<urlset xmlns="https://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9" xmlns:video="http://www.google.com/schemas/sitemap-video/1.1"><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/bacchu-kadu-booked-in-amravati-plot-case-bawankule-slams-unacceptable-politics-1640056.html</loc><video:video>
	<video:title>Chandrashekhar Bawankule | जीव घेण्याचा कट पूर्णपणे...बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?</video:title>
	<video:publication_date>2026-04-03T17:15:01+05:30</video:publication_date>
	<video:description>प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, “निवडणुकीत जिंकणं-हरणं हा भाग असतो. मात्र, निवडणूक जिंकण्यासाठी एवढी लाचारी दाखवणे योग्य नाही. कोणावर हल्ला करण्याचा किंवा जीव घेण्याचा कट रचणे हे पूर्णपणे अयोग्य आहे.” त्यांनी राजकारणात स्वस्थ स्पर्धा असावी आणि ज्याच्या नशिबात असेल तोच निवडून येतो, असेही स्पष्ट केले. दरम्यान, अमरावतीमध्ये आमदार प्रवीण तायडे यांच्या भावावर हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी बच्चू कडू यांच्यासह आणखी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी होत आहे.  भोंदू अशोक खरात प्रकरणात तपास अधिक तीव्र झाला असून, या प्रकरणातील संबंधित नामकर्ण आवारे यांची शिर्डी पोलिसांकडून सुमारे तीन तास चौकशी करण्यात आली आहे. आवारे हे अशोक खरात यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान समता पतसंस्थेमध्ये आवारे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने सहा खाती उघडण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या खात्यांमधून 2021 पासून सुमारे 1 कोटी 20 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. मात्र, या सर्व आरोपांवर प्रतिक्रिया देताना आवारे यांनी कोणत्याही व्यवहारात आपला सहभाग नसल्याचा दावा केला आहे. “मी कोणताही व्यवहार केलेला नाही आणि खाते उघडताना माझी सहीदेखील नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. या विरोधाभासी दाव्यांमुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/jd5n9PqTosY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-03T170113.165.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ashok-kharat-case-trupti-desai-demands-action-over-alleged-black-magic-targeting-ajit-pawar-1639964.html</loc><video:video>
	<video:title>Trupti Desai On Ashok Kharat | अशोक खरात प्रकरणात खळबळ: अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?; तृप्ती देसाईंचा धक्कादायक संशय</video:title>
	<video:publication_date>2026-04-03T15:49:44+05:30</video:publication_date>
	<video:description>नाशिकचा ज्योतिष विद्या अवगत असल्याचा दावा करणारा भोंदू अशोक खरात सध्या कारागृहात असून, त्याच्यावर महिला अत्याचार, लैंगिक शोषण, फसवणूक आणि पैसे लुबाडण्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून, अनेक राजकीय नेते आणि आमदार त्याला भेटत असल्याची माहितीही पुढे येत आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दावा केला की, भोंदू अशोक खरातने दिवंगत नेते अजित पवार यांच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या, तसेच एका बड्या नेत्याचा फोटोही त्यामध्ये असल्याचा संशय व्यक्त केला. यावर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी संताप व्यक्त केला. “अजित दादा आता हयात नाहीत. त्यांच्या फोटोवर अशा प्रकारे कृती करणे चुकीचे असून, यामागील दोषींना शिक्षा झाली पाहिजे,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी पुढे सांगितले की, अजित पवार अंधश्रद्धेला कधीही बळी पडणारे नव्हते. तसेच, या प्रकरणात एका मोठ्या नेत्याचे नाव समोर येत असून, ते शरद पवार असू शकतात, अशी शंका देसाई यांनी व्यक्त केली. काही राजकीय स्वार्थासाठी काळी जादू, अघोरी पूजा करण्याचं प्रयत्न जर कोणी केला असेल तर त्या नेत्यांवर, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/72WKqoEMETY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-03T154048.118.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ashok-kharat-case-trupti-desai-repeats-allegations-against-shiv-sena-leader-neelam-gorhe-1639904.html</loc><video:video>
	<video:title>Trupti Desai | नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय? ते दोन्ही कार्यकर्ते...</video:title>
	<video:publication_date>2026-04-03T14:12:07+05:30</video:publication_date>
