<urlset xmlns="https://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9" xmlns:video="http://www.google.com/schemas/sitemap-video/1.1"><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/dhananjay-munde-hints-at-political-retirement-after-pankaja-mundes-statement-sparks-fresh-political-buzz-in-maharashtra-1725740.html</loc><video:video>
	<video:title>माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडेंचंही मोठं विधान</video:title>
	<video:publication_date>2026-08-03T16:58:13+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राजकारणात सध्या निवृत्तीच्या वक्तव्यांची चर्चा रंगली असतानाच अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही राजकीय निवृत्तीबाबत सूचक विधान केले आहे. सध्याच्या राजकीय वातावरणावर भाष्य करताना त्यांनी, &quot;खरंच आता राजकारणात राहावं की न राहावं, असा प्रश्न पडतो,&quot; असे वक्तव्य केले.  एका कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी राज्यातील सध्याच्या राजकारणाबद्दल नाराजी व्यक्त केली. &quot;आज सर्वत्र जाती-पाती आणि धर्माच्या आधारावर राजकारण होत आहे. अशा वातावरणात माझ्यासारख्या व्यक्तीला खरंच राजकारणात राहावं की नाही, असा विचार मनात येतो,&quot; असे ते म्हणाले.  मात्र, त्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सामाजिक समतेसाठी काम सुरूच ठेवणार असल्याचे संकेत दिले. &quot;महापुरुषांनी दिलेले समतेचे विचार आमच्या पाठीशी आहेत. समाजात पुन्हा समता प्रस्थापित करण्यासाठी काम करणे हीच आमची जबाबदारी आहे,&quot; असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.  दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनीही &quot;मला राजकारणातून संन्यास घ्यावासा वाटतो,&quot; असे विधान केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याची आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे नेतृत्व करण्याची खुली ऑफर दिली होती.  पंकजा मुंडे यांच्या विधानानंतर आता धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, मुंडे बंधू-भगिनींच्या सलग वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/ksLBtszNJ3k</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-03T165703.546.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/washim-politics-bjp-deals-major-blow-to-mva-as-sarpanch-and-gram-panchayat-members-join-party-1725735.html</loc><video:video>
	<video:title>मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते, पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाने खळबळ!</video:title>
	<video:publication_date>2026-08-03T17:06:32+05:30</video:publication_date>
	<video:description>वाशिम जिल्ह्यात भाजपने महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का दिला आहे. जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीचे सरपंच आणि अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.  मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने भाजपने ग्रामपंचायत स्तरावर पक्षविस्ताराला गती दिली आहे. &quot;मिनी विधानसभा&quot; म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवण्याच्या दिशेने भाजपने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे या पक्षप्रवेशातून दिसून येत आहे.  या पक्षप्रवेशामुळे वाशिममधील महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.  दरम्यान, या पक्षप्रवेशानंतर वाशिम जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, स्थानिक पातळीवरील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/9ghDVuXjSN4</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-03T170127.671.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/dhananjay-munde-statement-sparks-sharp-response-from-manoj-jarange-patil-1725701.html</loc><video:video>
	<video:title>धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी, म्हणाले मराठ्यांच्या नादी ...</video:title>
	<video:publication_date>2026-08-03T16:50:44+05:30</video:publication_date>
	<video:description>धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. जातीपातीच्या राजकारणावर भाष्य करताना मुंडे यांनी राजकारणात राहावं की नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर जरांगे यांनी प्रतिक्रिया देत टोला लगावला.  राज्यातील राजकारण सध्या रसातळाला गेल्याची खंत धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली. सध्या जातीपातीचे आणि धर्माचे राजकारण सुरू असल्याचे सांगत, “अशा राजकारणामध्ये माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की खरंच आज राजकारणात राहावं की न राहावं,” असं मोठं विधान त्यांनी केलं.  मुंडे यांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना त्यांच्यावर निशाणा साधला. जरांगे म्हणाले, “जेव्हा काळ होता तेव्हा नीट खाता नाही आलं, मराठ्यांसह सगळ्या जातींनी मोठं केलं आणि टोळीने ओरबाडून खाल्लं.”  पुढे त्यांनी, “ना ओबीसी मोठा होऊ दिला ना मराठा मोठा होऊ दिला, मारामारीत वेळ जास्त घातला,” असा आरोप केला. तसेच मुंडे यांना सल्ला देताना, “तु शहाणा हो मराठ्यांच्या नादी लागू नको,” असे म्हटले.  याशिवाय, “कोणताही पक्ष, कोणीही तुला जवळ करणार नाहीत,” असेही जरांगे म्हणाले. शेवटी त्यांनी, “काळ यायचा काळ गेला आता मध्ये जायचा वेळ आला आहे,” असे सांगत धनंजय मुंडे यांना टोला लगावला.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/_WtknixxXwU</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/manoj-Jarange-Dhananjay-Munde.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/court-directs-states-to-withdraw-cases-against-cjp-student-protesters-relief-for-participants-in-lathi-charge-case-1725703.html</loc><video:video>
	<video:title>मोठा दिलासा! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व राज्यांना आदेश</video:title>
	<video:publication_date>2026-08-03T16:19:55+05:30</video:publication_date>
	<video:description>दिल्लीतील CJPच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड समोर आली आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने सर्व राज्य सरकारांना आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, ज्या व्यक्तींवर गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा अन्य गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, त्यांच्याविरोधात कायद्यानुसार स्वतंत्र कारवाई करण्यास पोलिसांना मुभा असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.  दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईनंतर अनेक आंदोलकांवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. या कारवाईवर देशभरातून टीका झाली होती. त्यानंतर या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू होती.  दरम्यान, न्यायालयाच्या या निर्देशांनंतर आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, संबंधित राज्य सरकारे आणि पोलीस प्रशासन या आदेशाची अंमलबजावणी कशी करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/7nt3Vyd2uTg</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-03T161300.772.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/pankaja-munde-retirement-remark-sparked-fresh-political-speculation-in-maharashtra-1725665.html</loc><video:video>
	<video:title>पंकजा मुंडे खरंच मोठा राजकीय निर्णय घेणार? करुणा मुंडेंच्या एका विधानानेच उडवली खळबळ</video:title>
	<video:publication_date>2026-08-03T15:57:29+05:30</video:publication_date>
	<video:description>भाजप नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी &#039;रिटायर व्हावसं वाटतं&#039;, असं विधान केलं आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे यांच्या विधानाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आहेत. काँग्रेसने तर पंकजा मुंडे यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याची आणि मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली आहे. त्यावर पंकजा मुंडे यांची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या आधी एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, &quot;कंटाळा आलाय... राजकारणातून रिटायर्ड व्हावसं वाटतं. पण तुमचा सर्वांचा उत्साह बघून मी पुन्हा नव्या जोमाने काम करते&quot;  या सर्व घडामोडींवर करुणा मुंडे यांनी सुचक विधान केलं आहे. त्यांनी सांगितले की, येणारा काळ काँग्रेसचा आहे; महत्त्वाचं म्हणजे या पक्षात बरेच जण आहेत जे मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यासाठी पंकजा ताईंची गरज नाही... मला तर असं वाटतं की त्या राजकारण सोडतील पण भाजप सोडणार नाहीत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/zJuKHsSMAlM</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/karuna-munde-.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sunetra-pawar-reviews-ministers-work-after-eknath-shinde-scrutiny-1725643.html</loc><video:video>
	<video:title>शिंदेंनंतर आता सुनेत्रा पवारांनी घेतली मंत्र्यांची शाळा! थेट आदेश दिले अन्... रडारवर कोणता मंत्री?</video:title>
	<video:publication_date>2026-08-03T15:36:02+05:30</video:publication_date>
	<video:description>राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी मंत्र्यांकडून गेल्या सहा महिन्यांतील कामांचा अहवाल मागितला आहे. त्यामुळे आता मंत्र्यांना त्यांच्या विभागातील कामांचा हिशोब सादर करावा लागणार आहे. या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांकडून कामाचा हिशोब घेतला होता. यावेळी त्यांच्या रडारवर शिक्षण खातं असल्याच्याही चर्चा आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, केवळ कागदावरील कामांपेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर किती कामे झाली, यावर सुनेत्रा पवार यांचा भर असल्याचे दिसत आहे. नागरिकांना दिसणाऱ्या विकासकामांचा आणि सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे संबंधित मंत्र्यांमध्येही या विषयाची चर्चा सुरू झाली आहे.  सुनेत्रा पवार यांनी मंत्र्यांना त्यांच्या कामाबाबत स्पष्ट सूचना दिल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी मंत्र्यांकडून सहा महिन्यांचा अहवाल मागितला आहे. प्रत्यक्ष जमिनीवर दिसाणाऱ्या कामांचा हिशोब द्यावा लागेल असा इशारा दिला आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/IunGNtGNsEM</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/sunetra-pawar-action.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/nitin-gadkari-protest-sparked-tension-as-police-stopped-congress-workers-1725570.html</loc><video:video>
	<video:title>गडकरींच्या निवासस्थानाबाहेर मोठा गोंधळ, पोलिसांनी हात पाय धरले अन्... नागपूरात मोठ्या घडामोडी</video:title>
	<video:publication_date>2026-08-03T15:09:04+05:30</video:publication_date>
	<video:description>नीट पेपर लीकप्रकरणावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधातही आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे. नागपूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने गडकरी यांच्या निवासस्थानासमोर जनआक्रोश घेराव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.  शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांच्या समस्या, वाढती बेरोजगारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून इथेनॉलच्या वापरावरून नितीन गडकरी यांच्यावर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येत आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, मोर्चाला दुपारी 1 वाजता महाल परिसरातील चिटणीस पार्क चौकातून सुरुवात झाली. त्यानंतर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते गडकरी यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरातील सुरक्षा वाढवली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना निवासस्थानापर्यंत पोहोचू दिले जाणार का, याकडे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/Dzbvg0cIsa4</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/nagpur-2.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/nashik-guardian-minister-row-girish-mahajan-says-cm-will-decide-on-chhagan-bhujbal-amid-banner-campaign-1725588.html</loc><video:video>
	<video:title>Girish Mahajan | नाशिकच्या पालकमंत्रीपदावर गिरीश महाजन यांचं सूचक विधान, म्हणाले...</video:title>
	<video:publication_date>2026-08-03T14:48:51+05:30</video:publication_date>
	<video:description>नाशिक शहरातील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येमुळे निर्माण झालेल्या अपघातांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मागील काही दिवसांत खड्ड्यांमुळे सहा नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत असून, या पार्श्वभूमीवर शहरात पालकमंत्रीपदाच्या मागणीचे बॅनर झळकले आहेत. &quot;छगन भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री करा आणि शहराला खड्ड्यांतून बाहेर काढा,&quot; असा मजकूर असलेल्या बॅनर्समुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.  या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. &quot;छगन भुजबळ हे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या संदर्भातील जनतेच्या भावना मी समजू शकतो. मात्र, पालकमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्री यांच्याकडे आहेत आणि ते योग्य वेळी निर्णय घेतील,&quot; असे महाजन यांनी स्पष्ट केले.  रायगडच्या पालकमंत्रीपदाविषयी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, रायगड विधान परिषद जागेच्या निर्णयावेळी या विषयावर चर्चा झाली होती. &quot;माझ्या माहितीनुसार, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे,&quot; असे त्यांनी सांगितले.  यावेळी छगन भुजबळ आणि आपल्यामध्ये दुरावा असल्याच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला. &quot;आमच्यात कुठलाही अबोला किंवा मतभेद नाहीत. पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमातही मी स्वतः त्यांना हात धरून व्यासपीठावर घेऊन गेलो होतो. आमचे वैयक्तिक संबंध अतिशय चांगले आहेत,&quot; असे महाजन यांनी स्पष्ट केले.  दरम्यान, नाशिकमधील रस्त्यांची दुरवस्था, वाढते अपघात आणि पालकमंत्रीपदाच्या मागणीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, मुख्यमंत्री या प्रश्नावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/F4L439TV</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-03T144432.566.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/devendra-fadnavis-objects-to-innova-car-purchase-proposal-calls-for-public-funds-to-be-spent-on-development-1725561.html</loc><video:video>
	<video:title>मोठी बातमी! जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालणार नाही; इनोव्हा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांचा दणका</video:title>
	<video:publication_date>2026-08-03T14:07:29+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्य शासनाच्या विविध विभागांसाठी इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. जनतेच्या पैशाचा वापर केवळ विकासकामांसाठी व्हावा, अनावश्यक खर्च टाळावा आणि प्रशासनाने लोकहिताच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित प्रस्ताव सभागृह नेते गणेश खणकर यांनी मांडला होता. मात्र, या प्रस्तावावर विरोधकांसह विविध स्तरांतून टीका झाल्यानंतर त्यावर पुनर्विचार करण्याची वेळ आली. वाढत्या विरोधामुळे अखेर हा प्रस्ताव मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी जनतेचा पैसा अनावश्यक खर्चावर न करता विकासकामे, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या हिताच्या योजनांवर खर्च करण्यावर भर द्यावा, असे स्पष्ट मत व्यक्त केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. प्रशासनाने खर्चात काटकसर करत लोकाभिमुख निर्णय घ्यावेत, असा संदेशही त्यांनी दिल्याची चर्चा आहे.  दरम्यान, इनोव्हा गाड्या खरेदीच्या प्रस्तावावरून निर्माण झालेल्या वादानंतर हा प्रस्ताव मागे घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात या प्रकरणाची चर्चा रंगली असून, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भूमिकेकडेही विशेष लक्ष वेधले जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/g-r3Ovo-ihM</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-03T140316.778.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/prashant-kishor-leads-in-bankipur-bypoll-as-bjp-stronghold-faces-upset-1725528.html</loc><video:video>
