<urlset xmlns="https://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9" xmlns:video="http://www.google.com/schemas/sitemap-video/1.1"><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/maharashtra-farmers-loan-waiver-decision-brings-big-relief-to-lakhs-1681764.html</loc><video:video>
	<video:title>अखेर शेतकरी कर्जमाफी झाली! मंत्रिमंडळ बैठकीत थेट थेट मान्यता; वाचा किती रुपये माफ होणार!</video:title>
	<video:publication_date>2026-06-02T15:10:35+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेला अखेर मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे. तसेच 65 लाखांहून अधिक कर्जखात्यांना तब्बल 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार असल्याचे वृत्त आहे. जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात, त्यांना प्रोत्साहनपर रक्कमही देण्यात येणार आहे. आचारसंहिता असल्यमामुळे अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच यावर शिक्कामोर्तब होईल असं सांगतिलं जात आहे.  गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली होती. गारपीटीमुळे झालेल्या नुकसानानंतर बच्चू कडू आणि इतर नेत्यांनीही आंदोलन छेडले होते. त्यानंतर सरकारने 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/e5FTTonwL98</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/farmer-1.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/big-action-in-mumbai-bmc-demolishes-illegal-dargah-in-aarey-1681717.html</loc><video:video>
	<video:title>मोठी बातमी! मुंबईत पालिकेची धडक कारवाई! 50 वर्ष जुन्या अवैध दर्ग्यावर बुलडोझर</video:title>
	<video:publication_date>2026-06-02T14:45:16+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईतील गोरेगाव परिसरातील आरे कॉलनीमध्ये मंगळवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मोठी कारवाई करण्यात आली. सरकारी जागेवर झालेल्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवत पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. यावेळी 50 वर्षे जुन्या हजरत सय्यद बरकत अली दर्ग्यावरही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  पालिकेकडून याआधी संबंधितांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र अधिकाऱ्यांसमोर कोणतीही वैध कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याने अखेर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती.  भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील या परिसराला भेट देत पाहणी केली होती. त्यानंतर येथे अनधिकृत बांधकाम झाल्याची चर्चा अधिक रंगली होती. अखेर आज BMC आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत हे बांधकाम हटवले. सोशल मीडियावर या कारवाईचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/1vmaJOnN-yg</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/BMC.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/supriya-sule-slams-maharashtra-government-over-rising-crime-in-pune-raises-questions-on-law-and-order-1681693.html</loc><video:video>
	<video:title>पत्रकार पोलिसांचे काम करायला लागलेत; गुन्हेगारी दिसत नाही का? सुप्रिया सुळेंनी उघडली कायदा-सुव्यवस्थेची पोलखोल</video:title>
	<video:publication_date>2026-06-02T14:40:14+05:30</video:publication_date>
	<video:description>विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील काँग्रेस भवनात महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पुण्यात वाढत्या गुन्हेगारीसह विविध स्थानिक प्रश्नांवर राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हा मुद्दा केवळ राजकारणाचा नसून पुणेकर म्हणून प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. “निवडणुका येतील-जातील, राजकारण सुरूच राहील; मात्र पुण्यात वाढणारी गुन्हेगारी ही गंभीर बाब आहे. आपल्या घरातील मुलं, मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे,” असे त्या म्हणाल्या.  राज्य सरकार, पुणे पोलीस आणि केंद्र सरकारच्या आकडेवारीत तफावत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. “गुन्हेगारीबाबत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाचे आकडे वेगवेगळे आहेत. नेमकी खरी परिस्थिती कोणती, हा मोठा प्रश्न आहे,” असे सुळे यांनी म्हटले. पुण्यातील कोयता गँगच्या वाढत्या दहशतीवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. विविध माध्यमांमध्ये सातत्याने गुन्हेगारीचे व्हिडिओ आणि बातम्या समोर येत असताना पोलिस प्रशासनाला या घटना कशा दिसत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच शहरातील भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, पाणीटंचाई आणि कचरा व्यवस्थापनासारख्या प्रश्नांवरही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.  महाविकास आघाडी विधान परिषद निवडणुका एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट करताना सुळे यांनी सांगितले की, बैठकीत निवडणुकीपेक्षा स्थानिक प्रश्नांवर अधिक चर्चा झाली. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका महाविकास आघाडीची असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, पुणे विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारी अर्जांबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. काही उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आल्याची माहिती देताना, त्याबाबतचा अंतिम निर्णय निवडणूक आयोग घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पक्षासाठी दीर्घकाळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.  सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यांमुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्था, स्थानिक प्रशासन आणि विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/WhXX3pRb4Eg</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-02T143323.259.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mahayuti-prepares-big-action-against-rebels-in-council-elections-1681662.html</loc><video:video>
	<video:title>महायुती मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, थेट... बंडखोरी शमवण्यासाठीच्या हालचालींना वेग, राजकारणात मोठं घडणार?</video:title>
	<video:publication_date>2026-06-02T13:59:03+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत मित्र पक्षांमध्येच मतभेद आढळून येत आहेत. यामुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. अशात विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीला मोठ्या बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. अमरावती, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ या जागांवर अधिकृत उमेदवारांविरोधात स्वपक्षीय आणि मित्रपक्षाच्या नेत्यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय गणिते पूर्णपणे बिघडल्याचे चित्र आहे. अशात अंतर्गत भेद संपवण्यासाठी महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या हालचालींना वेग आला आहे.  आता यासंदर्भात महायुती मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बंड करणाऱ्यांनी अर्ज मागे न घेतल्यास पक्षाकडून शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. याआधी बंडखोरी करणाऱ्या नेत्यांना समज देण्याचा प्रयत्न केला जाईल. यादरम्यान सुनील तटकरे यांची रवींद्र चव्हाणांसोबत अर्धा तास बैठक झाली. एकूणच बंड करणाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तसेच युतीतील अंतर्गत वाद शमवण्यासाठी प्रमुख नेते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/Zcwev3OKLSo</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/Mahayuti-Maharashtra.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/pune-legislative-council-election-objection-raised-against-vikram-kakades-nomination-political-buzz-intensifies-1681665.html</loc><video:video>
	<video:title>Vikram Kakade | अर्ज भरला, पण आता अडथळा! विक्रम काकडेंना निवडणुकीआधीच मोठा झटका</video:title>
	<video:publication_date>2026-06-02T13:41:32+05:30</video:publication_date>
