<urlset xmlns="https://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9" xmlns:video="http://www.google.com/schemas/sitemap-video/1.1"><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/petrol-diesel-prices-reduced-from-first-day-of-july-big-relief-1701739.html</loc><video:video>
	<video:title>महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T11:45:07+05:30</video:publication_date>
	<video:description>जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 1 जुलैपासून नायरा एनर्जीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांची तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात केली आहे. मध्य पूर्वेतील तणाव कमी झाल्यामुळे आणि कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत झाल्याने जागतिक बाजारात क्रूड ऑइलच्या किमती कमी झाल्या आहेत. त्याचा परिणाम इंधन दरांवर दिसून येत आहे.  नायरा एनर्जीचे देशभरात 7000 पेक्षा अधिक पेट्रोल पंप आहेत. या सर्व पंपांवर नवीन दर लागू करण्यात आले आहेत. मात्र, स्थानिक करांमुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगळे असू शकतात.  सध्या, मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 111.21 रुपये आहे.  चंदीगडमध्ये पेट्रोलचा दर सर्वात कमी म्हणजे 101.54 रुपये प्रति लिटर आहे. तर हैदराबादमध्ये पेट्रोल 115.69 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.  डिझेलबाबत बोलायचे झाल्यास, 89.47 रुपये प्रति लिटरच्या जवळपास आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/IFKO-SlDQRc</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/petrol-.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/drunk-man-created-panic-inside-mumbai-local-train-during-journey-1701723.html</loc><video:video>
	<video:title>“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T11:20:51+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच पश्चिम रेल्वेमध्ये शुल्लक कारणावरून मयंक लहार नावाच्या तरुणाची हत्या झाली होती. यावेळी लोकलमध्ये उपस्थित सर्वांनी बचावाची भूमिका घेतली. यानंतर एका आठवड्यातच तब्बल तीन चाकू हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. यानंतर आता पनवेल ते सीएसएमटी लोकलमध्ये एका मद्यधुंध सनकी व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला आहे. त्याने एका प्रवाशाला चक्क जीवे मारण्याची धमकी दिली.  पनवेल ते सीएसएमटी लोकलमध्ये काही प्रवासी प्रवास करत होते. यावेळी एका मद्यधुंद व्यक्तीने वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने मोठमोठ्या आवाजात शिवगाळ करण्यास सुरुवात केली. धिंगाणा घालणाऱ्या इसमाने थेट धमकी दिली की, “मी याआधीच चार खून केलेत, यानंतर पुढचा नंबर तुझाच आहे. कर ज्याला जिथं तक्रार करायची आहे... बघ काय होईल?” या लोकलच्या डब्यात काही दिव्यांग प्रवासीसुद्धा होते. या प्रकरणानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून रेल्वे प्रवासादरम्यान सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/jXL8waiBeos</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/panvel-csmt-local-train.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-slams-sachin-ahir-after-switch-to-shinde-sena-he-betrayed-sharad-pawar-too-maharashtra-politics-1701729.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T11:16:37+05:30</video:publication_date>
	<video:description>शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर आता माजी मंत्री सचिन अहिर यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारण आणखी तापले आहे. या घडामोडीनंतर ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सचिन अहिर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.  सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी निवड होण्याची औपचारिक घोषणा अद्याप बाकी असताना राऊत यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी अहिर यांचा राजकीय प्रवास वादग्रस्त आणि कलंकित असल्याचा आरोप करत त्यांच्या पक्षांतरावर टीका केली.  संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सचिन अहिर यांनी शरद पवार यांना कोणतीही कल्पना न देता शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळीही त्यांनी आपल्या राजकीय भविष्यासाठी निर्णय घेतला होता. त्यामुळे, “जे शरद पवार यांचे झाले नाहीत, ते आमचे कसे होतील?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  राऊत यांनी पुढे सांगितले की, शिवसेना, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सचिन अहिर यांना पक्षात योग्य सन्मान आणि जबाबदाऱ्या दिल्या. त्यांना भेटण्यासाठी वेळ दिला जात नव्हता किंवा त्यांचे म्हणणे ऐकले जात नव्हते, असा दावा करणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आदित्य ठाकरे आणि सचिन अहिर यांची नियमित भेट होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.  सचिन अहिर यांनी आपल्या राजकीय भविष्यासाठी पक्ष सोडल्याचे सांगितले असले, तरी या निर्णयामागील कारणांवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना अधिक वेग आला आहे. त्यांच्या पक्षांतरामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना उधाण आले असून या प्रकरणावर पुढे आणखी प्रतिक्रिया येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/-uBySwCu-8c</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T111455.572.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sant-nivruttinath-maharaj-palkhi-arrives-in-nashik-thousands-of-warkaris-march-towards-pandharpur-1701717.html</loc><video:video>
	<video:title>Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T10:59:20+05:30</video:publication_date>
