<urlset xmlns="https://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9" xmlns:video="http://www.google.com/schemas/sitemap-video/1.1"><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ladki-bahin-yojana-row-aditi-tatkare-clarifies-80-lakh-women-not-removed-verification-process-underway-1680946.html</loc><video:video>
	<video:title>Aditi Tatkare On Ladki Bahin Yojna | 80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण, म्हणाल्या....</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T14:27:35+05:30</video:publication_date>
	<video:description>मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सुमारे 80 लाख महिलांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. या आरोपांना उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमांशी संवाद साधताना तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेतील अर्ज बाद करण्यात आलेले नाहीत. लाभार्थ्यांची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रिया सुरू असल्याने काही नोंदींची तपासणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, ई-केवायसी प्रक्रिया मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यात आली होती. यासाठी लाभार्थ्यांना सुमारे तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता.  तटकरे यांनी स्पष्ट केले की, ई-केवायसी ही प्रक्रिया केवळ लाडकी बहीण योजनेसाठी नसून राज्यातील विविध डीबीटी (Direct Benefit Transfer) योजनांमध्येही राबवली जाते. तसेच 80 लाखांचा आकडा केवळ ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांचा नसून त्यामध्ये इतर निकषांमुळे अपात्र ठरणाऱ्या महिलांचाही समावेश आहे. यामध्ये वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी, वयोमर्यादेच्या निकषात न बसणाऱ्या महिला आणि सरकारी कर्मचारी यांचा देखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी कर्मचाऱ्यांकडून लाभाची रक्कम परत वसूल करण्याची प्रक्रिया गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.  दरम्यान, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांबाबत सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/RZ2kU7R_vEk</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-01T142038.446.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ncp-pune-candidate-row-sparks-rebellion-among-party-leaders-1680916.html</loc><video:video>
	<video:title>सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत... पुण्यात राष्ट्रवादीचा हायव्होल्टेज ड्रामा</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T14:03:55+05:30</video:publication_date>
	<video:description>महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे आणि कोकण या जागा मिळाल्या आहेत. कोकणमधून अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र पुण्याच्या जागेवरून पक्षात मोठा वाद पेटला आहे.  ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या विक्रम काकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आल्याने पुण्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. पक्षातील अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. उमेदवारीसाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक नेत्यांना डावलण्यात आल्याची भावना पक्षात निर्माण झाली आहे.  या निर्णयानंतर काही नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. सुनील टिंगरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून रामदास गाडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद अधिक स्पष्ट झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी जिजाई बंगल्यावर पदाधिकाऱ्यांसोबत अनेक तास चर्चा केली. मात्र स्थानिक नेत्यांचा विरोध असतानाही विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज नेत्यांची समजूत कशी काढली जाणार आणि याचा निवडणुकीवर काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/uAGi1C18_zA</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/NCP-Pune.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/vijay-wadettiwar-slams-bjp-over-arun-lakhani-nomination-says-party-ignores-loyal-workers-1680908.html</loc><video:video>
	<video:title>Vijay Wadettiwar | कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; विजय वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T13:31:26+05:30</video:publication_date>
	<video:description>स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने 17 पैकी 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून उद्योगपती अरुण लखानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून, काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपचे उमेदवार अरुण लाखानी हे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या व्याही आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली जात आहे. यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “लाखानी हे पवार कुटुंबाचे नातेवाईक आहेत, तर यात पवारांचा नेमका काय संबंध? उमेदवारी भाजपने दिली आहे. मग हा प्रश्न भाजपलाच विचारायला हवा. पवारांना विचारून उमेदवारी दिली का? याचे उत्तर भाजपने द्यावे,” असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.  भाजप उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “भाजपला नेहमी उद्योगपती, मोठे व्यावसायिक आणि प्रभावशाली व्यक्तीच हव्या असतात. पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांचा मात्र विसर पडतो,” अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी आणि राजकीय समीकरणांवरून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, आगामी काळात हा वाद आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/mQfnYHNIm_Y</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-01T133014.983.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sunetra-pawar-finalises-vikram-kakade-for-pune-council-seat-1680907.html</loc><video:video>