	<video:description>विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अर्ज छाननीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार विक्रम काकडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विक्रम काकडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदवला आहे. यासंदर्भात पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडण्यासाठी पोहोचले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून पुणे मतदारसंघासाठी श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  अर्ज छाननी प्रक्रियेच्या सुरुवातीलाच हा आक्षेप नोंदवण्यात आल्याने विक्रम काकडे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, नेमक्या कोणत्या तांत्रिक किंवा कायदेशीर कारणावरून आक्षेप घेण्यात आला आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, विक्रम काकडे यांच्या उमेदवारीवरून यापूर्वीही राजकीय चर्चांना उधाण आले होते. नुकतेच संजय काकडे आणि विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे हे दोघेही पक्ष कार्यालयात उपस्थित असल्याने उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाला होता.  त्यानंतर विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे सुनील टिंगरे समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. काही समर्थकांनी राजीनामेही दिल्याची चर्चा होती. आता त्यातच शरद पवार गटाने उमेदवारी अर्जावर घेतलेल्या आक्षेपामुळे या निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. आता निवडणूक निर्णय अधिकारी या आक्षेपावर काय निर्णय घेतात, विक्रम काकडे यांचा अर्ज वैध ठरतो की बाद होतो, याकडे राजकीय वर्तुळासह मतदारांचेही लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/Kv_h8qfy2cM</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-02T133314.486.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ladki-bahin-scheme-devendra-fadnavis-clarifies-kyc-verification-says-no-recovery-from-ineligible-beneficiaries-1681641.html</loc><video:video>
	<video:title>CM Devendra Fadnavis | लाडक्या बहिणींवर मोठं वक्तव्य! अपात्र महिलांकडून पैसे वसूल होणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं स्पष्ट उत्तर</video:title>
	<video:publication_date>2026-06-02T13:21:35+05:30</video:publication_date>
	<video:description>मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या पात्रता पडताळणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अर्ज प्रक्रिया, केवायसी पडताळणी आणि पात्रता निकषांबाबत सविस्तर माहिती दिली. माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली तेव्हा लाभार्थी महिलांना ठरावीक निकषांच्या आधारे अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ लागू शकतो, हे लक्षात घेऊन महिलांना स्वयंघोषणा (Self-Certification) करण्याची मुभा देण्यात आली होती. लाभार्थ्यांनी दिलेली माहिती सत्य मानून योजनेचा लाभ देण्यास सुरुवात करण्यात आली होती.  मात्र, सरकारी निधीचा वापर होत असल्याने योजनांचे लेखापरीक्षण (CAG Audit) आणि पात्रतेची पडताळणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार योजना सुरू झाल्यानंतर केवायसी प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी विविध शासकीय डेटाबेसची पडताळणी करण्यात आली. यामध्ये आयकर विभाग, सरकारी कर्मचारी वेतन पोर्टल, वाहन नोंदणी, रेशनकार्ड आणि इतर शासकीय नोंदींचा समावेश होता. या पडताळणीत काही लाभार्थी पात्रता निकषांमध्ये बसत नसल्याचे समोर आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे पाच लाख लाभार्थ्यांच्या कुटुंबात शासकीय नोकरी असल्याचे आढळून आले. तसेच सुमारे दहा लाख लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याची माहिती पडताळणीत समोर आली.  फडणवीस यांनी स्पष्ट केले की, ज्या लाभार्थी महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि पात्रता निकष पूर्ण केले आहेत, त्यांना योजनेचा लाभ पुढेही मिळत राहील. केवायसी पूर्ण न झाल्यास किंवा निकषांची पूर्तता होत नसल्यास संबंधित प्रकरणांची स्वतंत्र तपासणी केली जाईल. दरम्यान, अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांकडून यापूर्वी वितरित करण्यात आलेली रक्कम वसूल केली जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यामुळे योजनेतील लाभार्थ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम काही प्रमाणात दूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/jed6FQ51a7Q</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-02T130345.086.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/abdul-sattar-ambadas-danve-meeting-sparks-fresh-political-discussion-1681598.html</loc><video:video>
	<video:title>Video | मोठी बातमी! शिंदे गटातील नाराज अब्दुल सत्तार यांची उबाठाच्या अंबादास दानवेंशी गळाभेट</video:title>
	<video:publication_date>2026-06-02T12:59:17+05:30</video:publication_date>
	<video:description>विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीमधील जागावाटपावरून अनेक ठिकाणी नाराजी उघडपणे समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे या जागांवरून महायुतीतील पक्षांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.  छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी पक्षादेश झुगारून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यानंतर अब्दुल सत्तार यांनी भाजपवर गंभीर आरोप करत शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला. हा वाद अजून ताजा असताना अब्दुल सत्तार आणि शिवसेना (ठाकरे गट) चे अंबादास दानवे यांनी समृद्धी महामार्गावर थांबून गळाभेट घेतल्याचे समोर आले आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काय संवाद झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही, मात्र दोघांनी हसतमुखानी एकमेकांचे अभिवादन केले. हा व्हिडिओ समोर येताच राजकीय चर्चांना उधाण आले आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणतेही आरोप केले नसल्याचे सत्तार यांनी स्पष्ट केले. मात्र, मंत्री अतुल सावे यांच्यावर त्यांनी थेट निशाणा साधला. गेल्या 18 महिन्यांत नगरपरिषद आणि नगरपालिकांना कोणताही निधी मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच अतुल सावे यांनी आम्हाला कधीही मदत केली नाही, असेही सत्तार म्हणाले होते.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/6OaXBrie90M</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/Abdul-Sattar-and-Aambadas-Danve.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-targets-mahayuti-over-ladki-bahin-scheme-demands-probe-into-beneficiary-verification-1681618.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay Raut UNCUT | सरकारी तिजोरीचा अपहार? मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा; राऊतांच्या वक्तव्याने राजकारण ढवळून निघालं</video:title>
	<video:publication_date>2026-06-02T12:44:37+05:30</video:publication_date>
	<video:description>मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येवरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. योजनेतून मोठ्या संख्येने महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अपात्र लाभार्थ्यांना सरकारी निधीतून लाभ देण्यात आल्याचा दावा करत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच सरकारी तिजोरीच्या गैरवापराबाबत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.  यावेळी राऊत यांनी राज्यातील निवडणूक प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणुकांमध्ये मतदारांना प्रभावित करण्यासाठी विविध योजना वापरण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी यासंदर्भात सखोल चौकशीची गरज व्यक्त केली. दरम्यान, आगामी राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, एखादी निवडणूक पराभूत झाल्याने पक्ष कमकुवत होत नाही. सध्या पक्षबांधणीवर भर देण्यात येत असून भविष्यातील राजकीय परिस्थितीनुसार अनेक नेत्यांची भूमिका बदलू शकते, असे त्यांनी सूचित केले. शिवसेना पक्ष आणि आमदार अपात्रता प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणाचा निकाल आपल्या बाजूने लागेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी काही नाराज नेत्यांनी पुन्हा पक्षात परतण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्याचा विचार केला जाईल, असे सांगितले.  दरम्यान, संजय राऊत यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता असून महायुतीकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/XaHwmC1A</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-02T123940.271.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/satpati-gold-scam-exposed-after-jeweller-cheats-more-than-133-customers-1681551.html</loc><video:video>