	<video:title>बालेकिल्ल्यातच भाजपला दुसऱ्या क्रमांकावर आणणारा नेता कोण? गेल्या 30 वर्षांपासून...  बिहार पोटनिवडणूकीत सर्वात मोठा उलटफेर?</video:title>
	<video:publication_date>2026-08-03T13:36:02+05:30</video:publication_date>
	<video:description>पाटणा येथील बांकीपूर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. ए.एन. कॉलेजमध्ये सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली. आधी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली असून आता ईव्हीएम मतांची मोजणी सुरू आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्पातच यामध्ये मोठा उलटफेर दिसत आहे.  कलांनुसार पहिल्या फेरीनंतर जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर 862 मतांनी आघाडीवर आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही जागा भाजपचा बालेकिल्ला मानली जाते याच ठिकाणी गेल्या ३० वर्षांपासून भाजपचा विजय होत असल्याचं सांगितलं जात. अशात आता भाजपचे नीरज सिन्हा 1,363 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आरजेडीच्या रेखा गुप्ता यांना दोन फेऱ्यांमध्ये 505 मते मिळाली आहेत. या निवडणुकीत एकूण 25 उमेदवार रिंगणात आहेत.  मतमोजणीसाठी केंद्रावर कडक सुरक्षा तैनात असून ड्रोनद्वारेही लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, बांकीपूरमध्ये 1995 पासून भाजपचा सलग विजय होत आला आहे. नितीन नवीन यांना नवी जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी विधानसभेचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/BQ9rBgj6zOc</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Nitin-Nabin.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/bjp-leader-targeted-rana-couple-indirectly-during-public-event-speech-1725496.html</loc><video:video>
	<video:title>भाजप विरुद्ध भाजप? भर मंचावरून बड्या नेत्याचा राणा दांपत्यावर निशाणा, नाव न घेताच...</video:title>
	<video:publication_date>2026-08-03T13:09:53+05:30</video:publication_date>
	<video:description>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा समर्पण दशक’ कार्यक्रमात भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अमरावतीच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पोटे यांनी माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या वृक्षारोपणाच्या दाव्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली.  पोटे म्हणाले, &quot;मी स्वतः 1 हजार वृक्ष लागवड करताना माझ्या नाकात दम आला होता. पण इथे काही लोकांनी भलतेच आकडे फुगवून सांगितले. तोंडात येईल तसं बोलून दाखवलं!&quot;  याशिवाय पक्षातील नवीन प्रवेशांवरही त्यांनी भाष्य केले. पोटे म्हणाले, &quot;माझं रक्तच मुळात भाजपचं आहे. जे नवीन पक्षात येत आहेत आणि फुगड्या खेळत आहेत, त्यांच्या अंगावर आधी शेला टाका. केवळ पेपरला पत्र देऊन बातम्या छापण्याची आमची सवय नाही, आम्ही प्रत्यक्षात काम करणारी माणसे आहोत.&quot;</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/yoviZHk1mCU</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Navneet-rana.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/raigad-guardian-minister-row-bharat-gogawale-pushes-for-post-cm-fadnavis-and-eknath-shinde-assure-early-decision-1725495.html</loc><video:video>
	<video:title>मोठी राजकीय घडामोड! CM-DCM कडून भरत गोगावले यांना आश्वासन; रायगडच्या पालकमंत्रीपदावर लवकरच शिक्कामोर्तब?</video:title>
	<video:publication_date>2026-08-03T13:06:27+05:30</video:publication_date>
	<video:description>रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) आमदार भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही भूमिका घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.  सूत्रांच्या माहितीनुसार, या मुद्द्यावर भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. या बैठकीत रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सोडवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.  विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांकडूनही येत्या तीन ते चार दिवसांत रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन भरत गोगावले यांना देण्यात आले आहे.  दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील घडामोडींना वेग आला असून, येत्या काही दिवसांत या प्रश्नावर पडदा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंतिम निर्णयाकडे आता रायगडसह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/wxL9DzhA3Wk</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-03T130533.608.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/brij-bhushan-singh-gets-relief-in-pocso-case-after-court-accepts-closure-report-1725467.html</loc><video:video>
	<video:title>6 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केलेले भाजप नेते बृजभूषण शरण सिंहंची निर्दोष मुक्तता</video:title>
	<video:publication_date>2026-08-03T12:44:28+05:30</video:publication_date>
	<video:description>महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर चर्चेत आलेले भाजप नेते आणि माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांना दिल्लीतील न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पोक्सो प्रकरणात पुरावे नसल्याने त्यांच्याविरोधातील कार्यवाही संपुष्टात आली आहे.  दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने पोलिसांनी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. त्यामुळे बृजभूषण सिंह यांच्यावरील पोक्सोची कार्यवाही संपली आहे. महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत जंतरमंतरवर आंदोलन केले होते. मात्र, बृजभूषण सिंह यांनी सुरुवातीपासूनच हे आरोप फेटाळले होते.  न्यायालयाच्या निर्णयानंतर बृजभूषण सिंह यांनी समाधान व्यक्त केले. “मी जे आधीच बोललो होतो ते आता खरं होत आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या प्रकरणातील आरोप सिद्ध झाल्यास फासावर लटकेल, असेही त्यांनी यापूर्वी म्हटले होते.  दरम्यान, त्यांच्या वकिलांनी तक्रार आणि तक्रारदाराच्या साक्षीत तफावत असल्याचे आधीपासून सांगितले होते. “आम्ही कोर्टाच्या आदेशाची वाट पाहत आहोत,” असे वकिलांनी स्पष्ट केले. आदेशानंतर सविस्तर प्रतिक्रिया देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/2sNwv6SmUQk</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/brijbhushan.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/pankaja-munde-retirement-remark-sparks-political-buzz-congress-offers-cm-post-if-she-quits-bjp-1725479.html</loc><video:video>
	<video:title>मोठी घडामोड! भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा; काँग्रेसची पंकजा मुंडे यांना थेट ऑफर</video:title>
	<video:publication_date>2026-08-03T12:37:05+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्याच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी &quot;आता निवृत्त व्हावंसं वाटतं&quot; असे वक्तव्य केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांकडूनही विविध प्रतिक्रिया उमटत असून, काँग्रेसने तर पंकजा मुंडे यांना थेट पक्षात येण्याची आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे नेतृत्व करण्याची ऑफर दिली आहे.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांना भाजप सोडण्याचे खुले आवाहन केले. &quot;गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ओबीसी नेतृत्वाला डावलण्याचे काम सुरू झाले. पंकजा मुंडे यांना पक्षात न्याय मिळत नसल्याची भावना असेल, म्हणूनच त्यांच्या भावना अशा प्रकारे व्यक्त होत आहेत,&quot; असे वडेट्टीवार म्हणाले.  यावेळी त्यांनी पुढे सांगितले की, &quot;पंकजा मुंडे यांनी भाजपमधून बाहेर पडून स्वतंत्र नेतृत्व करावे. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात. काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभी राहील. त्यांनी काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतल्यास पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल,&quot; असेही त्यांनी स्पष्ट केले.  दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यामुळे भाजपमधील अंतर्गत नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले असून, काँग्रेसच्या या ऑफरमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, काँग्रेसच्या या प्रस्तावावर पंकजा मुंडे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.  राजकीय वर्तुळात आता पंकजा मुंडे पुढे कोणती भूमिका घेतात आणि भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/081mNiIdcgM</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-03T123431.799.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/chikhaldara-attracted-over-fifteen-thousand-tourists-in-one-day-recently-1725455.html</loc><video:video>
	<video:title>न माथेरान न महाबळेश्वर, महाराष्ट्रातील या पर्यटनस्थळी एका दिवसाला 15 हजारांहून अधिक पर्यटक देतात भेट, पहा...</video:title>
	<video:publication_date>2026-08-03T12:13:58+05:30</video:publication_date>
	<video:description>महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हटलं की माथेरान आणि महाबळेश्वर ही नावे आवर्जून घेतली जातात. मात्र, याचबरोबर अमरावतीतील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाणही पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्याला वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. विशेषतः सुट्टीचे दिवस आणि रविवार असल्यास येथे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.  डोंगररांगा, हिरवाई, धुक्याची चादर आणि आल्हाददायक वातावरण यामुळे चिखलदरा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. पावसाळ्यात येथील निसर्ग आणखी खुलून दिसतो. धुक्यात हरवलेले रस्ते आणि डोंगरांचा सुंदर नजारा पर्यटकांना आकर्षित करतो.  मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी चिखलदऱ्यात 15 हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे पर्यटनस्थळी मोठी गर्दी पाहायला मिळाली. रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली असून विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची लगबग दिसून आली. त्यामुळे चिखलदरा हे महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/2Xyto1N_8bY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/chikhaldara.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/pune-news-bee-swarm-attacks-funeral-in-ambegaon-relatives-flee-leaving-body-behind-1725449.html</loc><video:video>
	<video:title>Pune News | तर एकही वाचला नसता... मधमाशांनी हल्ला करताच डेडबॉडी सोडून सर्वच पळाले; व्हिडीओ व्हायरल</video:title>
	<video:publication_date>2026-08-03T12:04:29+05:30</video:publication_date>
	<video:description>पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वडगाव पीर येथे अंत्यसंस्कारादरम्यान धक्कादायक घटना घडली. स्मशानभूमीत अंत्यविधी सुरू असतानाच अचानक मधमाशांच्या थव्याने उपस्थितांवर हल्ला चढवला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे स्मशानभूमीत एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळ काढला.  मिळालेल्या माहितीनुसार, अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू असतानाच मधमाशांनी उपस्थित नातेवाईक आणि नागरिकांना लक्ष्य केले. हल्ल्याची तीव्रता इतकी होती की, अनेकांना मृतदेह जागेवरच सोडून सुरक्षित स्थळी धाव घ्यावी लागली. या प्रकारामुळे काही काळ स्मशानभूमी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.  या घटनेत अनेक जण मधमाशांच्या दंशामुळे जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्मशानभूमीत मृतदेह एकटाच पडलेला दिसत असून, मधमाशांच्या हल्ल्यामुळे उपस्थित नागरिक जीव वाचवण्यासाठी दूरवर पळाल्याचे दृश्य पाहायला मिळते. काही जण मृतदेहाजवळच खाली बसून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतानाही दिसत आहेत.  या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी स्मशानभूमी परिसरातील सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/T5OmJd9R</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-03T120115.544.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/pappu-yadav-press-conference-attack-attempt-sparked-political-controversy-1725404.html</loc><video:video>
	<video:title>भर पत्रकार परिषदेत खासदारावर हल्ला करण्यामागे मास्टमाईंड कोण? बड्या नेत्याची पोस्ट चर्चेत</video:title>
	<video:publication_date>2026-08-03T11:48:08+05:30</video:publication_date>
	<video:description>पप्पू यादव यांच्या पत्रकार परिषदेत काल मोठा गोंधळ निर्माण झाला. पत्रकार परिषद सुरू असतानाच एका व्यक्तीने चाकू घेऊन हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. या घटनेत पप्पू यादव थोडक्यात बचावले. घटनेनंतर त्यांनी हा प्रकार आपल्या हत्येचा कट असल्याचा आरोप केला.  पप्पू यादव यांनी सांगितले की, हल्लेखोर चाकू घेऊन पत्रकार परिषदेत आला होता. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास करण्याची मागणी होत आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. घटनेनंतर सुरक्षेचा मुद्दाही अधिक गंभीरपणे चर्चेत आला आहे. पत्रकार परिषदेत अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.  दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हल्ल्याच्या प्रयत्नाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. रोहित पवार म्हणाले, &quot;या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल करावा. पुढे त्यांनी सांगितले,या घटने मागचा मास्टर माईंड शोधला पाहिजे. हल्ला करणाऱ्याच्या पाठीवर कोणाचा हात असेल तर त्यालाही समोर आणला पाहिजे.&quot;</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/ey3kELbJsps</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/khasdar-Pappu.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/shiv-senas-2029-strategy-eknath-shinde-camp-targets-gen-z-voters-after-jantar-mantar-student-protest-1725418.html</loc><video:video>
	<video:title>Shivsena | 2029 साठी Gen Z मतदारांवर शिंदे सेनेचा मोेठा फोकस; 38 कोटी तरुणांसाठी खास रणनीती काय?</video:title>
	<video:publication_date>2026-08-03T11:33:06+05:30</video:publication_date>
