<urlset xmlns="https://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9" xmlns:video="http://www.google.com/schemas/sitemap-video/1.1"><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/rupali-chakankar-warns-legal-action-over-maharashtra-epstein-file-movie-notice-to-dipali-sayyad-1702874.html</loc><video:video>
	<video:title>Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T17:50:03+05:30</video:publication_date>
	<video:description>&#039;महाराष्ट्र एपस्टीन फाईल&#039; या आगामी चित्रपटावरून नवा वाद निर्माण झाला असून, राज्य महिला आयोगाच्या माझी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रपट निर्माते आणि संबंधित व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.  माध्यमांशी संवाद साधताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, एखाद्या जिवंत व्यक्तीची व्यक्तिरेखा चित्रपटात साकारायची असेल, तर संबंधित व्यक्तीची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, या चित्रपटासाठी त्यांची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणात कायदेशीर पावले उचलण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  यासंदर्भात अभिनेत्री दीपाली सय्यद आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकाविरोधात कायदेशीर नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही रुपाली चाकणकर यांनी दिली.  दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित आणखी एका घडामोडीत रुपाली चाकणकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सुषमा अंधारे, अंजली दमानिया, आशा मिरगे आणि रुपाली ठोंबरे यांच्या विरोधातही दावा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.  या सर्व घडामोडींमुळे &#039;महाराष्ट्र एपस्टीन फाईल&#039; या चित्रपटाभोवतीचा वाद अधिकच तीव्र झाला असून, या प्रकरणात पुढे कोणते कायदेशीर निर्णय होतात, याकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/mou7370XMkg</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-02T173703.212.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/rohit-pawar-meets-eknath-shinde-raises-mpsc-offline-exam-government-jobs-and-teachers-issues-1702812.html</loc><video:video>
	<video:title>मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T17:07:14+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करत विविध मागण्यांचे निवेदनही उपमुख्यमंत्र्यांकडे सादर केले.  रोहित पवार यांनी सर्वप्रथम विदीप जाधव यांच्या पत्नीला कायमस्वरूपी शासकीय नोकरी देण्याची मागणी केली. तसेच मृत पिंकी माळी यांच्या भावालाही कायमस्वरूपी नोकरी देऊन कुटुंबाला न्याय मिळावा, अशी विनंती त्यांनी केली.  याशिवाय, एमपीएससी (MPSC) परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात यावी, अशी मागणी करत त्यांनी यासंदर्भातील निवेदन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.  यावेळी राज्यातील खासगी शाळांतील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर तातडीने निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.  या भेटीदरम्यान सामाजिक, शैक्षणिक आणि रोजगाराशी संबंधित विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली असून, आता या मागण्यांबाबत राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे संबंधित घटकांचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/JiggU3de2KI</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-02T165920.522.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/rupali-chakankar-legal-action-against-asha-mirge-sparks-major-controversy-1702782.html</loc><video:video>
	<video:title>त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T16:40:56+05:30</video:publication_date>
	<video:description>नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून आता दुसराच वाद सुरु झाला आहे. या वादाला आता राजकीय आणि कायदेशीर रुप आलं असून प्रकरण प्रचंड तापलंय. महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी एका चर्चासत्रादरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या वक्तव्यांनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती.  दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी आशा मिरगे यांना कायदेशीर नोटिसा पाठवल्या होत्या. मात्र, या नोटिसा स्वीकारण्यात आल्या नसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर चाकणकर यांनी माझगाव न्यायालयात फौजदारी अब्रुनुकसानीची तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने आशा मिरगे यांना 2 जुलै 2026 रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते.  या प्रकरणात आज रुपाली चाकणकर स्वतः माझगाव न्यायालयात हजर झाल्या आहेत. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयात पुढे काय घडणार, तसेच आशा मिरगे यांची भूमिका काय असणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/mJDpeoAz8fQ</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/Rupali-chakanakar-big-update.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mumbai-sakinaka-manhole-tragedy-man-dies-after-falling-into-open-manhole-kishori-pednekar-slams-bmc-1702726.html</loc><video:video>
	<video:title>Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T16:34:24+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईतील साकीनाका परिसरात मुसळधार पावसादरम्यान घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खैरानी रोड परिसरातील उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचे नाव अस्लम इसाक शेख असे असून, सुमारे 20 ते 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.  या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, विरोधकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.  या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महानगरपालिकेवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. पावसाळ्यापूर्वी 31 मेपर्यंत मॅनहोलची झाकणे बसवणे, जाळ्या बदलणे आणि नाल्यांची स्वच्छता करण्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ही कामे वेळेत पूर्ण झाली नसल्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप त्यांनी केला.  पुढे बोलताना त्यांनी कोट्यवधी रुपयांचे अर्थसंकल्प असतानाही मुंबईकरांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आणि या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. या दुर्घटनेनंतर पावसाळी तयारीच्या दाव्यांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही जोर धरू लागली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/YzcllDlzxrg</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-02T162824.758.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/bmc-commissioner-ashwini-bhide-called-urgent-meeting-after-manhole-death-1702768.html</loc><video:video>
	<video:title>मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T16:28:01+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईत मुसळधार पावसामुळे साकीनाका परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले आहे. खैरानी रोड परिसरात पाण्याने भरलेल्या रस्त्यावर उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली असून नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती पाण्यातून रस्ता ओलांडत असताना पाण्याखाली असलेला मॅनहोल दिसला नाही. त्यामुळे तो थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये पडला. ही संपूर्ण घटना जवळील CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. अग्निशमन दल आणि प्रशासनाने बचावकार्य सुरू केले, मात्र संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला.  या गंभीर घटनेनंतर BMC आयुक्त अश्विनी भिडे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. मुंबईतील सर्व धोकादायक मॅनहोल, पाणी साचणारे भाग आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना देणार सांगितले जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/OH6XuWwMzkk</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/ashwini-bhide-called-urgent-meeting.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/hatnur-dam-gates-opened-after-heavy-rain-increased-tapi-water-1702712.html</loc><video:video>
	<video:title>खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T15:52:14+05:30</video:publication_date>
	<video:description>जळगाव जिल्ह्यातील तापी आणि पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रशासनाकडून धरणाचे 4 दरवाजे 5 मिलिमीटरने उघडण्यात आले असून सध्या 5 हजार 368 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  मध्यप्रदेश आणि विदर्भ भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पूर्णा आणि तापी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम हतनूर धरणाच्या पाणीसाठ्यावर झाला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वेगाने पाण्याची आवक होत आहे. परिस्थिती लक्षात घेऊन धरण प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला.  दरम्यान, प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शेतकरी आणि ग्रामस्थांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे, असेही सांगण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/ucXCB9Ff0_Q</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/paus-buldhana.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/aurangabad-district-bank-election-ambadas-danve-gets-mahayuti-backing-thackeray-sena-shinde-sena-bjp-share-stage-1702653.html</loc><video:video>
	<video:title>राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T15:36:56+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राजकारणात विरोधी पक्ष म्हणून एकमेकांवर टीका करणारे नेते आता सहकार क्षेत्रात मात्र एकत्र आल्याचे चित्र औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळत आहे. जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजपचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि भाजपचे मंत्री अतुल सावे यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीसंदर्भातील रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, अंबादास दानवे हे महायुतीच्या पॅनलकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाच्या रिंगणात उतरले आहेत. सहकारी संस्थांच्या निवडणुकीत पक्षचिन्ह नसल्यामुळे स्थानिक पातळीवरील समीकरणांनुसार विविध पक्षांतील नेते एकत्र येत असल्याचे चित्र या निवडणुकीत दिसून येत आहे. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी ४ जुलै रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी अंबादास दानवे यांना पाठिंबा दिल्याने या निवडणुकीतील राजकीय समीकरणांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.  </video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/9fWNCwbj5NE</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-02T153522.664.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mumbai-saki-naka-man-dies-after-falling-into-open-manhole-1702673.html</loc><video:video>