	<video:description>नाशिकचा ज्योतिष विद्या अवगत असल्याचा दावा करणारा भोंदू अशोक खरात सध्या कारागृहात आहे. त्याच्यावर महिला अत्याचार, लैंगिक शोषण, फसवणूक आणि पैसे लुबाडण्याचे अनेक आरोप आहेत. भोंदू अशोक खरातला भेटायला अनेक नेते, राजकारणी आणि आमदार येत असल्याचेही समजते. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. देसाईंच्या मते, गोऱ्हे कोरोना काळाच्या आधीपासून नाशिकमधील हॉटेलात खरातशी भेटत होत्या आणि मंत्रीपदासाठी त्यांना समर्थनही दिले. मात्र गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत हे सर्व आरोप फेटाळून लावले, त्यांनी खरातला कधीही भेट दिली नसल्याचे सांगितले. तरीही तृप्ती देसाई यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचा पुनरुच्चार केला. त्यांनी सांगितले की, खरातप्रकरणी माहिती दिलेली दोन व्यक्ती एक नाशिकची आणि दुसरी पुण्याची असून, ती माहिती एसआयटी किंवा पक्ष नेते एकनाथ शिंदे यांच्या समोर सादर होईल. योग्य वेळ आली की सर्व पुरावे समोर येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/KWkwc46Agf0</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-03T140944.332.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/controversy-erupts-over-chhatrapati-shivaji-maharaj-statue-in-anjan-village-solapur-two-groups-clash-1639874.html</loc><video:video>
	<video:title>Solapur Madha Controversy | अंजन गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; दोन्ही गटात संवाद साधून प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा</video:title>
	<video:publication_date>2026-04-03T13:53:59+05:30</video:publication_date>
	<video:description>सोलापूरच्या माढ्यातील अंजन गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. परिसरात पोलिसांनी बॅरिकेटिंग करून सुरक्षा वाढवली आहे. दोन गट आमने-सामने आले असून, एका गटाचे प्रतिनिधी आणि ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी हा पुतळा शासकीय जागेत स्थलांतरित होईपर्यंत ठिय्या देण्याची घोषणा केली आहे. मात्र दुसऱ्या गटाने आक्रमक प्रतिक्रिया देत विरोध व्यक्त केला आहे. माढा तालुक्यातील अंजन गावात 31 मार्च रोजी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. हा पुतळा खेळोबा ट्रस्टच्या जागेत बसवला गेला होता. ट्रस्टने पुतळा हटवण्याची भूमिका मांडली आहे, तर पुतळा बसवलेली जागा PWD च्या अंतर्गत येते. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांत मतभेद निर्माण झाले. प्रशासनाने 1 एप्रिलच्या रात्री पुतळा काढण्यासाठी क्रेन आणली, परंतु पुतळा बसवणाऱ्या गटाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आले. त्यानंतर 2 एप्रिलला पुतळा बसवणाऱ्या गटाचे प्रतिनिधी बाळराजे आवारे पाटील यांनी कॉर्नर सभा घेत पुतळा हटवणार नाही, अशी भूमिका ठामपणे मांडली, तर लक्ष्मण हाके यांनी त्याच दिवशी पुतळा स्थलांतरित करावा अशी भूमिका मांडली. दरम्यान, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आमदार अभिजीत पाटील यांच्यासह दोन्ही गटांच्या स्वतंत्र बैठका घेऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनांमुळे अंजन गावात राजकीय आणि सामाजिक तणाव वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/csZooq2uufQ</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-03T133629.391.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ashok-kharat-case-trupti-desai-alleges-100-fake-accounts-for-money-laundering-demands-sit-probe-1639845.html</loc><video:video>
	<video:title>Trupati Desai on Ashok Kharat Case | अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप</video:title>
	<video:publication_date>2026-04-03T13:05:01+05:30</video:publication_date>
	<video:description>भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून, या प्रकरणाला आता अधिकच वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. देसाई यांनी सांगितले की, समता नागरी पतसंस्थेमध्ये 100 पेक्षा अधिक बनावट खाती उघडण्यात आली होती. विशेष म्हणजे, या सर्व खात्यांमध्ये नॉमिनी म्हणून अशोक खरात यांचेच नाव असल्याचा दावा त्यांनी केला. “या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार काही लोकांच्या मदतीने करण्यात आला,” असा आरोप त्यांनी केला. त्या पुढे म्हणाल्या की, संबंधित खात्यांसाठी काही लोकांनी स्वतःची ओळखपत्रे, आधारकार्ड वापरण्याची परवानगी दिली होती. मात्र, आता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. या प्रकरणात काही नातेवाईक किंवा संबंधित व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करत, “कोणत्याही व्यक्तीचा यात सहभाग असेल, त्याची चौकशी एसआयटीमार्फत होऊन सत्य लवकरात लवकर समोर आले पाहिजे,” अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/4N8xdTOlaio</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-03T130029.361.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-slams-eknath-shinde-over-corruption-in-mumbai-municipal-tenders-1000-crore-deals-cancelled-1639758.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay Raut On Eknath Shinde | शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप</video:title>