	<video:description>दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर राज्यातील राजकीय पक्षांनी जनरेशन-Z (Gen Z) मतदारांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आगामी निवडणुकांच्या तयारीला लागली असून, तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष रणनीती आखण्यास सुरुवात केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार, 2029 पर्यंत देशात सुमारे 38 कोटी Gen Z मतदार असतील. हे लक्षात घेऊन शिवसेनेकडून लवकरच पक्षाची विशेष बैठक बोलावली जाणार असून, या नव्या मतदारवर्गाचे नेतृत्व करू शकणाऱ्या युवा चेहऱ्यांची निवड करण्यावर भर दिला जाणार आहे. पक्षातील युवा नेत्यांसह विविध सामाजिक संघटनांमध्ये सक्रिय असलेल्या तरुणांना संधी देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.  यासोबतच शहर आणि ग्रामीण भागातील Gen Z मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी राज्यभर युवक मेळावे आयोजित करण्याची तयारीही पक्षात सुरू आहे. तरुणांच्या प्रश्नांवर आतापासूनच सक्रियपणे काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.  अलीकडेच जंतर-मंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनात मोठ्या प्रमाणावर Gen Z तरुणांचा सहभाग होता. या आंदोलनानंतर केंद्रातील तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या घटनाक्रमामुळे तरुण मतदारांची राजकीय ताकद अधोरेखित झाली असून, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी या मतदारवर्गाकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.  दरम्यान, 2029 मध्ये देशात लोकसभा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये Gen Z मतदारांची भूमिका निर्णायक ठरू शकते, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेसह महायुतीतील पक्षांनी तरुण मतदारांशी संवाद वाढवण्यावर आणि त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यावर भर देण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/IYQIVEwF3go</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-03T112934.146.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-plans-parliament-protest-demanding-amit-shah-resignation-1725397.html</loc><video:video>
	<video:title>हे काय नवीन? अमित शाहांचा राजीनामा मागण्यासाठी संजय राऊतांची नवी शक्कल, थेट संसदेत...</video:title>
	<video:publication_date>2026-08-03T15:10:59+05:30</video:publication_date>
	<video:description>संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अनुपस्थितीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मागील 2 आठवड्यांपासून पंतप्रधान आणि गृहमंत्री संसदेत दिसत नसल्याचा दावा राऊत यांनी केला. कोट्यवधी रुपये खर्च करून नवी संसद उभारली, मग संसद इन्स्टाग्रामवरच चालवा, असा टोला त्यांनी लगावला. तसेच संसदेला सामोरे जाण्यास घाबरणाऱ्या पंतप्रधानांना पदावर राहण्याचा अधिकार आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी पुढेही सुरू ठेवणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “आज आम्ही त्यांना पुन्हा बोलावण्याचा प्रयत्न करू आणि अमित शहांचा राजीनामा मागण्याचा आमचा उपक्रम, ती मागणी चालूच राहील. आम्ही थेट संसदेतच आंदोलन करणार आणी राजीनाम्याची मागणी करणार” पुण्यात अमित शाह यांच्या विरोधात निदर्शने झाल्याचा उल्लेख करत राऊत यांनी सरकारला जनतेसमोर येण्याचे आव्हान दिले.  राऊत म्हणाले, “जनतेला सामोरं जा ना.. जनतेल तुम्ही सामोरं का जात नाही.” पुढे त्यांनी निवडणुकीतील कथित गैरप्रकारांवरही भाष्य केले. “जर तुम्ही चोऱ्यामाऱ्या करून, लफंगेगिरी करून, व्होटचोरी करून, दहशतीच्या मार्गाने निवडून आले असाल तर ती दहशत तुम्हाला छळते,” अशी टीका त्यांनी केली.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/ULktJN0A</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/sanjay-Raut-9.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-questions-pm-modis-absence-from-parliament-targets-amit-shah-over-no-show-1725390.html</loc><video:video>
	<video:title>जे पंतप्रधान देशाच्या संसेदला सामोरं जायला टरकतात त्यांना... संजय राऊतांचा मोदींवर थेट प्रहार</video:title>
	<video:publication_date>2026-08-03T11:04:32+05:30</video:publication_date>
	<video:description>संसदेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अनुपस्थितीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे संसदेत दर्शन झाले नसल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले.  माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, &quot;गेल्या दोन आठवड्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह संसदेत उपस्थित नाहीत. मग एवढे कोट्यवधी रुपये खर्च करून नवी संसद उभारण्याची गरज काय होती? संसद इन्स्टाग्राम किंवा सोशल मीडियावरच चालवायची होती का?&quot; असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  राऊत यांनी पुढे म्हटले की, देशाच्या संसदेला सामोरे जाण्यास जर पंतप्रधान आणि गृहमंत्री तयार नसतील, तर त्यांना त्या पदांवर राहण्याचा नैतिक अधिकार आहे का, याचा विचार झाला पाहिजे. संसद ही लोकशाहीची सर्वोच्च संस्था असून, सरकारने संसदेसमोर उत्तरदायी राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.  यावेळी संजय राऊत यांनी विरोधकांकडून &quot;गुमशुदा की तलाश&quot; या स्वरूपात आंदोलन करण्याचाही इशारा दिला. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी संसदेत उपस्थित राहून विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.  दरम्यान, संजय राऊत यांनी सरकारवर लोकांपासून दूर राहण्याचाही आरोप केला. लोकांनी निवडून दिले असल्यास जनतेसमोर जाण्याची तयारी दाखवावी, असे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यांच्या या वक्तव्यामुळे संसदेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/R2KHPzGE</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-03T110033.336.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/nashik-guardian-minister-row-ncp-banners-demand-chhagan-bhujbals-appointment-sparks-buzz-in-mahayuti-1725371.html</loc><video:video>
	<video:title>भाजपच्या मित्रपक्षाचाच भाजपला घरचा आहेर! रस्त्यांवरील खड्ड्यांपासून पालकमंत्रीपदापर्यंत...नेमका मसला काय?</video:title>
	<video:publication_date>2026-08-03T10:32:52+05:30</video:publication_date>
	<video:description>महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी लावलेल्या बॅनरमुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. या बॅनरमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकची जबाबदारी स्वीकारली असल्याचा उल्लेख करत, आता छगन भुजबळ यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.  नाशिक शहरातील विविध चौकांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने हे बॅनर झळकवण्यात आले आहेत. &quot;नाशिकला दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी आता छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावे, हीच सर्वसामान्य नाशिककरांची भावना आहे,&quot; असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे.  या बॅनरबाजीमुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत मतभेदांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः नाशिकमधील रस्त्यांची दुरवस्था, खड्डे आणि विकासकामांच्या मुद्द्यावरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, त्याचे पडसाद आता बॅनरबाजीच्या माध्यमातूनही उमटताना दिसत आहेत.  दरम्यान, या बॅनरनंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावर महायुतीतील राजकारण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, यावर भाजप आणि महायुतीतील इतर नेत्यांची भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/w3B-6UaW7Fs</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-03T102828.994.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mumbai-water-cut-likely-to-end-as-reservoir-levels-reach-89-after-heavy-rainfall-1725343.html</loc><video:video>
	<video:title>Mumbai Water Cut Update | मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातवरील मोठी अपडेट समोर</video:title>
	<video:publication_date>2026-08-03T09:57:28+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलाशयांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांतील पाणीसाठा जवळपास 89 टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, यामुळे सध्या लागू असलेली 10 टक्के पाणीकपात लवकरच मागे घेतली जाण्याची शक्यता आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेकडून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.  यंदा जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैच्या अखेरीस राज्यभर दमदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, धरणे आणि जलाशयांतील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने जलसाठा वेगाने वाढत आहे.  सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांमध्ये आवश्यक क्षमतेच्या जवळपास 89 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मोडक सागर आणि विहार तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून, तानसा आणि तुळशी तलावही जवळपास तुडुंब भरले आहेत. या सातही जलाशयांतून मुंबईला दररोज सुमारे 4,100 दशलक्ष लिटर (MLD) पाणीपुरवठा केला जातो.  उन्हाळ्यात पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने 10 टक्के पाणीकपात लागू केली होती. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांतील मुसळधार पावसामुळे जलाशयांतील पाणी झपाट्याने वाढल्याने पाणीपुरवठ्यातही वाढ करण्यात आली आहे. सध्याचा पाणीसाठा आणि आगामी पावसाचा अंदाज लक्षात घेता पाणीकपात रद्द करण्याबाबत पालिका प्रशासन सकारात्मक असल्याचे समजते.  दरम्यान, सातही तलावांतील समाधानकारक पाणीसाठ्यामुळे लवकरच मुंबईतील 10 टक्के पाणीकपात रद्द करण्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, त्यानंतर मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/-ikj2yxBBPg</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-03T095432.440.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/cm-fadnavis-inaugurated-ai-lab-in-nagpur-highlighting-future-technology-jobs-1725005.html</loc><video:video>
	<video:title>विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन</video:title>
	<video:publication_date>2026-08-02T18:00:46+05:30</video:publication_date>
	<video:description>नागपूरमध्ये सत्यनारायण नुवाल आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत AI लॅबचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण, तंत्रज्ञान आणि भविष्यातील रोजगाराबाबत महत्त्वाचे विचार मांडले.  फडणवीस म्हणाले की, या अत्याधुनिक AI लॅबची स्थापना ही आनंदाची बाब आहे. रामदेवबाबा विद्यापीठाने संशोधनाला प्राधान्य देत शिक्षणाला नवा आकार दिला आहे. AI, सेमीकंडक्टर आणि क्वांटम कम्प्युटिंग ही तंत्रज्ञाने भविष्यात मोठे बदल घडवतील, असे त्यांनी सांगितले.  आज डीपफेक, AI आणि सहाव्या औद्योगिक क्रांतीची चर्चा सुरू असून तंत्रज्ञानातील बदलाचा वेग वाढला आहे. रोबोटिक्स आणि बायोटेक्नॉलॉजीसह सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानामुळे परिवर्तन होत आहे. पुढील एक हजार दिवसांत 75 टक्के नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल; नोकऱ्या जाणार नाहीत, त्यांचे रूप बदलेल, असे फडणवीस म्हणाले.  महाराष्ट्र सरकारच्या महाविस्तार AI App चा उल्लेख करत त्यांनी कृषी क्षेत्रातील उपयोगही सांगितला. AI मुळे शेतीचा खर्च 25 टक्क्यांनी कमी आणि उत्पादन 30 टक्क्यांनी वाढू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. रामदेवबाबा विद्यापीठ 90 स्टार्टअप्सना मदत करत असून, मध्य भारतातील पुढचे इनोवेशन याच संस्थेतून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/uOItIXd9</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/CM-Devendra-Fadnavis-1.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/prakash-ambedkar-challenges-maharashtra-freedom-of-religion-law-directly-1724989.html</loc><video:video>
	<video:title>मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...</video:title>
	<video:publication_date>2026-08-02T17:42:11+05:30</video:publication_date>
	<video:description>देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी मिळाल्यानंतर आणि अधिकृत राजपत्रात (गॅझेट) प्रकाशित झाल्यानंतर महाराष्ट्रात धर्मांतर-विरोधी कायदा - &#039;महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, 2026&#039; (Maharashtra Freedom of Religion Act, 2026) आता राज्यात लागू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा कायदा 30 जुलै रोजी अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाला आणि त्याच तारखेपासून तो अंमलात आला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार &quot;आता राज्यात बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये नवीन कायद्यातील तरतुदींनुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.&quot; यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही मोठं विधान केलं आहे.  महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याविषयी काय म्हणाले?  महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही कोर्टात याला चॅलेंज करणार आहोत. मुंबई हाय कोर्टात याला चॅलेंज करू. जुन्या काळात भांडण होतं होतं. एक वर्ग विष्णूला मानणारा होता दुसरा रामाला मानणारा होता. रामायण, महाभारत ज्यांनी काढलं त्यांच्या विरोधात याचिका दाखल झाली होती. कुठल्या देवाने कुठल्या देवा समोर झुकले पाहिजे यावरून याचिका दाखल झाली होती. बड्या मुश्किलीने ती याचिका दाबण्यात आली होती. नेमकं कुणी कुणासमोर झुकावे हा विषय होता.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/mkglh2i5</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Prakash-ambedkar.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/abhijit-deepke-meeting-sparks-bjp-leaders-anger-amid-alliance-tensions-1724964.html</loc><video:video>
	<video:title>अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...</video:title>
	<video:publication_date>2026-08-02T16:30:06+05:30</video:publication_date>
	<video:description>NEET पेपरफुटी प्रकरणी अभिजीत दीपके याने सरकारविरोधात आंदोलन केले. यावेळी अनेकांनी दीपकेला पाठिंबा दिला. महत्त्वाचे म्हणजे, यावेळी भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) मधील संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांचा कल अभिजीत दीपकेकडे झुकताना दिसला. संजय शिरसाटांनी अभिजीत दीपकेची भेट घेतली. यावर भाजपचे प्रवीण दरेकर आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे.  पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार बच्चू कडू यांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांची भेट घेतली. त्यावरून भाजप नेते नाराज झाले आहेत. रत्नागिरीमध्ये माध्यमांशी बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. &#039;एकनाथ शिंदेंनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे. शेवटी हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांच्या नेत्यांनी कसे वागावे हे एकनाथ शिंदेंनी ठरवले पाहिजे. महायुतीत काम करताना असे वर्तन करणे योग्य नाही,&#039; असे महसूलमंत्री म्हणाले. याच प्रकरणी प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, &#039;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जर त्यांच्या नेत्यांना समज दिली असेल, तर त्यांचे स्वगतच आहे. कारण महायुती भक्कम राहावी, याकडेच शिंदेंचा भर असतो.&#039;</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/w6Ztau_DJ50</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/sanjay-shirsat-3.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/devendra-fadnavis-delhi-move-rumours-dismissed-by-bjp-leader-bawankule-1724895.html</loc><video:video>
	<video:title>विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच</video:title>
	<video:publication_date>2026-08-02T16:06:24+05:30</video:publication_date>
