<urlset xmlns="https://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9" xmlns:video="http://www.google.com/schemas/sitemap-video/1.1"><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/raj-thackeray-criticized-bjp-over-pm-modi-viral-video-statement-1724193.html</loc><video:video>
	<video:title>पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत, म्हणाले &#039;तुम्ही म्हणाले ते मान्य मात्र...</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T12:49:53+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरही सूचक भाष्य केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना भाजपला टोला लगावला.  राज ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांनी आक्षेपार्ह भाषा आणि व्हिडीओ चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्यांचे हे म्हणणे योग्य असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र, अशाच प्रकारची भाषा वापरणाऱ्या आपल्या पक्षातील लोकांनाही मोदींनी समज द्यावी, असे त्यांनी सांगितले.  “पंतप्रधानांना सांगायचं तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा,” असे म्हणत राज ठाकरे यांनी भाजपच्या ट्रोल टीमवर निशाणा साधला. महात्मा गांधी, नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यापासून अनेकांवर ट्रोलिंग होत असल्याचा दावा त्यांनी केला.  मोदींनी संबंधित तरुणांना माफ केल्याचे म्हटले आहे. त्यावर राज ठाकरे यांनी, “पण १२ वर्ष तुमच्या लोकांनी जे केलं त्याची माफी कोण मागणार,” असा सवाल उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/zbVrVClGFaY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/MNS-Raj-thackeray.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/raj-thackeray-on-chandrakant-patil-i-want-to-see-chandrakant-patils-brain-fingerprints-mns-chief-launches-scathing-attack-on-maharashtra-education-minister-1724206.html</loc><video:video>
	<video:title>मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंची फटकेबाजी</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T12:37:15+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्था आणि शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्या भाषणात त्यांनी उपरोधिक शैलीत शिक्षणमंत्र्यांच्या विधानांचा समाचार घेत राज्य सरकारवर निशाणा साधला.  राज ठाकरे म्हणाले, &quot;आम्ही लहान असताना आमचे आई-वडील रात्री झोपताना डोक्याला तेल लावायला सांगायचे. त्यामुळे बुद्धी तल्लख होते, असं ते म्हणायचे. पण एका माणसाने आयुष्यभर डोक्याला तेल चोपडलं, तरी त्याला बुद्धी आली नाही. प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो. हे म्हणे राज्याचे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री,&quot; असा टोला त्यांनी लगावला.  यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या काही विधानांचाही उल्लेख करत टीका केली. &quot;दगडावरचे फूटप्रिंट आधारशी लिंक करणार म्हणतात. ते नेमकं कसं शक्य आहे? मला तर चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूचे फिंगरप्रिंट पाहायचे आहेत,&quot; असे म्हणत त्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.  राज ठाकरे पुढे म्हणाले, &quot;कोल्हापूरकरांनी शिक्षणासाठी त्यांना पुण्यात पाठवलं. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं. पण तिथेही काही झालं नाही. अशा व्यक्तीला राज्याचा शिक्षणमंत्री म्हटल्यावर आजच्या तरुणांचा आणि जनरेशन-Z चा संताप होणारच. राज्याच्या नशिबी अशी माणसं आली आहेत, ही दुर्दैवाची बाब आहे,&quot; अशी टीका त्यांनी केली.  मनसे विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यातील या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असून, राज ठाकरे यांच्या टीकेला सत्ताधारी पक्षाकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/yqSE8K_rHGE</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T123405.588.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/amit-shah-pune-visit-preparations-intensified-ahead-of-major-award-ceremony-1724180.html</loc><video:video>
	<video:title>Amit shah Pune Visit | अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T12:12:31+05:30</video:publication_date>