	<video:title>सावधान! मोठ्या Gold Scam चा पर्दाफाश, सोनाराकडून भयंकर कांड, 133 जणांना जाळ्यात ओढलं</video:title>
	<video:publication_date>2026-06-02T11:59:46+05:30</video:publication_date>
	<video:description>पालघरच्या सातपाटी येथील एका ज्वेलर्सने अनेकांना गंडवल्याची माहिती समोर आली आहे. हा सोनार ग्राहकांचे लाखो रुपयांचे सोने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली. गेल्या 3 वर्षांपासून अनेक ग्राहकांनी दागिने घडवण्यासाठी तसेच सोने खरेदीसाठी संबंधित दुकानात पैसे आणि सोने जमा केले होते. मात्र, ग्राहकांना दागिने परत मिळत नसल्याने संशय निर्माण झाला होता.  सुमारे 8 ते 10 ग्राहकांनी काही महिन्यांपूर्वी दुकानात जाऊन चौकशी केली होती. त्यावेळी दुकान मालकाने लवकरच सर्वांचे दागिने परत देण्याचे आश्वासन दिले होते, त्यामुळे अनेकांनी पोलिसांत तक्रार केली नव्हती. मात्र, गेल्या आठवड्यात दुकान बंद आढळल्याने आणि मालक कुटुंबासह गायब झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. या सोनाराचे नाव असलम शेख असून त्याच्या दुकानाचे नाव सलीमा असे आहे. कित्येकांना त्याने खऱ्या सोन्याच्या बदल्यात बनावट सोने दिल्याचे समोर आले आहे.  यानंतर सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे 3 किलो सोने आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन फसवणूक करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी संबंधित ज्वेलर्सच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/gvZKDLjQG9E</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/Palghar-Gold-Scam.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ladki-bahin-yojana-update-chandrashekhar-bawankule-clarifies-removed-beneficiaries-not-permanently-disqualified-1681542.html</loc><video:video>
	<video:title>Chandrashekhar Bawankule | लाडकी बहीण योजनेतून नाव वगळलं? घाबरू नका; बावनकुळेंनी दिली मोठी गुड न्यूज! म्हणाले....</video:title>
	<video:publication_date>2026-06-02T11:35:31+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ संदर्भात गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा सुरू असताना, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. योजनेच्या छाननी प्रक्रियेदरम्यान काही महिलांची नावे यादीतून वगळण्यात आल्याने लाभार्थींमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली होती. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, योजनेतून काही नावे कमी झाल्याचा अर्थ त्या महिलांना कायमस्वरूपी अपात्र ठरवण्यात आले आहे, असा होत नाही. तांत्रिक अडचणी, अपूर्ण कागदपत्रे किंवा माहितीतील त्रुटींमुळे काही अर्ज तात्पुरते प्रलंबित ठेवण्यात आले असू शकतात.  सरकारकडून अशा अर्जांची पुन्हा सविस्तर तपासणी केली जाणार असून, ज्या लाभार्थ्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळतील त्यांना त्या दुरुस्त करण्याची संधी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रशासन आवश्यक ती कार्यवाही करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी या योजनेमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचा दावा केला. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही समाजातील तळागाळातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांच्या कल्याणासाठी राबवली जात आहे. या योजनेचा उद्देश केवळ गरजू महिलांना आर्थिक आधार देणे हा आहे,” असे बावनकुळे म्हणाले.  दरम्यान, योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येबाबत सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे अनेक महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/-g74nqPgIHo</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-02T113148.851.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-claims-ajit-pawar-ncp-will-collapse-soon-1681500.html</loc><video:video>
	<video:title>अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष भविष्यात राहणार नाही; संजय राऊतांचे मोठे विधान</video:title>
	<video:publication_date>2026-06-02T11:12:51+05:30</video:publication_date>
	<video:description>शिवसेना शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांच्या एका वक्तव्याने सध्या सगळीकडेच खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या वक्तव्यावर अनेक नेते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. सत्तारांना आता प्रमुख नेत्यांनी बैठकीसाठी बोलावले आहे. एकीकडे हे सर्व सुरू असतानाच दुसरीकडे शिवसेना (उबाठा) गटातील संजय राऊतांनी या प्रकरणावर धारदार वक्तव्य केले आहे. नुकतीच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर भाष्य केले.  राऊत म्हणाले, &quot;सत्तारांचे हे वैयक्तिक मत असेल, त्यांना शिंदे गटासोबत गेल्याचा पश्चाताप झाला असेल. कोणीतरी मला सांगितले की काही नेते तर भाजपला &#039;स्लो पॉयझन&#039; देखील म्हणत आहेत; जर कोणाला असे वाटत असेल तर त्याने उद्धव ठाकरेंच्या छत्रछायेखाली यावे. काहींना आमच्या पक्षात मज्जाव असेल हे नक्की आहे.&quot; पुढे राष्ट्रवादीतील मतभेदांबाबत संजय राऊत म्हणाले, &quot;मी वारंवार सांगतो, अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष भविष्यात राहणार नाही.&quot;</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/HlamwqU3</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/Sanjay-raut-On-NCP-.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/political-buzz-in-uddhav-thackeray-camp-nashik-leaders-skip-nomination-filing-amid-growing-speculation-1681501.html</loc><video:video>
	<video:title>मातोश्रीवर बैठक, पण उमेदवारी अर्जच गायब; ठाकरे गटात नेमकं काय चाललंय?</video:title>
	<video:publication_date>2026-06-02T10:56:17+05:30</video:publication_date>
	<video:description>उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटामध्ये नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत घडामोडींना वेग आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पक्षातील काही स्थानिक नेत्यांच्या भूमिकेमुळे ठाकरे गटात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिकचे नेते अनिल कदम यांनी मातोश्रीवर वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतरही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तसेच वसंत गीते यांनी अर्ज घेतला असला तरी त्यांनीही उमेदवारी अर्ज भरला नसल्याचे समोर आले आहे. या घडामोडींमुळे नाशिकमधील ठाकरे गटाच्या राजकीय रणनीतीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.  दरम्यान, या विषयावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून पुढील निर्णय नगरसेवक आणि स्थानिक नेतृत्वाच्या मतानुसार घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  या सर्व घडामोडींमुळे नाशिकमधील ठाकरे गटाच्या राजकारणात नेमके काय घडते आणि पक्षाची पुढील भूमिका काय असणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/xL6kpA8xMb4</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-02T105104.800.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/onion-price-crisis-in-maharashtra-dilip-walse-patil-appeals-to-farmers-offers-talks-with-protesters-1681442.html</loc><video:video>
	<video:title>Dilip Walse Patil | कांदा आंदोलनावर वळसे पाटलांचा मोठा प्रस्ताव; &#039;या, चर्चा करू&#039; म्हणत आंदोलनकर्त्यांना खुलं आवाहन!</video:title>
