<urlset xmlns="https://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9" xmlns:video="http://www.google.com/schemas/sitemap-video/1.1"><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/abhijeet-dipake-health-update-emerged-after-sudden-illness-at-home-1724323.html</loc><video:video>
	<video:title>Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T15:52:14+05:30</video:publication_date>
	<video:description>कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली. छत्रपती संभाजीनगरमधील निवासस्थानी समर्थकांशी संवाद साधत असताना त्यांना अचानक घबराट, मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवला. त्यांचा बीपीही काही प्रमाणात कमी झाला. त्यामुळे त्यांचे वडील भगवान दिपके यांनी तातडीने डॉक्टरांना घरी बोलावले.  सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास अभिजीत दिपके समर्थकांशी बोलत होते. त्यावेळी अचानक त्रास जाणवू लागल्याने ते घरात निघून गेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.  डॉक्टरांच्या माहितीनुसार, सकाळपासून त्यांना मळमळ आणि उलटीसारखे जाणवत होते. त्यांना दोन-तीन उलट्या झाल्या असून, लूज मोशनचाही त्रास झाला. बीपी थोडा लो होता. त्यामुळे त्यांना आयव्ही देण्यात आला असून, पाच-सहा वाजेपर्यंत आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  आरामानंतरही प्रकृतीत सुधारणा झाली नाही, तर रक्त तपासणी केली जाणार आहे. दिल्लीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नंतर निगेटिव्ह रिपोर्ट देण्यात आला होता. त्यामुळे डॉक्टर पुन्हा टेस्ट करण्याचा विचार करत आहेत. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता कमी असून त्यांच्यावर घरीच उपचार होत असल्याचे डॉक्टरांनी कळवले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/a6zUFnYlX-Y</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/abhijit-dipake-Health-update.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sonam-wangchuk-urges-centre-to-fulfil-promises-after-returning-to-ladakh-reminds-government-of-pending-demands-1724336.html</loc><video:video>
	<video:title>Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T15:50:58+05:30</video:publication_date>
	<video:description>लडाखमध्ये परतल्यानंतर पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत केंद्र सरकारला दिलेल्या आश्वासनांची तातडीने पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे. आंदोलन संपले असले तरी त्यामागील मूळ मुद्दे आणि मागण्या विसरलेल्या नाहीत, असे स्पष्ट करत त्यांनी सरकारने याबाबत ठोस भूमिका घ्यावी, असे म्हटले.  व्हिडिओ संदेशात सोनम वांगचुक यांनी आंदोलनादरम्यान मांडलेल्या मागण्या अद्यापही कायम असल्याचे सांगितले. आंदोलनाचा उद्देश केवळ तात्पुरता नसून लडाखच्या प्रश्नांवर दीर्घकालीन आणि न्याय्य तोडगा निघावा, हीच भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.  यावेळी त्यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना जाहीर केलेली आर्थिक मदत तातडीने देण्याची आठवणही सरकारला करून दिली. संबंधित कुटुंबांना न्याय मिळावा आणि सरकारने आपल्या आश्वासनांची अंमलबजावणी विलंब न करता करावी, अशी मागणी त्यांनी केली.  दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या या व्हिडिओ संदेशामुळे लडाखमधील प्रलंबित प्रश्न आणि आंदोलनादरम्यान सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/7P1l42Vz5u4</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T154822.194.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/uddhav-thackeray-expresses-confidence-over-shiv-senas-bow-and-arrow-symbol-ahead-of-supreme-court-verdict-1724320.html</loc><video:video>
	<video:title>मोठी बातमी! धनुष्यबाण आमचाच... नाही मिळालं तर गोठवलं जाईल; सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी उद्धव ठाकरेंचा मोठा दावा</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T15:43:17+05:30</video:publication_date>
	<video:description>शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आज जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि विधानसभा प्रमुखांची ऑनलाइन बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत संघटनात्मक विषयांसह सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील प्रकरणावरही चर्चा करण्यात आली.  बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. पक्ष आणि &#039;धनुष्यबाण&#039; या निवडणूक चिन्हाबाबत न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला. तसेच, कोणत्याही परिस्थितीत हे चिन्ह दुसऱ्या गटाकडे जाणार नाही, गरज पडल्यास ते गोठवले जाऊ शकते, असेही त्यांनी बैठकीत म्हटल्याची माहिती समोर आली आहे.  दरम्यान, पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर 2022 पासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाची नुकतीच सुनावणी पार पडली असून, अंतिम निर्णयाकडे राज्याचे राजकीय लक्ष लागले आहे.  बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक तयारी मजबूत ठेवण्याच्या सूचना दिल्याचेही सांगितले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/WLz8O5vHCXM</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/nivruti-babar">nivruti babar</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T153304.432.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/cjp-foreign-funding-probe-intensifies-after-minister-gives-direct-investigation-orders-1724310.html</loc><video:video>
	<video:title>CJP सह अनेक संस्थांचं टेन्शन वाढलं; विदेशी फंडिंगच्या दाव्यानंतर गृहराज्यमंत्र्यांचे थेट आदेश...</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T15:24:24+05:30</video:publication_date>