	<video:title>एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T15:31:28+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईतील साकीनाका परिसरात मुसळधार पावसादरम्यान अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. खैरानी रोड परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असताना एका व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही संपूर्ण घटना जवळील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असल्याचे सांगितले जात आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती पाण्यातून रस्ता ओलांडत असताना त्याला मॅनहोलचा अंदाज आला नाही. पाण्याखाली झाकलेला मॅनहोल अचानक समोर आल्याने तो थेट आत कोसळला. हा मॅनहोल सुमारे 20 ते 25 फुट खोल असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.  स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अग्निशमन दल आणि प्रशासनाच्या पथकांनी बचावकार्य सुरू केले. मात्र, काही वेळानंतर संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/cMcnCZwwmEk</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/sakinaka.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mumbai-man-fell-into-deep-manhole-during-heavy-rainfall-chaos-1702626.html</loc><video:video>
	<video:title>मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T14:08:24+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईतील साकीनाका परिसरातील खैरानी रोड येथे मुसळधार पावसामुळे धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात मॅनहोलचा अंदाज न आल्याने एक व्यक्ती थेट उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याची माहिती समोर आली आहे. हा मॅनहोल तब्बल 20 ते 25 फुट खोल असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे.  मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे खड्डे, उघडी गटारे आणि मॅनहोल नागरिकांना दिसत नसल्याने अपघातांच्या घटना वाढत आहेत. साकीनाका येथील घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.  यावेळी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने शोधमोहीम सुरू असून संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पावसाळ्यात नागरिकांनी सतर्क राहावे आणि पाणी साचलेल्या रस्त्यांवरून जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र या घटनेने नागरकांमध्ये आक्रोश पहायला मिळत आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/rlGN4TuH0JU</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Image-2026-07-02-at-2.04.40-PM.jpeg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/operation-tutari-buzz-sanjay-shirsat-targets-amol-kolhe-over-offer-remark-rohit-pawar-denies-defection-rumours-1702603.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T13:48:25+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यात &#039;ऑपरेशन टायगर&#039;नंतर आता &#039;ऑपरेशन तुतारी&#039;च्या चर्चांना वेग आला असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे खासदार आणि प्रवक्ते अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. &quot;ऑफर आली तर विचार करू,&quot; या वक्तव्याचा राजकीय अर्थ लावला जात असताना, दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी पक्षातील कोणताही नेता कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.  या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, अमोल कोल्हे हे पक्षाचे वरिष्ठ नेते आणि अधिकृत प्रवक्ते आहेत. त्यामुळे त्यांनी केलेले वक्तव्य हे वैयक्तिक नसून पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेनुसारच असण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला.  रोहित पवार यांच्या भूमिकेवरही भाष्य करत शिरसाट म्हणाले की, रोहित पवार जे बोलतात ते शरद पवार यांचे मत असते, मात्र वेळोवेळी भूमिका बदलणे ही राष्ट्रवादीची जुनी पद्धत असल्याची टीकाही त्यांनी केली. &quot;ऑफर आली तर जायचे, हे आधीच ठरलेले दिसते,&quot; असा आरोप करत त्यांनी अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याला अधिक महत्त्व असल्याचे सांगितले.  यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक होत असल्याचाही उल्लेख करत, बदलाचे वारे वाहू लागले की अशा प्रकारची वक्तव्ये समोर येतात, असेही संजय शिरसाट यांनी म्हटले. दरम्यान, &#039;ऑपरेशन तुतारी&#039;च्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून, आगामी काळात विरोधी पक्षांतील नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/MRdZv4NGUTA</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-02T133852.156.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/pune-police-investigation-intensifies-in-ketan-agrawal-lohgad-case-1702593.html</loc><video:video>
	<video:title>तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T13:43:56+05:30</video:publication_date>
	<video:description>पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणात अटक असलेली आरोपी सिया गोयल हिला आज पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासासाठी शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी नेले. 18 जून रोजी घडलेल्या या प्रकरणाच्या तपासात पोलिसांकडून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. घटनेपूर्वी आणि घटनेनंतर सिया गोयल ज्या ज्या ठिकाणी गेली होती, त्या सर्व ठिकाणांचा पोलिसांनी पंचनामा केला.  तपासादरम्यान सियाने घटनेच्या दिवशी परिधान केलेले कपडेही पोलिसांनी जप्त केले आहेत. तसेच सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालला मारण्यापूर्वी ज्या ठिकाणी सराव केल्याचा संशय आहे, त्या जागेलाही पोलिसांनी भेट दिली. संबंधित ठिकाणाचा बारकाईने आढावा घेत पंचनामा करण्यात आला.  पुण्यातील एरिया 37 परिसरात हा सराव करण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. त्यामुळे या परिसरातही पोलिसांची हालचाल वाढली होती. या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/KCDt2l8gaxw</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/ketan-agrawal-case-1.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sachin-ahir-hinted-big-political-entry-after-bachchu-kadu-statement-1702536.html</loc><video:video>
	<video:title>आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T13:09:49+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यात पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या अधिवेशनाच्या काळात ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार फुटले त्यानंतर आमदारही फुटतील अशा चर्च रंगत होत्या. काही दिवसांत आणखी नेते फुटतील, असा दावा सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले सचिन अहिर यांनीही आणखी एक नेता शिंदे गटात येणार असल्याचा दावा केला आहे.  पावसाळी अधिवेशनादरम्यान उपसभापतीपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध झाल्याने सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाली.  दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनीही मोठं वक्तव्य करत चर्चांना उधाण आणलं आहे. “शिवसेनेत सचिन अहिर आले आहेत. आता त्यांची क्रिकेटची टीमही येणार आहे. आता त्याला संजय राऊत रोखू शकत नाही. सर्व खापर हे संजय राऊत यांच्यावर फुटत आहे,” असं बच्चू कडू म्हणाले. यावर सचिन अहिर यांनीही प्रतिक्रिया देताना, “आधी मला जरा स्कोअर करून देत मग संपूर्ण टीम आणेन,” असं म्हटलं आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/-p323R-3tVo</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/bachhu-kadu-.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/operation-tiger-to-intensify-bachchu-kadu-hints-at-more-shiv-sena-ubt-leaders-joining-shinde-camp-after-sachin-ahir-1702523.html</loc><video:video>
	<video:title>सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T12:58:03+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील पक्षांतर घडामोडीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदार आणि एक आमदार पक्ष सोडून गेल्यानंतर आणखी काही नेते पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सचिन अहिर यांच्यानंतर आता आमदार बच्चू कडू यांनीही मोठा दावा करत राजकीय चर्चांना नवे वळण दिले आहे.  विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाची साथ सोडत सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. या घडामोडीनंतर सचिन अहिर यांनी ठाकरे गटातील आणखी काही नेते लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा केला होता. दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनीही या दाव्याला दुजोरा देत, “सचिन अहिर आले आहेत, आता त्यांची क्रिकेटची टीमही येणार आहे,” असे वक्तव्य केले. तसेच, “हे पक्षांतर आता कोणीही रोखू शकत नाही,” असा दावा करत त्यांनी ठाकरे गटातील आणखी काही खासदार आणि आमदार शिंदे गटात येणार असल्याचे संकेत दिले.  यावेळी बच्चू कडू यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका करत, सध्याच्या परिस्थितीसाठी त्यांनाच जबाबदार धरले जात असल्याचा दावा केला. तसेच उद्धव ठाकरे यांनीही या घडामोडींनंतर नाराजी व्यक्त केल्याचा उल्लेख त्यांनी केला. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे हेही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, सुनील शिंदे यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावत आपण पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही बच्चू कडू यांनी, “सुरुवातीला अनेक जण नकार देतात, पण नंतर निर्णय बदलतात. पावसाचा जोर वाढेल तसाच &#039;ऑपरेशन टायगर&#039;चाही वेग वाढेल,” असे सूचक वक्तव्य केले.  बच्चू कडू यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा पक्षांतराच्या चर्चांना वेग आला असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या राजकीय घडामोडी घडतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/nKEhBcg39QA</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-02T125257.362.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/chandrapur-newborn-baby-selling-racket-exposed-bjp-women-leaders-arrested-1702496.html</loc><video:video>
	<video:title>धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T12:42:42+05:30</video:publication_date>