	<video:publication_date>2026-06-02T10:27:04+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यात कांद्याच्या घसरलेल्या दरांमुळे शेतकरी अडचणीत सापडले असून, अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर कांदा फेकून देण्याची वेळ आल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी आंदोलनकर्ते आणि शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकार गंभीर असून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. आंदोलन करणाऱ्यांनी सरकारच्या प्रयत्नांचा विचार करावा आणि आणखी सुधारणा आवश्यक असल्यास त्याबाबत चर्चा करण्यासाठी आपण तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  “आंदोलनकर्त्यांनी आंदोलनानंतर माझी भेट घेतली तर त्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करता येईल. तसेच मला आंदोलनस्थळी बोलावले तरी कोणताही पूर्वग्रह न ठेवता शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास मी तयार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत,” असे वळसे पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आगामी हवामान परिस्थितीबाबतही शेतकऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला. हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला असून एल निनोचा प्रभाव वाढल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.  शेतकऱ्यांनी पीक नियोजन करताना ऊस, कांदा आणि इतर नगदी पिकांबाबत हवामान आणि बाजारपेठेतील परिस्थितीचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच आखाती प्रदेशातील युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असून त्याचा प्रभाव भारतासह महाराष्ट्रावरही जाणवू शकतो, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्य आणि केंद्र सरकारने आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील असल्याचेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/CCU0viTs</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-02T102458.156.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/supriya-sule-alleges-over-1-25-crore-women-disqualified-from-ladki-bahin-yojana-questions-governments-verification-process-1681426.html</loc><video:video>
	<video:title>Tv9 Marathi Special Report । लाडकी बहीण योजनेतून किती महिला अपात्र?; सुप्रिया सुळेंनी सरकारला पाडलं तोंडघशी</video:title>
	<video:publication_date>2026-06-02T10:03:52+05:30</video:publication_date>
	<video:description>मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. माध्यमांमध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 80 लाख महिलांना योजनेतून अपात्र ठरवण्यात आल्याचे सांगितले जात असताना, प्रत्यक्षात हा आकडा सव्वा कोटींच्या घरात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.  सुप्रिया सुळे यांनी आरोप केला की, विधानसभा निवडणुकांपूर्वी कोणतीही सखोल पडताळणी न करता अर्ज करणाऱ्या महिलांना सरसकट लाभ देण्यात आला. मात्र निवडणुका संपल्यानंतर लाभार्थ्यांची छाननी सुरू करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात महिलांना अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे निवडणुकीपूर्वी महिलांना लाभ देऊन त्यांची मते मिळवली गेली का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.  तसेच, इतक्या मोठ्या संख्येने महिला अपात्र असल्याचे सरकारला निवडणुकांनंतरच कसे लक्षात आले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. लाडकी बहीण योजनेची व्याप्ती टप्प्याटप्प्याने कमी करून अखेर योजना बंद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत आहे.  दरम्यान, उपलब्ध आकडेवारीनुसार आता सुमारे 1.66 कोटी महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून सरकारकडून याबाबत काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/5Ic1y6A_9fg</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-02T095939.559.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/abdul-sattar-alleges-bjp-trying-to-finish-shiv-sena-1681125.html</loc><video:video>
	<video:title>Abdul Sattar LIVE | भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता... बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर खदखद मांडली!</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T17:46:20+05:30</video:publication_date>
	<video:description>विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीमधील जागावाटपावरून अनेक ठिकाणी नाराजी उघडपणे समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे या जागांवरून महायुतीतील पक्षांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.  छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी पक्षादेश झुगारून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यानंतर अब्दुल सत्तार यांनी भाजपवर गंभीर आरोप करत शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणतेही आरोप केले नसल्याचे सत्तार यांनी स्पष्ट केले. मात्र, मंत्री अतुल सावे यांच्यावर त्यांनी थेट निशाणा साधला. गेल्या 18 महिन्यांत नगरपरिषद आणि नगरपालिकांना कोणताही निधी मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच अतुल सावे यांनी आम्हाला कधीही मदत केली नसल्याचेही सत्तार म्हणाले. या आरोपांनंतर अतुल सावे यांनीही प्रतिक्रिया दिली असून महायुतीतील वाद अधिकच चव्हाट्यावर आला आहे. भाजपाकडून शिवसेनेला संपवण्याचं काम केलं जात आहे, असा गंभीर आरोप आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/ua9OFIKNxPg</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/Abdul-Sattar.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/maharashtra-legislative-council-elections-2026-key-battles-emerge-across-17-seats-as-mahayuti-faces-mva-challenge-1681116.html</loc><video:video>
	<video:title>Vidhan Parishad Election | कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील सर्वात मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T17:30:02+05:30</video:publication_date>
	<video:description>स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राज्यातील 17 जागांवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी थेट लढती रंगणार आहेत. प्रमुख मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झाली असून निवडणुकीचे चित्र स्पष्ट होत आहे. चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली मतदारसंघात भाजपचे अरुण लखानी आणि काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांच्यात थेट सामना होणार आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यासमोर काँग्रेसचे प्रफुल अग्रवाल आव्हान उभे करणार आहेत. तर अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे हर्षजीत देशमुख यांच्यात प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-सातारा मतदारसंघात भाजपचे धैर्यशील कदम यांच्याविरोधात शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील मैदानात उतरले आहेत. सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत आणि काँग्रेसचे फत्तेपूरकर यांच्यात मुकाबला होणार आहे. अहिल्यानगरमध्ये नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे यांच्यासमोर शरद पवार गटाच्या राणी लंके यांचे आव्हान असणार आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात भाजपचे सुहास शिरसाट आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या देवयानी डोणगावकर यांच्यात थेट लढत होणार आहे. तर नांदेडमध्ये भाजपचे अमर राजूरकर आणि काँग्रेसचे माधवराव जळगावकर आमनेसामने येणार आहेत. एकूणच, विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होणार असून अनेक मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळण्याची शक्यता आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/pttMa5LyquQ</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-01T172011.934.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/raigad-mlc-election-shiv-sena-rebel-candidate-juilee-dalvi-files-nomination-despite-mahayuti-seat-allocation-to-ncp-1681090.html</loc><video:video>
	<video:title>Raigad | एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी? महायुतीत नेमकं काय घडतंय?</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T16:52:51+05:30</video:publication_date>