	<video:description>आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज नाशिक शहरात भक्तिमय वातावरणात दाखल झाली. “हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा” आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात हजारो वारकरी टाळ-मृदुंगाच्या निनादात पालखीसोबत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.  त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान केल्यानंतर काल पालखीने महिरावणी येथे मुक्काम केला होता. त्यानंतर आज सकाळी पालखीचे नाशिकमध्ये आगमन होताच संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. भगवे ध्वज, पताका आणि विठ्ठलाच्या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.  नाशिकमध्ये पालखीचे औपचारिक आणि उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी शहराच्या महापौर हिमगौरी आडगे, उपमहापौर विलास शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर, साधू-महंत आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.  स्वागत सोहळ्यादरम्यान जेसीबीच्या साहाय्याने संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या अनोख्या स्वागतामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. वारकऱ्यांनी अभंग, भजन आणि हरिनामाच्या गजरात विठ्ठलभक्तीचा उत्सव साजरा केला.  आता संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पुढील मुक्कामासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली असून, लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने या पवित्र वारीत सहभागी झाले आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/ULTCxnQaG6M</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T104418.196-1.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-reacted-strongly-after-sachin-ahir-filed-nomination-papers-1701710.html</loc><video:video>
	<video:title>मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T10:49:32+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली. काल विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली. सचिन अहिर हे &#039;उबाठा&#039;मधील वरळी येथील नेते आहेत. महत्त्वाचं म्हणजे, त्यांच्या उपसभापती पदासाठीचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नीलम गोऱ्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.  या राजकीय घडामोडीनंतर अनेक सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी उबाठा गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी या सबंध प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांनी सांगितले, &#039;हे सर्व जे पक्षांतर करत आहेत, ते मोठ्या पदासाठीच गेले आहेत. आम्ही त्यांना सगळं दिलं तरी ते गेले... एकनाथ शिंदे यांना तर चक्क मुख्यमंत्री पद मिळालं होतं बंडखोरी करून, तसंच सचिन अहिर यांनाही पद मिळतंय.&#039; &#039;त्यांचा इतिहास अतिशय कलंकित आहे,&#039; असा आरोपदेखील यावेळी संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या आरोपांनंतर मोठी खळबळ उडाली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/PS1ZqDa_0L4</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/Sanjay-raut-on-sachin-ahir.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mumbai-rains-today-heavy-rain-batters-city-as-massive-waves-hit-marine-drive-amid-strong-winds-1701704.html</loc><video:video>
	<video:title>Marine Drive Rain Updates | मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड लाटा, पर्यटकांची गर्दी वाढली</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T10:46:53+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबई आणि उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शहरातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. पावसासोबत वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे जनजीवनावर परिणाम होत असून नागरिकांना प्रवासादरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे.  दरम्यान, मुंबईतील प्रसिद्ध मरीन ड्राईव्ह परिसरातही मुसळधार पावसासह अरबी समुद्राला उधाण आले आहे. जोरदार वाऱ्यांमुळे समुद्रात प्रचंड उंच लाटा उसळताना दिसत असून या लाटांनी किनाऱ्यावर धडक दिल्याने परिसरातील दृश्य अधिकच नाट्यमय झाले आहे. समुद्राच्या रौद्र रूपाचे दर्शन घेण्यासाठी अनेक पर्यटक आणि मुंबईकरांनी मरीन ड्राईव्ह परिसरात गर्दी केली आहे.  मुसळधार पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले असले, तरी प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना समुद्रकिनाऱ्याजवळ अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. भरतीच्या काळात समुद्र अधिक धोकादायक होऊ शकतो, त्यामुळे सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.  हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढील काही तासांतही मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि हवामान विभाग तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/G8INekG4JJc</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T104605.887.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/heavy-rain-alert-issued-across-maharashtra-red-and-orange-warnings-1701683.html</loc><video:video>
	<video:title>Latest Rain Update | 24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार; तुमच्या शहरात कोणता अलर्ट?</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T10:12:22+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे घाटमाथा तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही ढगाळ वातावरणासह मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  अशात कोणत्या ठिकाणी येलो, कोणत्या ठिकाणी ऑरेंज आणि कोणत्या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरत आहे. राज्यातील ऑरेंज अलर्टच्या यादीत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि चंद्रपूर ही ठिकाणे आहेत. येलो अलर्ट असलेल्या ठिकाणांमध्ये पालघर, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे घाटमाथा, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, हिंगोली, धाराशिव, नांदेड, लातूर, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, भंडारा आणि गोंदिया या ठिकाणांचा समावेश आहे.  गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत अधूनमधून पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असला तरी काही ठिकाणी पाणी साचणे, वाहतूक मंदावणे आणि नदी-नाल्यांची पातळी वाढण्याच्या घटना समोर येत आहेत. विशेषतः घाट रस्ते आणि पूरप्रवण भागांमध्ये सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/07d3ZEdSw7o</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/rain-alart-.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/omraje-nimbalkar-viral-audio-clip-created-huge-stir-in-politics-1701671.html</loc><video:video>