	<video:description>पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अमित शाह यांनी पुण्यात दाखल झाल्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.  दरम्यान, राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.  या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपचे अनेक स्थानिक नेते उपस्थित आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे पुण्यात राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. कार्यक्रमस्थळी सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, विविध भागांतून नेते आणि कार्यकर्ते दाखल होत आहेत. त्यामुळे पुरस्कार सोहळ्याला मोठी उपस्थिती पाहायला मिळण्याची शक्यता आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/rBMGjpi0dps</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Amit-shah-at-delhi.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mns-leader-amit-thackeray-turns-emotional-during-speech-leaves-stage-briefly-at-student-wing-rally-returns-to-slam-government-1724171.html</loc><video:video>
	<video:title>LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले... Video होतोय व्हायरल</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T12:09:54+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे नेते अमित ठाकरे यांच्या भाषणादरम्यान अनपेक्षित घडामोड पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना अमित ठाकरे काही क्षणांसाठी भावूक झाले आणि भाषणाचा धागा सुटल्याने त्यांनी &quot;मी विसरायला लागलो... मला सुचत नाहीये... मी परत येतो,&quot; असे सांगत काही वेळासाठी मंच सोडला. या घटनेमुळे सभागृहात उपस्थित मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काही काळ अवाक् झाले.  यापूर्वी भाषणाची सुरुवात करताना अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी हलक्या-फुलक्या अंदाजात संवाद साधला. &quot;थोड्या घोषणा द्या म्हणजे माझं भाषण आटपेल,&quot; असे म्हणत त्यांनी वातावरण हलके केले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.  भाषणादरम्यान अमित ठाकरे यांनी आपण राज ठाकरे यांचे पुत्र असल्यामुळेच राजकारणात आल्याची स्पष्ट कबुली दिली. &quot;मी राज साहेबांचा मुलगा नसतो तर राजकारणात नसतो. पण तुमच्यासारखे कार्यकर्ते नसते तर राजकारणात टिकूही शकलो नसतो,&quot; असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. महाराष्ट्रभर झालेल्या दौऱ्यांचा आणि विद्यार्थी संघटनेच्या कामाचा उल्लेख करत त्यांनी पक्षाच्या वाढीत कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.  देश आणि राज्याच्या सद्यस्थितीवर बोलताना अमित ठाकरे भावूक झाले. &quot;आपण आंदोलने विसरून आता पुढच्या लढाईसाठी तयार झालं पाहिजे,&quot; असे म्हणत असतानाच ते काही क्षणांसाठी थांबले आणि भाषण पुढे सुरू ठेवता आले नाही. त्यामुळे त्यांनी मंच सोडला. सुमारे दहा मिनिटांनंतर ते पुन्हा मंचावर परतले आणि उर्वरित भाषण पूर्ण करत राज्य आणि केंद्र सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/OxPmc88_vgI</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T120516.436.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/supriya-sule-questions-neet-paper-leak-demands-transparent-sit-probe-says-upsc-papers-never-leak-1724162.html</loc><video:video>
	<video:title>UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T11:47:47+05:30</video:publication_date>
	<video:description>UG-NEET पेपरफुटी प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद अद्यापही कायम असून, परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतरही विरोधकांनी सरकारवर टीकेची धार कायम ठेवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परीक्षा सुधारणा विधेयकावर नाराजी व्यक्त करत नीट पेपरफुटी प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे.  मुंबईत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, &quot;देशात UPSC परीक्षेचा पेपर कधी फुटत नाही, मग NEET चाच पेपर वारंवार कसा फुटतो?&quot; असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT), सर्वपक्षीय बैठक किंवा संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली.  सुळे यांनी पुढे शिक्षण क्षेत्रातील वाढत्या व्यावसायिकीकरणावरही टीका केली. काही कोचिंग क्लासेस मोठ्या आर्थिक उलाढाली करत असून, त्यांच्या कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध होत आहेत, हे चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले. &quot;शिक्षणाचे बाजारीकरण थांबले पाहिजे. संसदेत शिक्षण व्यवस्थेवर गंभीर चर्चा होणे गरजेचे आहे. राजकारण बाजूला ठेवून विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक झाली पाहिजे,&quot; असे त्या म्हणाल्या.  परीक्षा सुधारणा विधेयकाबाबतही त्यांनी असमाधान व्यक्त केले. &quot;या विधेयकावर मी समाधानी नाही, राष्ट्रवादी काँग्रेस समाधानी नाही आणि इंडिया आघाडीही समाधानी नाही. एका पालकाच्या भूमिकेतूनही मी समाधानी नाही. केवळ शिक्षा करून प्रश्न सुटणार नाही, तर पेपरफुटीची मूळ कारणे रोखली पाहिजेत,&quot; असे त्यांनी स्पष्ट केले.  जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत सुळे म्हणाल्या की, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता तर परिस्थिती वेगळी राहिली असती. &quot;विद्यार्थ्यांवर अश्रुधूराचा वापर करण्यात आला, त्याचे आवाज संसदेतही ऐकू येत होते. सरकारने विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने तोडगा काढावा,&quot; असे आवाहन त्यांनी केले. तसेच, NEET पेपरफुटी प्रकरण अत्यंत गांभीर्याने हाताळून देशातील परीक्षा व्यवस्था अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/6tmszql0r5g</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T114022.714.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-uncut-statement-on-amit-shah-sparked-major-political-controversy-1724164.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay raut UNCUT | एकतर गृहमंत्र्यांसारखे या, नाही तर गुंड्यांसारखे या, तुम्ही...&#039; संजय राऊतांचं अमित शाहांबाबत खळबळजनक विधान</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T12:06:21+05:30</video:publication_date>
	<video:description>शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी लोकमान्य टिळकांच्या कुटुंबावरही जोरदार टीका केली. टिळकांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा संदर्भ देत त्यांनी शिंदे गटावरही आरोप केले. इतकेच नाही तर त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही थेट निशाणा साधला आहे.  दरम्यान, गृहमंत्री येणार असल्याने पुण्यात आर्मी आणि महाराष्ट्राचा पोलीस फोर्स आणल्याचा दावा राऊत यांनी केला. यावरून त्यांनी सरकारला सवाल केला. “तुम्ही कशाला घाबरता? तुम्ही मूळचे गुंड आहात. तुम्ही एक तर गुंडासारखे वागा किंवा गृहमंत्र्यासारखे वागा,” असं ते म्हणाले.  संजय राऊत म्हणाले, “काय झालं काय टिळकांच्या कुटुंबाला? शिंदेंच्या गटात टिळकांचं कुटुंब गेलं. लाज वाटली पाहिजे.” स्वाभिमानासाठी टिळकांच्या पूर्वजांनी दिलेल्या लढ्याची आठवण करून देत त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचाही उल्लेख केला. “जालियनवालानंतरचं हे कांड आहे,” असा आरोप त्यांनी केला.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/KvSrGJ7H</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/sanajy-raut-on-amit-shah.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/girish-mahajan-vijay-chaudhari-audio-case-took-shocking-turn-after-aide-detained-1724107.html</loc><video:video>
	<video:title>गिरीश महाजन - विजय चौधरी कथित ऑडिओ प्रकरणाला धक्कादायक वळण! स्वीय सहाय्यकानेच... भाजपमध्ये मोठ्या घडामोडी</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T11:21:32+05:30</video:publication_date>
	<video:description>भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संबंधित कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना वेग आला आहे. या कथित क्लिपमध्ये एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.  दरम्यान, या प्रकरणात आता नव्या घडामोडी समोर आल्या आहेत. ताज्या माहितीनुसार, विजय चौधरी यांचे स्वीय सहाय्यक यश टिपरे याच्यावर कथित ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  प्राथमिक माहितीनुसार, यश टिपरे सोशल मीडिया हँडलर आणि स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होता. याच काळात विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील डेटा चिपमध्ये साठवून घेतल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. इतकेच नाही तर आणखी काही ऑडिओदेखील व्हायरल केल्याचा संशय आहे. या प्रकरणात आणखी काही जण तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचीही चर्चा आहे. संशयित यश टिपरे याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील तपासानंतर या प्रकरणात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/j9JUaFS6aDs</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/girish-mahajan-vijay-chaudhari.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/commonwealth-games-2026-india-wins-23-medals-judo-athletics-shine-as-neeraj-chopra-settles-for-silver-1724144.html</loc><video:video>
	<video:title>Commonwealth Game | कॉमनवेल्थमध्ये भारताची पदकांची आतषबाजी! एका दिवसात 6 पदके, ज्युडोपासून भालाफेकीपर्यंत भारतीय खेळाडूंची कमाल</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T11:13:43+05:30</video:publication_date>