	<video:publication_date>2026-04-03T12:58:05+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबई महापालिकेतील प्रशासकीय कारभाराच्या काळात काढण्यात आलेल्या सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या टेंडरला रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, “भ्रष्टाचारमुक्त मुंबई” हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी या प्रकरणावरून थेट एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “प्रशासकीय काळात महानगरपालिकेचा कारभार नगरविकास मंत्र्यांकडे असतो. त्या वेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे होते. त्यामुळे त्या काळातील प्रशासन त्यांच्या नियंत्रणाखाली होते,” असे राऊत यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, गेल्या साडेतीन वर्षांत मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत. “महानगरपालिकांच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता दिसून आली,” असा दावा त्यांनी केला. दरम्यान, एक हजार कोटींपेक्षा अधिक रकमेचे टेंडर भ्रष्टाचाराच्या संशयावरून रद्द करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी मुंबई महानगरपालिकेच्या विद्यमान आयुक्तांचे कौतुक केले. “या निर्णयाबद्दल आयुक्तांचे अभिनंदन केले पाहिजे,” असे म्हणत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेचे समर्थन केले. या घडामोडीमुळे मुंबई महापालिकेतील कामकाज आणि मागील काळातील निर्णयांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/IzzHYYj9MNg</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-03T123211.178.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-claims-25-30-mlas-from-shinde-and-ajit-pawar-camps-may-join-bjp-amid-court-delay-1639735.html</loc><video:video>
	<video:title>Special Report | संजय राऊतांचा मोठा दावा शिंदे- अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर? सुप्रीम कोर्टाच्या विलंबावरून आरोप</video:title>
	<video:publication_date>2026-04-03T10:51:08+05:30</video:publication_date>
	<video:description>शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात खळबळ उडवणारा दावा केला आहे. त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील तब्बल 25 ते 30 आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असे वक्तव्य केले आहे. राऊत यांनी म्हटले की, या आमदारांसमोर भाजपमध्ये विलीन होण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर नवनीत राणा आणि सुषमा अंधारे यांच्यात शाब्दिक चकमकही रंगली. सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका करत, “स्वतः आपल्या पतीच्या पक्षात नसलेल्या व्यक्तीने इतरांना निष्ठेचे धडे देऊ नयेत,” असा टोला लगावला. तर राऊत यांच्या या दाव्यामागे त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्याचा संदर्भ दिला आहे. शिवसेना संदर्भातील प्रकरणावर 1 एप्रिल रोजी सुनावणी अपेक्षित होती. मात्र, सुप्रीम कोर्ट यांनी ही सुनावणी पुढे ढकलत 23 एप्रिलची तारीख दिली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी निवडणूक आयोगावर टीका करत त्यांना “चोर” म्हंटलं आणि सरन्यायाधीशांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही केला. शिवसेनेच्या खटल्याला जवळपास चार वर्षे लोटली असून, अद्याप अंतिम युक्तिवादाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. “सतत मिळणाऱ्या तारखांमुळे आमदारांमध्ये नाराजी वाढत आहे. या विलंबामुळेच शिंदे आणि अजित पवार गटातील आमदार वैतागून अखेरीस भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतील,” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/S4YN2nyDBM0</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-03T095850.284-1.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sunetra-pawar-upset-with-praful-patel-and-sunil-tatkare-over-election-commission-letter-1639700.html</loc><video:video>
	<video:title>Special Report | NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी, निवडणूक आयोगाच्या पत्रामुळे वाद वाढला</video:title>
	<video:publication_date>2026-04-03T10:03:53+05:30</video:publication_date>