	<video:description>चंद्रपूर शहरात काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या बाळ विक्री प्रकरणात आता मोठी घडामोड झाली आहे. या प्रकरणात भाजपच्या दोन महिला नेत्यांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान या दोन्ही महिलांची या रॅकेटमध्ये महत्त्वाची भूमिका असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. न्यायालयाने सध्या दोन्ही आरोपी महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  मे महिन्यात स्वतःच्या दोन मुलांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला होता. यानंतर आणखी तपास करताना 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाची विक्री करण्याच्या तयारीत तिची आई असल्याचे समोर आले. माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी महिलेला अटक केली होती.  या प्रकरणामागे “लिव्ह इन” आणि अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात बालकांची विक्री करणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी तपास अधिक गतीने सुरू केला आहे.  या प्रकरणात आतापर्यंत अजय फुलझेले, पीडित मुलीची आई आणि बाळ खरेदी करणाऱ्या दोन महिलांसह एकूण अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/wAw1d21vSYs</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/chandrapur.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/amol-kolhe-clarifies-remarks-amid-mahayuti-rumours-reaffirms-loyalty-to-sharad-pawar-and-ncp-sp-1702494.html</loc><video:video>
	<video:title>शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T12:21:15+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना ठाकरे गटातील पक्षांतरांच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे खासदार अमोल कोल्हे यांच्या भूमिकेचीही चर्चा रंगू लागली आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांच्या बंडानंतर माजी मंत्री सचिन अहिर यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची धुरा स्वीकारल्याने विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.  या घडामोडींमध्ये खासदार अमोल कोल्हे महायुतीत जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, या सर्व चर्चांवर आता अमोल कोल्हे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, आपण केलेले वक्तव्य हे पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात होते. &quot;मी ऑफरचा विचार करू, असे म्हटले होते, मात्र त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. तो राजकीय ऑफरबाबत नव्हता,&quot; असे त्यांनी स्पष्ट केले.  कोल्हे यांनी पुढे सांगितले की, काहीजण त्यांच्या वक्तव्याचा वेगळाच अर्थ लावत असून विनाकारण राजकीय चर्चा रंगवल्या जात आहेत. &quot;कधी कधी काही लोक दिवसा स्वप्न पाहतात,&quot; असा टोला त्यांनी या अफवांवर लगावला.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) एकसंध असल्याचे ठामपणे सांगत अमोल कोल्हे म्हणाले, &quot;शरद पवार जे सांगतील तेच आमचे धोरण आहे. आम्ही सर्वजण शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने उभे आहोत.&quot;  तसेच पक्षात कोणताही गटबाजीचा प्रश्न नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, &quot;आम्ही पक्षात असूनही अशा कोणत्याही हालचालींची माहिती आम्हाला नसते, मात्र काही सूत्रांकडे अशा बातम्या आधीच पोहोचतात.&quot; त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर महायुतीत प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/0qG-2YRD6VY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-02T121555.818.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mumbai-rain-alert-imd-predicts-heavy-rain-for-next-4-days-135-tree-fall-incidents-9-wall-collapses-reported-1702447.html</loc><video:video>
	<video:title>Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T12:00:38+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम असून, पुढील 4 दिवस अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. शहरासह मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, प्रशासन सतर्क झाले आहे.  मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापालिकेच्या प्राथमिक माहितीनुसार, शहरात आतापर्यंत 135 ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच घरांच्या भिंती कोसळण्याच्या 9 घटना नोंदवण्यात आल्या असून, संबंधित ठिकाणी यंत्रणांकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.  कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि दैनंदिन प्रवासात अडथळे निर्माण झाल्याने मुंबईकरांची मोठी तारांबळ उडाली आहे. अनेक भागांमध्ये वाहतुकीचा वेग मंदावला असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.  हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 4 दिवस मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, तसेच प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/qzcUDdM33Bw</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-02T115331.511.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/senior-shiv-sainiks-reunite-in-pune-to-support-uddhav-thackeray-1702449.html</loc><video:video>
	<video:title>ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T11:53:18+05:30</video:publication_date>
	<video:description>ठाकरे गटात सुरू असलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर आता पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुणे जिल्हा संपर्क प्रमुख शिंदे गटात गेल्यानंतर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यानंतर आता 130 जेष्ठ शिवसैनिक पुन्हा मैदानात उतरले आहेत.  पक्षातील नाराजी आणि गळती रोखण्यासाठी या ज्येष्ठ शिवसैनिकांनी पुढाकार घेतला असून, येत्या रविवारी पुण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘चलो मातोश्री दर्शन’ या उपक्रमातून हे सर्व शिवसैनिक मुंबईतील मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पक्षातील निष्ठा दाखवणार आहेत तर अनेक त्रुटींवर काम करणार असल्याचं सांगितलं जात आहे.  शिवसेनेचे शहरप्रमुख वसंत मोरे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. पक्ष अडचणीत असताना जेष्ठ शिवसैनिकांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे गटात नवचैतन्य निर्माण झाल्याची चर्चा आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/tGl-KiKRiyw</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/mahavikas-aaghadi-1.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mvia-suffered-another-setback-after-close-aide-mla-joined-shinde-1702398.html</loc><video:video>
	<video:title>&#039;मविआ&#039;ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T11:18:19+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकद आणखी वाढल्याचे मानले जात आहे. अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे किरण सरनाईक यांच्या निर्णयामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे.  गेल्या काही दिवसांपासून राज्यात खासदार आणि आमदारांच्या फुटीमुळे विरोधकांना मोठे धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वी 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर विधानपरिषद आमदार सचिन अहिर यांनीही शिंदे गटाच्या माध्यमातून उपसभापतीपदाचा अर्ज भरला होता. काल त्यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसल्याची चर्चा रंगली.  दरम्यान, किरण सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूमिका स्पष्ट करत राज्याच्या विकासासाठी आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आपण हा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यांच्या पाठिंब्यामुळे सत्ताधारी पक्षाची ताकद वाढली असून आगामी काळात आणखी राजकीय बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/vcwjRNq_aG4</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/mahavikas-aaghadi.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-warns-bjp-of-operation-kamal-explosive-attack-on-modi-shah-over-defections-1702431.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T11:14:29+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील पक्षांतराच्या राजकारणावरून आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होत असतानाच खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भविष्यात &quot;ऑपरेशन कमळ&quot;सारख्या राजकीय घडामोडी भाजपलाही अनुभवाव्या लागू शकतात, असा इशारा दिला.  संजय राऊत म्हणाले की, आज इतर पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांना भविष्यात त्याच परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. &quot;एक दिवस तुमचंच ऑपरेशन होईल आणि तेव्हा कळणारही नाही. ऑपरेशन कमळ होईल,&quot; असे वक्तव्य त्यांनी केले.  आपल्या वक्तव्यांवरून सातत्याने टीका होत असल्याचा उल्लेख करत राऊत म्हणाले, &quot;मी बोललो की म्हणतात संजय राऊत शिव्या देतो. पण ज्यांना जी भाषा समजते, त्यांच्याशी त्याच भाषेत बोलावे लागते.&quot;  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अलीकडील वक्तव्याचाही संदर्भ देत त्यांनी सध्याच्या राजकीय वास्तवावर भाष्य केले. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर टीका करताना राऊत म्हणाले की, शिवसेनेने आमदार आणि खासदारांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जपले, मात्र त्यांनी राजकीय स्वार्थासाठी पक्षाची साथ सोडली.  यावेळी त्यांनी भाजपवरही अप्रत्यक्ष निशाणा साधत, &quot;आज इतर पक्ष फोडले जात आहेत, पण उद्या फोडण्यासाठी कोणी उरणार नाही, तेव्हा मोदी-शहा यांनाच स्वतःचा पक्ष सांभाळावा लागेल,&quot; असा टोला लगावला.  संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, त्यांच्या आरोपांवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/oORvT29_OqE</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-02T111251.683.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/tamil-nadu-political-row-15-thalapathy-vijay-mlas-allegedly-offered-35-50-crore-each-in-alleged-toppling-plot-1702402.html</loc><video:video>
	<video:title>Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T10:50:55+05:30</video:publication_date>
	<video:description>तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारा दावा समोर आला आहे. अभिनेता-राजकारणी थलपती विजय यांच्या पक्षाशी संबंधित काही आमदारांना कथितरीत्या कोट्यवधी रुपयांची ऑफर देऊन राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.  प्राथमिक माहितीनुसार, विजय यांच्या पक्षातील सुमारे 15 आमदारांना ₹35 ते ₹50 कोटींची ऑफर देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या कथित प्रकरणामागे राजकीय षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, चेन्नईच्या गुप्तचर विभागाकडून या प्रकरणाची माहिती समोर आल्याचे सांगितले जात आहे.  या प्रकरणात सेंथिल बालाजी आणि करूर गँग यांची नावे चर्चेत आली असल्याचा दावा केला जात आहे. तसेच या कथित षडयंत्रप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  दरम्यान, विजय यांच्या राजकीय वाटचालीवर परिणाम करण्यासाठी पुढील काही महिन्यांत हालचाली सुरू असल्याचा दावाही केला जात आहे. या घडामोडींमुळे तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, या प्रकरणाच्या अधिकृत तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/D4KVhVv8qZo</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-02T104600.809.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mumbai-woman-crushed-under-train-during-heavy-rain-near-virar-1702387.html</loc><video:video>