	<video:description>कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) नीट पेपरफुटी आणि तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतरवर 35 दिवस आंदोलन केले. या आंदोलनानंतर सरकारने CJP संदर्भात मोठे पाऊल उचलल्याचे संकेत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले आहेत. अनेक वेळा सीजेपीला विदेशी फंडिंग होत असल्याचा दावा करण्यात आला होता.  CJP ला परदेशातून निधी मिळतोय का, याची चौकशी सुरू असल्याची माहिती पंकज भोयर यांनी दिली. महाराष्ट्रात गृह विभाग आणि केंद्रात ED कडून CJP सह इतर फॉरेन फंडिंग घेणाऱ्या संस्थांची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. हा पैसा सकारात्मक कामासाठी वापरला जात असेल तर निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, देश, राज्य अथवा समाज अस्थिर करण्यासाठी त्याचा वापर होत असेल तर निश्चितपणे चौकशी करण्यात येईल, असे भोयर म्हणाले.  अभिजीत दिपके यांनी 16 मे 2026 रोजी CJP ही डिजिटल पार्टी सुरू केली होती. फॉरेन फंडिंगच्या आरोपांवर सरकारला संशय असेल तर त्यांनी चौकशी करावी, असे दिपके यांनी यापूर्वी म्हटले होते. आता या चौकशीतून काय समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/7rpHW026jXM</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/abhijit-dipake-case.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ajit-doval-tilak-award-speech-urged-gen-z-toward-nation-building-1724289.html</loc><video:video>
	<video:title>Ajit Doval Speech | आता अजित डोवाल यांचे तरुणांवर मोठे विधान, म्हणाले, तरुणांनी...</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T15:11:14+05:30</video:publication_date>
	<video:description>NSA अजित डोभाल यांचे टिळक पुरस्कार सोहळ्यातील भाषण चर्चेत आले आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी युवकांना राष्ट्रनिर्माणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. विशेषतः Gen Z पिढीने देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.  डोभाल म्हणाले, &quot;आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत विशेष आहे. लोकमान्य टिळकांसारख्या महान राष्ट्रपुरुषाच्या पुण्यतिथीच्या दिवशी हा पुरस्कार स्वीकारण्याचे भाग्य लाभले. मी पुण्यात शिक्षण घेत असताना टिळकांच्या विचारांवर व्याख्यान ऐकले होते. त्यावेळी कधी वाटले नव्हते की अनेक वर्षांनी त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळेल,&quot;  युवकांनी टिळकांच्या राष्ट्रनिर्माणाच्या विचारांचा अभ्यास करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्याचा अर्थ केवळ मनाला वाटेल ते करणे नसून देशहिताची जबाबदारी स्वीकारणे असल्याचे डोभाल यांनी स्पष्ट केले.  ते म्हणाले, &quot;आज लोकमान्य टिळक असते तर कदाचित ते म्हणाले असते की &#039;भारताला सशक्त आणि विकसित बनवणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.&#039;&quot; देशाला सक्षम आणि सुरक्षित बनवण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे, नव्या पिढीने योगदान द्याव. तरुणांनी पुढे यावं&quot; असा संदेश त्यांनी यावेळी दिला.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/mZOEJuzE</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/ajit-doval.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/uddhav-thackeray-slams-pm-modi-apologise-to-neet-victims-not-protesters-over-paper-leak-row-1724288.html</loc><video:video>
	<video:title>Uddhav Thackeray | झुरळ, भरकटलेले म्हणणारे पंतप्रधान मोदी तरुणांची माफी मागणार का?; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T14:51:17+05:30</video:publication_date>
	<video:description>UG-NEET पेपरफुटी प्रकरण आणि त्यानंतर झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील संवादादरम्यान आंदोलक तरुणांना माफ करत ते भरकटले असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांवर जोरदार टीका केली असून, माफी आंदोलकांनी नव्हे तर पंतप्रधानांनी मागितली पाहिजे, अशी भूमिका मांडली.  मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, NEET पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची पंतप्रधानांनी माफी मागावी. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचाही त्यांनी उल्लेख केला. आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला, पॅलेट गनचा वापर झाला तसेच काही विद्यार्थिनींशी गैरवर्तन झाल्याचे आरोप त्यांनी यावेळी केले.  उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले की, आंदोलक तरुणांच्या भाषेवर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी सरकारने स्वतःच्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. सोशल मीडियावरील ट्रोलिंग संस्कृतीवर टीका करत त्यांनी, सरकारच्या जवळच्या सहकाऱ्यांकडून देशातील वास्तविक परिस्थितीची माहिती पंतप्रधानांनी घ्यावी, असेही म्हटले.  तसेच, आंदोलकांना यापूर्वी &quot;झुरळ&quot; आणि आता &quot;भरकटलेले&quot; असे संबोधल्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, देशाच्या भवितव्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तरुणांना अशा प्रकारे संबोधणे योग्य नाही. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सुरुवातीपासूनच संवेदनशीलतेने पाहिले असते, तर परिस्थिती इतकी चिघळली नसती, असेही त्यांनी नमूद केले.  दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थी आंदोलन आणि त्यावरून सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यासह देशातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/nrWyEbrrS78</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T144721.528.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/dhule-rain-news-panjhra-river-floods-after-137-mm-rainfall-47000-cusecs-water-released-1724282.html</loc><video:video>
	<video:title>Dhule Rain | 137 मिमी पावसानंतर पांजरा नदीला पूर; रातोरात रस्ते पाण्याखाली, प्रशासनाचा अलर्ट जारी</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T14:41:39+05:30</video:publication_date>