	<video:description>रायगड विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर बंडखोरीचे आव्हान उभे राहिले आहे. महायुतीतील जागावाटपानुसार रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली असतानाही शिवसेनेचे नेते महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जाची निवडणूक प्रशासनाकडून नोंदही घेण्यात आली आहे. महायुतीने रायगड विधान परिषद मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवार निश्चित केला असला तरी जुईली दळवी यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत महायुतीतील सर्व घटक पक्षांनी युतीधर्म पाळावा आणि अधिकृत उमेदवारांनाच पाठिंबा द्यावा, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, रायगड विधान परिषद जागेबाबत महेंद्र दळवी हे सुरुवातीपासूनच आग्रही असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जुईली दळवी यांच्या उमेदवारीकडे केवळ बंडखोरी म्हणून नव्हे, तर स्थानिक स्तरावरील राजकीय नाराजीचे प्रतीक म्हणूनही पाहिले जात आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महायुती या बंडखोरीवर कोणती भूमिका घेते आणि जुईली दळवी उमेदवारी कायम ठेवतात की माघार घेतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/pb_M_GlyOyM</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-01T164746.743.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/abhijeet-deepke-gives-warning-of-massive-protest-in-delhi-1681054.html</loc><video:video>
	<video:title>कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ,  आता सर्वात मोठं आंदोलन, दिल्लीत थेट...नेमकं काय घडणार?</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T17:05:25+05:30</video:publication_date>
	<video:description>नीट यूजी पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली असताना अभिजीत दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. या प्रकरणामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.  अभिजीत दीपके याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत विद्यार्थ्यांना, पालकांना आणि या प्रकरणामुळे नाराज असलेल्या नागरिकांना दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलनासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ‘मला एअरपोर्टवर भेटा, आपण सर्व मिळून आवाज उठवू,’ असं तो व्हिडीओमध्ये म्हणाला आहे.  नीट पेपरफुटी प्रकरणात देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत असून अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. अभिजीत दीपके हा विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी दिल्लीला येणार असून देशासाठी काहीतरी करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं त्याने म्हटलं आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/s8y5FGJYsPY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/Abhijit-Dipake-2.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/fake-copies-of-who-was-shivaji-book-spark-controversy-pansare-family-demands-withdrawal-and-action-against-pdfs-audiobooks-1681044.html</loc><video:video>
	<video:title>Shivaji Kon Hota | शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे कुटुंबीयांचा आक्षेप</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T16:25:28+05:30</video:publication_date>
	<video:description>ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या बनावट प्रती बाजारात उपलब्ध झाल्याचा आरोप करण्यात आला असून, यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. पुस्तकातील काही मजकुरावर पानसरे कुटुंबीयांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख करण्यात आल्याबाबत कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात प्रशांत आंबी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या संबंधित पुस्तकांच्या प्रती तातडीने मागे घेण्यात याव्यात. तसेच या पुस्तकाचे अभिवाचन, ऑडिओ बुक आणि पीडीएफ स्वरूपातील आवृत्त्या विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्याचे त्यांनी सांगितले. युट्यूबसह इतर माध्यमांवर हे साहित्य उपलब्ध असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत आहे. विशेषतः पीडीएफ प्रती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात असल्याने त्या हटविण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे प्रशांत आंबी यांनी स्पष्ट केले. “व्हायरल झालेल्या पीडीएफ प्रती आम्हाला स्वतःहून नष्ट करणे शक्य नाही. त्यामुळे शासनाने या संदर्भात योग्य ती कारवाई करावी,” असे त्यांनी म्हटले. तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या ऑडिओ बुकमध्ये काही दुरुस्त्या आवश्यक असल्यास संबंधितांना कायदेशीर नोटीस पाठविण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे इतिहास आणि साहित्य क्षेत्रात नव्या चर्चेला तोंड फुटले असून संबंधित पुस्तक आणि डिजिटल सामग्रीबाबत पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/2cKV3KzO</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-01T161957.789.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/nashik-legislative-council-election-mahayuti-faces-internal-political-twist-1680956.html</loc><video:video>
	<video:title>ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या नेत्यांच्या विधानाची तुफान चर्चा!</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T15:43:08+05:30</video:publication_date>
	<video:description>नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीतच पेच निर्माण झाला आहे. जागा शिवसेनेला मिळाल्यानंतर नरेंद्र दराडे यांना उमेदवारी मिळाली. यानंतर दराडे यांनी केवळ एकनाथ शिंदेंचे आभार मानले असे नाही, तर त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, &#039;मी शिवसेनेत होतो तेव्हाही शिंदेच आमचे नेते होते&#039;, असे विधान त्यांनी केले आहे. आता या विधानामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.  दरम्यान, नाशिकची विधान परिषद जागा महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळाली. शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासह शिंदेंसेनेचे नगरसेवक आणि भाजपचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दराडेंनी उमेदवारी अर्ज भरला. पण अर्ज दाखल करण्याआधी काही तास आधीच ट्विस्ट आला असून भाजप आणि राष्ट्रवादीचे नेतेही मैदानात उतरणार असल्याचे समजतेय. इतकेच नाही तर गणेश गीते यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरायचे ठरवले आहे, अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/a_38AoAaQrk</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/Eknath-Shinde-5.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ladki-bahin-yojana-row-aditi-tatkare-clarifies-80-lakh-women-not-removed-verification-process-underway-1680946.html</loc><video:video>
	<video:title>Aditi Tatkare On Ladki Bahin Yojna | 80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण, म्हणाल्या....</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T14:27:35+05:30</video:publication_date>
	<video:description>मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सुमारे 80 लाख महिलांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. या आरोपांना उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमांशी संवाद साधताना तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेतील अर्ज बाद करण्यात आलेले नाहीत. लाभार्थ्यांची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रिया सुरू असल्याने काही नोंदींची तपासणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, ई-केवायसी प्रक्रिया मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यात आली होती. यासाठी लाभार्थ्यांना सुमारे तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता.  तटकरे यांनी स्पष्ट केले की, ई-केवायसी ही प्रक्रिया केवळ लाडकी बहीण योजनेसाठी नसून राज्यातील विविध डीबीटी (Direct Benefit Transfer) योजनांमध्येही राबवली जाते. तसेच 80 लाखांचा आकडा केवळ ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांचा नसून त्यामध्ये इतर निकषांमुळे अपात्र ठरणाऱ्या महिलांचाही समावेश आहे. यामध्ये वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी, वयोमर्यादेच्या निकषात न बसणाऱ्या महिला आणि सरकारी कर्मचारी यांचा देखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी कर्मचाऱ्यांकडून लाभाची रक्कम परत वसूल करण्याची प्रक्रिया गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.  दरम्यान, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांबाबत सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/RZ2kU7R_vEk</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-01T142038.446.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ncp-pune-candidate-row-sparks-rebellion-among-party-leaders-1680916.html</loc><video:video>