	<video:title>मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T10:33:54+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईत मुसळधार पावसादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वैतरणा आणि विरार दरम्यान एका महिलेचा ट्रेनखाली चिरडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नारंगी फाटकाजवळ ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याचवेळी ही घटना घडली असावी.घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि रेल्वे प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले.  या दुर्घटनेमुळे मुंबईकडे येणाऱ्या काही लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत. अनेक प्रवाशांना याचा फटका बसला असून रेल्वे स्थानकांवर गर्दी वाढली आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/eXUEuqFD6w4</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/prabhadevi-railway-station-1.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mumbai-rain-chaos-flooded-prabhadevi-station-troubled-thousands-of-daily-commuters-1702374.html</loc><video:video>
	<video:title>पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेर थेट...</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T10:06:54+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईत पावसाने पहिल्याच आठवड्यात जोरदार हजेरी लावत नागरिकांची मोठी गैरसोय केली आहे. प्रभादेवी रेल्वे स्थानक परिसरात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागला. अनेकांनी गुडघाभर पाण्यातून चालत स्टेशन गाठले.  सकाळच्या वेळेतच रस्ते आणि स्थानकाबाहेरील परिसर जलमय झाल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पावसाचे पाणी तुंबल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. सोशल मीडियावरही प्रभादेवी परिसरातील पाणीसाच्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. हवामान विभागाने पुढील चार दिवस मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/lJqDE67bA6o</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/prabhadevi-railway-station-.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/shinde-sena-mp-warned-thackeray-workers-after-black-flag-protest-1702361.html</loc><video:video>
	<video:title>एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T09:59:41+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून ठाकरे गट आणि शिंदे गटामधील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव तथा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला काल नांदेडमध्ये काळे झेंडे दाखवण्यात आले. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी हा विरोध दर्शवला होता. राज्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.  उद्धव ठाकरे यांनी संबंधित मतदारसंघांचा दौरा करत शिवसैनिकांना “ऑपरेशन तुडवा” सुरू करण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे. त्यानंतर काही ठिकाणी फुटीर खासदारांविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी काळा झेंडा दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना शाबसकी दिली. यानंतर खासदार नागेश आष्टिकर संतापले.  दरम्यान, शिवसेना शिंदे गटात सामिल झालेले खासदार नागेश पाटील आष्टिकर यांनी काळे झेंडे दाखवणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. “दाखवा ते काळे झेंडे वगैरे काय ते, आम्हाला तुमचं काही माहित नाही का? अरे नसानसातल्या गोष्टी माहित आहेत, मग बघा आम्हीसुद्धा आहोत, तुम्ही सुद्धा या बघा काय होतंय ते,” अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सेनेला प्रत्युत्तर दिले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/EdPsNSrCcbQ</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/nagesh-patil-ashtikar-.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/amol-kolhe-praised-devendra-fadnavis-sparking-fresh-maha-vikas-aghadi-buzz-1702351.html</loc><video:video>
	<video:title>पुन्हा &#039;मविआ&#039;मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T09:28:06+05:30</video:publication_date>
	<video:description>राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील खासदाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना “इन्फ्रामॅन” म्हणून ओळखलं जात असल्याचं म्हणत थेट मोठी खळबळ उडावली.  राष्ट्रावदी शरद पवार गटातील अमोर कोल्हे त्यांच्या एका विधानाची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अमोल कोल्हे म्हणाले की, “भविष्यातील केंद्रीय पातळीवरील नेत्यांमध्ये काही नावांची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात होत असते. त्यामध्ये मराठी माणसाचं नाव घेतलं जात असेल तर ती चांगली गोष्ट आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव जसं आदराने घेतलं जातं, तसंच देवेंद्र फडणवीस यांचं नाव इन्फ्रामॅन म्हणून घेतलं जातं.”  दरम्यान, पत्रकारांनी सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली आहे का? असा प्रश्न अमोल कोल्हे यांना विचारला. त्यावर त्यांनी सूचक उत्तर दिलं. “अशी ऑफर माझ्याकडे अद्याप आलेली नाही. पण भविष्यात अशी ऑफर आली तर विचार करु. मी विचार करु असं म्हटलं आहे, जाऊ असं नाही,” असं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/LNTPisEuxuA</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/amol-kolhe.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mumbai-local-trains-slowed-after-heavy-rain-flooded-railway-tracks-1702313.html</loc><video:video>
	<video:title>Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ</video:title>
	<video:publication_date>2026-07-02T08:55:03+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईत संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरासह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. दादर परिसरातील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकल सेवा काही ठिकाणी संथ गतीने सुरू होती. त्यामुळे सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. मुंबई लोकल सेंट्रल, हर्बल, आणि पश्चिम तीन्ही मार्गांवरील ट्रेन 10 ते 15 मिनीटे उशीराने धावत आहेत.  ईस्टर्न एक्सप्रेस वेवरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मुसळधार पावसामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक वाहनचालकांना तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागले. मुंबईतील काही रस्ते जलमय झाल्याने बस आणि रिक्षा वाहतुकीवरही परिणाम झाला.  हवामान विभागाने पुढील 24 तासांत मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. प्रशासनाने नागरिकांना आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. तसेच समुद्र किनाऱ्यालगत राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई महानगरपालिका आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/YD1FopPgTtM</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/rain-update-3.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/navi-mumbai-short-circuit-incident-two-schoolgirls-suffer-electric-shock-near-lp-bridge-hospitalized-1702092.html</loc><video:video>
	<video:title>नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T17:34:31+05:30</video:publication_date>
	<video:description>नवी मुंबईतील एल. पी. पुलाखालील बिकानेरसमोर शॉर्टसर्किट झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेत दोन विद्यार्थिनी विजेच्या प्रवाहाच्या संपर्कात आल्या. पावसाचे पाणी साचलेल्या परिसरातून जात असताना विद्युत प्रवाह पसरल्याने दोघींनाही विजेचा धक्का बसला आणि त्या पाण्यात कोसळल्या.  घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि उपस्थितांनी तातडीने दोन्ही विद्यार्थिनींना बाहेर काढत उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.  घटनेची माहिती मिळताच महापौर सुजाता पाटील यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  या घटनेनंतर परिसरातील विद्युत सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, शॉर्टसर्किट नेमके कशामुळे झाले याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/ipDUXdv1Tuk</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T173014.970.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/heavy-rain-causes-massive-traffic-jam-on-mumbai-nashik-highway-in-bhiwandi-vehicles-stuck-for-5-km-1702070.html</loc><video:video>
	<video:title>Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T17:12:07+05:30</video:publication_date>
	<video:description>मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतुकीचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला आहे. सततच्या पावसामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.  प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-नाशिक महामार्गावर 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्गावरील वाढलेली वाहतूक आणि पावसामुळे निर्माण झालेल्या संथ गतीचा परिणाम संपूर्ण मार्गावरील वाहतुकीवर झाला आहे.  वाहतूक कोंडीमुळे मालवाहतूक, खासगी वाहने तसेच प्रवासी वाहनांचा वेग मंदावला असून अनेक वाहनचालक महामार्गावर अडकून पडले आहेत. पावसामुळे रस्त्यांवरील परिस्थिती अधिक गंभीर बनली असून वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी कार्यरत असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. सततच्या पावसामुळे नागरिकांनी अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/_yS0A7GCASg</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T170529.815.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sushma-andhare-questioned-thackeray-camp-leaders-over-mahayuti-political-moves-1702053.html</loc><video:video>
	<video:title>ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T16:55:18+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यतील राजकारणात सध्या खूप मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहेत तर कालच आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आणि आमदार सचिन अहिर यांनी थेट महायुतीकडून उपसभापती अर्ज भरला. सचिन अहिर यांची आज बिनविरोध उपसभापती पदी निवड झाली.  उबाठा गटातील सुषमा अंधारे यांनी संबंधित प्रकरणावर बोलताना नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात आमचीच लोकं महायुतीकडून अर्ज भरत आहेत. सभागृहात आमच्या लोकांकडून आवाज उठवला जात नाही, मात्र हे दुसरीकडे बंड करतात. पडद्यामागे नेमकं काहीतरी घडतंय? या सर्व गोष्टीचं अकाऊंटीग झालंच पाहिजे. टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना सुषमा अंधारे यांनी खंत व्यक्त केली.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/Tawzu1gaSv0</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/Sushama-andhare.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/maharashtra-agriculture-day-cm-devendra-fadnavis-announces-100-daytime-power-supply-for-farmers-by-year-end-1702042.html</loc><video:video>
	<video:title>मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T16:45:26+05:30</video:publication_date>