	<video:description>धुळे जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पांजरा नदीला मोठा पूर आला आहे. दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसानंतर जिल्ह्यात तब्बल 137 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नद्या, नाले आणि जलसाठे तुडुंब भरून वाहू लागले.  मिळालेल्या माहितीनुसार, पांजरा नदीत सुमारे 47 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीला मोठा पूर आला. पुराच्या पाण्यामुळे नदीलगतचे दोन्ही बाजूंचे रस्ते रात्री उशिरापर्यंत पाण्याखाली गेले होते. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.  दरम्यान, जिल्ह्यातील अनेक धरणे आणि जलसाठे पूर्ण क्षमतेने भरले असून, सततच्या पावसामुळे प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी नदीकाठच्या भागात सतर्कता कायम ठेवण्यात आली आहे.  प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, नदी-नाल्यांजवळ न जाण्याचे आणि हवामान विभाग तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/F_taUDtTFXI</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T144033.678.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/amit-shah-urged-youth-to-read-tilaks-gita-during-pune-award-ceremony-1724250.html</loc><video:video>
	<video:title>लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना दिलेल्या खास संदेशाची सर्वत्र चर्चा</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T14:18:48+05:30</video:publication_date>
	<video:description>पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  अमित शाह यांनी अजित डोभाल यांच्या देशसेवेचे कौतुक केले. त्यांच्या कार्यकाळाची माहिती देताना त्यांनी देशाच्या सेवेसाठी मोठे समर्पण केल्याचे सांगितले.  यावेळी अमित शाह यांनी तरुणांना टिळकांनाच्या नजरेने, त्यांच्या विचारधारेने गीता वाचण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “मला टिळकांनी लिहीलेली गीता गुजरातीत मिळाली. मी ती वाचली आहे त्यामुळे माझं तरुणांना आवाहन आहे. तुम्ही टिळकांची गीता वाचा. तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीच चूक करणार नाही. मी गॅरंटी देतो.” हा ग्रंथ भगवद्गीतेचा व्यावहारिक स्वरूप असल्याचेही त्यांनी सांगितले.  अमित शाह यांनी टिळकांच्या पत्रकारितेतील योगदानाचाही उल्लेख केला. “इंग्रज हे कोणत्या पेपरला घाबरायचे तर ते केसरी आणि मराठाला घाबरायचे,” असे ते म्हणाले. राष्ट्राची चेतना जागवून स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असे टिळक मानत होते. विविध उत्सवांच्या माध्यमातून त्यांनी लोकांना संघटित करण्याचे काम केले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/EuqkfWhCwKU</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/amit-shah-Lokmanya-Tilak-speech.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ajit-doval-received-lokmanya-tilak-award-from-amit-shah-in-pune-1724239.html</loc><video:video>
	<video:title>अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; अमित शाहांच्या हस्ते गौरव</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T13:42:16+05:30</video:publication_date>
	<video:description>पुण्यात आज लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.  पुरस्कार प्रदान केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित डोभाल यांच्या कार्याचा गौरव केला. देशाच्या सुरक्षेसाठी त्यांनी दिलेले योगदान, समर्पण आणि रणनीतीकार म्हणून बजावलेली भूमिका याचा फडणवीस यांनी उल्लेख केला. देशहितासाठी सातत्याने काम करणाऱ्या डोभाल यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वातील महत्त्वाच्या कामगिरीचाही यावेळी संदर्भ देण्यात आला.  यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनाही अभिवादन केले. स्वातंत्र्यलढ्यात टिळकांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा आणि त्यांच्या योगदानाचा त्यांनी उल्लेख केला. त्यामुळे पुरस्कार सोहळ्यात अजित डोभाल यांच्या कार्यासोबतच लोकमान्य टिळकांच्या विचारांना आणि देशासाठीच्या योगदानालाही उजाळा मिळाला.  पुण्यात पार पडत असलेल्या या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित असल्याने सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या पुरस्कारामुळे डोभाल यांच्या दीर्घकाळच्या राष्ट्रीय सेवेला विशेष सन्मान मिळाला. या सोहळ्याला मोठी उपस्थिती लाभली.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/aDP6VprW89o</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/amit-shah-ajit-Dhobhal.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/raj-thackeray-on-siddhivinayak-temple-18-crore-donation-box-scam-mns-chief-demands-high-level-probe-1724241.html</loc><video:video>
	<video:title>Raj Thackeray | सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंच्या दाव्याने खळबळ; भरसभेत...</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T13:26:52+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. मंदिरातील दानपेटीतून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा अपहार होत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.  राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सिद्धिविनायक मंदिर न्यासाशी संबंधित एका पत्राचा उल्लेख केला. या पत्रात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून मंदिरातील दानपेटीतील कथित चोरीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रात दर बुधवारी दानपेटीतील रकमेची मोजदाद कर्मचारी पकडण्यापूर्वी सुमारे 50 लाख रुपयांच्या आसपास होत होती. मात्र, कथित चोरी प्रकरण उघडकीस आल्यानंतर हीच रक्कम सुमारे दीड कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला असून, त्यामुळे दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचा अपहार होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.  