	<video:description>अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या नाराजीची झलक निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रातही दिसून आली आहे. संबंधित पत्रामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावासमोर ‘अध्यक्षा’ आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावासमोर ‘खजिनदार’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावांसमोर कोणत्याही पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, हे पत्र प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंनी 16 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रानंतर लिहिले गेले आहे. त्या पत्रामध्ये प्रफुल पटेल यांना ‘राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष’ म्हणून अध्यक्षांचे अधिकार देण्याचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी अचानक दिल्लीत दाखल झाल्यामुळे या घडामोडींना आणखी राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, पक्षातील अंतर्गत तणाव वाढल्याची शक्यता वर्तवली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/AhGB_AbpewQ</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-03T095850.284.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/parth-pawar-defends-praful-patel-and-sunil-tatkare-amid-ncp-internal-row-1639401.html</loc><video:video>
	<video:title>Parth Pawar | निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात; वरिष्ठ नेत्यांच्या समर्थनार्थ भूमिका</video:title>
	<video:publication_date>2026-04-02T17:01:35+05:30</video:publication_date>
	<video:description>माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विविध घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पत्रामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांप्रमाणेच कार्याध्यक्षांनाही अधिकार देण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी पक्ष ‘हायजॅक’ केला जात असल्याचा आरोप यापूर्वीच करण्यात आला होता. त्यानंतर हे पत्र समोर आल्यानंतर विविध दावे आणि अटकळींना सुरुवात झाली आहे. या सर्व घडामोडींवर अजित पवार गटाचे नेते आणि खासदार पार्थ पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सोशल मीडियावरील ट्विटद्वारे प्रतिक्रिया देताना म्हटले की, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना विनाकारण लक्ष्य केले जात आहे. तसेच, निराधार बातम्या आणि तर्क-वितर्कांवर आधारित चर्चांमुळे या वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक दशकांपासून त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे असून, अशा नेत्यांना बनावट वादांमध्ये ओढणे दुर्दैवी असल्याचेही पार्थ पवार यांनी स्पष्ट केले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/mL_500iCdvk</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-02T165437.383.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/unseasonal-rain-hits-pune-dark-skies-strong-winds-disrupt-daily-life-1639378.html</loc><video:video>
	<video:title>Pune Unseasonal Rain | पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा, नागरिकांची धावपळ</video:title>
	<video:publication_date>2026-04-02T16:43:11+05:30</video:publication_date>
	<video:description>पुण्यात अचानक अवकाळी पावसाने जोर धरला असून शहरातील विविध भागांत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा आणि दाट ढगांमुळे वातावरण पूर्णतः अंधारमय झाले आहे. दुपारी तीन वाजल्यानंतरही संध्याकाळसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या अर्ध्या तासापासून शहरात पावसाचा जोर कायम असून, अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याचेही समोर येत आहे. दरम्यान, हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, त्याचा परिणाम म्हणून हा अवकाळी पाऊस होत असल्याचे सांगितले जात आहे. या पावसाचा फटका ग्रामीण भागालाही बसण्याची शक्यता आहे. सध्या गहू आणि हरभऱ्याची काढणी सुरू असताना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/ZhOiBRxcDsE</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-02T162652.192.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/shivaji-maharaj-statue-controversy-triggers-protest-and-heavy-police-deployment-in-solapur-1639352.html</loc><video:video>
	<video:title>Solapur | सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन, शौर्य प्रतिष्ठानची स्थलांतराची मागणी</video:title>
	<video:publication_date>2026-04-02T16:01:16+05:30</video:publication_date>