	<video:title>सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत... पुण्यात राष्ट्रवादीचा हायव्होल्टेज ड्रामा</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T14:03:55+05:30</video:publication_date>
	<video:description>महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे आणि कोकण या जागा मिळाल्या आहेत. कोकणमधून अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र पुण्याच्या जागेवरून पक्षात मोठा वाद पेटला आहे.  ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या विक्रम काकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आल्याने पुण्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. पक्षातील अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. उमेदवारीसाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक नेत्यांना डावलण्यात आल्याची भावना पक्षात निर्माण झाली आहे.  या निर्णयानंतर काही नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. सुनील टिंगरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून रामदास गाडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद अधिक स्पष्ट झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी जिजाई बंगल्यावर पदाधिकाऱ्यांसोबत अनेक तास चर्चा केली. मात्र स्थानिक नेत्यांचा विरोध असतानाही विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज नेत्यांची समजूत कशी काढली जाणार आणि याचा निवडणुकीवर काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/uAGi1C18_zA</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/NCP-Pune.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/vijay-wadettiwar-slams-bjp-over-arun-lakhani-nomination-says-party-ignores-loyal-workers-1680908.html</loc><video:video>
	<video:title>Vijay Wadettiwar | कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; विजय वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T13:31:26+05:30</video:publication_date>
	<video:description>स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने 17 पैकी 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून उद्योगपती अरुण लखानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून, काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपचे उमेदवार अरुण लाखानी हे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या व्याही आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली जात आहे. यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “लाखानी हे पवार कुटुंबाचे नातेवाईक आहेत, तर यात पवारांचा नेमका काय संबंध? उमेदवारी भाजपने दिली आहे. मग हा प्रश्न भाजपलाच विचारायला हवा. पवारांना विचारून उमेदवारी दिली का? याचे उत्तर भाजपने द्यावे,” असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.  भाजप उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “भाजपला नेहमी उद्योगपती, मोठे व्यावसायिक आणि प्रभावशाली व्यक्तीच हव्या असतात. पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांचा मात्र विसर पडतो,” अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी आणि राजकीय समीकरणांवरून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, आगामी काळात हा वाद आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/mQfnYHNIm_Y</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-01T133014.983.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sunetra-pawar-finalises-vikram-kakade-for-pune-council-seat-1680907.html</loc><video:video>
	<video:title>4 तासांच्या मंथनानंतर सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम काकडेंनाच उमेदवारी, असं काय घडलं?</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T13:26:57+05:30</video:publication_date>
	<video:description>सध्या राज्यभरात विधान परिषदेचीच रणधुमाळी सुरू आहे. यादरम्यान राष्ट्रवादीत मोठी घडमोड पहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेल्या विधान परिषदेच्या दोन जागा आल्या आहेत. कोकण आणि पुण्याची जागा राष्ट्रवादीला सुटली आहे. कोकणमधून राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे असणार आहेत. तर पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादीत अजून माथापच्ची सुरू होती. सकाळी 9 वाजल्यापासून राष्ट्रवादीची बैठक सुरू होती. दुपार झाली तरी नाव फायनल होत नव्हते. अखेर चार तासाच्या माथापच्चीनंतर विक्रम काकडे यांचे नाव फायनल झाले आहे. काकडे हेच राष्ट्रवादीचे पुण्यातील उमेदवार असणार आहेत.  पुण्यातील जिजाई बंगल्यावरती सकाळी नऊ पासून राष्ट्रवादीची बैठक सुरू होती. पुणे जिल्ह्यातील आजी-माजी आमदार राष्ट्रवादी पदाधिकारी यांची सुनेत्रा पवारांसोबत बैठक सुरू होती. विक्रम काकडे यांना तिकीट देण्यास सर्वांचा विरोध होता. अनेकांनी आक्षेप घेतला होता. मात्र, या सर्वांची मनधरणी करण्यात सुनेत्रा पवार यांना यश आलं आहे. सुनेत्रा पवार यांनी अखेर काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. काकडे यांनीही राष्ट्रवादीत तात्काळ प्रवेश घेतला आहे. विक्रम काकडे यांच्या संजय काकडे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीतील एका जागेचा तिढा सुटला आहे. तिकीट मिळताच काकडे यांनी मी अर्ज भरायला निघाल्याची प्रतिक्रिया देऊन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/UBJ9su0bRAg</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/NCP-1.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/atul-londhe-likely-to-be-mva-candidate-for-nagpur-legislative-council-election-nomination-buzz-intensifies-1680850.html</loc><video:video>
	<video:title>Nagpur | नागपूर विधान परिषदेसाठी अतुल लोंढेंची वर्णी?; उमेदवारी जवळपास निश्चित! -सुत्र</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T12:59:09+05:30</video:publication_date>
	<video:description>स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून अनेक उमेदवारांनी अर्जही दाखल केले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबतही अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू आहे.  दरम्यान, नागपूर विधान परिषद मतदारसंघासाठी काँग्रेस नेते अतुल लोंढे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीकडून अतुल लोंढे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. पक्षश्रेष्ठींकडून अंतिम शिक्कामोर्तब होण्याची औपचारिकता बाकी असल्याचे सांगितले जात आहे.  नागपूर विधान परिषद निवडणुकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले असून, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी आणखी काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/4Rtl9NRwEO8</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-01T124515.533.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/crude-oil-prices-surge-amid-middle-east-tensions-impact-on-india-1680844.html</loc><video:video>
	<video:title>मोठी बातमी! कच्च्या तेलाच्या किंमतींनी विक्रमी टप्पा गाठला, जागतिक स्तरावर संकट, प्रति बॅरल आता...</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T12:53:11+05:30</video:publication_date>
	<video:description>जागतिक घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या किमतीने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. अमेरिका-इराण तणावाचा थेट परिणाम तेल पुरवठ्यावर होण्याची शक्यता असल्याने बाजारात तेजी आली आहे. कच्च्या तेलाची प्रति बॅरल किंमत 93 डॉलरवर पोहोचली आहे. म्हणजेच कच्च्या तेलाच्या किंमतीत 2 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या भयंकर हल्ल्यामुळे या किंमती वधारल्या आहेत. या तणावामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण आहे.  पश्चिम आशियात पुन्हा एकदा तणाव वाढताना दिसत आहे, ज्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे सरकारी तेल कंपन्या आणि भारत सरकार आधीच आर्थिक ओझ्याखाली दबले जात आहेत, भारताचा परकीय चलनाचा साठा कमी होत आहे आणि अशा परिस्थितीत तणाव वाढल्याने व कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा उसळल्याने भारतावर आर्थिक दबाव आणखी वाढू शकतो.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/puUftuunpd8</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/Oil-Price-Hike.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/fire-breaks-out-at-education-ministry-office-in-new-delhi-1680803.html</loc><video:video>