याप्रकरणाचे धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचत असल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी आणि विश्वस्त मंडळाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही पत्रात करण्यात आल्याचा उल्लेख राज ठाकरे यांनी केला. श्रद्धेने भक्तांनी दानपेटीत टाकलेला पैसा धर्मकार्यासाठी वापरला जावा, मात्र त्याच पैशाची चोरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला.  यावेळी त्यांनी तरुणांच्या वाढत्या असंतोषाचाही संदर्भ देत सरकारवर टीका केली. &quot;सरकारवर विश्वास ठेवता येत नाही म्हणून लोक देवळात जातात, पण मंदिरातही चोरी होत असेल तर नागरिकांचा विश्वास कुठे राहणार?&quot; असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तरुणांच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा आणि समाजातील वाढती अस्वस्थता समजून घेण्याची गरज सरकारने ओळखली पाहिजे, असेही ते म्हणाले.  राज ठाकरे यांनी पुढे सांगितले की, सध्याचा जनतेचा उद्रेक हा केवळ एका घटनेमुळे नसून त्यामागे अनेक गंभीर सामाजिक आणि प्रशासकीय कारणे आहेत. सरकारने राजकारणापलीकडे जाऊन तरुणांच्या आकांक्षा आणि नागरिकांच्या विश्वासाशी संबंधित प्रश्न गांभीर्याने हाताळण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/vAASwzx4ncA</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T132304.680.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/amit-thackeray-targeted-chandrakant-patil-during-mns-student-wing-gathering-1724224.html</loc><video:video>
	<video:title>ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...&#039; ठाकरेंचा निशाणा नेमका कुणावर?</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T13:12:53+05:30</video:publication_date>
	<video:description>मनसेच्या विद्यार्थी सेनेचा मुंबईत मेळावा सुरू असून, या कार्यक्रमाला अमित ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. देश आणि राज्यातील परिस्थितीवर बोलताना अमित ठाकरे भाषणादरम्यान भावूक झाले. यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका करत चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले. त्यांच्या भाषणातील काही वक्तव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.  नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन झाले होते. या आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील यांनी आंदोलकांबाबत वक्तव्य केले होते. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांचे फिंगर प्रिंट घेतले असून, आधार कार्डच्या माध्यमातून त्यांचा शोध घेऊन अटक केली जाईल, असे त्यांनी म्हटले होते.  यावर अमित ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. “हा सर्व डाटा चंपाच्या घरी पाठवा,” असे म्हणत त्यांनी त्यांना डिवचले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मेळाव्यात राजकीय चर्चेला चांगलेच उधाण आले.  दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा संदर्भ देत अमित ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना सूचक इशारा दिला. “तरुणांनी दिल्लीतून राजीनामा आणलाय, यांना राज्यातूनच राजीनामा आणायला वेळ लागणार नाही,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची मेळाव्यात जोरदार चर्चा झाली. अमित ठाकरे यांच्या भावनिक भाषणामुळे मेळाव्यातील वातावरण काही काळ गंभीर झाले आणि उपस्थित कार्यकर्त्यांचे लक्ष त्यांच्या वक्तव्यांकडे होते.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/qtPx1PVoU8I</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/MNS-Amit-thackeray.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/raj-thackeray-slams-government-theres-money-to-topple-mlas-but-not-for-the-youth-mns-chief-launches-sharp-attack-1724220.html</loc><video:video>
	<video:title>Raj Thackeray | आमदार फोडण्यासाठी पैसे आहेत, तरुणांसाठी नाहीत; राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T13:05:22+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तरुणांच्या वाढत्या असंतोषावर भाष्य करत राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. NEET पेपरफुटी हे केवळ आंदोलनाचे निमित्त होते, मात्र त्यामागे तरुणांच्या मनात साचलेला रोष हा खरा कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले.  राज ठाकरे म्हणाले, &quot;NEET पेपरफुटी हे आंदोलनाचं एक कारण होतं. पण रस्त्यावर उतरलेले सर्वजण विद्यार्थी नव्हते, त्यात मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी सहभागी झाले होते. त्यांच्या मनात अनेक वर्षांपासून साचलेला असंतोष आता बाहेर पडत आहे.&quot; त्यांनी सांगितले की, तरुणांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत, शहरांमध्ये मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत, शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही रोजगार उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे युवकांमध्ये नैराश्य वाढत आहे.  यावेळी त्यांनी सरकारच्या आर्थिक आणि औद्योगिक धोरणांवरही निशाणा साधला. &quot;कंपन्या खासगी हातात दिल्या जात आहेत. एका उद्योगपतीवरच सरकारची विशेष मेहरबानी सुरू आहे. देशात विकासापेक्षा फक्त निवडणुका आणि आमदार-खासदार फोडण्याचे राजकारण सुरू आहे,&quot; असा आरोप त्यांनी केला. तसेच, डिजिटल व्यवहारांचा उल्लेख करत त्यांनी आमदार-खासदारांच्या कथित खरेदी-विक्रीवरही उपरोधिक भाष्य केले.  राज ठाकरे पुढे म्हणाले की, हा केवळ सत्तांतराचा प्रश्न नसून देशाच्या भविष्यासंबंधीचा विषय आहे. &quot;हा कुणाला सत्तेवरून खाली खेचण्याचा किंवा कुणाला सत्तेवर आणण्याचा मुद्दा नाही. हा देशाच्या भविष्याचा आणि तरुणांच्या आयुष्याचा प्रश्न आहे,&quot; असे ते म्हणाले.  ग्रामीण भागातील युवकांच्या परिस्थितीकडे लक्ष वेधताना त्यांनी शेतकरी आत्महत्यांचा मुद्दाही उपस्थित केला. &quot;शेजारच्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याचा मुलगा शहरात जाऊन नोकरी करण्याचं स्वप्न पाहतो. पण शहरातही नोकऱ्या नाहीत, राहण्यासाठी जागा नाही. स्मार्ट सिटीची घोषणा झाली, पण प्रत्यक्षात परिस्थिती बदलली का?&quot; असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  राज ठाकरे यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था आणि तरुणांच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/njDMfaBR98A</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T130139.542.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/raj-thackeray-criticized-bjp-over-pm-modi-viral-video-statement-1724193.html</loc><video:video>