	<video:description>केंद्रात मनुष्यबळ विकास खातं बघा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचवल्याचा दावा उद्धव ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी दावा केला होता. सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखातून त्यांनी हे सांगितलं होतं त्यानंतर पत्रकार परिषदेतही त्यांनी याच भाकि‍तावर भर दिला होता. या सबंध प्रकरणावर बोलताना भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.  बावनकुळे म्हणाले, फडणवीस केंद्रात जाण्याच्या वावड्यांवर लक्ष देऊ नका असे ते म्हणाले. विकसीत महाराष्ट्राचा संकल्प फडणवीस हेच पूर्ण करू शकतात. राऊतांच्या दाव्यावर महसूलमंत्र्यांनी असे उत्तर दिले. त्यांच्याकडे तिसरा डोळा आहे का माहित नाही. पण फडणवीस साहेब राज्यातच राहाणार. त्या वावड्यांवर विश्वास ठेवू नका असे ते म्हणाले. एकूणच महाराष्ट्रात विकास कामांसाठी देवेंद्र फडणवीसच योग्य आहेत असं बावनकुळे म्हणाले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/KYOv6UJZgvM</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/deevndra-Fadnavis-.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/nana-patole-gurupurnima-video-sparks-political-controversy-in-nanded-1724862.html</loc><video:video>
	<video:title>नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..</video:title>
	<video:publication_date>2026-08-02T15:01:56+05:30</video:publication_date>
	<video:description>नांदेडमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांचे गुरुपौर्णिमेनिमित्त दुधाने पाय धुतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून विरोधकांकडून नाना पटोले यांच्यावर टीका केली जात आहे. मात्र, पाय धुणाऱ्या व्यक्तींनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देत टीकेला उत्तर दिले आहे.  भाजपने हिंदू धर्म किंवा गुरुपौर्णिमा कशी असते, याबाबत आम्हाला शिकवू नये, अशी भूमिका अनिल पाटील चिमेगावकर आणि माधवराव पवळे यांनी मांडली. नाना पटोले यांनी पाय धुऊन घेतले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  याबाबत बोलताना अनिल पाटील चिमेगावकर आणि माधवराव पवळे म्हणाले, “नाना पटोले यांनी पाय धुऊन घेतले नाही तर नांदेडवरून आम्ही रत्नागिरीला गेलो होतो आणि गुरुपाद्य पूजा केली.”  त्यामुळे व्हायरल झालेल्या व्हिडीओमागील नेमका प्रकार काय होता, यावरून आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या दोघांशी आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी बातचीत केली. त्यांची सविस्तर भूमिका व्हिडीओमधून समोर आली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/c_od-6yyMOk</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/nana-patole.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/beed-political-equations-may-change-as-kshirsagar-leaders-discuss-unity-1724854.html</loc><video:video>
	<video:title>अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?</video:title>
	<video:publication_date>2026-08-02T16:35:06+05:30</video:publication_date>
	<video:description>बीड नगरपरिषदेत सत्ताधारी गटातील नाराजीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या सत्तेसमोर आता सत्तांतराचे आव्हान निर्माण झाल्याची चर्चा आहे. नगरपरिषदेतील काही सत्ताधारी नगरसेवक नाराज असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.  दरम्यान, अनेक वर्षांपासून राजकीय विरोधात असलेले योगेश क्षीरसागर आणि आमदार संदिप क्षीरसागर पुन्हा एकत्र येण्याची शक्यता चर्चेत आली आहे. भाजप नेते योगेश क्षीरसागर यांनी बीडच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी, &quot;बीडच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे,&quot; असे वक्तव्य केले.  यानंतर आमदार संदिप क्षीरसागर यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी, &quot;अशी वेळ आली तर आम्ही दोघे क्षीरसागर एकत्र बसण्यास तयार आहोत,&quot; असे स्पष्ट केले. या वक्तव्यांमुळे बीडच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.  योगेश क्षीरसागर आणि संदिप क्षीरसागर एकत्र आल्यास नगरपरिषदेतील सत्तेचे गणित बदलू शकते. त्यामुळे आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखालील सत्तेसमोर नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/KmkiTt9lv_8</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/sharad-Pawar-Beed-.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/pune-dagdusheth-ganpati-temple-witnessed-huge-devotee-crowd-1724828.html</loc><video:video>
	<video:title>Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी</video:title>
	<video:publication_date>2026-08-02T13:58:53+05:30</video:publication_date>
	<video:description>आज संकष्ट चतुर्थीनिमित्त पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. गणरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविक मंदिर परिसरात दाखल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढल्याने व्यवस्थापनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.  दरम्यान, गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाने टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी “साकड घातलं काय देवाला साकड घातलं, काही नाही देवाचा आशीर्वाद असू दे बस एवढंच” असे म्हटले. संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने मंदिरात भाविकांकडून भक्तिभावाने पूजा आणि दर्शन घेतले जात आहे. बाप्पाचे दर्शन घेऊन भाविक समाधान व्यक्त करत आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/5PaQsYfkWNk</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/dagdusheth-halwai-ganapati.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/cjp-core-committee-meeting-in-sambhajinagar-may-reveal-major-plans-1724777.html</loc><video:video>
	<video:title>CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?</video:title>
	<video:publication_date>2026-08-02T14:06:30+05:30</video:publication_date>
	<video:description>छत्रपती संभाजीनगरमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात CJP म्हणजेच कोकरोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनाने देशभराचे लक्ष वेधून घेतले होते. तब्बल महिनाभर चाललेले हे आंदोलन काही दिवसांपूर्वी संपले. मात्र, आंदोलन संपले असले तरी CJP आता शांत बसणार नसल्याचे चित्र दिसत आहे. संस्थापक अभिजित दिपके यांनी पुढील काळासाठी मोठा मास्टर प्लान तयार करण्याचे संकेत दिले आहेत.  याच पार्श्वभूमीवर बुधवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये CJP च्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत देशभरातील CJP च्या कोअर कमिटीचे 15 ते 20 प्रमुख सदस्य सहभागी होणार आहेत. संस्थापक अभिजित दिपके यांच्यासोबत या सदस्यांची विविध मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.  विशेष म्हणजे ही बैठक अभिजित दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगरातील घरात आयोजित करण्यात आली आहे. CJP च्या पुढील ध्येय-धोरणांबाबत तसेच भविष्यातील भूमिकेबाबत या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीनंतर CJP कडून पुढील कोणती पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/i_HmmNJX24A</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Dipake-Meeting-at-home-town.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ganesh-naik-warns-over-cluster-scheme-amid-political-tension-with-eknath-shinde-1724770.html</loc><video:video>
	<video:title>Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी</video:title>
	<video:publication_date>2026-08-02T13:03:39+05:30</video:publication_date>
	<video:description>वनमंत्री गणेश नाईक यांनी क्लस्टर योजनेवरून मोठे विधान करत आपली नाराजी स्पष्ट केली आहे. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांच्या वक्तव्याचा रोख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे या वक्तव्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या क्लस्टर योजनेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, क्लस्टरच्या माध्यमातून ओढून ताणून 30 वर्ष न झालेल्या, पडझडीला न आलेल्या आणि अतिधोकादायक नसलेल्या इमारतींमध्ये क्लस्टर डेव्हलोपमेंटचा फॅड उभा करण्याचा प्रयत्न सुरु आहे.  यावेळी गणेश नाईक यांनी पुढे बोलताना म्हटले की, गणेश नाईकच्या नादासा लागला तर त्याला त्याची जागा नीट ठेऊ देार नाही. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी हा इशारा थेट एकनाथ शिंदे यांच्यासाठी असल्याची चर्चा आहे.  आता शिंदे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आगामी काळात हा वाद आणखी वाढतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/FGFD74IRwJs</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/eknath-shinde-ganesh-naik.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-attacks-shinde-sena-over-missing-thackeray-and-dighe-photos-1724755.html</loc><video:video>
	<video:title>बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले</video:title>
	<video:publication_date>2026-08-02T12:36:15+05:30</video:publication_date>
	<video:description>पुण्यात अमित शाह यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवरून खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे सेनेवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर बॅनर शेअर करत राऊतांनी या मुद्द्यावरून टीका केली.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाह यांच्या स्वागतासाठी महायुतीकडून पुण्यात विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते.  यातील शिंदे सेनेकडून लावण्यात आलेला एक बॅनर संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केला. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो नसल्याचे सांगत त्यांनी शिंदे सेनेवर टीका केली.  राऊतांनी पोस्टमध्ये म्हटले, “हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसतोय का कोठे? सोडा, श्री आनंद दिघे सुद्धा गायब झाले! काल पुण्यात अमित शहा यांच्या स्वागताचे हे होर्डिंग्स आहेत! बहुधा मालकांना चालत नसावेत! हळू हळू ढोंग उघडे पडत आहे!”</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/LEBgH-lgpHk</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/pune-shah-baner.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/bmc-corporator-brought-from-hospital-to-protect-ruling-side-majority-1724735.html</loc><video:video>
	<video:title>अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी भाजपनं BMC तील नगरसेवकाला रुग्णालयातून आणलं, Video व्हायरल</video:title>
	<video:publication_date>2026-08-02T12:06:08+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील बहुमत टिकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांना आजारी नगरसेवकाला रुग्णालयातून थेट बैठकीत आणावे लागल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.  जुलैच्या शेवटच्या आठवड्यात स्थायी समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा हे प्रकृती अस्वस्थ असतानाही रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन बैठकीला उपस्थित राहिले. महत्त्वाच्या प्रस्तावांवरील मतदानासाठी सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ कायम ठेवणे गरजेचे होते.  स्थायी समितीत सत्ताधारी पक्षाकडे 13 सदस्य, तर विरोधकांकडे 12 सदस्य आहेत. मात्र बैठकीच्या दिवशी शिंदे सेनेच्या यामिनी जाधव उपचारासाठी रुग्णालयात होत्या आणि भाजपच्या राखी जाधव रजेवर होत्या. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसमोरील अडचण वाढली होती.  शिवकुमार झा यांनी प्रकृती ठीक नसतानाही अंगावर भागलपुरी शाल आणि कानांवर रुमाल बांधून बैठकीला हजेरी लावली. त्यांना थंडीचा त्रास होत असल्याचेही दिसून आले. GST संबंधित प्रस्तावावरील मतदानात सहभागी झाल्यानंतर बैठक संपण्याच्या काही मिनिटे आधी त्यांना परत जाण्याची परवानगी देण्यात आली.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/EjbOhP0Ag6M</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/BMC-nagarsevak.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/devendra-fadnavis-delhi-move-sparks-speculation-over-maharashtra-cm-1724713.html</loc><video:video>
	<video:title>देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल</video:title>
	<video:publication_date>2026-08-02T11:23:07+05:30</video:publication_date>
	<video:description>देशाच्या राजकारणात पुढील काही दिवसांत मोठी उलथापालथ होणार असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. केंद्रातील राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता असून, देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात वर्णी लागू शकते, असे राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.  संजय राऊत म्हणाले, ‘नरेंद्र मोदींच्या यांच्या मनात एक नेता आहे. शिक्षण खात्यावर दूरदृष्टीचा उच्च शिक्षित चांगला प्रशासक नेमावा. आता देशात उत्तम शिक्षणमंत्री कोण होऊ शकेल, तर त्यांचं नाव देंवेंद्र फडणवीस आहेत. ते नरेंद्र मोदींनाही माहिती आहे. पंतप्रधान मोदींनीही चर्चा केली आहे. आता त्याला मनुष्यबळ विकास खाते म्हणतात. फार मोठं खाते आहे. मनुष्यबळ विकास खात्याची जबाबदारी घ्यावी, अशी सूचना मोदींनी फडणवीसांना दिली आहे, असे राऊतांनी सांगितलं.  राऊत पुढे म्हणाले, ‘अशी माहिती माझ्याकडे आहे. कोणी कितीही नकार दिला. तरी ही माझी आहे.’ दिल्लीतील आंदोलनामुळे पंतप्रधान मोदींना भविष्यात माघार घ्यावी लागू शकते, असाही दावा त्यांनी केला. त्यामुळे फडणवीस केंद्रात गेल्यास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/6c9KZ2ENrxI</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/CM-Devendra-fadnavis-.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/e20-fuel-controversy-intensifies-as-aap-announces-major-delhi-protest-1724706.html</loc><video:video>
	<video:title>पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे... नेमकं प्रकरण काय?</video:title>
	<video:publication_date>2026-08-02T11:07:59+05:30</video:publication_date>
	<video:description>E20 इंधनाच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. आम आदमी पार्टीने या धोरणाविरोधात आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.  दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या E20 इंधन धोरणात तीन महत्त्वाचे बदल करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या मागण्यांसाठी दोन लाखांहून अधिक नागरिकांनी डिजिटल स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे आता या मुद्द्यावर सरकारची भूमिका काय असणार, याकडे लक्ष लागले आहे.  दरम्यान, काही वाहनचालक E20 पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनवर परिणाम होत असल्याचा दावा करत आहेत. तसेच मायलेज कमी होत असल्याचीही तक्रार केली जात आहे. दुसरीकडे, सरकार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इथेनॉलच्या वापराला प्रोत्साहन देत आहेत.  यापूर्वी नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरूनही सरकारवर विरोधकांनी टीका केली होती. आता E20 इंधनाच्या प्रश्नावरून पुन्हा आंदोलनाची तयारी सुरू झाल्याने केंद्र सरकारची चिंता वाढणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/_FBWQuv2mMc</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/PM-Modi-6.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-claims-secret-cold-war-brewing-between-modi-shah-leadership-1724693.html</loc><video:video>
	<video:title>एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे... फडणवीसांचा उल्लेख करत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा</video:title>
	<video:publication_date>2026-08-02T10:48:01+05:30</video:publication_date>