	<video:description>महाराष्ट्र कृषीदिनानिमित्त आयोजित कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कृषी धोरणांबाबत सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. शेती क्षेत्रातील यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, दर्जेदार बियाणे, पशुपालन आणि दिवसा वीजपुरवठा या विषयांवर सरकारचे धोरण स्पष्ट करत त्यांनी कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले.  मुख्यमंत्री म्हणाले की, शेतीतील यांत्रिकीकरणासाठी देशात सर्वाधिक अर्थसंकल्पीय तरतूद महाराष्ट्र सरकारने केली आहे. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी आता सर्व प्रकारच्या बियाण्यांचे प्रमाणन (Certification) अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयामुळे बनावट बियाण्यांवर आळा बसून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावरही सरकार भर देत असल्याचे सांगत फडणवीस यांनी देशातील कृषी क्षेत्रासाठी तयार करण्यात आलेले पहिले AI अॅप महाराष्ट्राने विकसित केल्याची माहिती दिली. या अॅपच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी होण्यास आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.  फलोत्पादन क्षेत्रात गेल्या ३ वर्षांत राज्याने उल्लेखनीय प्रगती केली असून पशुपालन क्षेत्राचा विस्तार करून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करण्याचा सरकारचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतीचे स्वरूप कसे बदलावे, यावरही सरकार अभ्यास करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची घोषणा करत सांगितले की, राज्यातील शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सध्या राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जात असून, हे वर्ष संपण्यापूर्वी १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.  तसेच सुरुवातीला शेतीसाठी दिवसा ८ तास वीजपुरवठा केला जाईल आणि पुढील टप्प्यात तो वाढवून १२ तासांपर्यंत केला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/CGr-4F0fj_g</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T163722.522.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sunetra-pawar-speech-delayed-twice-during-maharashtra-agriculture-award-event-1702000.html</loc><video:video>
	<video:title>Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T16:31:18+05:30</video:publication_date>
	<video:description>आज महाराष्ट्र कृषीदिन आहे. कृषीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कृषी पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार तसेच इतर अनेक नेते हजर होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार सध्या शेतकऱ्यांसाठी कोण-कोणत्या योजना राबवत आहे आणि भविष्यात कोणत्या योजना राबवल्या जाणार आहेत? तसेच सरकारचे कृषीच्या प्रगतीसाठी काय धोरण आहे, याबाबत माहिती दिली. मात्र या कार्यक्रमात एक घोळ झाल्याचं दिसून आलं. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित प्रोटोकॉल पाळला गेलेला नाही असं दिसून आलं. यावेळी भाषणासाठी नाव पुकारलं मात्र भाषण झालंच नाही, असं सांगितलं जात आहे.  या गोंधळानंतर त्यांचा सत्कार झाला अन् पुन्हा नाव पुकारण्यात आलं, मात्र सत्कारानंतर मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले त्यामुळे त्यांना पुन्हा थांबावे लागले. त्यानंतर आयोजकांना चूक लक्षात आली आणि नंतर कार्यक्रम सुरळीत झाला. मात्र कार्यक्रमात दोनदा सुनेत्रा पवार यांना बोलावलं त्या वेळी भाषण करता आलं नाही. या सबंध प्रकरणानंतर कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? अशा चर्चांना उधाण आलं आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/ObPWfjUuzdY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/Sunetra-pawar-at-programm.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mumbai-nesco-drugs-case-13th-accused-arrested-in-goregaon-vanrai-police-intensify-probe-after-mba-student-death-1702019.html</loc><video:video>
	<video:title>Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T16:20:21+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को ड्रग्ज प्रकरणात वनराई पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत आणखी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील हा १३ वा आरोपी असून, दीपक हमलानी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  पोलिसांच्या माहितीनुसार, सहआरोपीने ड्रग्जचे एक पॅकेट दीपक हमलानी याच्याकडे ठेवण्यासाठी दिले होते. मात्र, त्या पॅकेटमध्ये नेमके काय आहे, याची कोणतीही माहिती नव्हती, असा दावा हमलानीने चौकशीदरम्यान पोलिसांसमोर केला आहे.  हे प्रकरण एप्रिल महिन्यात गोरेगाव येथील नेस्को परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका कॉन्सर्टनंतर समोर आले होते. कॉन्सर्टदरम्यान कथितरित्या एक्स्टसी (Ecstasy) गोळ्यांचे सेवन केल्यानंतर एका एमबीए विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी ड्रग्ज पुरवठा साखळीचा तपास सुरू केला असून आतापर्यंत १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.  या प्रकरणाचा अधिक तपास व नराई पोलीस करत असून, ड्रग्ज रॅकेटशी संबंधित आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/wD5fpSLatLQ</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T161908.580.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sunetra-pawar-praised-sachin-ahir-after-unopposed-deputy-chairman-win-1701929.html</loc><video:video>
	<video:title>अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T15:59:28+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देत, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार सचिन अहिर यांना महायुतीकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी दिली. सचिन अहिर हे ठाकरे गटातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असल्याचं सांगितलं जातं. आता सचिन अहिर यांची आज (१ जुलै) रोजी उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून जगन्नाथ (ज. मो.) अभ्यंकर यांनीही अर्ज भरला होता, परंतु नंतर त्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली.  यावर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भाष्य केले. त्यांनी उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल सचिन अहिर यांचे अभिनंदन केले. त्यांनी सचिन अहिर यांच्या राजकीय कारकिर्दीबाबतही सांगितले. इतकेच नाही तर त्यांच्या राष्ट्रवादीतील कार्यबाबतही सांगितले. अहिर यांच्या बाबत बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, &#039;आदरणीय अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं होतं&#039;. सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी सचिन अहिर यांना अभिनंदन केले तसेच शुभेच्छा दिल्या.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/c5hMe3tcCW8</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/sunetra-pawar-on-sachin-ahire.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/heavy-rain-wreaks-havoc-in-nalasopara-palghar-roads-waterlogged-house-wall-collapses-amid-downpour-1701983.html</loc><video:video>
	<video:title>Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T15:57:21+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईलगतच्या नालासोपारा परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वसई-विरार महानगरपालिका मुख्यालयाकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग पाण्याखाली गेला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.  स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पाणी उपसून वाहतूक पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. पाणी साचल्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.  दरम्यान, पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा जोर कायम असून अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील धुकटन परिसरात एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत घराचे मोठे नुकसान झाले आहे.  भिंत कोसळल्यानंतर घरातील अन्नधान्य, कपडे आणि दैनंदिन वापरातील वस्तू पावसाच्या पाण्यात भिजल्याने कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.  मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर स्थानिक यंत्रणांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/hxbZvJWsauo</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T155118.382.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/black-flags-shown-to-mp-shrikant-shindes-convoy-in-nanded-shiv-sainiks-detained-by-police-1701899.html</loc><video:video>
	<video:title>मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T15:14:08+05:30</video:publication_date>
	<video:description>नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. अंजनखेडा गावात श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला काही शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला.  यावेळी आंदोलकांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.  घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या काही शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, या आंदोलनावर संबंधित पक्षांच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/VQbXAcP49EY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T145714.479.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mumbai-sea-waves-rise-dangerously-high-during-heavy-rainfall-alert-1701916.html</loc><video:video>
	<video:title>उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T14:56:11+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईत गेल्या 24 तासांपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. हवामान विभागाने पुढील काही तासांसाठीही जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, समुद्राला मोठी भरती आल्याने किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  दादर, परळ, सायन, कुर्ला, अंधेरी आणि बांद्रा परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता. काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला असून लोकल सेवांवरही किरकोळ परिणाम झाला. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना घराबाहेर पडताना अडचणींचा सामना करावा लागला.  मुंबई महानगरपालिकेकडून आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली आहेत. समुद्र किनाऱ्यावर नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मच्छीमारांना देखील पुढील 48 तास समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/zqrPerp5YoM</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/mumbai-dariya-kinara.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/eknath-shinde-gives-sachin-ahir-big-responsibility-shocks-thackeray-camp-1701870.html</loc><video:video>
