त्या संकेतस्थळाची असणार आहे. याचाच अर्थ वादग्रस्त पोस्टसाठी या संकेतस्थळांना जबाबदार धरले जाऊ शकते, त्यामुळे त्यांच्या जबाबदारीमध्ये वाढ होणार आहे.

हे सुद्धा वाचा

वादग्रस्त पोस्टला आळा बसणार

सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमुळे आपण अनेकदा वाद निर्माण झाल्याचे पहातो. हे वाद अनेकदा एखाद्याच्या जीवावर देखील बेततात. अशा घटनांना आळा बसावा, समाजात तेढ निर्माण होऊ नये, तसेच सोशल मीडियाचा जो वापरकर्ता आहे त्यांच्या गोपनियतेच संरक्ष व्हावे या हेतून आयटी कायद्यात लवकरच काही सुधारणा केल्या जाणार आहेत.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.