	<video:description>कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतासाठी 31 जुलै हा दिवस ऐतिहासिक ठरला असून, भारतीय खेळाडूंनी ज्युडो आणि ॲथलेटिक्समध्ये दमदार कामगिरी करत एका दिवसात तब्बल सहा पदकांची कमाई केली आहे. या शानदार प्रदर्शनामुळे भारताच्या एकूण पदकांची संख्या 23 वर पोहोचली असून, त्यामध्ये 5 सुवर्ण, 12 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश आहे. मात्र, एकूण पदकतालिकेत भारत सध्या 10व्या स्थानावर असून, 24 पदकांसह वेल्स नवव्या स्थानावर आहे.  नवव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकत देशाची मान उंचावली. ज्युडोमध्ये महिलांच्या 48 किलो गटात अस्मिता डे हिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले, तर पुरुषांच्या 60 किलो गटात हर्ष सिंहने 10-0 अशा एकतर्फी विजयासह सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या 57 किलो गटात यामिनी मौर्यने रौप्य पदक जिंकले.  भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असलेल्या नीरज चोप्राला 85.83 मीटरच्या सर्वोत्तम फेकीसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मात्र, यशवीर सिंहने 85.41 मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह कांस्य पदक पटकावत सर्वांचे लक्ष वेधले. तसेच तेजस्विन शंकरने डेकॅथलॉनमध्ये कांस्य पदक जिंकत या स्पर्धेत पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला.  दरम्यान, बॉक्सिंगमध्येही भारताची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. भारतीय संघातील सर्व 10 उपांत्य फेरीतील बॉक्सरांनी आपापले सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला असून, किमान रौप्य पदक निश्चित केले आहे. त्यामुळे आगामी दिवसांत भारताच्या सुवर्णपदकांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये आतापर्यंत भारतासाठी मीराबाई चानू, शर्मिला धनकड, दिलीप गावित, अस्मिता डे आणि हर्ष सिंह यांनी सुवर्णपदके जिंकली आहेत. तर नीरज चोप्रासह अनेक खेळाडूंनी रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई करत भारताची पदकांची झोळी भरली आहे. भारतीय खेळाडूंच्या या दमदार प्रदर्शनामुळे आगामी स्पर्धांबाबत देशाच्या अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/pAJJeNl5QV0</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T110725.031.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/bombay-high-court-pulls-up-fda-over-mantralaya-canteen-inspection-flies-dust-found-despite-98-clean-report-1724099.html</loc><video:video>
	<video:title>Special Report | Tukaram Mundhe | FDA | मंत्रालयाच्या कँटीनचा भांडाफोड! FDA चा 98% स्वच्छ अहवाल हायकोर्टाने फेटाळला</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T10:42:58+05:30</video:publication_date>
	<video:description>अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नसुरक्षा मोहिमेदरम्यान नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला. या कारवाईनंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने एफडीएला मंत्रालय आणि विधानभवनातील कँटीनचीही प्रत्यक्ष तपासणी करण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे, त्याच्याच एक दिवस आधी एफडीएने मुंबई उच्च न्यायालयातील कँटीनवरही कारवाई करत ते बंद करण्याचे आदेश दिले होते.  सुनावणीदरम्यान एफडीएने न्यायालयात मंत्रालयातील कँटीनची तपासणी करण्यात आली असून तेथे एकही कीटक आढळला नसल्याचा दावा केला. मात्र, या दाव्यावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र आक्षेप घेत आश्चर्य व्यक्त केले. &quot;एवढ्या मोठ्या कँटीनमध्ये एकही कीटक आढळला नाही, हा दावा हास्यास्पद आहे,&quot; अशी टिप्पणी न्यायालयाने केली. तसेच, &quot;मंत्रालयात कीटक आढळले तर त्यावरही खासगी आस्थापनांप्रमाणेच कारवाई करणार का?&quot; असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला.  यानंतर वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने मंत्रालय आणि विधानभवनातील कँटीनची प्रत्यक्ष पाहणी केली. तपासणीनंतर न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालात मंत्रालयातील कँटीनमध्ये माश्या, धूळ तसेच स्वच्छतेतील अनेक त्रुटी आढळल्याचे नमूद करण्यात आले. याशिवाय भाज्या कापण्यासाठी वापरण्यात येणारे चाकू अत्यंत जुने आणि गंजलेले असल्याचेही तपासणीत समोर आले.  या अहवालानंतर मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएची कडक शब्दांत खरडपट्टी काढली. एफडीएने तयार केलेला &quot;98 टक्के स्वच्छतेचा&quot; अहवाल वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, खासगी आणि सरकारी आस्थापनांना वेगवेगळे निकष लावले जात असल्याची टीका करत कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे, असे न्यायालयाने नमूद केले.  