	<video:description>शिवसेना (उबाठा) गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप पक्षाबाबत धक्कादायक दावा केला आहे. राऊत यांनी सामना वृत्तपत्रातील त्यांच्या रोखठोक या अग्रलेखातून खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचं नमूद केलं.  सामनातील लेखामध्ये राऊत म्हणाले, दिल्लीत मोदी-शहांमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे, पंतप्रधान मोदींनी देवेंद्र फडणवीसांना केंद्रात येण्यासाठी सांगितलं किंवा वारंवार सुचवलं असेल, मात्र असं काही झालं नाही. मोदींनी फडणवीसांना सांगितलं की दिल्लीत तुमची गरज आहे वाटल्यास, महाराष्ट्रात पसंतीचा मुख्यमंत्री करून देतील, असाही दावा त्यांनी अग्रलेखातून केला आहे. त्यांच्या लेखाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.  याच अग्रलेखात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत राऊत म्हणाले, &quot;एरवी ऊठसुट कोणत्याही विषयांवर बोलणारे आणि गुरगुरणारे गृहमंत्री शहा या प्रकरणात रहस्यमयीरीत्या गप्प राहिले. त्याच्यामागे वेगळंच रहस्य आहे.&quot;</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/V34HQXFnNCs</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Sanjay-Raut-On-Modi-shah.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/dhananjay-munde-comeback-hints-spark-political-buzz-after-latest-speech-1724658.html</loc><video:video>
	<video:title>धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच... मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा</video:title>
	<video:publication_date>2026-08-02T10:15:40+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. परळीतील एका उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या राजकीय कमबॅकच्या चर्चांना वेग आला आहे.  कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी आपण नियमित जिम करत असल्याचे सांगितले. तसेच स्वतःचे वजन कमी केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले. “सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झाल होतं, पण येणारा काळ आपला आहे,” असे मुंडे म्हणाले.  पुढे बोलताना त्यांनी आपल्या आरोग्याबाबतही माहिती दिली. “मी स्वतः जिम करतो बऱ्यापैकी मी स्वतः माझं वजन कमी केलं आहे, असंही सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झाल होतं, पण येणारा काळ आपला आहे. त्या काळात आपण चांगलं फिट राहिला पाहिजे. यासाठी मी आता जीम करतोय,” असे त्यांनी सांगितले.  दरम्यान, मुंडे यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘येणारा काळ आपला आहे’ या विधानामुळे त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेबाबत चर्चांना उधाण आले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/k5iHKxW1dSQ</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Dhananjay-Munde-1.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/abhijit-dipke-exclusive-revealed-shocking-inside-story-behind-youth-protest-movement-1724445.html</loc><video:video>
	<video:title>Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T18:12:32+05:30</video:publication_date>
	<video:description>‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत देशातील तरुणांच्या आंदोलनाबाबत महत्त्वाची भूमिका मांडली. तरुणांनी सरकारकडून राजीनामा घेतला, ही बाब कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.  दीपके म्हणाले की, आंदोलन सुरू करताना एवढा मोठा परिणाम होईल, अशी कल्पनाही केली नव्हती. स्वतःला मोठा कॉकरोच न म्हणता, आपण त्यातील एक छोटा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, तरुणांनी जे करून दाखवले, ते निश्चितच उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.  दरम्यान, अनेक राज्यांमध्ये आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा दावा दीपके यांनी केला. महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगालसह काही राज्यांनी यासंदर्भात नोटीस काढल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली सरकारसोबतही चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या वेळी दीपके यांनी आंदोलनातील इनसाईड स्टोरी सांगितली त्यांनी सांगितले की मला स्वप्नतही वाटलं नव्हतं की आम्ही हे मिळवणार... इतकं मोठं आंदोलन होणार... मात्र हे झालं, आम्ही सिद्धी केलं.  तरुणांमध्ये असलेला संताप आणखी वाढला असून, सरकारने त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा दीपके यांनी दिला. दिल्लीत काही तरुणांवर गुन्हे दाखल होत असल्याचे फोनद्वारे समजत असून, त्यांना कोणतीही अडचण येऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/Iz0S82-Z5tc</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Dipake.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/wai-mahaganpati-temple-surrounded-by-krishna-river-floodwaters-during-heavy-rains-1724424.html</loc><video:video>
	<video:title>वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T17:40:44+05:30</video:publication_date>
	<video:description>वाईतील महागणपती मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत कृष्णा नदीचे पाणी पोहोचले आहे. मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून मंदिर परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मंदिराच्या आसपास मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दृश्य समोर आले आहे.  वाई शहरातील प्रसिद्ध महागणपती मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. नदीला आलेल्या पुरामुळे मंदिराच्या परिसरात पाणी शिरले असून मंदिराच्या पायापर्यंत पाणी पोहोचल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.  पाणी मंदिरातील ढोल्या गपपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाप्पाच्या पाया पर्यंत पोहचलं आहे तरी या मंदीरात नित्यनेमाने आरती करण्यात आली. पूरस्थिती निर्माण झाली असतानाही मंदिरातील धार्मिक विधींमध्ये खंड पडलेला नाही. मंदिरामध्ये विशेष आरती करण्यात आली. पाणी मंदिराच्या जवळपर्यंत आले असतानाही धार्मिक परंपरा जपण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे या घटनेचा व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर चर्चेत आहेत.  कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. मंदिर परिसरातील परिस्थिती पाहता भाविकांनीही सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/tHERaSPz1-Q</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/mahaganpati-wai.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/samata-patsanstha-fake-account-scam-bhondu-kharat-produced-before-rahata-court-over-multi-crore-fraud-allegations-1724414.html</loc><video:video>
	<video:title>Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T17:22:13+05:30</video:publication_date>
	<video:description>समता पतसंस्थेतील कथित बनावट खाते प्रकरणात आरोपी भोंदू खरात याला राहता न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणात समता पतसंस्थेत बनावट खाती उघडून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, बनावट खाते प्रकरणाच्या तपासासाठी शिर्डी पोलिसांनी भोंदू खरात याला ताब्यात घेतले असून, न्यायालयीन प्रक्रियेनुसार त्याला राहता न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत.  तपासादरम्यान समता पतसंस्थेत तब्बल 57 व्यक्तींच्या नावावर सुमारे 100 खाती उघडण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या खात्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, आर्थिक गैरव्यवहाराचा तपास अधिक गतीने सुरू आहे.  या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच बनावट खात्यांच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांचे नेमके स्वरूप काय आहे, याचा तपास पोलीस करत असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/ckz0VeNAilA</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T171434.697.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/hatnur-dam-released-massive-water-after-heavy-rainfall-in-jalgaon-district-1724376.html</loc><video:video>
	<video:title>Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T17:09:39+05:30</video:publication_date>
	<video:description>जळगावमध्ये मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून हातनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाचे तब्बल 30 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून परिसरातील नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  धरणातून तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली असून प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.  जळगाव जिल्ह्यात गेल्या काही काळापासून पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  हातनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये विशेष दक्षता घेतली जात आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणा सतर्क आहेत. दरम्यान, धरणाचे दरवाजे उघडल्याचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर चर्चेत आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/4PPqL9YImdQ</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/hatnur-dharan.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/amit-satam-slams-raj-thackeray-over-siddhivinayak-remarks-calls-him-stand-up-comedian-1724405.html</loc><video:video>
	<video:title>Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T16:58:54+05:30</video:publication_date>
	<video:description>मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांची विश्वासार्हता शून्य असल्याचा दावा करत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला.  माध्यमांशी संवाद साधताना अमित साटम म्हणाले की, &quot;महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांची विश्वासार्हता शून्य आहे. ते फक्त मिमिक्री आर्टिस्ट आणि स्टँडअप कॉमेडियन आहेत.&quot; तसेच, राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही नवीन नसल्याचेही त्यांनी म्हटले.  साटम पुढे म्हणाले, &quot;राज ठाकरे यांनी भाषणात आरोप केले, पण त्यात नवीन काय आहे? कोणतेही ठोस पुरावे न देता केवळ आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.&quot;  दरम्यान, सिद्धिविनायक मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून, मनसे आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर भाजपकडून ही पहिली तीव्र प्रतिक्रिया मानली जात असून, या वादावर पुढे आणखी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/lxbqvwl3SBE</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T165709.009.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/raj-thackeray-felicitates-riya-ahir-and-youth-who-filmed-police-action-during-ug-neet-protest-in-mumbai-1724391.html</loc><video:video>
	<video:title>Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T16:48:32+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईतील UG-NEET पेपरफुटी प्रकरणावरून झालेल्या विद्यार्थी आंदोलनात पोलिसांची गाडी अडवणारी विद्यार्थिनी रिया अहिर आणि आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कारवाईचा व्हिडिओ चित्रीत करणाऱ्या तरुणाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  मुंबईत आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात हा सत्कार सोहळा पार पडला. विद्यार्थी आंदोलनादरम्यान धाडसाने भूमिका घेतल्याबद्दल या दोघांचा गौरव करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी तरुणांच्या सहभागाचे कौतुक करत विद्यार्थी आणि युवकांनी सामाजिक प्रश्नांवर जागरूक राहण्याचे आवाहन केले.  UG-NEET पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले होते. मुंबईतील आंदोलनादरम्यान रिया अहिर हिने पोलिसांची गाडी अडविल्याचा व्हिडिओ तसेच पोलिसांच्या कारवाईचे चित्रीकरण करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर मनसे विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात दोघांचा विशेष सत्कार करण्यात आला.  या सत्कारानंतर पुन्हा एकदा NEET आंदोलन, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/b_hOWOoQOTo</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T164514.737.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mahayuti-dispute-grows-after-shinde-leaders-meet-abhijit-deepke-1724349.html</loc><video:video>
	<video:title>महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T16:25:35+05:30</video:publication_date>
	<video:description>भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांसह महायुतीतील काही नेत्यांवरही निशाणा साधला. NEET पेपरफुटी प्रकरणी अभिजीत दीपके याने सरकार विरोधात आंदोलन केलं. या वेळी अनेकांनी दीपके याला पाठिंबा दिला. महत्त्वाचं म्हणजे यावेळी भाजपचे मित्र पक्ष शिवसेना शिंदे गटाकडून संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांचा कल अभिजीत दीपकेकडे झूकताना दिसला. संजय शिरसाटांनी अभिजीत दीपकेची भेट घेतली. यावर भाजपचे प्रविण दरेकर यांनी भाष्य केलं आहे.  दरेकर म्हणाले, &quot;काँग्रेस आणि उबाठाचे समजू शकतो, मात्र संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनी अभिजीत दीपकेंची भेट घेणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या विरोधात जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांना समर्थन देणे महायुतीसाठी योग्य नसल्याचेही दरेकर म्हणाले. बच्चू कडू नौटंकी करत असून माध्यमांमध्ये येण्यासाठी विपर्यास करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे महायुतीतील भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये वाद वाढू शकते, असे ते म्हणाले.  संजय राऊत यांच्यावरही दरेकरांनी टीका केली. राज ठाकरेंकडे खूप बुद्धी आहे, मात्र त्यांच्या बुद्धीची प्रिंट्स जनमानसात का उमटत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. चंद्रकांत पाटील सरळ आणि सज्जन व्यक्ती असल्याने त्यांच्यावर टीकेचा परिणाम होणार नाही, असे दरेकर म्हणाले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/FPVQmQXcO9k</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/pravin-darekar.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sada-sarvankar-responds-to-raj-thackerays-siddhivinayak-donation-box-claims-denies-18-crore-scam-allegation-1724369.html</loc><video:video>
	<video:title>Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T16:22:30+05:30</video:publication_date>
	<video:description>मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहाराबाबत केलेल्या वक्तव्यावर शिवसेना आमदार आणि सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मंदिरातील आर्थिक व्यवहारांबाबत नागरिकांमध्ये गैरसमज पसरू नये, यासाठी वस्तुस्थिती समोर मांडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.  सदा सरवणकर यांनी स्पष्ट केले की, सिद्धिविनायक न्यासाच्या काही विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन मंदिरातील देणगी व्यवस्थेची चौकशी करण्याची विनंती केली होती. मात्र, त्या पत्रात कुठेही &quot;चोरी&quot; किंवा &quot;18 कोटी रुपयांचा घोटाळा&quot; असा उल्लेख करण्यात आलेला नाही. या पत्राचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले.  ते पुढे म्हणाले की, पूर्वी मंदिराच्या दानपेटीत दरवर्षी सुमारे 40 ते 45 लाख रुपये जमा होत होते. मात्र, मंदिर परिसरात करण्यात आलेल्या विविध सुधारणा आणि व्यवस्थापनातील बदलांमुळे गेल्या महिनाभरात ही रक्कम 90 ते 98 लाख रुपयांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे उत्पन्नात झालेली वाढ ही व्यवस्थापनातील सुधारणा आणि पारदर्शकतेचा परिणाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  सदा सरवणकर यांनी मंदिरातील आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आल्याची माहितीही दिली. काही कंत्राटी कर्मचारी ऑनलाइन माध्यमातून दर्शनासाठी पैसे घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर 19 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. तसेच, हातचलाखी करून पैसे लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 9 कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.  याशिवाय, मंदिरातील पुजाऱ्यांना भक्तांकडून मिळणारी रक्कम शासनाच्या नियमांनुसार दानपेटीत जमा करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. या सर्व उपाययोजनांमुळे मंदिराच्या उत्पन्नात वाढ झाली असून, सिद्धिविनायक मंदिर न्यास गेल्या दोन वर्षांपासून पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने काम करत असल्याचा दावाही सदा सरवणकर यांनी केला.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/FB6DdzjILHg</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T162047.449.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/abhijeet-dipake-health-update-emerged-after-sudden-illness-at-home-1724323.html</loc><video:video>