	<video:title>एकच खळबळ अन् धुराचा कल्लोळ, नवी दिल्लीतील शिक्षण मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T12:12:24+05:30</video:publication_date>
	<video:description>नवी दिल्लीतील आयटीओ (ITO) परिसरातील विकास मार्गावर असलेल्या शिक्षण मंत्रालयाच्या कार्यालयात अचानक आग लागली. ही आग इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागली असून घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले.  प्राथमिक माहितीनुसार, आग दुसऱ्या मजल्यावरील एका विभागात लागली होती. धूर मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे इमारतीतील कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.  या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. तसेच कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/HBCp5lCUSIk</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/Delhi-fire-news-.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/rcb-wins-ipl-2026-final-virat-kohlis-unbeaten-75-leads-royal-challengers-bengaluru-to-historic-title-1680805.html</loc><video:video>
	<video:title>RCB | अखेर पुन्हा लाल झेंडा फडकला! सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर RCB चा कब्जा</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T11:59:53+05:30</video:publication_date>
	<video:description>इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) दमदार विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम लढतीत आरसीबीने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत 155 धावांची मजल मारली आणि आरसीबीसमोर 156 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात आरसीबीने हे लक्ष्य 18 षटकांत 5 विकेट्स गमावून पूर्ण केले. आरसीबीच्या विजयात स्टार फलंदाज विराट कोहलीने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. विराटने नाबाद 75 धावांची शानदार खेळी करत संघाचा विजय जवळपास एकहाती निश्चित केला. त्याला टीम डेव्हिडने 24 धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली, तर जितेश शर्मासोबतच्या भागीदारीने आरसीबीचा विजय शिक्कामोर्तब केला. गुजरातकडून राशिद खानने नवव्या षटकात रजत पाटीदार आणि कृणाल पंड्या यांना बाद करत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र विराट कोहलीच्या संयमी आणि आक्रमक खेळीसमोर गुजरातचे प्रयत्न अपुरे ठरले. या विजयासह आरसीबीने आयपीएल इतिहासातील एक महत्त्वाचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा आरसीबी हा चौथा संघ ठरला आहे. यापूर्वी Chennai Super Kings, Mumbai Indians आणि Kolkata Knight Riders यांनी ही कामगिरी केली होती. तसेच 2018 पासून सुरू असलेली ‘क्वालिफायर-1 विजेता संघच आयपीएल चॅम्पियन’ ही परंपराही आरसीबीने कायम राखली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर आरसीबीच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/qfaCtRxbfJ8</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-01T115041.547.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-remarks-on-arun-lakhani-name-among-bjp-veterans-1680772.html</loc><video:video>
	<video:title>त्या पुराण पुरुषांच्या यादीत लखानी अग्रस्थानी; सुप्रिया सुळेंच्या व्याह्यांबाबत राऊतांचे धक्कादायक विधान</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T11:39:17+05:30</video:publication_date>
	<video:description>शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.  त्यांनी अहिल्यानगरातील नेते प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश, अरुण लखानी-मोदी भेट आणि &#039;भाजपयुक्त काँग्रेस&#039; यावर रोकठोक भाष्य केले. यामध्ये ते प्रामुख्याने सुप्रिया सुळेंची लेक रोहिणी सुळे हिच्या सासरच्या मंडळींबाबत बोलले. भाजपने सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानी यांना उमेदवारी दिली. याविषयी राऊतांनी मोठं विधान केलं आहे.  यानंतर संजय राऊत यांना अरुण लखानी यांच्या उमेदवारीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावरही त्यांनी भाष्य केले. अरुण लखानी हे काही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नेते नाहीत. ते जन्मजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) आहेत. ते संघाचे निष्ठावान कार्यकर्ते, समर्थक आणि पदाधिकारी आहेत. सर्वच बाबतीत संघाला ताकद देणारे ते एक सद्गृहस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी मोदींची भेट घेतली यात आश्चर्यकारक काय आहे? जेव्हा मी दिल्लीत राज्यसभेतील अनेक लोकांची माहिती घेतो, तेव्हा त्यांचे मूळ कुठेतरी संघाशी जोडलेले असतेच. विदर्भात भाजपचे जे कोणी जुने आणि ज्येष्ठ चेहरे आहेत, त्या पुराण पुरुषांच्या यादीत लखानी यांचे नाव अग्रक्रमाने येते. संघ आणि भाजप काय वेगळे आहेत का? हे दोन्ही एकच आहेत, असे संजय राऊत म्हणाले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/rTm9YOglYCE</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/sanjay-Raut-on-Arun-Lakhani-.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/vijay-wadettiwar-slams-mahayuti-government-over-ladki-bahin-yojana-claims-80-lakh-women-excluded-1680771.html</loc><video:video>
	<video:title>Ladki Bahin Yojna | भाऊ खुर्चीवर, बहीण वाऱ्यावर! 80 लाख महिलांचा श्राप महायुतीला लागणार? वडेट्टीवारांच्या वक्तव्याने खळबळ</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T11:23:37+05:30</video:publication_date>
	<video:description>आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ‘माझी लाडकी बहीण’ योजना, वाढती महागाई आणि विविध जनकल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लाडकी बहीण योजनेतून मोठ्या संख्येने महिलांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप करत वडेट्टीवार म्हणाले की, निवडणुकीनंतर सरकारने लाभार्थी महिलांकडे दुर्लक्ष केले आहे. सुमारे 80 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याचा दावा करत त्यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारने निवडणुकीच्या काळात महिलांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा आरोप करत त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. या निर्णयामुळे अनेक महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली असून त्याचा राजकीय परिणाम भविष्यात दिसून येईल, असेही ते म्हणाले.  महागाई, बेरोजगारी आणि जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. आगामी निवडणुकांमध्ये जनतेसमोर हे मुद्दे प्रभावीपणे मांडले जातील, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, वडेट्टीवार यांच्या टीकेनंतर महायुतीकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/DRfgQHrwjcc</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-01T112225.844.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/aniket-tatkare-officially-named-mahayuti-candidate-for-konkan-mlc-election-1680764.html</loc><video:video>
	<video:title>Sunil Tatkare On Vidhan Parishad | कोकणच्या जागेवर तटकरेंचा डंका! अनिकेत तटकरे महायुतीचे उमेदवार? सुनील तटकरेंची मोठी घोषणा</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T11:02:25+05:30</video:publication_date>