	<video:title>4 तासांच्या मंथनानंतर सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम काकडेंनाच उमेदवारी, असं काय घडलं?</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T13:26:57+05:30</video:publication_date>
	<video:description>सध्या राज्यभरात विधान परिषदेचीच रणधुमाळी सुरू आहे. यादरम्यान राष्ट्रवादीत मोठी घडमोड पहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेल्या विधान परिषदेच्या दोन जागा आल्या आहेत. कोकण आणि पुण्याची जागा राष्ट्रवादीला सुटली आहे. कोकणमधून राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे असणार आहेत. तर पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादीत अजून माथापच्ची सुरू होती. सकाळी 9 वाजल्यापासून राष्ट्रवादीची बैठक सुरू होती. दुपार झाली तरी नाव फायनल होत नव्हते. अखेर चार तासाच्या माथापच्चीनंतर विक्रम काकडे यांचे नाव फायनल झाले आहे. काकडे हेच राष्ट्रवादीचे पुण्यातील उमेदवार असणार आहेत.  पुण्यातील जिजाई बंगल्यावरती सकाळी नऊ पासून राष्ट्रवादीची बैठक सुरू होती. पुणे जिल्ह्यातील आजी-माजी आमदार राष्ट्रवादी पदाधिकारी यांची सुनेत्रा पवारांसोबत बैठक सुरू होती. विक्रम काकडे यांना तिकीट देण्यास सर्वांचा विरोध होता. अनेकांनी आक्षेप घेतला होता. मात्र, या सर्वांची मनधरणी करण्यात सुनेत्रा पवार यांना यश आलं आहे. सुनेत्रा पवार यांनी अखेर काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. काकडे यांनीही राष्ट्रवादीत तात्काळ प्रवेश घेतला आहे. विक्रम काकडे यांच्या संजय काकडे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीतील एका जागेचा तिढा सुटला आहे. तिकीट मिळताच काकडे यांनी मी अर्ज भरायला निघाल्याची प्रतिक्रिया देऊन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/UBJ9su0bRAg</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/NCP-1.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/atul-londhe-likely-to-be-mva-candidate-for-nagpur-legislative-council-election-nomination-buzz-intensifies-1680850.html</loc><video:video>
	<video:title>Nagpur | नागपूर विधान परिषदेसाठी अतुल लोंढेंची वर्णी?; उमेदवारी जवळपास निश्चित! -सुत्र</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T12:59:09+05:30</video:publication_date>
	<video:description>स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून अनेक उमेदवारांनी अर्जही दाखल केले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबतही अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू आहे.  दरम्यान, नागपूर विधान परिषद मतदारसंघासाठी काँग्रेस नेते अतुल लोंढे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीकडून अतुल लोंढे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. पक्षश्रेष्ठींकडून अंतिम शिक्कामोर्तब होण्याची औपचारिकता बाकी असल्याचे सांगितले जात आहे.  नागपूर विधान परिषद निवडणुकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले असून, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी आणखी काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/4Rtl9NRwEO8</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-01T124515.533.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/crude-oil-prices-surge-amid-middle-east-tensions-impact-on-india-1680844.html</loc><video:video>
	<video:title>मोठी बातमी! कच्च्या तेलाच्या किंमतींनी विक्रमी टप्पा गाठला, जागतिक स्तरावर संकट, प्रति बॅरल आता...</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T12:53:11+05:30</video:publication_date>
	<video:description>जागतिक घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या किमतीने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. अमेरिका-इराण तणावाचा थेट परिणाम तेल पुरवठ्यावर होण्याची शक्यता असल्याने बाजारात तेजी आली आहे. कच्च्या तेलाची प्रति बॅरल किंमत 93 डॉलरवर पोहोचली आहे. म्हणजेच कच्च्या तेलाच्या किंमतीत 2 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या भयंकर हल्ल्यामुळे या किंमती वधारल्या आहेत. या तणावामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण आहे.  पश्चिम आशियात पुन्हा एकदा तणाव वाढताना दिसत आहे, ज्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे सरकारी तेल कंपन्या आणि भारत सरकार आधीच आर्थिक ओझ्याखाली दबले जात आहेत, भारताचा परकीय चलनाचा साठा कमी होत आहे आणि अशा परिस्थितीत तणाव वाढल्याने व कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा उसळल्याने भारतावर आर्थिक दबाव आणखी वाढू शकतो.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/puUftuunpd8</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/Oil-Price-Hike.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/fire-breaks-out-at-education-ministry-office-in-new-delhi-1680803.html</loc><video:video>