	<video:description>सोलापूर जिल्ह्यात महापुरुषांच्या पुतळ्यावरून उफाळलेल्या वादाला आणखी तीव्र स्वरूप प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे हे आंदोलकांच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धनगर समाजाचे बांधव मोठ्या संख्येने एकवटले असून त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकीकडे आंदोलन सुरू असताना धनगर समाजाकडून घोषणाबाजीही करण्यात येत आहे. शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने असा आरोप करण्यात आला आहे की, श्री खेलोबा देवस्थानच्या प्रवेशद्वारात मध्यरात्री कोणतीही अधिकृत परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. काही समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शौर्य प्रतिष्ठानने स्पष्ट केले की, त्यांचा विरोध पुतळ्याला नसून तो उभारण्यात आलेल्या जागेला आहे. देवस्थानच्या प्रवेशद्वारावरील ही जागा असल्याने पुतळा योग्य त्या ठिकाणी स्थलांतरित करावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/BxmkiSBR</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-02T155506.529.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/bhondu-kharat-case-intensifies-sit-seeks-7-day-police-custody-amid-sexual-abuse-allegations-1639264.html</loc><video:video>
	<video:title>Ashok Kharat Case Hearing | महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले; काय काय घडलं कोर्टात?</video:title>
	<video:publication_date>2026-04-02T14:34:10+05:30</video:publication_date>
	<video:description>अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे, रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले की, 14 दिवसांच्या पोलीस कोठडीदरम्यान अनेक महत्त्वाचे अँगल समोर आले आहेत. भोंदू खरात प्रकरणी युक्तिवाद पूर्ण झालेला असून, सर्व बाबींचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचेही त्यांनी कोर्टासमोर नमूद केले. कोर्टात एका पीडितेने धैर्य दाखवत तक्रार दिली. यावर सरकारी वकिलांनी विचारले की, “तुम्हाला काही बोलायचे आहे का?” तर खरातने कोर्टासमोर हात जोडले, “मला काही सांगायचे नाही,” असं त्याने कोर्टाला सांगितलं. भोंदू खरात प्रकरणात तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला असून, भोंदू खरातच्या वकिलांनीही युक्तिवाद केला. या प्रकरणात आरोपीने फक्त आर्थिक व्यवहारच नाही, तर लैंगिक अत्याचार आणि अघोरी, विकृत कृत्येही केली असल्याचा आरोप आहे. एसआयटीकडून भोंदू खरातसाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली गेली. विशेष म्हणजे, सर्वात महत्त्वाचा तपास म्हणजे आरोपीने ज्या महिलांसोबत लैंगिक अत्याचार केले त्याचा तपास प्राधान्याने केला जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/cn9ehZCv</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-02T142518.504.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ncp-internal-tension-sunetra-pawar-avoids-comment-on-letters-to-election-commission-1639213.html</loc><video:video>
	<video:title>NCP | Maharashtra Politics | प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला पाठवलेल्या घटनांवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण</video:title>
	<video:publication_date>2026-04-02T13:29:05+05:30</video:publication_date>
	<video:description>अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होईल असे संकेत मिळत होते. पण दादाच्या पक्षातच आता पक्षातच आता धुसफूस सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दोन घटना निवडणूक आयोगाकडे का पाठवल्या? असा प्रश्न विचारला आहे. यावर सुनेत्रा पवार यांना सवाल करण्यात आला. मात्र, त्यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असून, पत्रकारांनी प्रफुल पटेलांच्या प्रश्नासंदर्भात विचारल्यावर त्यांनी बोलणे टाळले. कालपासून सुरू असलेल्या चर्चेनुसार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांसंदर्भातील पत्र निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलं आहे. त्यात पक्षाकडून दोघांच्या पदांचा उल्लेख नसल्याचे समोर आले आहे. यावर प्रश्न विचारला असता, सुनेत्रा पवार यांनी कोणतीही भूमिका मांडली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/9zsj6Ai-Q4w</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-02T132659.881.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/clash-erupts-in-anjan-village-solapur-over-statue-installation-police-deployed-1639167.html</loc><video:video>
	<video:title>Solapur | सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव, गावात छावणी तैनात</video:title>
	<video:publication_date>2026-04-02T12:32:17+05:30</video:publication_date>