	<video:description>कोकण विभागातील विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरे यांना महायुतीचे उमेदवार म्हणून अधिकृतपणे मैदानात उतरवण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली. सुनील तटकरे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 17 जागांच्या निवडणुका महायुती एकत्रितपणे लढत आहे. महायुतीतील जागावाटपाबाबत निर्णय झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने कोकण विभागातील जागा लढवण्याचे निश्चित केले आहे. अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज महायुतीचे उमेदवार म्हणून दाखल करण्यात येत असून त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार यांचे आशीर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले.  यावेळी त्यांनी कोकणातील महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांचे पाठबळ अनिकेत तटकरे यांना असल्याचा दावा केला. उदय सामंत, नितेश राणे, भरत गोगावले यांच्यासह महायुतीतील सर्व आमदार आणि नेते त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवरही सर्वांचे लक्ष लागले आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून अजूनही तिढा कायम असून आदिती तटकरे आणि भरत गोगावले हे दोघेही या पदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.  कोकण विधान परिषद मतदारसंघातील ही निवडणूक महायुतीसाठी प्रतिष्ठेची मानली जात असून अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीमुळे राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/DVVODWNiduY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-01T110042.383.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/bjp-announces-11-legislative-council-candidates-surprise-name-included-1680754.html</loc><video:video>
	<video:title>सुप्रिया सुळे यांच्या व्याहींसह भाजपचे 11 उमेदवार जाहीर; नवे चेहरे कोण कोण?</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T11:56:24+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यात सर्वत्र विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे. माहायुतीने धक्कातंत्र वापरत अनेक चकित करणारी नावे समोर केली आहेत. महायुतीत भाजपला 11, शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादीला 2 अशा जागा मिळाल्या आहेत. कित्येक दावे-प्रतिदावे झाल्यानंतर अखेर एकमताने जागावाटप झाले. यावेळी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ काही तासांवर आली आहे. त्यामुळे कोणत्या पक्षातून कोणाला उमेदवारी मिळते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. हा सस्पेन्स आता कायमचा संपवत भाजपने त्यांच्या 11 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.  भाजपने केंद्र समितीच्या बैठकीनंतर ही नावे जाहीर केली. यामध्ये अविनाश ब्राम्हणकर, प्रवीण पोटे, पाटील धैर्यशील कदम, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपूरे, सुहास शिरसाट, अमर राजूरकर, बसवराज पाटील, नंदकिशोर महाजन, राजीव पोतदार तसेच अरुण लखाणी यांचा समावेश आहे. या उमेदवारांपैकी विशेष चर्चा ही अरुण लखाणी यांची आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीसाठी उमेदवार घोषित झालेले अरुण लखाणी हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळेंचे व्याही आहेत. या विषयावर अरुण लखाणी म्हणाले, &#039;पवार कुटुंब हे खूप मोठे नाव आहे, त्यामुळे हा विषय निघणार असे वाटलंच होते.&#039;</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/RYan2W8SQsY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/BJP-Arun-Lakhani.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/fatal-crash-on-mumbai-pune-expressway-leaves-two-dead-elderly-woman-injured-1680748.html</loc><video:video>
	<video:title>Mumbai - Pune | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मृत्यूचा थरार! कंटेनर-ट्रकची भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T10:41:04+05:30</video:publication_date>
	<video:description>महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत भीषण अपघातांच्या घटनांनी चिंता वाढवली असून, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या एका गंभीर अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एका 80 वर्षीय महिलेसह अन्य प्रवाशांना दुखापत झाली असून वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे सुमारे 4.30 वाजण्याच्या सुमारास खोपोली हद्दीत हा अपघात घडला. पुण्याहून मुंबईकडे तेलाचे डबे घेऊन जाणारा एक कंटेनर भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो मुंबई मार्गिकेत उलटला. याचवेळी मागून तांदूळ घेऊन जाणारा ट्रक घटनास्थळी पोहोचला. रस्त्यावर उलटलेल्या कंटेनरमुळे ट्रक चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ट्रक थेट कंटेनरवर जाऊन आदळला. धडक इतकी भीषण होती की ट्रकमधील चालक आणि क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या दोन अवजड वाहनांच्या अपघातात बाजूने प्रवास करणारी एक एर्टिगा कारही सापडली. कारमधील 80 वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. हायवे पोलीस, बचाव पथक आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. दुर्घटनाग्रस्त वाहने हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/IpTVH41AyxI</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-01T103945.813.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/two-friends-drown-in-jayakwadi-dam-near-chhatrapati-sambhajinagar-tragedy-shocks-locals-1680732.html</loc><video:video>
	<video:title>Chhatrapati Sambhajinagar | जायकवाडी धरणात दुर्दैवी दुर्घटना; पाण्यात बुडून दोन मित्रांचा मृत्यू</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T10:22:29+05:30</video:publication_date>
	<video:description>छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरण परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. पाण्यात बुडून दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत भारती आणि संकेत खरात हे दोघे मित्र जायकवाडी धरण परिसरात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना पाण्याची खोली आणि प्रवाहाचा योग्य अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. काही वेळानंतर ही घटना लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी आणि बचाव पथकाने शोधमोहीम सुरू केली.  शोधकार्यादरम्यान दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.  दरम्यान, या प्रकरणाची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी धरण, तलाव आणि नदी परिसरात पोहताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/RpNUf3bOr7o</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-01T102014.658.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/commercial-lpg-cylinder-prices-hiked-by-42-from-june-1-restaurants-may-feel-the-impact-1680713.html</loc><video:video>
	<video:title>Gas Cylinder | महागाईचा आणखी एक झटका! LPG सिलेंडर पुन्हा महाग, खिशाला कात्री, हॉटेलमधील जेवणही महागणार?</video:title>
	<video:publication_date>2026-06-01T09:52:45+05:30</video:publication_date>
	<video:description>आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव आणि वाढत्या ऊर्जा किमतींच्या पार्श्वभूमीवर देशात महागाईचा दबाव कायम असल्याचे चित्र दिसत आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढत असतानाच आता व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. नवीन दरांनुसार 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत प्रति सिलेंडर सुमारे 42 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच 5 किलो फ्री ट्रेड एलपीजी (FTL) सिलेंडरच्या दरातही 11 रुपयांची वाढ करण्यात आली असून, दिल्लीत त्याची किंमत 821.50 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. हे नवे दर 1 जून 2026 पासून लागू करण्यात आले आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा थेट परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग आणि अन्य व्यावसायिक क्षेत्रांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या किमतींमध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसल्याने सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने व्यापारी वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये होत असलेली वाढ, पुरवठा साखळीवरील दबाव आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यांचा परिणाम ऊर्जा क्षेत्रावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आगामी काळात इंधन आणि गॅसच्या किमतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/NfGbqKD9PQc</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-01T094514.918.jpg</video:thumbnail_loc></video:video></url></urlset>