	<video:title>पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत, म्हणाले &#039;तुम्ही म्हणाले ते मान्य मात्र...</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T12:49:53+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरही सूचक भाष्य केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना भाजपला टोला लगावला.  राज ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांनी आक्षेपार्ह भाषा आणि व्हिडीओ चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्यांचे हे म्हणणे योग्य असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र, अशाच प्रकारची भाषा वापरणाऱ्या आपल्या पक्षातील लोकांनाही मोदींनी समज द्यावी, असे त्यांनी सांगितले.  “पंतप्रधानांना सांगायचं तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा,” असे म्हणत राज ठाकरे यांनी भाजपच्या ट्रोल टीमवर निशाणा साधला. महात्मा गांधी, नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यापासून अनेकांवर ट्रोलिंग होत असल्याचा दावा त्यांनी केला.  मोदींनी संबंधित तरुणांना माफ केल्याचे म्हटले आहे. त्यावर राज ठाकरे यांनी, “पण १२ वर्ष तुमच्या लोकांनी जे केलं त्याची माफी कोण मागणार,” असा सवाल उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/zbVrVClGFaY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/MNS-Raj-thackeray.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/raj-thackeray-on-chandrakant-patil-i-want-to-see-chandrakant-patils-brain-fingerprints-mns-chief-launches-scathing-attack-on-maharashtra-education-minister-1724206.html</loc><video:video>
	<video:title>मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंची फटकेबाजी</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T12:37:15+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्था आणि शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्या भाषणात त्यांनी उपरोधिक शैलीत शिक्षणमंत्र्यांच्या विधानांचा समाचार घेत राज्य सरकारवर निशाणा साधला.  राज ठाकरे म्हणाले, &quot;आम्ही लहान असताना आमचे आई-वडील रात्री झोपताना डोक्याला तेल लावायला सांगायचे. त्यामुळे बुद्धी तल्लख होते, असं ते म्हणायचे. पण एका माणसाने आयुष्यभर डोक्याला तेल चोपडलं, तरी त्याला बुद्धी आली नाही. प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो. हे म्हणे राज्याचे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री,&quot; असा टोला त्यांनी लगावला.  यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या काही विधानांचाही उल्लेख करत टीका केली. &quot;दगडावरचे फूटप्रिंट आधारशी लिंक करणार म्हणतात. ते नेमकं कसं शक्य आहे? मला तर चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूचे फिंगरप्रिंट पाहायचे आहेत,&quot; असे म्हणत त्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.  राज ठाकरे पुढे म्हणाले, &quot;कोल्हापूरकरांनी शिक्षणासाठी त्यांना पुण्यात पाठवलं. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं. पण तिथेही काही झालं नाही. अशा व्यक्तीला राज्याचा शिक्षणमंत्री म्हटल्यावर आजच्या तरुणांचा आणि जनरेशन-Z चा संताप होणारच. राज्याच्या नशिबी अशी माणसं आली आहेत, ही दुर्दैवाची बाब आहे,&quot; अशी टीका त्यांनी केली.  मनसे विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यातील या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असून, राज ठाकरे यांच्या टीकेला सत्ताधारी पक्षाकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/yqSE8K_rHGE</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T123405.588.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/amit-shah-pune-visit-preparations-intensified-ahead-of-major-award-ceremony-1724180.html</loc><video:video>
	<video:title>Amit shah Pune Visit | अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T12:12:31+05:30</video:publication_date>
	<video:description>पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अमित शाह यांनी पुण्यात दाखल झाल्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.  दरम्यान, राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.  या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपचे अनेक स्थानिक नेते उपस्थित आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे पुण्यात राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. कार्यक्रमस्थळी सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, विविध भागांतून नेते आणि कार्यकर्ते दाखल होत आहेत. त्यामुळे पुरस्कार सोहळ्याला मोठी उपस्थिती पाहायला मिळण्याची शक्यता आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/rBMGjpi0dps</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Amit-shah-at-delhi.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mns-leader-amit-thackeray-turns-emotional-during-speech-leaves-stage-briefly-at-student-wing-rally-returns-to-slam-government-1724171.html</loc><video:video>