	<video:title>ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T14:32:31+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत, अशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देत, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार सचिन अहिर यांना महायुतीकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी दिली. सचिन अहिर हे ठाकरे गटातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असल्याचं सांगितलं जातं. आता सचिन अहिर यांची आज (१ जुलै) रोजी उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून जगन्नाथ अभ्यंकर यांनीही अर्ज भरला होता, परंतु नंतर त्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली.  सचिन अहिर यांच्या बिनविरोध निवडीनंतर मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आणि अहिर यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील भाष्य केले. ते म्हणाले, &quot;खऱ्या अर्थाने शिवसैनिकाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे आणि उपसभापतीपदी शिवसैनिक बसल्याचा आनंद आहे,&quot; याआधी नीलम गोऱ्हे यांनी या पदाची गरिमा राखली होती आणि पूर्ण न्याय केला होता, असंही त्यांनी नमूद केलं. यानंतर त्यांनी कविता आणि शायरीच्या माध्यमातूनही सचिन अहिर यांचे अभिनंदन केले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/H3J9-C954P4</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/Eknath-shinde-on-sachin-ahir-.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/raj-thackeray-slams-bjp-over-defection-politics-says-modi-is-the-foundation-holding-everything-together-1701868.html</loc><video:video>
	<video:title>राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं...</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T14:07:35+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यात आणि देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार भाष्य करत फोडाफोडीच्या राजकारणावर तीव्र टीका केली आहे. ठाण्यातील सीकेपी सभागृहात मनसे पदाधिकाऱ्यांना एसआयआरच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारच्या राजकीय रणनीतीवर निशाणा साधला.  राज ठाकरे म्हणाले की, देशातील सध्याचे फोडाफोडीचे राजकारण अत्यंत घाणेरडे असून अशा प्रकारच्या राजकारणाचे परिणाम भविष्यात सत्ताधाऱ्यांनाही भोगावे लागतील. कोणत्याही पक्षाला किंवा नेत्याला सत्ता कायमस्वरूपी मिळत नसते. आज घेतले जाणारे निर्णय आणि अवलंबली जाणारी राजकीय पद्धत भविष्यात कोणता पायंडा पाडेल, याचे भान राजकारण्यांनी ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.  भाजपवर टीका करताना त्यांनी म्हटले की, सध्या पक्षाची राजकीय ताकद मोठ्या प्रमाणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर उभी आहे. &quot;पत्त्यांच्या बंगल्याचा सर्वात खालचा पत्ता निघाला की संपूर्ण बंगला कोसळतो, त्याचप्रमाणे सध्या जे काही टिकून आहे ते मोदींमुळेच आहे,&quot; असे वक्तव्य त्यांनी केले. उद्या सत्ता बदलल्यानंतर भाजपलाही अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.  फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, इतिहासात ज्या-ज्या सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याच पक्षांतून नवे विरोधक निर्माण झाले आणि त्यांनीच पुढे त्या सत्तेला आव्हान दिले. हीच प्रक्रिया आता भाजपमध्येही सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. आणीबाणीच्या काळातील राजकीय परिस्थितीची आठवण करून देत त्यांनी सत्ताधाऱ्यांनी इतिहासातून धडा घेण्याची गरज व्यक्त केली.  यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजकीय रणनीतीवरही अप्रत्यक्ष टीका केली. विविध पक्षांतील नेत्यांना वेगळे करून स्वतंत्र गट निर्माण करण्यामागे भविष्यातील राजकीय समीकरणे डोळ्यासमोर असल्याचा दावा त्यांनी केला. &quot;समोरचे विरोधक संपवण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या पक्षातच नवे विरोधक तयार होतात, हा जगाचा नियम आहे,&quot; असेही राज ठाकरे म्हणाले.  राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून त्यांच्या टीकेला भाजपकडून काय उत्तर दिले जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/9chHColovNg</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T140524.225.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sachin-ahir-elected-unopposed-as-maharashtra-legislative-council-deputy-chairman-after-joining-shinde-sena-2-1701850.html</loc><video:video>
	<video:title>Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T13:55:30+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. नुकतेच शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांच्या निवडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.  विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे आमदार सचिन अहिर, तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र विधान परिषदेतील महायुतीचे संख्याबळ लक्षात घेता सचिन अहिर यांच्या विजयाची शक्यता सुरुवातीपासूनच व्यक्त केली जात होती.  दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला सर्वानुमते निवड करण्याचे आवाहन केले. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सभागृहात महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड निश्चित झाली.  विशेष म्हणजे, शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर लगेचच सचिन अहिर यांनी उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि अवघ्या एका दिवसात त्यांची या महत्त्वाच्या पदावर बिनविरोध निवड झाली आहे.  निवड जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात सचिन अहिर यांचे अभिनंदन केले. त्यांच्या निवडीनंतर महायुतीच्या नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या असून, आगामी काळात सभागृहाचे कामकाज निष्पक्षपणे पार पाडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/qEBUTTenW1Y</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T135416.553.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/uddhav-thackeray-faction-faces-another-shock-amid-major-political-turmoil-1701824.html</loc><video:video>
	<video:title>ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T13:57:53+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राजकारणात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची चर्चा रंगली आहे. आधी 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्यानंतर आता ठाकरे गटातील आणखी काही नेते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत.  विधान परिषदेच्या उपसभापती निवडणुकीसाठी सचिन अहिर यांचा अर्ज महायुतीकडून दाखल करण्यात आला. सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जात होते. त्यामुळे त्यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडीनंतर ठाकरे गट अलर्ट मोडवर गेला आहे.  दरम्यान, आमदार सुनील शिंदे आणि काही नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही इतर आमदारही बंडखोरीच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.  सततच्या राजकीय धक्क्यांमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून पुढील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात आणखी मोठे बदल होण्याच्या चर्चा  आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/ilR3m3Wj0cI</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/Uddhav-Thackeray-8.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sachin-ahir-breaks-silence-on-joining-shinde-sena-reacts-to-deputy-chairman-nomination-maharashtra-politics-1701836.html</loc><video:video>
	<video:title>Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T13:21:37+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राजकारणात सचिन अहिर यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशाची चर्चा जोर धरत असतानाच त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या भूमिकेवर भाष्य केले. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सध्या अधिक प्रतिक्रिया देणे टाळले असले, तरी आगामी जबाबदारीबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.  माध्यमांशी बोलताना सचिन अहिर म्हणाले, “मी गेल्याशिवाय सर्वांना कळणार नाही. माझ्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवत ही संधी दिली आहे, त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करणार आहे.”  पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, सभागृहाचे कामकाज सर्व पक्षांना विश्वासात घेऊन निष्पक्षपणे चालवण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे सध्या या विषयावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.  “प्रथम संबंधित प्रस्ताव मंजूर होऊ द्या, त्यानंतर माझी सविस्तर भूमिका मांडेन,” असेही सचिन अहिर यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय चर्चांना आणखी वेग आला असून पुढील काही दिवसांत या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/yPgk32QUUMY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T130947.593.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/eknath-shinde-likely-leaves-for-delhi-amid-cabinet-expansion-buzz-1701793.html</loc><video:video>
	<video:title>मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T12:45:01+05:30</video:publication_date>
	<video:description>गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. या विस्तारात राज्यातील काही नेत्यांना लॉटरी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. यात अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झालेले ओमराजे निंबाळकर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (१ जुलै) रोजी दुपारीच दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळातील विस्ताराच्या कामासंदर्भात एकनाथ शिंदेंचा हा दौरा असू शकतो. सुरुवातीला मंत्री पद श्रीकांत शिंदे की ओमराजे कोणाला मिळेल अशी चर्चा होती, मात्र आता दोघांना मंत्रिपद मिळेल अशा चर्चा आहेत. एकनाथ शिंदेंच्या आजच्या दिल्ली दौऱ्याच्या माहितीवरून पुन्हा या चर्चांनी जोर धरला आहे.  काही दिवसांपूर्वीच खासदार ओमराजेंना मंत्रिपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला, यावर बोलताना ओमराजे म्हणाले की, मंत्री होणे ही माझी प्राथमिकता नाही, अतिशय प्रामाणिकपणे हे मी कबूल करू इच्छितो. सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी, मतदारसंघाच्या विकासासाठी आणि मतदारसंघाच्या प्रगतीसाठी काम करायचे आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/9e3CXgLXrQE</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/eknath-shinde-shrikant-shinde-omraje-nimbalkar.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/11-major-rule-changes-effective-from-today-new-rules-for-itr-hsrp-lpg-passport-banks-credit-cards-1701780.html</loc><video:video>
	<video:title>New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T12:26:28+05:30</video:publication_date>