	<video:title>एकच खळबळ अन् धुराचा कल्लोळ, नवी दिल्लीतील शिक्षण मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T12:12:24+05:30</video:publication_date>
	<video:description>नवी दिल्लीतील आयटीओ (ITO) परिसरातील विकास मार्गावर असलेल्या शिक्षण मंत्रालयाच्या कार्यालयात अचानक आग लागली. ही आग इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागली असून घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले.  प्राथमिक माहितीनुसार, आग दुसऱ्या मजल्यावरील एका विभागात लागली होती. धूर मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे इमारतीतील कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.  या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. तसेच कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/HBCp5lCUSIk</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/Delhi-fire-news-.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/rcb-wins-ipl-2026-final-virat-kohlis-unbeaten-75-leads-royal-challengers-bengaluru-to-historic-title-1680805.html</loc><video:video>
	<video:title>RCB | अखेर पुन्हा लाल झेंडा फडकला! सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर RCB चा कब्जा</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T11:59:53+05:30</video:publication_date>
	<video:description>इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) दमदार विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम लढतीत आरसीबीने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत 155 धावांची मजल मारली आणि आरसीबीसमोर 156 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात आरसीबीने हे लक्ष्य 18 षटकांत 5 विकेट्स गमावून पूर्ण केले. आरसीबीच्या विजयात स्टार फलंदाज विराट कोहलीने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. विराटने नाबाद 75 धावांची शानदार खेळी करत संघाचा विजय जवळपास एकहाती निश्चित केला. त्याला टीम डेव्हिडने 24 धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली, तर जितेश शर्मासोबतच्या भागीदारीने आरसीबीचा विजय शिक्कामोर्तब केला. गुजरातकडून राशिद खानने नवव्या षटकात रजत पाटीदार आणि कृणाल पंड्या यांना बाद करत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र विराट कोहलीच्या संयमी आणि आक्रमक खेळीसमोर गुजरातचे प्रयत्न अपुरे ठरले. या विजयासह आरसीबीने आयपीएल इतिहासातील एक महत्त्वाचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा आरसीबी हा चौथा संघ ठरला आहे. यापूर्वी Chennai Super Kings, Mumbai Indians आणि Kolkata Knight Riders यांनी ही कामगिरी केली होती. तसेच 2018 पासून सुरू असलेली ‘क्वालिफायर-1 विजेता संघच आयपीएल चॅम्पियन’ ही परंपराही आरसीबीने कायम राखली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर आरसीबीच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/qfaCtRxbfJ8</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-01T115041.547.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-remarks-on-arun-lakhani-name-among-bjp-veterans-1680772.html</loc><video:video>
	<video:title>त्या पुराण पुरुषांच्या यादीत लखानी अग्रस्थानी; सुप्रिया सुळेंच्या व्याह्यांबाबत राऊतांचे धक्कादायक विधान</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T11:39:17+05:30</video:publication_date>
	<video:description>शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.  त्यांनी अहिल्यानगरातील नेते प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश, अरुण लखानी-मोदी भेट आणि &#039;भाजपयुक्त काँग्रेस&#039; यावर रोकठोक भाष्य केले. यामध्ये ते प्रामुख्याने सुप्रिया सुळेंची लेक रोहिणी सुळे हिच्या सासरच्या मंडळींबाबत बोलले. भाजपने सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानी यांना उमेदवारी दिली. याविषयी राऊतांनी मोठं विधान केलं आहे.  यानंतर संजय राऊत यांना अरुण लखानी यांच्या उमेदवारीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावरही त्यांनी भाष्य केले. अरुण लखानी हे काही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नेते नाहीत. ते जन्मजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) आहेत. ते संघाचे निष्ठावान कार्यकर्ते, समर्थक आणि पदाधिकारी आहेत. सर्वच बाबतीत संघाला ताकद देणारे ते एक सद्गृहस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी मोदींची भेट घेतली यात आश्चर्यकारक काय आहे? जेव्हा मी दिल्लीत राज्यसभेतील अनेक लोकांची माहिती घेतो, तेव्हा त्यांचे मूळ कुठेतरी संघाशी जोडलेले असतेच. विदर्भात भाजपचे जे कोणी जुने आणि ज्येष्ठ चेहरे आहेत, त्या पुराण पुरुषांच्या यादीत लखानी यांचे नाव अग्रक्रमाने येते. संघ आणि भाजप काय वेगळे आहेत का? हे दोन्ही एकच आहेत, असे संजय राऊत म्हणाले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/rTm9YOglYCE</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/sanjay-Raut-on-Arun-Lakhani-.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/vijay-wadettiwar-slams-mahayuti-government-over-ladki-bahin-yojana-claims-80-lakh-women-excluded-1680771.html</loc><video:video>