	<video:title>Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T15:52:14+05:30</video:publication_date>
	<video:description>कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली. छत्रपती संभाजीनगरमधील निवासस्थानी समर्थकांशी संवाद साधत असताना त्यांना अचानक घबराट, मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवला. त्यांचा बीपीही काही प्रमाणात कमी झाला. त्यामुळे त्यांचे वडील भगवान दिपके यांनी तातडीने डॉक्टरांना घरी बोलावले.  सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास अभिजीत दिपके समर्थकांशी बोलत होते. त्यावेळी अचानक त्रास जाणवू लागल्याने ते घरात निघून गेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.  डॉक्टरांच्या माहितीनुसार, सकाळपासून त्यांना मळमळ आणि उलटीसारखे जाणवत होते. त्यांना दोन-तीन उलट्या झाल्या असून, लूज मोशनचाही त्रास झाला. बीपी थोडा लो होता. त्यामुळे त्यांना आयव्ही देण्यात आला असून, पाच-सहा वाजेपर्यंत आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  आरामानंतरही प्रकृतीत सुधारणा झाली नाही, तर रक्त तपासणी केली जाणार आहे. दिल्लीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नंतर निगेटिव्ह रिपोर्ट देण्यात आला होता. त्यामुळे डॉक्टर पुन्हा टेस्ट करण्याचा विचार करत आहेत. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता कमी असून त्यांच्यावर घरीच उपचार होत असल्याचे डॉक्टरांनी कळवले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/a6zUFnYlX-Y</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/abhijit-dipake-Health-update.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sonam-wangchuk-urges-centre-to-fulfil-promises-after-returning-to-ladakh-reminds-government-of-pending-demands-1724336.html</loc><video:video>
	<video:title>Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T15:50:58+05:30</video:publication_date>
	<video:description>लडाखमध्ये परतल्यानंतर पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत केंद्र सरकारला दिलेल्या आश्वासनांची तातडीने पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे. आंदोलन संपले असले तरी त्यामागील मूळ मुद्दे आणि मागण्या विसरलेल्या नाहीत, असे स्पष्ट करत त्यांनी सरकारने याबाबत ठोस भूमिका घ्यावी, असे म्हटले.  व्हिडिओ संदेशात सोनम वांगचुक यांनी आंदोलनादरम्यान मांडलेल्या मागण्या अद्यापही कायम असल्याचे सांगितले. आंदोलनाचा उद्देश केवळ तात्पुरता नसून लडाखच्या प्रश्नांवर दीर्घकालीन आणि न्याय्य तोडगा निघावा, हीच भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.  यावेळी त्यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना जाहीर केलेली आर्थिक मदत तातडीने देण्याची आठवणही सरकारला करून दिली. संबंधित कुटुंबांना न्याय मिळावा आणि सरकारने आपल्या आश्वासनांची अंमलबजावणी विलंब न करता करावी, अशी मागणी त्यांनी केली.  दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या या व्हिडिओ संदेशामुळे लडाखमधील प्रलंबित प्रश्न आणि आंदोलनादरम्यान सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/7P1l42Vz5u4</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T154822.194.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/uddhav-thackeray-expresses-confidence-over-shiv-senas-bow-and-arrow-symbol-ahead-of-supreme-court-verdict-1724320.html</loc><video:video>
	<video:title>मोठी बातमी! धनुष्यबाण आमचाच... नाही मिळालं तर गोठवलं जाईल; सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी उद्धव ठाकरेंचा मोठा दावा</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T15:43:17+05:30</video:publication_date>
	<video:description>शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आज जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि विधानसभा प्रमुखांची ऑनलाइन बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत संघटनात्मक विषयांसह सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील प्रकरणावरही चर्चा करण्यात आली.  बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. पक्ष आणि &#039;धनुष्यबाण&#039; या निवडणूक चिन्हाबाबत न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला. तसेच, कोणत्याही परिस्थितीत हे चिन्ह दुसऱ्या गटाकडे जाणार नाही, गरज पडल्यास ते गोठवले जाऊ शकते, असेही त्यांनी बैठकीत म्हटल्याची माहिती समोर आली आहे.  दरम्यान, पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर 2022 पासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाची नुकतीच सुनावणी पार पडली असून, अंतिम निर्णयाकडे राज्याचे राजकीय लक्ष लागले आहे.  बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक तयारी मजबूत ठेवण्याच्या सूचना दिल्याचेही सांगितले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/WLz8O5vHCXM</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/nivruti-babar">nivruti babar</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T153304.432.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/cjp-foreign-funding-probe-intensifies-after-minister-gives-direct-investigation-orders-1724310.html</loc><video:video>
	<video:title>CJP सह अनेक संस्थांचं टेन्शन वाढलं; विदेशी फंडिंगच्या दाव्यानंतर गृहराज्यमंत्र्यांचे थेट आदेश...</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T15:24:24+05:30</video:publication_date>
	<video:description>कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) नीट पेपरफुटी आणि तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतरवर 35 दिवस आंदोलन केले. या आंदोलनानंतर सरकारने CJP संदर्भात मोठे पाऊल उचलल्याचे संकेत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले आहेत. अनेक वेळा सीजेपीला विदेशी फंडिंग होत असल्याचा दावा करण्यात आला होता.  CJP ला परदेशातून निधी मिळतोय का, याची चौकशी सुरू असल्याची माहिती पंकज भोयर यांनी दिली. महाराष्ट्रात गृह विभाग आणि केंद्रात ED कडून CJP सह इतर फॉरेन फंडिंग घेणाऱ्या संस्थांची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. हा पैसा सकारात्मक कामासाठी वापरला जात असेल तर निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, देश, राज्य अथवा समाज अस्थिर करण्यासाठी त्याचा वापर होत असेल तर निश्चितपणे चौकशी करण्यात येईल, असे भोयर म्हणाले.  अभिजीत दिपके यांनी 16 मे 2026 रोजी CJP ही डिजिटल पार्टी सुरू केली होती. फॉरेन फंडिंगच्या आरोपांवर सरकारला संशय असेल तर त्यांनी चौकशी करावी, असे दिपके यांनी यापूर्वी म्हटले होते. आता या चौकशीतून काय समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/7rpHW026jXM</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/abhijit-dipake-case.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ajit-doval-tilak-award-speech-urged-gen-z-toward-nation-building-1724289.html</loc><video:video>
	<video:title>Ajit Doval Speech | आता अजित डोवाल यांचे तरुणांवर मोठे विधान, म्हणाले, तरुणांनी...</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T15:11:14+05:30</video:publication_date>
	<video:description>NSA अजित डोभाल यांचे टिळक पुरस्कार सोहळ्यातील भाषण चर्चेत आले आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी युवकांना राष्ट्रनिर्माणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. विशेषतः Gen Z पिढीने देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.  डोभाल म्हणाले, &quot;आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत विशेष आहे. लोकमान्य टिळकांसारख्या महान राष्ट्रपुरुषाच्या पुण्यतिथीच्या दिवशी हा पुरस्कार स्वीकारण्याचे भाग्य लाभले. मी पुण्यात शिक्षण घेत असताना टिळकांच्या विचारांवर व्याख्यान ऐकले होते. त्यावेळी कधी वाटले नव्हते की अनेक वर्षांनी त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळेल,&quot;  युवकांनी टिळकांच्या राष्ट्रनिर्माणाच्या विचारांचा अभ्यास करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्याचा अर्थ केवळ मनाला वाटेल ते करणे नसून देशहिताची जबाबदारी स्वीकारणे असल्याचे डोभाल यांनी स्पष्ट केले.  ते म्हणाले, &quot;आज लोकमान्य टिळक असते तर कदाचित ते म्हणाले असते की &#039;भारताला सशक्त आणि विकसित बनवणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.&#039;&quot; देशाला सक्षम आणि सुरक्षित बनवण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे, नव्या पिढीने योगदान द्याव. तरुणांनी पुढे यावं&quot; असा संदेश त्यांनी यावेळी दिला.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/mZOEJuzE</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/ajit-doval.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/uddhav-thackeray-slams-pm-modi-apologise-to-neet-victims-not-protesters-over-paper-leak-row-1724288.html</loc><video:video>
	<video:title>Uddhav Thackeray | झुरळ, भरकटलेले म्हणणारे पंतप्रधान मोदी तरुणांची माफी मागणार का?; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T14:51:17+05:30</video:publication_date>
	<video:description>UG-NEET पेपरफुटी प्रकरण आणि त्यानंतर झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील संवादादरम्यान आंदोलक तरुणांना माफ करत ते भरकटले असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांवर जोरदार टीका केली असून, माफी आंदोलकांनी नव्हे तर पंतप्रधानांनी मागितली पाहिजे, अशी भूमिका मांडली.  मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, NEET पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची पंतप्रधानांनी माफी मागावी. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचाही त्यांनी उल्लेख केला. आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला, पॅलेट गनचा वापर झाला तसेच काही विद्यार्थिनींशी गैरवर्तन झाल्याचे आरोप त्यांनी यावेळी केले.  उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले की, आंदोलक तरुणांच्या भाषेवर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी सरकारने स्वतःच्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. सोशल मीडियावरील ट्रोलिंग संस्कृतीवर टीका करत त्यांनी, सरकारच्या जवळच्या सहकाऱ्यांकडून देशातील वास्तविक परिस्थितीची माहिती पंतप्रधानांनी घ्यावी, असेही म्हटले.  तसेच, आंदोलकांना यापूर्वी &quot;झुरळ&quot; आणि आता &quot;भरकटलेले&quot; असे संबोधल्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, देशाच्या भवितव्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तरुणांना अशा प्रकारे संबोधणे योग्य नाही. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सुरुवातीपासूनच संवेदनशीलतेने पाहिले असते, तर परिस्थिती इतकी चिघळली नसती, असेही त्यांनी नमूद केले.  दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थी आंदोलन आणि त्यावरून सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यासह देशातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/nrWyEbrrS78</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T144721.528.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/dhule-rain-news-panjhra-river-floods-after-137-mm-rainfall-47000-cusecs-water-released-1724282.html</loc><video:video>
	<video:title>Dhule Rain | 137 मिमी पावसानंतर पांजरा नदीला पूर; रातोरात रस्ते पाण्याखाली, प्रशासनाचा अलर्ट जारी</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T14:41:39+05:30</video:publication_date>
	<video:description>धुळे जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पांजरा नदीला मोठा पूर आला आहे. दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसानंतर जिल्ह्यात तब्बल 137 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नद्या, नाले आणि जलसाठे तुडुंब भरून वाहू लागले.  मिळालेल्या माहितीनुसार, पांजरा नदीत सुमारे 47 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीला मोठा पूर आला. पुराच्या पाण्यामुळे नदीलगतचे दोन्ही बाजूंचे रस्ते रात्री उशिरापर्यंत पाण्याखाली गेले होते. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.  दरम्यान, जिल्ह्यातील अनेक धरणे आणि जलसाठे पूर्ण क्षमतेने भरले असून, सततच्या पावसामुळे प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी नदीकाठच्या भागात सतर्कता कायम ठेवण्यात आली आहे.  प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, नदी-नाल्यांजवळ न जाण्याचे आणि हवामान विभाग तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/F_taUDtTFXI</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T144033.678.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/amit-shah-urged-youth-to-read-tilaks-gita-during-pune-award-ceremony-1724250.html</loc><video:video>
	<video:title>लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना दिलेल्या खास संदेशाची सर्वत्र चर्चा</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T14:18:48+05:30</video:publication_date>
	<video:description>पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  अमित शाह यांनी अजित डोभाल यांच्या देशसेवेचे कौतुक केले. त्यांच्या कार्यकाळाची माहिती देताना त्यांनी देशाच्या सेवेसाठी मोठे समर्पण केल्याचे सांगितले.  यावेळी अमित शाह यांनी तरुणांना टिळकांनाच्या नजरेने, त्यांच्या विचारधारेने गीता वाचण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “मला टिळकांनी लिहीलेली गीता गुजरातीत मिळाली. मी ती वाचली आहे त्यामुळे माझं तरुणांना आवाहन आहे. तुम्ही टिळकांची गीता वाचा. तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीच चूक करणार नाही. मी गॅरंटी देतो.” हा ग्रंथ भगवद्गीतेचा व्यावहारिक स्वरूप असल्याचेही त्यांनी सांगितले.  अमित शाह यांनी टिळकांच्या पत्रकारितेतील योगदानाचाही उल्लेख केला. “इंग्रज हे कोणत्या पेपरला घाबरायचे तर ते केसरी आणि मराठाला घाबरायचे,” असे ते म्हणाले. राष्ट्राची चेतना जागवून स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असे टिळक मानत होते. विविध उत्सवांच्या माध्यमातून त्यांनी लोकांना संघटित करण्याचे काम केले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/EuqkfWhCwKU</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/amit-shah-Lokmanya-Tilak-speech.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ajit-doval-received-lokmanya-tilak-award-from-amit-shah-in-pune-1724239.html</loc><video:video>
	<video:title>अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; अमित शाहांच्या हस्ते गौरव</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T13:42:16+05:30</video:publication_date>