	<video:title>LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले... Video होतोय व्हायरल</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T12:09:54+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे नेते अमित ठाकरे यांच्या भाषणादरम्यान अनपेक्षित घडामोड पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना अमित ठाकरे काही क्षणांसाठी भावूक झाले आणि भाषणाचा धागा सुटल्याने त्यांनी &quot;मी विसरायला लागलो... मला सुचत नाहीये... मी परत येतो,&quot; असे सांगत काही वेळासाठी मंच सोडला. या घटनेमुळे सभागृहात उपस्थित मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काही काळ अवाक् झाले.  यापूर्वी भाषणाची सुरुवात करताना अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी हलक्या-फुलक्या अंदाजात संवाद साधला. &quot;थोड्या घोषणा द्या म्हणजे माझं भाषण आटपेल,&quot; असे म्हणत त्यांनी वातावरण हलके केले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.  भाषणादरम्यान अमित ठाकरे यांनी आपण राज ठाकरे यांचे पुत्र असल्यामुळेच राजकारणात आल्याची स्पष्ट कबुली दिली. &quot;मी राज साहेबांचा मुलगा नसतो तर राजकारणात नसतो. पण तुमच्यासारखे कार्यकर्ते नसते तर राजकारणात टिकूही शकलो नसतो,&quot; असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. महाराष्ट्रभर झालेल्या दौऱ्यांचा आणि विद्यार्थी संघटनेच्या कामाचा उल्लेख करत त्यांनी पक्षाच्या वाढीत कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.  देश आणि राज्याच्या सद्यस्थितीवर बोलताना अमित ठाकरे भावूक झाले. &quot;आपण आंदोलने विसरून आता पुढच्या लढाईसाठी तयार झालं पाहिजे,&quot; असे म्हणत असतानाच ते काही क्षणांसाठी थांबले आणि भाषण पुढे सुरू ठेवता आले नाही. त्यामुळे त्यांनी मंच सोडला. सुमारे दहा मिनिटांनंतर ते पुन्हा मंचावर परतले आणि उर्वरित भाषण पूर्ण करत राज्य आणि केंद्र सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/OxPmc88_vgI</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T120516.436.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/supriya-sule-questions-neet-paper-leak-demands-transparent-sit-probe-says-upsc-papers-never-leak-1724162.html</loc><video:video>
	<video:title>UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T11:47:47+05:30</video:publication_date>
	<video:description>UG-NEET पेपरफुटी प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद अद्यापही कायम असून, परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतरही विरोधकांनी सरकारवर टीकेची धार कायम ठेवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परीक्षा सुधारणा विधेयकावर नाराजी व्यक्त करत नीट पेपरफुटी प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे.  मुंबईत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, &quot;देशात UPSC परीक्षेचा पेपर कधी फुटत नाही, मग NEET चाच पेपर वारंवार कसा फुटतो?&quot; असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT), सर्वपक्षीय बैठक किंवा संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली.  सुळे यांनी पुढे शिक्षण क्षेत्रातील वाढत्या व्यावसायिकीकरणावरही टीका केली. काही कोचिंग क्लासेस मोठ्या आर्थिक उलाढाली करत असून, त्यांच्या कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध होत आहेत, हे चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले. &quot;शिक्षणाचे बाजारीकरण थांबले पाहिजे. संसदेत शिक्षण व्यवस्थेवर गंभीर चर्चा होणे गरजेचे आहे. राजकारण बाजूला ठेवून विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक झाली पाहिजे,&quot; असे त्या म्हणाल्या.  परीक्षा सुधारणा विधेयकाबाबतही त्यांनी असमाधान व्यक्त केले. &quot;या विधेयकावर मी समाधानी नाही, राष्ट्रवादी काँग्रेस समाधानी नाही आणि इंडिया आघाडीही समाधानी नाही. एका पालकाच्या भूमिकेतूनही मी समाधानी नाही. केवळ शिक्षा करून प्रश्न सुटणार नाही, तर पेपरफुटीची मूळ कारणे रोखली पाहिजेत,&quot; असे त्यांनी स्पष्ट केले.  जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत सुळे म्हणाल्या की, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता तर परिस्थिती वेगळी राहिली असती. &quot;विद्यार्थ्यांवर अश्रुधूराचा वापर करण्यात आला, त्याचे आवाज संसदेतही ऐकू येत होते. सरकारने विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने तोडगा काढावा,&quot; असे आवाहन त्यांनी केले. तसेच, NEET पेपरफुटी प्रकरण अत्यंत गांभीर्याने हाताळून देशातील परीक्षा व्यवस्था अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/6tmszql0r5g</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T114022.714.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-uncut-statement-on-amit-shah-sparked-major-political-controversy-1724164.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay raut UNCUT | एकतर गृहमंत्र्यांसारखे या, नाही तर गुंड्यांसारखे या, तुम्ही...&#039; संजय राऊतांचं अमित शाहांबाबत खळबळजनक विधान</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T12:06:21+05:30</video:publication_date>
	<video:description>शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी लोकमान्य टिळकांच्या कुटुंबावरही जोरदार टीका केली. टिळकांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा संदर्भ देत त्यांनी शिंदे गटावरही आरोप केले. इतकेच नाही तर त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही थेट निशाणा साधला आहे.  दरम्यान, गृहमंत्री येणार असल्याने पुण्यात आर्मी आणि महाराष्ट्राचा पोलीस फोर्स आणल्याचा दावा राऊत यांनी केला. यावरून त्यांनी सरकारला सवाल केला. “तुम्ही कशाला घाबरता? तुम्ही मूळचे गुंड आहात. तुम्ही एक तर गुंडासारखे वागा किंवा गृहमंत्र्यासारखे वागा,” असं ते म्हणाले.  संजय राऊत म्हणाले, “काय झालं काय टिळकांच्या कुटुंबाला? शिंदेंच्या गटात टिळकांचं कुटुंब गेलं. लाज वाटली पाहिजे.” स्वाभिमानासाठी टिळकांच्या पूर्वजांनी दिलेल्या लढ्याची आठवण करून देत त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचाही उल्लेख केला. “जालियनवालानंतरचं हे कांड आहे,” असा आरोप त्यांनी केला.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/KvSrGJ7H</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/sanajy-raut-on-amit-shah.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/girish-mahajan-vijay-chaudhari-audio-case-took-shocking-turn-after-aide-detained-1724107.html</loc><video:video>