	<video:title>Ladki Bahin Yojna | भाऊ खुर्चीवर, बहीण वाऱ्यावर! 80 लाख महिलांचा श्राप महायुतीला लागणार? वडेट्टीवारांच्या वक्तव्याने खळबळ</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T11:23:37+05:30</video:publication_date>
	<video:description>आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ‘माझी लाडकी बहीण’ योजना, वाढती महागाई आणि विविध जनकल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लाडकी बहीण योजनेतून मोठ्या संख्येने महिलांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप करत वडेट्टीवार म्हणाले की, निवडणुकीनंतर सरकारने लाभार्थी महिलांकडे दुर्लक्ष केले आहे. सुमारे 80 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याचा दावा करत त्यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारने निवडणुकीच्या काळात महिलांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा आरोप करत त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. या निर्णयामुळे अनेक महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली असून त्याचा राजकीय परिणाम भविष्यात दिसून येईल, असेही ते म्हणाले.  महागाई, बेरोजगारी आणि जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. आगामी निवडणुकांमध्ये जनतेसमोर हे मुद्दे प्रभावीपणे मांडले जातील, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, वडेट्टीवार यांच्या टीकेनंतर महायुतीकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/DRfgQHrwjcc</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-01T112225.844.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/aniket-tatkare-officially-named-mahayuti-candidate-for-konkan-mlc-election-1680764.html</loc><video:video>
	<video:title>Sunil Tatkare On Vidhan Parishad | कोकणच्या जागेवर तटकरेंचा डंका! अनिकेत तटकरे महायुतीचे उमेदवार? सुनील तटकरेंची मोठी घोषणा</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T11:02:25+05:30</video:publication_date>
	<video:description>कोकण विभागातील विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरे यांना महायुतीचे उमेदवार म्हणून अधिकृतपणे मैदानात उतरवण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली. सुनील तटकरे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 17 जागांच्या निवडणुका महायुती एकत्रितपणे लढत आहे. महायुतीतील जागावाटपाबाबत निर्णय झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने कोकण विभागातील जागा लढवण्याचे निश्चित केले आहे. अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज महायुतीचे उमेदवार म्हणून दाखल करण्यात येत असून त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार यांचे आशीर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले.  यावेळी त्यांनी कोकणातील महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांचे पाठबळ अनिकेत तटकरे यांना असल्याचा दावा केला. उदय सामंत, नितेश राणे, भरत गोगावले यांच्यासह महायुतीतील सर्व आमदार आणि नेते त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवरही सर्वांचे लक्ष लागले आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून अजूनही तिढा कायम असून आदिती तटकरे आणि भरत गोगावले हे दोघेही या पदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.  कोकण विधान परिषद मतदारसंघातील ही निवडणूक महायुतीसाठी प्रतिष्ठेची मानली जात असून अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीमुळे राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/DVVODWNiduY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-01T110042.383.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/bjp-announces-11-legislative-council-candidates-surprise-name-included-1680754.html</loc><video:video>
	<video:title>सुप्रिया सुळे यांच्या व्याहींसह भाजपचे 11 उमेदवार जाहीर; नवे चेहरे कोण कोण?</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T11:56:24+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यात सर्वत्र विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे. माहायुतीने धक्कातंत्र वापरत अनेक चकित करणारी नावे समोर केली आहेत. महायुतीत भाजपला 11, शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादीला 2 अशा जागा मिळाल्या आहेत. कित्येक दावे-प्रतिदावे झाल्यानंतर अखेर एकमताने जागावाटप झाले. यावेळी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ काही तासांवर आली आहे. त्यामुळे कोणत्या पक्षातून कोणाला उमेदवारी मिळते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. हा सस्पेन्स आता कायमचा संपवत भाजपने त्यांच्या 11 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.  भाजपने केंद्र समितीच्या बैठकीनंतर ही नावे जाहीर केली. यामध्ये अविनाश ब्राम्हणकर, प्रवीण पोटे, पाटील धैर्यशील कदम, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपूरे, सुहास शिरसाट, अमर राजूरकर, बसवराज पाटील, नंदकिशोर महाजन, राजीव पोतदार तसेच अरुण लखाणी यांचा समावेश आहे. या उमेदवारांपैकी विशेष चर्चा ही अरुण लखाणी यांची आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीसाठी उमेदवार घोषित झालेले अरुण लखाणी हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळेंचे व्याही आहेत. या विषयावर अरुण लखाणी म्हणाले, &#039;पवार कुटुंब हे खूप मोठे नाव आहे, त्यामुळे हा विषय निघणार असे वाटलंच होते.&#039;</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/RYan2W8SQsY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/BJP-Arun-Lakhani.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/fatal-crash-on-mumbai-pune-expressway-leaves-two-dead-elderly-woman-injured-1680748.html</loc><video:video>