दरम्यान, न्यायालयाने एफडीएला खासगी हॉटेल्सप्रमाणेच सरकारी कँटीननाही समान निकष लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. परवाने रद्द करण्यापूर्वी संबंधित आस्थापनांना सुधारणा करण्यासाठी नोटीस देण्यात यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. मंत्रालय, विधानभवन तसेच संबंधित खासगी आस्थापनांना मंगळवारपर्यंत आवश्यक सुधारणा करण्यासाठी मुदत देण्यात आली असून, त्यानंतर एफडीएकडून पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/DoW9SW7A6ZI</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/New-Project-2026-08-01T103416.764.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/pm-modi-viral-video-sparked-attention-after-forgiving-protesting-youth-1724089.html</loc><video:video>
	<video:title>पंतप्रधान मोदींच्या आणखी एका व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ! त्या कृतीने वेधलं लक्ष</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T10:41:01+05:30</video:publication_date>
	<video:description>जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान काही आंदोलकांकडून वापरण्यात आलेल्या आक्षेपार्ह भाषेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली. मात्र, या प्रकरणात आंदोलकांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांना योग्य दिशा देण्याची गरज असल्याचे मोदी यांनी म्हटले. तसेच त्यांनी आंदोलकांना माफ करण्याची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या कृतीने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.  व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत, आंदोलकांच्या वक्तव्यांमुळे समाजात निर्माण झालेला आक्रोश आपण समजू शकतो, असे मोदी म्हणाले. मात्र, संबंधित तरुणांना शिक्षा करण्यापेक्षा त्यांना समजावून योग्य मार्ग दाखवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मोदी म्हणाले, “समाजात जो आक्रोश आहे त्याला मी व्यवस्थितपणे समजू शकतो. हा एकप्रकारचा सांस्कृतिक धक्का आहे, आमच्या मुली अशाप्रकारची भाषा कशी वापरु शकतात? पण, या मुलांना मिठीत घेऊन, योग्य रस्ता दाखविण्याची हीच वेळ आहे. ही दिशा भरकटलेली मुलं आहेत, त्यांना योग्य रस्ता दाखवणं आपलं काम आहे. त्यांना शिक्षा देणं, न्यायालयाच्या फेऱ्या मारायला लावणं यामुळे परिस्थिती बदलणार नाही, मला त्यांना माफ करायचंय&quot;, असे मोदींनी स्पष्ट केले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/uxjTnVecZ8Q</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/narendra-modi-video.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/jyoti-shinde-caste-certificate-invalid-creates-crisis-over-zilla-parishad-membership-1724078.html</loc><video:video>
	<video:title>ShivSena | शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का! कागदपत्रांचा घोळ अन् छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली, काय घडतंय?</video:title>
	<video:publication_date>2026-08-01T10:16:36+05:30</video:publication_date>
	<video:description>छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत प्रहार पक्षाच्या सदस्या ज्योती शिंदे यांच्यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रहार पक्ष हे शिवसेना शिंदे गटाशी संलग्न आहे. त्यांचे मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र छाननीनंतर अवैध ठरवण्यात आले आहे. प्रशासनाने हे प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिल्याने त्यांच्या जिल्हा परिषद सदस्यत्वावरही कायदेशीर संकट निर्माण झाले आहे.  ज्योती शिंदे यांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या जात प्रमाणपत्राची कागदपत्रांच्या आधारे तपासणी करण्यात आली. या छाननीत संबंधित प्रमाणपत्र नियमांनुसार वैध नसल्याचे स्पष्ट झाल्याने ते रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या सदस्यपदाबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया काय होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.  दरम्यान, मराठवाड्यात अवैध किंवा संशयास्पद कुणबी प्रमाणपत्रांवर प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. ज्योती शिंदे यांच्या प्रकरणाचा परिणाम प्रहार पक्षासोबतच शिवसेना शिंदे गटाच्या राजकीय समीकरणांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतकेच नाही तर शिंदे गटासह अनेक पक्षांतील सदस्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्र अवैध असल्याचं सांगितलं जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/2n7COPQ2fhQ</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/chhatrapati-Sambjaji-nagar.png</video:thumbnail_loc></video:video></url></urlset>