	<video:description>सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजन गावात महापुरुषांच्या पुतळा बसवण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. काल रात्री काही जमावाने पोलिसांवर दगडफेक केली होती. या घटनेनंतर पोलीसांनी आंदोलकांना हुसकवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आज अंजन गावात पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे. एका गटाने पुतळ्यासमोर तर दुसऱ्या गटाने मंदिराच्या आवारात बसून घोषणाबाजी सुरू केली आहे. पोलिसांनी दोन्ही गटांना हटवण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली आणि परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण झाली. पोलिस प्रशासनाने आधीच जमावबंदीचे आदेश जारी केले असून, संबंधित सूचना दिल्या आहेत. तरीसुद्धा दोन्ही गट आजही जमले आहेत. कायदा व सुव्यवस्थेची तक्रार उद्भवू नये यासाठी पोलिसांनी गावात छावणी तैनात केली आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/P2UpE5Z-s9w</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-02T122320.991.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-slams-supreme-court-and-election-commission-over-delayed-hearings-1639130.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay Raut Press | हा आयोग चोर आहे... संजय राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर खोचक टीका</video:title>
	<video:publication_date>2026-04-02T11:47:45+05:30</video:publication_date>
	<video:description>शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्टातील पक्ष आणि निशाणी संदर्भातील सुनावणी पुढे ढकलल्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पन्यायालयीन प्रक्रियेवर तोंडसुख घेतल्यासारखे वागले जात आहे. गेल्या चार वर्षांपासून तारखांवर तारखा दिल्या जात आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खटल्यांवर सुनावणी पूर्ण होत नाही. अंतिम सुनावणीसाठी वेळ मागितला जातो, पण अशा संवैधानिक पेचाच्या प्रसंगातही सर्वोच्च न्यायालय हे खटले गांभीर्याने घेत नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होतो. कोणाचा दबाव आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. “शिवसेनेचा खटला शोवसेना पक्ष या संदर्भातला खटला चालवू नये, यासाठी आमच्यावर दबाव आहे. सरन्यायाधीशांनी हिमतीने हे स्पष्ट करावे,” असंही ते म्हणाले. तसेच, त्यांनी देशातील निवडणूक आयोगावर थेट टीका करत म्हटले की, “हा अयोग चोर आहे.” या वक्तव्यांमुळे निवडणूक आयोग आणि न्यायालयीन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला सुरुवात झाली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/ikmynHIi</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-02T113738.516.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-claims-ajit-pawar-faction-may-merge-with-bjp-sparks-political-debate-1639096.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay Raut Press | अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार? आकडाच आला समोर; बड्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ</video:title>
	<video:publication_date>2026-04-02T10:59:27+05:30</video:publication_date>
	<video:description>राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असल्याने या घडामोडींना अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले की, हा त्यांचा स्वतंत्र पक्ष असून सुनेत्रा पवार या त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांचे सहकारी होते, मात्र नव्या संघटनात्मक रचनेत ते सुनेत्रा पवार यांचे सहकारी असतीलच असे नाही. तसेच, दुसऱ्या पक्षाच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्याची गरज काय?, असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला. पक्षाच्या संघटनात्मक निर्णयांबाबत त्यांनी कोणाला कोणती पदे दिली, हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, पुढील काळात हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपमध्ये विलीन होईल, तसेच शिंदे गटातील काही आमदारही भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा राऊत यांनी केला आहे. दरम्यान, राऊत यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/SC8b7hZ6mxs</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-02T105535.303.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ncp-merger-row-sunil-tatkare-changes-stand-within-two-months-1639091.html</loc><video:video>
	<video:title>tv9 Marathi Special Report | राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न; दोन महिन्यांतच बदलली भूमिका, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण</video:title>
	<video:publication_date>2026-04-02T10:48:28+05:30</video:publication_date>