	<video:title>मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची &#039;ती&#039; ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय वर्तुळात मोठं घडणार?</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T10:03:12+05:30</video:publication_date>
	<video:description>धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह एकूण सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली अन् थेट शिवसेना शिंदे गटाशी हातमिळवणी केली. त्यांच्या या बंडखोरीनंतर राज्याभर खळबळ उडाली. दरम्यान, उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी करणाऱ्या सर्व खासदारांच्या मतदारसंघात दौरा केला. ही बाब अजून ताजी असतानाच त्यांच्या वरळीतील आणखी एका नेत्याने ठाकरेंना धक्का दिल्याच्या चर्चा आहेत.  अशात एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये थेट ओमराजे निंबाळकर यांना एक कार्यकर्ता काहीतरी विचारत असून ओमराजे निंबाळकर त्यांच्या शिंदे गटात जाण्याच्या निर्णयाबाबत सांगत आहेत.  कार्यकर्त्याला ओमराजेंनी सांगितलं, &#039;मला लाईनमन म्हणू नका... मला हिणवू नका... विरोधक असताना तशीच परिस्थिती होती म्हणूनच...&#039; तेव्हा कार्यकर्ता म्हणाला, &#039;विरोधात राहून इतकी वर्षे काम केलं, मग आता का?&#039; तेव्हा ओमराजे म्हणतात, &#039;विरोधात राहिलो इतकी वर्षे, मात्र असा पराभव जो झाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत, इतका वाईट पराभव नव्हता झाला कधी....&#039; ऑडिओ क्लिपमध्ये कार्यकर्ता आणि ओमराजेंचा संवाद होत असल्याचं सांगितलं जात आहे. (सदर ऑडिओ क्लिपची टीव्ही९ मराठी पुष्टी करत नाही)</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/cEpAzowbjag</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/Omraje-Nimbalkar-14.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/uddhav-thackeray-faction-faces-another-setback-after-sachin-ahir-move-1701642.html</loc><video:video>
	<video:title>ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं, थेट वरळीतच....</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T09:32:25+05:30</video:publication_date>
	<video:description>शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गेल्या काही दिवसांत मोठे राजकीय धक्के बसत आहेत. 6 खासदारांनी साथ सोडल्यानंतर आता विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनीही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून काल विधान परिषदेतील उपसभापतीपदासाठी अर्ज भरला. सुत्रांच्या माहितीनुसार ते तीन दिवसांपासून शिंदेंच्या संपर्कात होते. त्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर काल वरळीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला विभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या बैठकीत माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि आमदार सुनील शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. किशोरी पेडणेकर यांनी बोलताना पक्षाशी निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. “आजही इथे सच्चे शिवसैनिक उपस्थित आहेत. शाखेपासून काम करणारे कार्यकर्ते पक्षासाठी मेहनत घेत आहेत,” असे त्या म्हणाल्या.  यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्या बंडाचा उल्लेख करत जुन्या काळातील संघर्षाची आठवण करून दिली. तसेच काही नेत्यांवर अप्रत्यक्ष टीकाही केली. पक्ष संघटना मजबूत ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजूट कायम ठेवावी, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/nZNFtc0gMd8</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/UBT-7.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/heavy-rains-disrupt-normal-life-after-trees-collapse-across-kalyan-dombivli-1701626.html</loc><video:video>
	<video:title>राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18...</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T08:45:42+05:30</video:publication_date>
	<video:description>कल्याण-डोंबिवली परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासांत शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कल्याण आणि डोंबिवली भागात 18 हून अधिक झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.  महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडे हटवण्याचे काम सुरू केले. यामध्ये काही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, काल चेंबूर येथे झाड कोसळ्यामुळे घडलेल्या बस अपघातात एका चिमुकल्याने जीव गमावला होता तर अनेक जखमी झाले होते. त्यामुळे शासन सर्व ठिकाणी झाडांचे सर्वेक्षण करत आहे.  दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांत आणखी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे महापालिकेने आपत्कालीन पथके सज्ज ठेवली आहेत. पावसामुळे काही भागांत पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यातील काही भगांना रेड, तर काहींना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/ggXG7LeoR14</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/Kalyan-dombivli.png</video:thumbnail_loc></video:video></url></urlset>