	<video:description>पुण्यात आज लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.  पुरस्कार प्रदान केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित डोभाल यांच्या कार्याचा गौरव केला. देशाच्या सुरक्षेसाठी त्यांनी दिलेले योगदान, समर्पण आणि रणनीतीकार म्हणून बजावलेली भूमिका याचा फडणवीस यांनी उल्लेख केला. देशहितासाठी सातत्याने काम करणाऱ्या डोभाल यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वातील महत्त्वाच्या कामगिरीचाही यावेळी संदर्भ देण्यात आला.  यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनाही अभिवादन केले. स्वातंत्र्यलढ्यात टिळकांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा आणि त्यांच्या योगदानाचा त्यांनी उल्लेख केला. त्यामुळे पुरस्कार सोहळ्यात अजित डोभाल यांच्या कार्यासोबतच लोकमान्य टिळकांच्या विचारांना आणि देशासाठीच्या योगदानालाही उजाळा मिळाला.  पुण्यात पार पडत असलेल्या या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित असल्याने सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या पुरस्कारामुळे डोभाल यांच्या दीर्घकाळच्या राष्ट्रीय सेवेला विशेष सन्मान मिळाला. या सोहळ्याला मोठी उपस्थिती लाभली.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/aDP6VprW89o</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/amit-shah-ajit-Dhobhal.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/raj-thackeray-on-siddhivinayak-temple-18-crore-donation-box-scam-mns-chief-demands-high-level-probe-1724241.html</loc><video:video>
	<video:title>Raj Thackeray | सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंच्या दाव्याने खळबळ; भरसभेत...</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T13:26:52+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. मंदिरातील दानपेटीतून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा अपहार होत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.  राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सिद्धिविनायक मंदिर न्यासाशी संबंधित एका पत्राचा उल्लेख केला. या पत्रात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून मंदिरातील दानपेटीतील कथित चोरीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रात दर बुधवारी दानपेटीतील रकमेची मोजदाद कर्मचारी पकडण्यापूर्वी सुमारे 50 लाख रुपयांच्या आसपास होत होती. मात्र, कथित चोरी प्रकरण उघडकीस आल्यानंतर हीच रक्कम सुमारे दीड कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला असून, त्यामुळे दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचा अपहार होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.  याप्रकरणाचे धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचत असल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी आणि विश्वस्त मंडळाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही पत्रात करण्यात आल्याचा उल्लेख राज ठाकरे यांनी केला. श्रद्धेने भक्तांनी दानपेटीत टाकलेला पैसा धर्मकार्यासाठी वापरला जावा, मात्र त्याच पैशाची चोरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला.  यावेळी त्यांनी तरुणांच्या वाढत्या असंतोषाचाही संदर्भ देत सरकारवर टीका केली. &quot;सरकारवर विश्वास ठेवता येत नाही म्हणून लोक देवळात जातात, पण मंदिरातही चोरी होत असेल तर नागरिकांचा विश्वास कुठे राहणार?&quot; असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तरुणांच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा आणि समाजातील वाढती अस्वस्थता समजून घेण्याची गरज सरकारने ओळखली पाहिजे, असेही ते म्हणाले.  राज ठाकरे यांनी पुढे सांगितले की, सध्याचा जनतेचा उद्रेक हा केवळ एका घटनेमुळे नसून त्यामागे अनेक गंभीर सामाजिक आणि प्रशासकीय कारणे आहेत. सरकारने राजकारणापलीकडे जाऊन तरुणांच्या आकांक्षा आणि नागरिकांच्या विश्वासाशी संबंधित प्रश्न गांभीर्याने हाताळण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/vAASwzx4ncA</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T132304.680.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/amit-thackeray-targeted-chandrakant-patil-during-mns-student-wing-gathering-1724224.html</loc><video:video>
	<video:title>ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...&#039; ठाकरेंचा निशाणा नेमका कुणावर?</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T13:12:53+05:30</video:publication_date>
	<video:description>मनसेच्या विद्यार्थी सेनेचा मुंबईत मेळावा सुरू असून, या कार्यक्रमाला अमित ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. देश आणि राज्यातील परिस्थितीवर बोलताना अमित ठाकरे भाषणादरम्यान भावूक झाले. यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका करत चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले. त्यांच्या भाषणातील काही वक्तव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.  नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन झाले होते. या आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील यांनी आंदोलकांबाबत वक्तव्य केले होते. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांचे फिंगर प्रिंट घेतले असून, आधार कार्डच्या माध्यमातून त्यांचा शोध घेऊन अटक केली जाईल, असे त्यांनी म्हटले होते.  यावर अमित ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. “हा सर्व डाटा चंपाच्या घरी पाठवा,” असे म्हणत त्यांनी त्यांना डिवचले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मेळाव्यात राजकीय चर्चेला चांगलेच उधाण आले.  दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा संदर्भ देत अमित ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना सूचक इशारा दिला. “तरुणांनी दिल्लीतून राजीनामा आणलाय, यांना राज्यातूनच राजीनामा आणायला वेळ लागणार नाही,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची मेळाव्यात जोरदार चर्चा झाली. अमित ठाकरे यांच्या भावनिक भाषणामुळे मेळाव्यातील वातावरण काही काळ गंभीर झाले आणि उपस्थित कार्यकर्त्यांचे लक्ष त्यांच्या वक्तव्यांकडे होते.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/qtPx1PVoU8I</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/MNS-Amit-thackeray.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/raj-thackeray-slams-government-theres-money-to-topple-mlas-but-not-for-the-youth-mns-chief-launches-sharp-attack-1724220.html</loc><video:video>
	<video:title>Raj Thackeray | आमदार फोडण्यासाठी पैसे आहेत, तरुणांसाठी नाहीत; राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T13:05:22+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तरुणांच्या वाढत्या असंतोषावर भाष्य करत राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. NEET पेपरफुटी हे केवळ आंदोलनाचे निमित्त होते, मात्र त्यामागे तरुणांच्या मनात साचलेला रोष हा खरा कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले.  राज ठाकरे म्हणाले, &quot;NEET पेपरफुटी हे आंदोलनाचं एक कारण होतं. पण रस्त्यावर उतरलेले सर्वजण विद्यार्थी नव्हते, त्यात मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी सहभागी झाले होते. त्यांच्या मनात अनेक वर्षांपासून साचलेला असंतोष आता बाहेर पडत आहे.&quot; त्यांनी सांगितले की, तरुणांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत, शहरांमध्ये मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत, शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही रोजगार उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे युवकांमध्ये नैराश्य वाढत आहे.  यावेळी त्यांनी सरकारच्या आर्थिक आणि औद्योगिक धोरणांवरही निशाणा साधला. &quot;कंपन्या खासगी हातात दिल्या जात आहेत. एका उद्योगपतीवरच सरकारची विशेष मेहरबानी सुरू आहे. देशात विकासापेक्षा फक्त निवडणुका आणि आमदार-खासदार फोडण्याचे राजकारण सुरू आहे,&quot; असा आरोप त्यांनी केला. तसेच, डिजिटल व्यवहारांचा उल्लेख करत त्यांनी आमदार-खासदारांच्या कथित खरेदी-विक्रीवरही उपरोधिक भाष्य केले.  राज ठाकरे पुढे म्हणाले की, हा केवळ सत्तांतराचा प्रश्न नसून देशाच्या भविष्यासंबंधीचा विषय आहे. &quot;हा कुणाला सत्तेवरून खाली खेचण्याचा किंवा कुणाला सत्तेवर आणण्याचा मुद्दा नाही. हा देशाच्या भविष्याचा आणि तरुणांच्या आयुष्याचा प्रश्न आहे,&quot; असे ते म्हणाले.  ग्रामीण भागातील युवकांच्या परिस्थितीकडे लक्ष वेधताना त्यांनी शेतकरी आत्महत्यांचा मुद्दाही उपस्थित केला. &quot;शेजारच्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याचा मुलगा शहरात जाऊन नोकरी करण्याचं स्वप्न पाहतो. पण शहरातही नोकऱ्या नाहीत, राहण्यासाठी जागा नाही. स्मार्ट सिटीची घोषणा झाली, पण प्रत्यक्षात परिस्थिती बदलली का?&quot; असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  राज ठाकरे यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था आणि तरुणांच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/njDMfaBR98A</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T130139.542.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/raj-thackeray-criticized-bjp-over-pm-modi-viral-video-statement-1724193.html</loc><video:video>
	<video:title>पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत, म्हणाले &#039;तुम्ही म्हणाले ते मान्य मात्र...</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T12:49:53+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरही सूचक भाष्य केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना भाजपला टोला लगावला.  राज ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांनी आक्षेपार्ह भाषा आणि व्हिडीओ चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्यांचे हे म्हणणे योग्य असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र, अशाच प्रकारची भाषा वापरणाऱ्या आपल्या पक्षातील लोकांनाही मोदींनी समज द्यावी, असे त्यांनी सांगितले.  “पंतप्रधानांना सांगायचं तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा,” असे म्हणत राज ठाकरे यांनी भाजपच्या ट्रोल टीमवर निशाणा साधला. महात्मा गांधी, नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यापासून अनेकांवर ट्रोलिंग होत असल्याचा दावा त्यांनी केला.  मोदींनी संबंधित तरुणांना माफ केल्याचे म्हटले आहे. त्यावर राज ठाकरे यांनी, “पण १२ वर्ष तुमच्या लोकांनी जे केलं त्याची माफी कोण मागणार,” असा सवाल उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/zbVrVClGFaY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/MNS-Raj-thackeray.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/raj-thackeray-on-chandrakant-patil-i-want-to-see-chandrakant-patils-brain-fingerprints-mns-chief-launches-scathing-attack-on-maharashtra-education-minister-1724206.html</loc><video:video>
	<video:title>मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंची फटकेबाजी</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T12:37:15+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्था आणि शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्या भाषणात त्यांनी उपरोधिक शैलीत शिक्षणमंत्र्यांच्या विधानांचा समाचार घेत राज्य सरकारवर निशाणा साधला.  राज ठाकरे म्हणाले, &quot;आम्ही लहान असताना आमचे आई-वडील रात्री झोपताना डोक्याला तेल लावायला सांगायचे. त्यामुळे बुद्धी तल्लख होते, असं ते म्हणायचे. पण एका माणसाने आयुष्यभर डोक्याला तेल चोपडलं, तरी त्याला बुद्धी आली नाही. प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो. हे म्हणे राज्याचे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री,&quot; असा टोला त्यांनी लगावला.  यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या काही विधानांचाही उल्लेख करत टीका केली. &quot;दगडावरचे फूटप्रिंट आधारशी लिंक करणार म्हणतात. ते नेमकं कसं शक्य आहे? मला तर चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूचे फिंगरप्रिंट पाहायचे आहेत,&quot; असे म्हणत त्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.  राज ठाकरे पुढे म्हणाले, &quot;कोल्हापूरकरांनी शिक्षणासाठी त्यांना पुण्यात पाठवलं. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं. पण तिथेही काही झालं नाही. अशा व्यक्तीला राज्याचा शिक्षणमंत्री म्हटल्यावर आजच्या तरुणांचा आणि जनरेशन-Z चा संताप होणारच. राज्याच्या नशिबी अशी माणसं आली आहेत, ही दुर्दैवाची बाब आहे,&quot; अशी टीका त्यांनी केली.  मनसे विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यातील या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असून, राज ठाकरे यांच्या टीकेला सत्ताधारी पक्षाकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/yqSE8K_rHGE</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T123405.588.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/amit-shah-pune-visit-preparations-intensified-ahead-of-major-award-ceremony-1724180.html</loc><video:video>
	<video:title>Amit shah Pune Visit | अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T12:12:31+05:30</video:publication_date>
	<video:description>पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अमित शाह यांनी पुण्यात दाखल झाल्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.  दरम्यान, राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.  या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपचे अनेक स्थानिक नेते उपस्थित आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे पुण्यात राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. कार्यक्रमस्थळी सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, विविध भागांतून नेते आणि कार्यकर्ते दाखल होत आहेत. त्यामुळे पुरस्कार सोहळ्याला मोठी उपस्थिती पाहायला मिळण्याची शक्यता आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/rBMGjpi0dps</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Amit-shah-at-delhi.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mns-leader-amit-thackeray-turns-emotional-during-speech-leaves-stage-briefly-at-student-wing-rally-returns-to-slam-government-1724171.html</loc><video:video>
	<video:title>LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले... Video होतोय व्हायरल</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T12:09:54+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे नेते अमित ठाकरे यांच्या भाषणादरम्यान अनपेक्षित घडामोड पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना अमित ठाकरे काही क्षणांसाठी भावूक झाले आणि भाषणाचा धागा सुटल्याने त्यांनी &quot;मी विसरायला लागलो... मला सुचत नाहीये... मी परत येतो,&quot; असे सांगत काही वेळासाठी मंच सोडला. या घटनेमुळे सभागृहात उपस्थित मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काही काळ अवाक् झाले.  यापूर्वी भाषणाची सुरुवात करताना अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी हलक्या-फुलक्या अंदाजात संवाद साधला. &quot;थोड्या घोषणा द्या म्हणजे माझं भाषण आटपेल,&quot; असे म्हणत त्यांनी वातावरण हलके केले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.  भाषणादरम्यान अमित ठाकरे यांनी आपण राज ठाकरे यांचे पुत्र असल्यामुळेच राजकारणात आल्याची स्पष्ट कबुली दिली. &quot;मी राज साहेबांचा मुलगा नसतो तर राजकारणात नसतो. पण तुमच्यासारखे कार्यकर्ते नसते तर राजकारणात टिकूही शकलो नसतो,&quot; असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. महाराष्ट्रभर झालेल्या दौऱ्यांचा आणि विद्यार्थी संघटनेच्या कामाचा उल्लेख करत त्यांनी पक्षाच्या वाढीत कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.  देश आणि राज्याच्या सद्यस्थितीवर बोलताना अमित ठाकरे भावूक झाले. &quot;आपण आंदोलने विसरून आता पुढच्या लढाईसाठी तयार झालं पाहिजे,&quot; असे म्हणत असतानाच ते काही क्षणांसाठी थांबले आणि भाषण पुढे सुरू ठेवता आले नाही. त्यामुळे त्यांनी मंच सोडला. सुमारे दहा मिनिटांनंतर ते पुन्हा मंचावर परतले आणि उर्वरित भाषण पूर्ण करत राज्य आणि केंद्र सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/OxPmc88_vgI</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T120516.436.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/supriya-sule-questions-neet-paper-leak-demands-transparent-sit-probe-says-upsc-papers-never-leak-1724162.html</loc><video:video>