	<video:title>गिरीश महाजन - विजय चौधरी कथित ऑडिओ प्रकरणाला धक्कादायक वळण! स्वीय सहाय्यकानेच... भाजपमध्ये मोठ्या घडामोडी</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T11:21:32+05:30</video:publication_date>
	<video:description>भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संबंधित कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना वेग आला आहे. या कथित क्लिपमध्ये एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.  दरम्यान, या प्रकरणात आता नव्या घडामोडी समोर आल्या आहेत. ताज्या माहितीनुसार, विजय चौधरी यांचे स्वीय सहाय्यक यश टिपरे याच्यावर कथित ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  प्राथमिक माहितीनुसार, यश टिपरे सोशल मीडिया हँडलर आणि स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होता. याच काळात विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील डेटा चिपमध्ये साठवून घेतल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. इतकेच नाही तर आणखी काही ऑडिओदेखील व्हायरल केल्याचा संशय आहे. या प्रकरणात आणखी काही जण तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचीही चर्चा आहे. संशयित यश टिपरे याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील तपासानंतर या प्रकरणात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/j9JUaFS6aDs</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/girish-mahajan-vijay-chaudhari.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/commonwealth-games-2026-india-wins-23-medals-judo-athletics-shine-as-neeraj-chopra-settles-for-silver-1724144.html</loc><video:video>
	<video:title>Commonwealth Game | कॉमनवेल्थमध्ये भारताची पदकांची आतषबाजी! एका दिवसात 6 पदके, ज्युडोपासून भालाफेकीपर्यंत भारतीय खेळाडूंची कमाल</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T11:13:43+05:30</video:publication_date>
	<video:description>कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतासाठी 31 जुलै हा दिवस ऐतिहासिक ठरला असून, भारतीय खेळाडूंनी ज्युडो आणि ॲथलेटिक्समध्ये दमदार कामगिरी करत एका दिवसात तब्बल सहा पदकांची कमाई केली आहे. या शानदार प्रदर्शनामुळे भारताच्या एकूण पदकांची संख्या 23 वर पोहोचली असून, त्यामध्ये 5 सुवर्ण, 12 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश आहे. मात्र, एकूण पदकतालिकेत भारत सध्या 10व्या स्थानावर असून, 24 पदकांसह वेल्स नवव्या स्थानावर आहे.  नवव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकत देशाची मान उंचावली. ज्युडोमध्ये महिलांच्या 48 किलो गटात अस्मिता डे हिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले, तर पुरुषांच्या 60 किलो गटात हर्ष सिंहने 10-0 अशा एकतर्फी विजयासह सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या 57 किलो गटात यामिनी मौर्यने रौप्य पदक जिंकले.  भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असलेल्या नीरज चोप्राला 85.83 मीटरच्या सर्वोत्तम फेकीसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मात्र, यशवीर सिंहने 85.41 मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह कांस्य पदक पटकावत सर्वांचे लक्ष वेधले. तसेच तेजस्विन शंकरने डेकॅथलॉनमध्ये कांस्य पदक जिंकत या स्पर्धेत पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला.  दरम्यान, बॉक्सिंगमध्येही भारताची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. भारतीय संघातील सर्व 10 उपांत्य फेरीतील बॉक्सरांनी आपापले सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला असून, किमान रौप्य पदक निश्चित केले आहे. त्यामुळे आगामी दिवसांत भारताच्या सुवर्णपदकांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये आतापर्यंत भारतासाठी मीराबाई चानू, शर्मिला धनकड, दिलीप गावित, अस्मिता डे आणि हर्ष सिंह यांनी सुवर्णपदके जिंकली आहेत. तर नीरज चोप्रासह अनेक खेळाडूंनी रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई करत भारताची पदकांची झोळी भरली आहे. भारतीय खेळाडूंच्या या दमदार प्रदर्शनामुळे आगामी स्पर्धांबाबत देशाच्या अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/pAJJeNl5QV0</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T110725.031.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/bombay-high-court-pulls-up-fda-over-mantralaya-canteen-inspection-flies-dust-found-despite-98-clean-report-1724099.html</loc><video:video>
	<video:title>Special Report | Tukaram Mundhe | FDA | मंत्रालयाच्या कँटीनचा भांडाफोड! FDA चा 98% स्वच्छ अहवाल हायकोर्टाने फेटाळला</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T10:42:58+05:30</video:publication_date>