	<video:title>Mumbai - Pune | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मृत्यूचा थरार! कंटेनर-ट्रकची भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T10:41:04+05:30</video:publication_date>
	<video:description>महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत भीषण अपघातांच्या घटनांनी चिंता वाढवली असून, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या एका गंभीर अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एका 80 वर्षीय महिलेसह अन्य प्रवाशांना दुखापत झाली असून वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे सुमारे 4.30 वाजण्याच्या सुमारास खोपोली हद्दीत हा अपघात घडला. पुण्याहून मुंबईकडे तेलाचे डबे घेऊन जाणारा एक कंटेनर भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो मुंबई मार्गिकेत उलटला. याचवेळी मागून तांदूळ घेऊन जाणारा ट्रक घटनास्थळी पोहोचला. रस्त्यावर उलटलेल्या कंटेनरमुळे ट्रक चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ट्रक थेट कंटेनरवर जाऊन आदळला. धडक इतकी भीषण होती की ट्रकमधील चालक आणि क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या दोन अवजड वाहनांच्या अपघातात बाजूने प्रवास करणारी एक एर्टिगा कारही सापडली. कारमधील 80 वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. हायवे पोलीस, बचाव पथक आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. दुर्घटनाग्रस्त वाहने हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/IpTVH41AyxI</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-01T103945.813.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/two-friends-drown-in-jayakwadi-dam-near-chhatrapati-sambhajinagar-tragedy-shocks-locals-1680732.html</loc><video:video>
	<video:title>Chhatrapati Sambhajinagar | जायकवाडी धरणात दुर्दैवी दुर्घटना; पाण्यात बुडून दोन मित्रांचा मृत्यू</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T10:22:29+05:30</video:publication_date>
	<video:description>छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरण परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. पाण्यात बुडून दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत भारती आणि संकेत खरात हे दोघे मित्र जायकवाडी धरण परिसरात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना पाण्याची खोली आणि प्रवाहाचा योग्य अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. काही वेळानंतर ही घटना लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी आणि बचाव पथकाने शोधमोहीम सुरू केली.  शोधकार्यादरम्यान दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.  दरम्यान, या प्रकरणाची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी धरण, तलाव आणि नदी परिसरात पोहताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/RpNUf3bOr7o</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-01T102014.658.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/commercial-lpg-cylinder-prices-hiked-by-42-from-june-1-restaurants-may-feel-the-impact-1680713.html</loc><video:video>
	<video:title>Gas Cylinder | महागाईचा आणखी एक झटका! LPG सिलेंडर पुन्हा महाग, खिशाला कात्री, हॉटेलमधील जेवणही महागणार?</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T09:52:45+05:30</video:publication_date>
	<video:description>आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव आणि वाढत्या ऊर्जा किमतींच्या पार्श्वभूमीवर देशात महागाईचा दबाव कायम असल्याचे चित्र दिसत आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढत असतानाच आता व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. नवीन दरांनुसार 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत प्रति सिलेंडर सुमारे 42 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच 5 किलो फ्री ट्रेड एलपीजी (FTL) सिलेंडरच्या दरातही 11 रुपयांची वाढ करण्यात आली असून, दिल्लीत त्याची किंमत 821.50 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. हे नवे दर 1 जून 2026 पासून लागू करण्यात आले आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा थेट परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग आणि अन्य व्यावसायिक क्षेत्रांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या किमतींमध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसल्याने सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने व्यापारी वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये होत असलेली वाढ, पुरवठा साखळीवरील दबाव आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यांचा परिणाम ऊर्जा क्षेत्रावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आगामी काळात इंधन आणि गॅसच्या किमतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/NfGbqKD9PQc</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-01T094514.918.jpg</video:thumbnail_loc></video:video></url></urlset>