	<video:description>राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी भूमिका बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विलिनीकरणाचा मुद्दा हा स्थानिक निवडणुकांपुरताच मर्यादित असल्याचे तटकरे सांगत होते. मात्र, आता त्यांनी या विषयावर वेगळेच विधान करत राजकीय चर्चांना उधाण आणले आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर तटकरे यांनी अवघ्या दोन महिन्यांत भूमिका बदलल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी, अजित पवार यांच्या बैठकीत विलिनीकरणाची चर्चा झाली असल्यास त्याचे ठोस पुरावे सादर करावेत, असे आव्हान तटकरे यांनी दिले होते. तसेच, अजित पवार यांच्या निधनानंतर विलिनीकरणाच्या प्रक्रियेत बदल होऊ शकले असते, असेही ते म्हणाले होते. राजकीय समीकरणांमध्ये झालेल्या बदलांमुळे विलिनीकरणाचा निर्णय बदलण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. दरम्यान, अजित पवार यांनी विलिनीकरणाबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती, असेही काही नेते त्यांच्या निधनानंतर सांगत होते. त्यामुळे, अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला का?, असा सवालही उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पुढील राजकीय दिशा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/-CXg1qkItlQ</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-02T104619.105.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/jain-monk-padmasagar-faces-backlash-over-controversial-historical-claims-in-maharashtra-1639072.html</loc><video:video>
	<video:title>tv9 Marathi Special Report | अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध</video:title>
	<video:publication_date>2026-04-02T10:38:36+05:30</video:publication_date>
	<video:description>इतिहासासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे जैन मुनी पद्मसागर यांच्या विरोधात जैन समाजातूनच तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. त्यांच्या दाव्यांना अनेक जैन मुनींनी उघडपणे विरोध करत हे विधान निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, मराठी आणि जैन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही काहींनी केला आहे. पद्मसागर यांनी केलेल्या दाव्यांमध्ये महाराणी ताराबाई जैन होत्या, असा उल्लेख असून हा दावा आता वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. विशेष म्हणजे, अनेक जैन मठांनीही हा दावा फेटाळून लावत पद्मसागर यांच्या वक्तव्यांवर टीका केली आहे. इतक्यावरच न थांबता पद्मसागर यांनी मेवाडच्या कुर्मादेवी जैन होत्या, महात्मा गांधी यांच्या आई जैन होत्या, तसेच मराठी भाषेची निर्मिती एका जैन व्यक्तीने केली, असेही दावे केले आहेत. “जैन हेच खरे मराठी” असे विधानही त्यांनी केले असल्याचे समोर आले आहे. या सर्व वक्तव्यांमुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट पसरली असून विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/kC6mloR5-ks</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-02T103335.052.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/maharashtra-deputy-cm-sunetra-pawar-heads-to-delhi-key-nda-meetings-likely-amid-political-developments-1638799.html</loc><video:video>
	<video:title>Sunetra Pawar | सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार?</video:title>
	<video:publication_date>2026-04-01T17:52:08+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. आज रात्री त्या नवी दिल्ली येथे दाखल होणार असून उद्या त्या NDAमधील काही महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागले आहे. दरम्यान, भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) काही नेत्यांवर दबाव वाढत असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा अधिक महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या भेटींतून पुढील रणनीती ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/p9JuYvQQp3w</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-01T173747.566.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/maharashtra-minister-narhari-zirwal-absent-from-cabinet-meeting-political-speculation-intensifies-1638761.html</loc><video:video>
	<video:title>Aditi Tatkare | झिरवळांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण</video:title>