	<video:description>आजपासून नव्या आर्थिक महिन्याची सुरुवात झाली असून सर्वसामान्य नागरिक, करदाते, वाहनधारक आणि बँक ग्राहकांसाठी अनेक महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. या बदलांचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावर आणि आर्थिक व्यवहारांवर होणार आहे.  1. काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत.  2. रेल्वेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आता 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.  3. HSRP (High Security Registration Plate) नसलेल्या वाहनांवर आजपासून दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे.  4. टाटा मोटर्सने पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे.  5. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 183 रुपयांची कपात करण्यात आली आहे.  6. नव्या पासपोर्टसाठी 2,500 रुपये, तर तात्काळ पासपोर्टसाठी 5,000 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.  7. आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 असून त्यानंतर विलंब शुल्क लागू होणार आहे.  8. आधार कार्डवरील ई-मेल अपडेटची सुविधा पुढील सहा महिन्यांसाठी मोफत उपलब्ध राहणार आहे.  9. स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स कार्यक्रमात बदल करण्यात आले आहेत.  10. HDFC बँकेच्या निवडक क्रेडिट कार्डधारकांना प्रत्येक तिमाहीत 3 मोफत देशांतर्गत विमानतळ लाउंज सुविधा मिळणार आहे.  11. ग्राहकांच्या नकळत विमा किंवा आर्थिक उत्पादने विक्री (Mis-selling) करणाऱ्या संस्थांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार असून ग्राहकांना पूर्ण परताव्याची तरतूद करण्यात आली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/YtL4cmS7kqM</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T122109.984.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sachin-ahir-filed-deputy-chairman-nomination-from-shinde-sena-amid-security-boost-1701757.html</loc><video:video>
	<video:title>सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T12:18:10+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत सचिन अहिर यांनी थेट शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे महायुतीकडून सचिन अहिर यांना मोठे महत्त्व दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.  विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना ठाकरे गटाकडूनही उमेदवार देण्यात आला असला तरी सचिन अहिर यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. अचानक झालेल्या या राजकीय घडामोडीमुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे.  दरम्यान, सचिन अहिर यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वरळी येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत.अलीकडेच बंडखोरी करणाऱ्या सहा खासदारांच्या ज्याप्रमाणे सुरक्षा दिली जात होती त्याप्रमाणेच अहिर यांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/UlUsSnAQnhk</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/Sanjay-ahir-security-.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-slams-sachin-ahir-after-shinde-sena-entry-shiv-sena-gave-him-everything-maharashtra-politics-1701763.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T12:12:06+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राजकारणात शिवसेना ठाकरे गटातून झालेल्या पक्षांतरांवरून आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच आहे. माजी मंत्री सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली.  संजय राऊत म्हणाले की, पक्षाची उभारणी ही शिवसैनिकांच्या मेहनतीवर होत असते. सचिन अहिर यांना पक्षाने आणि ठाकरे कुटुंबाने भरभरून संधी दिली. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीला बळ दिले, भारतीय कामगार सेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली, तसेच पुणे जिल्ह्याची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. एवढे मान-सन्मान आणि जबाबदाऱ्या मिळूनही त्यांनी पक्ष सोडल्याची खंत राऊत यांनी व्यक्त केली.  पुढे बोलताना राऊत यांनी, सर्व काही मिळाल्यानंतरही पक्ष सोडणे हे विश्वासाला तडा देणारे असल्याचे सांगितले. त्यांनी सचिन अहिर यांच्या राजकीय प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांच्या कारकिर्दीत अनेक वळणे आणि वाद राहिल्याचा आरोप केला.  यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधत, पक्षफोडीनंतर आनंद व्यक्त केला जात असल्याची टीका केली. तसेच ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांपैकी पाच जण मूळचे काँग्रेसचे असल्याचा दावाही त्यांनी केला. या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/8GRp3pzA</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T120632.065.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/petrol-diesel-prices-reduced-from-first-day-of-july-big-relief-1701739.html</loc><video:video>
	<video:title>महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T11:45:07+05:30</video:publication_date>
	<video:description>जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 1 जुलैपासून नायरा एनर्जीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांची तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात केली आहे. मध्य पूर्वेतील तणाव कमी झाल्यामुळे आणि कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत झाल्याने जागतिक बाजारात क्रूड ऑइलच्या किमती कमी झाल्या आहेत. त्याचा परिणाम इंधन दरांवर दिसून येत आहे.  नायरा एनर्जीचे देशभरात 7000 पेक्षा अधिक पेट्रोल पंप आहेत. या सर्व पंपांवर नवीन दर लागू करण्यात आले आहेत. मात्र, स्थानिक करांमुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगळे असू शकतात.  सध्या, मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 111.21 रुपये आहे.  चंदीगडमध्ये पेट्रोलचा दर सर्वात कमी म्हणजे 101.54 रुपये प्रति लिटर आहे. तर हैदराबादमध्ये पेट्रोल 115.69 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.  डिझेलबाबत बोलायचे झाल्यास, 89.47 रुपये प्रति लिटरच्या जवळपास आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/IFKO-SlDQRc</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/petrol-.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/drunk-man-created-panic-inside-mumbai-local-train-during-journey-1701723.html</loc><video:video>
	<video:title>“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T11:20:51+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच पश्चिम रेल्वेमध्ये शुल्लक कारणावरून मयंक लहार नावाच्या तरुणाची हत्या झाली होती. यावेळी लोकलमध्ये उपस्थित सर्वांनी बचावाची भूमिका घेतली. यानंतर एका आठवड्यातच तब्बल तीन चाकू हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. यानंतर आता पनवेल ते सीएसएमटी लोकलमध्ये एका मद्यधुंध सनकी व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला आहे. त्याने एका प्रवाशाला चक्क जीवे मारण्याची धमकी दिली.  पनवेल ते सीएसएमटी लोकलमध्ये काही प्रवासी प्रवास करत होते. यावेळी एका मद्यधुंद व्यक्तीने वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने मोठमोठ्या आवाजात शिवगाळ करण्यास सुरुवात केली. धिंगाणा घालणाऱ्या इसमाने थेट धमकी दिली की, “मी याआधीच चार खून केलेत, यानंतर पुढचा नंबर तुझाच आहे. कर ज्याला जिथं तक्रार करायची आहे... बघ काय होईल?” या लोकलच्या डब्यात काही दिव्यांग प्रवासीसुद्धा होते. या प्रकरणानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून रेल्वे प्रवासादरम्यान सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/jXL8waiBeos</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/panvel-csmt-local-train.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-slams-sachin-ahir-after-switch-to-shinde-sena-he-betrayed-sharad-pawar-too-maharashtra-politics-1701729.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T11:16:37+05:30</video:publication_date>
	<video:description>शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर आता माजी मंत्री सचिन अहिर यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारण आणखी तापले आहे. या घडामोडीनंतर ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सचिन अहिर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.  सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी निवड होण्याची औपचारिक घोषणा अद्याप बाकी असताना राऊत यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी अहिर यांचा राजकीय प्रवास वादग्रस्त आणि कलंकित असल्याचा आरोप करत त्यांच्या पक्षांतरावर टीका केली.  संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सचिन अहिर यांनी शरद पवार यांना कोणतीही कल्पना न देता शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळीही त्यांनी आपल्या राजकीय भविष्यासाठी निर्णय घेतला होता. त्यामुळे, “जे शरद पवार यांचे झाले नाहीत, ते आमचे कसे होतील?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  राऊत यांनी पुढे सांगितले की, शिवसेना, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सचिन अहिर यांना पक्षात योग्य सन्मान आणि जबाबदाऱ्या दिल्या. त्यांना भेटण्यासाठी वेळ दिला जात नव्हता किंवा त्यांचे म्हणणे ऐकले जात नव्हते, असा दावा करणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आदित्य ठाकरे आणि सचिन अहिर यांची नियमित भेट होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.  सचिन अहिर यांनी आपल्या राजकीय भविष्यासाठी पक्ष सोडल्याचे सांगितले असले, तरी या निर्णयामागील कारणांवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना अधिक वेग आला आहे. त्यांच्या पक्षांतरामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना उधाण आले असून या प्रकरणावर पुढे आणखी प्रतिक्रिया येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/-uBySwCu-8c</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T111455.572.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sant-nivruttinath-maharaj-palkhi-arrives-in-nashik-thousands-of-warkaris-march-towards-pandharpur-1701717.html</loc><video:video>
	<video:title>Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T10:59:20+05:30</video:publication_date>