	<video:title>UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T11:47:47+05:30</video:publication_date>
	<video:description>UG-NEET पेपरफुटी प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद अद्यापही कायम असून, परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतरही विरोधकांनी सरकारवर टीकेची धार कायम ठेवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परीक्षा सुधारणा विधेयकावर नाराजी व्यक्त करत नीट पेपरफुटी प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे.  मुंबईत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, &quot;देशात UPSC परीक्षेचा पेपर कधी फुटत नाही, मग NEET चाच पेपर वारंवार कसा फुटतो?&quot; असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT), सर्वपक्षीय बैठक किंवा संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली.  सुळे यांनी पुढे शिक्षण क्षेत्रातील वाढत्या व्यावसायिकीकरणावरही टीका केली. काही कोचिंग क्लासेस मोठ्या आर्थिक उलाढाली करत असून, त्यांच्या कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध होत आहेत, हे चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले. &quot;शिक्षणाचे बाजारीकरण थांबले पाहिजे. संसदेत शिक्षण व्यवस्थेवर गंभीर चर्चा होणे गरजेचे आहे. राजकारण बाजूला ठेवून विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक झाली पाहिजे,&quot; असे त्या म्हणाल्या.  परीक्षा सुधारणा विधेयकाबाबतही त्यांनी असमाधान व्यक्त केले. &quot;या विधेयकावर मी समाधानी नाही, राष्ट्रवादी काँग्रेस समाधानी नाही आणि इंडिया आघाडीही समाधानी नाही. एका पालकाच्या भूमिकेतूनही मी समाधानी नाही. केवळ शिक्षा करून प्रश्न सुटणार नाही, तर पेपरफुटीची मूळ कारणे रोखली पाहिजेत,&quot; असे त्यांनी स्पष्ट केले.  जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत सुळे म्हणाल्या की, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता तर परिस्थिती वेगळी राहिली असती. &quot;विद्यार्थ्यांवर अश्रुधूराचा वापर करण्यात आला, त्याचे आवाज संसदेतही ऐकू येत होते. सरकारने विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने तोडगा काढावा,&quot; असे आवाहन त्यांनी केले. तसेच, NEET पेपरफुटी प्रकरण अत्यंत गांभीर्याने हाताळून देशातील परीक्षा व्यवस्था अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/6tmszql0r5g</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T114022.714.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-uncut-statement-on-amit-shah-sparked-major-political-controversy-1724164.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay raut UNCUT | एकतर गृहमंत्र्यांसारखे या, नाही तर गुंड्यांसारखे या, तुम्ही...&#039; संजय राऊतांचं अमित शाहांबाबत खळबळजनक विधान</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T12:06:21+05:30</video:publication_date>
	<video:description>शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी लोकमान्य टिळकांच्या कुटुंबावरही जोरदार टीका केली. टिळकांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा संदर्भ देत त्यांनी शिंदे गटावरही आरोप केले. इतकेच नाही तर त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही थेट निशाणा साधला आहे.  दरम्यान, गृहमंत्री येणार असल्याने पुण्यात आर्मी आणि महाराष्ट्राचा पोलीस फोर्स आणल्याचा दावा राऊत यांनी केला. यावरून त्यांनी सरकारला सवाल केला. “तुम्ही कशाला घाबरता? तुम्ही मूळचे गुंड आहात. तुम्ही एक तर गुंडासारखे वागा किंवा गृहमंत्र्यासारखे वागा,” असं ते म्हणाले.  संजय राऊत म्हणाले, “काय झालं काय टिळकांच्या कुटुंबाला? शिंदेंच्या गटात टिळकांचं कुटुंब गेलं. लाज वाटली पाहिजे.” स्वाभिमानासाठी टिळकांच्या पूर्वजांनी दिलेल्या लढ्याची आठवण करून देत त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचाही उल्लेख केला. “जालियनवालानंतरचं हे कांड आहे,” असा आरोप त्यांनी केला.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/KvSrGJ7H</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/sanajy-raut-on-amit-shah.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/girish-mahajan-vijay-chaudhari-audio-case-took-shocking-turn-after-aide-detained-1724107.html</loc><video:video>
	<video:title>गिरीश महाजन - विजय चौधरी कथित ऑडिओ प्रकरणाला धक्कादायक वळण! स्वीय सहाय्यकानेच... भाजपमध्ये मोठ्या घडामोडी</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T11:21:32+05:30</video:publication_date>
	<video:description>भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संबंधित कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना वेग आला आहे. या कथित क्लिपमध्ये एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.  दरम्यान, या प्रकरणात आता नव्या घडामोडी समोर आल्या आहेत. ताज्या माहितीनुसार, विजय चौधरी यांचे स्वीय सहाय्यक यश टिपरे याच्यावर कथित ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  प्राथमिक माहितीनुसार, यश टिपरे सोशल मीडिया हँडलर आणि स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होता. याच काळात विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील डेटा चिपमध्ये साठवून घेतल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. इतकेच नाही तर आणखी काही ऑडिओदेखील व्हायरल केल्याचा संशय आहे. या प्रकरणात आणखी काही जण तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचीही चर्चा आहे. संशयित यश टिपरे याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील तपासानंतर या प्रकरणात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/j9JUaFS6aDs</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/girish-mahajan-vijay-chaudhari.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/commonwealth-games-2026-india-wins-23-medals-judo-athletics-shine-as-neeraj-chopra-settles-for-silver-1724144.html</loc><video:video>
	<video:title>Commonwealth Game | कॉमनवेल्थमध्ये भारताची पदकांची आतषबाजी! एका दिवसात 6 पदके, ज्युडोपासून भालाफेकीपर्यंत भारतीय खेळाडूंची कमाल</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T11:13:43+05:30</video:publication_date>
	<video:description>कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतासाठी 31 जुलै हा दिवस ऐतिहासिक ठरला असून, भारतीय खेळाडूंनी ज्युडो आणि ॲथलेटिक्समध्ये दमदार कामगिरी करत एका दिवसात तब्बल सहा पदकांची कमाई केली आहे. या शानदार प्रदर्शनामुळे भारताच्या एकूण पदकांची संख्या 23 वर पोहोचली असून, त्यामध्ये 5 सुवर्ण, 12 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश आहे. मात्र, एकूण पदकतालिकेत भारत सध्या 10व्या स्थानावर असून, 24 पदकांसह वेल्स नवव्या स्थानावर आहे.  नवव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकत देशाची मान उंचावली. ज्युडोमध्ये महिलांच्या 48 किलो गटात अस्मिता डे हिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले, तर पुरुषांच्या 60 किलो गटात हर्ष सिंहने 10-0 अशा एकतर्फी विजयासह सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या 57 किलो गटात यामिनी मौर्यने रौप्य पदक जिंकले.  भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असलेल्या नीरज चोप्राला 85.83 मीटरच्या सर्वोत्तम फेकीसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मात्र, यशवीर सिंहने 85.41 मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह कांस्य पदक पटकावत सर्वांचे लक्ष वेधले. तसेच तेजस्विन शंकरने डेकॅथलॉनमध्ये कांस्य पदक जिंकत या स्पर्धेत पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला.  दरम्यान, बॉक्सिंगमध्येही भारताची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. भारतीय संघातील सर्व 10 उपांत्य फेरीतील बॉक्सरांनी आपापले सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला असून, किमान रौप्य पदक निश्चित केले आहे. त्यामुळे आगामी दिवसांत भारताच्या सुवर्णपदकांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये आतापर्यंत भारतासाठी मीराबाई चानू, शर्मिला धनकड, दिलीप गावित, अस्मिता डे आणि हर्ष सिंह यांनी सुवर्णपदके जिंकली आहेत. तर नीरज चोप्रासह अनेक खेळाडूंनी रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई करत भारताची पदकांची झोळी भरली आहे. भारतीय खेळाडूंच्या या दमदार प्रदर्शनामुळे आगामी स्पर्धांबाबत देशाच्या अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/pAJJeNl5QV0</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T110725.031.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/bombay-high-court-pulls-up-fda-over-mantralaya-canteen-inspection-flies-dust-found-despite-98-clean-report-1724099.html</loc><video:video>
	<video:title>Special Report | Tukaram Mundhe | FDA | मंत्रालयाच्या कँटीनचा भांडाफोड! FDA चा 98% स्वच्छ अहवाल हायकोर्टाने फेटाळला</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T10:42:58+05:30</video:publication_date>
	<video:description>अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नसुरक्षा मोहिमेदरम्यान नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला. या कारवाईनंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने एफडीएला मंत्रालय आणि विधानभवनातील कँटीनचीही प्रत्यक्ष तपासणी करण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे, त्याच्याच एक दिवस आधी एफडीएने मुंबई उच्च न्यायालयातील कँटीनवरही कारवाई करत ते बंद करण्याचे आदेश दिले होते.  सुनावणीदरम्यान एफडीएने न्यायालयात मंत्रालयातील कँटीनची तपासणी करण्यात आली असून तेथे एकही कीटक आढळला नसल्याचा दावा केला. मात्र, या दाव्यावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र आक्षेप घेत आश्चर्य व्यक्त केले. &quot;एवढ्या मोठ्या कँटीनमध्ये एकही कीटक आढळला नाही, हा दावा हास्यास्पद आहे,&quot; अशी टिप्पणी न्यायालयाने केली. तसेच, &quot;मंत्रालयात कीटक आढळले तर त्यावरही खासगी आस्थापनांप्रमाणेच कारवाई करणार का?&quot; असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला.  यानंतर वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने मंत्रालय आणि विधानभवनातील कँटीनची प्रत्यक्ष पाहणी केली. तपासणीनंतर न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालात मंत्रालयातील कँटीनमध्ये माश्या, धूळ तसेच स्वच्छतेतील अनेक त्रुटी आढळल्याचे नमूद करण्यात आले. याशिवाय भाज्या कापण्यासाठी वापरण्यात येणारे चाकू अत्यंत जुने आणि गंजलेले असल्याचेही तपासणीत समोर आले.  या अहवालानंतर मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएची कडक शब्दांत खरडपट्टी काढली. एफडीएने तयार केलेला &quot;98 टक्के स्वच्छतेचा&quot; अहवाल वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, खासगी आणि सरकारी आस्थापनांना वेगवेगळे निकष लावले जात असल्याची टीका करत कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे, असे न्यायालयाने नमूद केले.  दरम्यान, न्यायालयाने एफडीएला खासगी हॉटेल्सप्रमाणेच सरकारी कँटीननाही समान निकष लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. परवाने रद्द करण्यापूर्वी संबंधित आस्थापनांना सुधारणा करण्यासाठी नोटीस देण्यात यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. मंत्रालय, विधानभवन तसेच संबंधित खासगी आस्थापनांना मंगळवारपर्यंत आवश्यक सुधारणा करण्यासाठी मुदत देण्यात आली असून, त्यानंतर एफडीएकडून पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/DoW9SW7A6ZI</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T103416.764.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/pm-modi-viral-video-sparked-attention-after-forgiving-protesting-youth-1724089.html</loc><video:video>
	<video:title>पंतप्रधान मोदींच्या आणखी एका व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ! त्या कृतीने वेधलं लक्ष</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T10:41:01+05:30</video:publication_date>
	<video:description>जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान काही आंदोलकांकडून वापरण्यात आलेल्या आक्षेपार्ह भाषेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली. मात्र, या प्रकरणात आंदोलकांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांना योग्य दिशा देण्याची गरज असल्याचे मोदी यांनी म्हटले. तसेच त्यांनी आंदोलकांना माफ करण्याची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या कृतीने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.  व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत, आंदोलकांच्या वक्तव्यांमुळे समाजात निर्माण झालेला आक्रोश आपण समजू शकतो, असे मोदी म्हणाले. मात्र, संबंधित तरुणांना शिक्षा करण्यापेक्षा त्यांना समजावून योग्य मार्ग दाखवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मोदी म्हणाले, “समाजात जो आक्रोश आहे त्याला मी व्यवस्थितपणे समजू शकतो. हा एकप्रकारचा सांस्कृतिक धक्का आहे, आमच्या मुली अशाप्रकारची भाषा कशी वापरु शकतात? पण, या मुलांना मिठीत घेऊन, योग्य रस्ता दाखविण्याची हीच वेळ आहे. ही दिशा भरकटलेली मुलं आहेत, त्यांना योग्य रस्ता दाखवणं आपलं काम आहे. त्यांना शिक्षा देणं, न्यायालयाच्या फेऱ्या मारायला लावणं यामुळे परिस्थिती बदलणार नाही, मला त्यांना माफ करायचंय&quot;, असे मोदींनी स्पष्ट केले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/uxjTnVecZ8Q</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/narendra-modi-video.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/jyoti-shinde-caste-certificate-invalid-creates-crisis-over-zilla-parishad-membership-1724078.html</loc><video:video>
	<video:title>ShivSena | शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का! कागदपत्रांचा घोळ अन् छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली, काय घडतंय?</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T10:16:36+05:30</video:publication_date>
	<video:description>छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत प्रहार पक्षाच्या सदस्या ज्योती शिंदे यांच्यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रहार पक्ष हे शिवसेना शिंदे गटाशी संलग्न आहे. त्यांचे मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र छाननीनंतर अवैध ठरवण्यात आले आहे. प्रशासनाने हे प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिल्याने त्यांच्या जिल्हा परिषद सदस्यत्वावरही कायदेशीर संकट निर्माण झाले आहे.  ज्योती शिंदे यांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या जात प्रमाणपत्राची कागदपत्रांच्या आधारे तपासणी करण्यात आली. या छाननीत संबंधित प्रमाणपत्र नियमांनुसार वैध नसल्याचे स्पष्ट झाल्याने ते रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या सदस्यपदाबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया काय होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.  दरम्यान, मराठवाड्यात अवैध किंवा संशयास्पद कुणबी प्रमाणपत्रांवर प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. ज्योती शिंदे यांच्या प्रकरणाचा परिणाम प्रहार पक्षासोबतच शिवसेना शिंदे गटाच्या राजकीय समीकरणांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतकेच नाही तर शिंदे गटासह अनेक पक्षांतील सदस्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्र अवैध असल्याचं सांगितलं जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/2n7COPQ2fhQ</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/chhatrapati-Sambjaji-nagar.png</video:thumbnail_loc></video:video></url></urlset>