	<video:description>अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नसुरक्षा मोहिमेदरम्यान नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला. या कारवाईनंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने एफडीएला मंत्रालय आणि विधानभवनातील कँटीनचीही प्रत्यक्ष तपासणी करण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे, त्याच्याच एक दिवस आधी एफडीएने मुंबई उच्च न्यायालयातील कँटीनवरही कारवाई करत ते बंद करण्याचे आदेश दिले होते.  सुनावणीदरम्यान एफडीएने न्यायालयात मंत्रालयातील कँटीनची तपासणी करण्यात आली असून तेथे एकही कीटक आढळला नसल्याचा दावा केला. मात्र, या दाव्यावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र आक्षेप घेत आश्चर्य व्यक्त केले. &quot;एवढ्या मोठ्या कँटीनमध्ये एकही कीटक आढळला नाही, हा दावा हास्यास्पद आहे,&quot; अशी टिप्पणी न्यायालयाने केली. तसेच, &quot;मंत्रालयात कीटक आढळले तर त्यावरही खासगी आस्थापनांप्रमाणेच कारवाई करणार का?&quot; असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला.  यानंतर वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने मंत्रालय आणि विधानभवनातील कँटीनची प्रत्यक्ष पाहणी केली. तपासणीनंतर न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालात मंत्रालयातील कँटीनमध्ये माश्या, धूळ तसेच स्वच्छतेतील अनेक त्रुटी आढळल्याचे नमूद करण्यात आले. याशिवाय भाज्या कापण्यासाठी वापरण्यात येणारे चाकू अत्यंत जुने आणि गंजलेले असल्याचेही तपासणीत समोर आले.  या अहवालानंतर मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएची कडक शब्दांत खरडपट्टी काढली. एफडीएने तयार केलेला &quot;98 टक्के स्वच्छतेचा&quot; अहवाल वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, खासगी आणि सरकारी आस्थापनांना वेगवेगळे निकष लावले जात असल्याची टीका करत कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे, असे न्यायालयाने नमूद केले.  दरम्यान, न्यायालयाने एफडीएला खासगी हॉटेल्सप्रमाणेच सरकारी कँटीननाही समान निकष लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. परवाने रद्द करण्यापूर्वी संबंधित आस्थापनांना सुधारणा करण्यासाठी नोटीस देण्यात यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. मंत्रालय, विधानभवन तसेच संबंधित खासगी आस्थापनांना मंगळवारपर्यंत आवश्यक सुधारणा करण्यासाठी मुदत देण्यात आली असून, त्यानंतर एफडीएकडून पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/DoW9SW7A6ZI</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T103416.764.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/pm-modi-viral-video-sparked-attention-after-forgiving-protesting-youth-1724089.html</loc><video:video>
	<video:title>पंतप्रधान मोदींच्या आणखी एका व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ! त्या कृतीने वेधलं लक्ष</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T10:41:01+05:30</video:publication_date>
	<video:description>जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान काही आंदोलकांकडून वापरण्यात आलेल्या आक्षेपार्ह भाषेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली. मात्र, या प्रकरणात आंदोलकांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांना योग्य दिशा देण्याची गरज असल्याचे मोदी यांनी म्हटले. तसेच त्यांनी आंदोलकांना माफ करण्याची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या कृतीने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.  व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत, आंदोलकांच्या वक्तव्यांमुळे समाजात निर्माण झालेला आक्रोश आपण समजू शकतो, असे मोदी म्हणाले. मात्र, संबंधित तरुणांना शिक्षा करण्यापेक्षा त्यांना समजावून योग्य मार्ग दाखवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मोदी म्हणाले, “समाजात जो आक्रोश आहे त्याला मी व्यवस्थितपणे समजू शकतो. हा एकप्रकारचा सांस्कृतिक धक्का आहे, आमच्या मुली अशाप्रकारची भाषा कशी वापरु शकतात? पण, या मुलांना मिठीत घेऊन, योग्य रस्ता दाखविण्याची हीच वेळ आहे. ही दिशा भरकटलेली मुलं आहेत, त्यांना योग्य रस्ता दाखवणं आपलं काम आहे. त्यांना शिक्षा देणं, न्यायालयाच्या फेऱ्या मारायला लावणं यामुळे परिस्थिती बदलणार नाही, मला त्यांना माफ करायचंय&quot;, असे मोदींनी स्पष्ट केले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/uxjTnVecZ8Q</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/narendra-modi-video.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/jyoti-shinde-caste-certificate-invalid-creates-crisis-over-zilla-parishad-membership-1724078.html</loc><video:video>
	<video:title>ShivSena | शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का! कागदपत्रांचा घोळ अन् छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली, काय घडतंय?</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T10:16:36+05:30</video:publication_date>
	<video:description>छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत प्रहार पक्षाच्या सदस्या ज्योती शिंदे यांच्यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रहार पक्ष हे शिवसेना शिंदे गटाशी संलग्न आहे. त्यांचे मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र छाननीनंतर अवैध ठरवण्यात आले आहे. प्रशासनाने हे प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिल्याने त्यांच्या जिल्हा परिषद सदस्यत्वावरही कायदेशीर संकट निर्माण झाले आहे.  ज्योती शिंदे यांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या जात प्रमाणपत्राची कागदपत्रांच्या आधारे तपासणी करण्यात आली. या छाननीत संबंधित प्रमाणपत्र नियमांनुसार वैध नसल्याचे स्पष्ट झाल्याने ते रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या सदस्यपदाबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया काय होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.  दरम्यान, मराठवाड्यात अवैध किंवा संशयास्पद कुणबी प्रमाणपत्रांवर प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. ज्योती शिंदे यांच्या प्रकरणाचा परिणाम प्रहार पक्षासोबतच शिवसेना शिंदे गटाच्या राजकीय समीकरणांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतकेच नाही तर शिंदे गटासह अनेक पक्षांतील सदस्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्र अवैध असल्याचं सांगितलं जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/2n7COPQ2fhQ</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/chhatrapati-Sambjaji-nagar.png</video:thumbnail_loc></video:video></url></urlset>