	<video:description>आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज नाशिक शहरात भक्तिमय वातावरणात दाखल झाली. “हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा” आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात हजारो वारकरी टाळ-मृदुंगाच्या निनादात पालखीसोबत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.  त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान केल्यानंतर काल पालखीने महिरावणी येथे मुक्काम केला होता. त्यानंतर आज सकाळी पालखीचे नाशिकमध्ये आगमन होताच संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. भगवे ध्वज, पताका आणि विठ्ठलाच्या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.  नाशिकमध्ये पालखीचे औपचारिक आणि उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी शहराच्या महापौर हिमगौरी आडगे, उपमहापौर विलास शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर, साधू-महंत आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.  स्वागत सोहळ्यादरम्यान जेसीबीच्या साहाय्याने संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या अनोख्या स्वागतामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. वारकऱ्यांनी अभंग, भजन आणि हरिनामाच्या गजरात विठ्ठलभक्तीचा उत्सव साजरा केला.  आता संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पुढील मुक्कामासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली असून, लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने या पवित्र वारीत सहभागी झाले आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/ULTCxnQaG6M</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T104418.196-1.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-reacted-strongly-after-sachin-ahir-filed-nomination-papers-1701710.html</loc><video:video>
	<video:title>मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T10:49:32+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली. काल विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली. सचिन अहिर हे &#039;उबाठा&#039;मधील वरळी येथील नेते आहेत. महत्त्वाचं म्हणजे, त्यांच्या उपसभापती पदासाठीचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नीलम गोऱ्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.  या राजकीय घडामोडीनंतर अनेक सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी उबाठा गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी या सबंध प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांनी सांगितले, &#039;हे सर्व जे पक्षांतर करत आहेत, ते मोठ्या पदासाठीच गेले आहेत. आम्ही त्यांना सगळं दिलं तरी ते गेले... एकनाथ शिंदे यांना तर चक्क मुख्यमंत्री पद मिळालं होतं बंडखोरी करून, तसंच सचिन अहिर यांनाही पद मिळतंय.&#039; &#039;त्यांचा इतिहास अतिशय कलंकित आहे,&#039; असा आरोपदेखील यावेळी संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या आरोपांनंतर मोठी खळबळ उडाली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/PS1ZqDa_0L4</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/Sanjay-raut-on-sachin-ahir.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mumbai-rains-today-heavy-rain-batters-city-as-massive-waves-hit-marine-drive-amid-strong-winds-1701704.html</loc><video:video>
	<video:title>Marine Drive Rain Updates | मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड लाटा, पर्यटकांची गर्दी वाढली</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T10:46:53+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबई आणि उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शहरातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. पावसासोबत वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे जनजीवनावर परिणाम होत असून नागरिकांना प्रवासादरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे.  दरम्यान, मुंबईतील प्रसिद्ध मरीन ड्राईव्ह परिसरातही मुसळधार पावसासह अरबी समुद्राला उधाण आले आहे. जोरदार वाऱ्यांमुळे समुद्रात प्रचंड उंच लाटा उसळताना दिसत असून या लाटांनी किनाऱ्यावर धडक दिल्याने परिसरातील दृश्य अधिकच नाट्यमय झाले आहे. समुद्राच्या रौद्र रूपाचे दर्शन घेण्यासाठी अनेक पर्यटक आणि मुंबईकरांनी मरीन ड्राईव्ह परिसरात गर्दी केली आहे.  मुसळधार पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले असले, तरी प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना समुद्रकिनाऱ्याजवळ अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. भरतीच्या काळात समुद्र अधिक धोकादायक होऊ शकतो, त्यामुळे सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.  हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढील काही तासांतही मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि हवामान विभाग तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/G8INekG4JJc</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T104605.887.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/heavy-rain-alert-issued-across-maharashtra-red-and-orange-warnings-1701683.html</loc><video:video>
	<video:title>Latest Rain Update | 24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार; तुमच्या शहरात कोणता अलर्ट?</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T10:12:22+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे घाटमाथा तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही ढगाळ वातावरणासह मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  अशात कोणत्या ठिकाणी येलो, कोणत्या ठिकाणी ऑरेंज आणि कोणत्या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरत आहे. राज्यातील ऑरेंज अलर्टच्या यादीत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि चंद्रपूर ही ठिकाणे आहेत. येलो अलर्ट असलेल्या ठिकाणांमध्ये पालघर, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे घाटमाथा, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, हिंगोली, धाराशिव, नांदेड, लातूर, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, भंडारा आणि गोंदिया या ठिकाणांचा समावेश आहे.  गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत अधूनमधून पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असला तरी काही ठिकाणी पाणी साचणे, वाहतूक मंदावणे आणि नदी-नाल्यांची पातळी वाढण्याच्या घटना समोर येत आहेत. विशेषतः घाट रस्ते आणि पूरप्रवण भागांमध्ये सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/07d3ZEdSw7o</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/rain-alart-.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/omraje-nimbalkar-viral-audio-clip-created-huge-stir-in-politics-1701671.html</loc><video:video>
	<video:title>मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची &#039;ती&#039; ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय वर्तुळात मोठं घडणार?</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T10:03:12+05:30</video:publication_date>
	<video:description>धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह एकूण सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली अन् थेट शिवसेना शिंदे गटाशी हातमिळवणी केली. त्यांच्या या बंडखोरीनंतर राज्याभर खळबळ उडाली. दरम्यान, उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी करणाऱ्या सर्व खासदारांच्या मतदारसंघात दौरा केला. ही बाब अजून ताजी असतानाच त्यांच्या वरळीतील आणखी एका नेत्याने ठाकरेंना धक्का दिल्याच्या चर्चा आहेत.  अशात एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये थेट ओमराजे निंबाळकर यांना एक कार्यकर्ता काहीतरी विचारत असून ओमराजे निंबाळकर त्यांच्या शिंदे गटात जाण्याच्या निर्णयाबाबत सांगत आहेत.  कार्यकर्त्याला ओमराजेंनी सांगितलं, &#039;मला लाईनमन म्हणू नका... मला हिणवू नका... विरोधक असताना तशीच परिस्थिती होती म्हणूनच...&#039; तेव्हा कार्यकर्ता म्हणाला, &#039;विरोधात राहून इतकी वर्षे काम केलं, मग आता का?&#039; तेव्हा ओमराजे म्हणतात, &#039;विरोधात राहिलो इतकी वर्षे, मात्र असा पराभव जो झाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत, इतका वाईट पराभव नव्हता झाला कधी....&#039; ऑडिओ क्लिपमध्ये कार्यकर्ता आणि ओमराजेंचा संवाद होत असल्याचं सांगितलं जात आहे. (सदर ऑडिओ क्लिपची टीव्ही९ मराठी पुष्टी करत नाही)</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/cEpAzowbjag</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/Omraje-Nimbalkar-14.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/uddhav-thackeray-faction-faces-another-setback-after-sachin-ahir-move-1701642.html</loc><video:video>
	<video:title>ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं, थेट वरळीतच....</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T09:32:25+05:30</video:publication_date>
	<video:description>शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गेल्या काही दिवसांत मोठे राजकीय धक्के बसत आहेत. 6 खासदारांनी साथ सोडल्यानंतर आता विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनीही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून काल विधान परिषदेतील उपसभापतीपदासाठी अर्ज भरला. सुत्रांच्या माहितीनुसार ते तीन दिवसांपासून शिंदेंच्या संपर्कात होते. त्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर काल वरळीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला विभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या बैठकीत माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि आमदार सुनील शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. किशोरी पेडणेकर यांनी बोलताना पक्षाशी निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. “आजही इथे सच्चे शिवसैनिक उपस्थित आहेत. शाखेपासून काम करणारे कार्यकर्ते पक्षासाठी मेहनत घेत आहेत,” असे त्या म्हणाल्या.  यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्या बंडाचा उल्लेख करत जुन्या काळातील संघर्षाची आठवण करून दिली. तसेच काही नेत्यांवर अप्रत्यक्ष टीकाही केली. पक्ष संघटना मजबूत ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजूट कायम ठेवावी, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/nZNFtc0gMd8</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/UBT-7.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/heavy-rains-disrupt-normal-life-after-trees-collapse-across-kalyan-dombivli-1701626.html</loc><video:video>
	<video:title>राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18...</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T08:45:42+05:30</video:publication_date>
	<video:description>कल्याण-डोंबिवली परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासांत शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कल्याण आणि डोंबिवली भागात 18 हून अधिक झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.  महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडे हटवण्याचे काम सुरू केले. यामध्ये काही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, काल चेंबूर येथे झाड कोसळ्यामुळे घडलेल्या बस अपघातात एका चिमुकल्याने जीव गमावला होता तर अनेक जखमी झाले होते. त्यामुळे शासन सर्व ठिकाणी झाडांचे सर्वेक्षण करत आहे.  दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांत आणखी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे महापालिकेने आपत्कालीन पथके सज्ज ठेवली आहेत. पावसामुळे काही भागांत पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यातील काही भगांना रेड, तर काहींना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/ggXG7LeoR14</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/Kalyan-dombivli.png</video:thumbnail_loc></video:video></url></urlset>