	<video:publication_date>2026-04-01T17:05:22+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून आज झालेल्या प्री-कॅबिनेट बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. या बैठकीला छगन भुजबळ, अदिती तटकरे, दत्तामामा भरणे आणि हसन मुश्रीफ हे उपस्थित होते. दरम्यान, आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री नरहरी झिरवाळ अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत स्पष्टीकरण दिले. पक्षांतर्गत किंवा अशा कोणत्याही प्रकारची चर्चा आज झालेल्या प्री-कॅबिनेट बैठकीत झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरहरी झिरवाळ यांना संबंधित प्रकरणाबाबत योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित प्रकाराबाबत त्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली असल्याचे तटकरे यांनी सांगितले. यासोबतच, संबंधित व्हिडिओ प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे योग्य तो निर्णय घेतील, असेही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/5KXSHtd9</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-01T170151.504.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/unseasonal-rains-ravage-crops-across-maharashtra-farmers-face-heavy-losses-1638664.html</loc><video:video>
	<video:title>Crop Loss | अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल</video:title>
	<video:publication_date>2026-04-01T16:12:35+05:30</video:publication_date>
	<video:description>महाराष्ट्रातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. गतवर्षीच्या नुकसानीतून शेतकरी अजून सावरत नाही तोच यंदाच्या अवकाळी पावसाने त्यांच्या जगण्यावरच घाला घातला आहे. परभणी जिल्ह्यात आंबा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे झाडांवरील कैऱ्या गळून पडल्या असून गावरान आंब्याच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भंडारा जिल्ह्यातील त्रिद्दी परिसरातही आंबा पिकाला फटका बसला आहे. नांदेड जिल्ह्यात शेकडो हेक्टरवरील हळद पिक अवकाळी पावसामुळे भिजले असून अर्धापूर तालुक्यात हळदीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि बागलाण पट्ट्यात अवकाळी पावसाने कांदा, द्राक्षे आणि फळबागांचे मोठे नुकसान केले आहे. सटाण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. धुळे जिल्ह्यातील साखरी येथे पावसासोबत गारपीट झाल्याने कांदा, बाजरी, गहू आणि मका पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/EJ-F37f1sXc</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-01T155234.340.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/chaitra-shuddha-pournima-grand-jotiba-festival-celebrated-with-palakhi-procession-and-traditional-rituals-at-kedarlang-1638589.html</loc><video:video>
	<video:title>Kolhapur Jotiba | चैत्र शुद्ध पौर्णिमेला दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण</video:title>
	<video:publication_date>2026-04-01T14:19:16+05:30</video:publication_date>
	<video:description>आज चैत्र शुद्ध पौर्णिमेला दख्खनचा राजा ज्योतिबा यांचा मुख्य दिनोत्सव साजरा केला जात आहे. या निमित्ताने केदारलिंगमध्ये ज्योतिबाची सालंकी पूजा पारंपरिक पद्धतीने करण्यात आली आहे. या दिवशी ज्योतिबाला शाही पोशाख आणि अलंकार परिधान करून सजवण्यात आले आहे. यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक विधी सकाळपासून सुरू झाले आहेत. पहाटे 5 ते 6 या वेळेत शासकीय अभिषेक करण्यात आला, तर 7 ते 8 या वेळेत देवाची सरदारी पूजा पार पडली. साडे 10 ते 12 या वेळेत देवाची धूप आरती पार पडली. एक नंतर देवाच्या सासन गाठीच्या क्रमांकांची पूजा शासकीय कर्मचाऱ्यांच्या हस्ते पार पडली आणि त्या क्रमांकाला प्रारंभ देण्यात आला. संध्याकाळी 5 वाजता पालखी सोहळा सुरू होणार आहे, तर साडेपाच वाजता तोफेची सलामी देण्यात येईल. पालखी सोहळा 5 वाजून 34 मिनिटांनी एमआयकडे प्रस्थान केला जाईल. यात्रेत भक्तांचा उत्साह शिगेला पोहचला असून, मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करण्यात येत आहे. तसेच, भक्तांना चांगभलं गजराचा अनुभव मंदिराच्या आवारात अनुभवायला मिळत आहे. ही पारंपरिक यात्रा आणि धार्मिक विधी दख्खनच्या राजा ज्योतिबा यांच्या भक्तांसाठी आनंदाची अनुभूती ठरत आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/0U7yDBsg3D4</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-01T141140.806.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/narahari-zirwal-skips-pre-cabinet-and-cabinet-meetings-amid-viral-video-row-resignation-buzz-grows-1638543.html</loc><video:video>
	<video:title>Narhari Zirwal | व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित? चर्चांना उधाण</video:title>
	<video:publication_date>2026-04-01T13:41:46+05:30</video:publication_date>
	<video:description>व्हायरल क्लिपमुळे वादात सापडलेले अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी प्री-कॅबिनेट बैठकीला अनुपस्थिती दर्शवली आहे. याशिवाय बाबासाहेब पाटील आणि इंद्रनील नाईल यांनीही बैठकीला पाठ फिरवल्याने राजकीय चर्चांना जोर मिळाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या प्री-कॅबिनेट बैठकीत छगन भुजबळ, अदिती तटकरे, दत्तामामा भरणे आणि हसन मुश्रीफ उपस्थित होते. या घडामोडींमुळे झिरवळ यांचा राजीनामा घ्यावा लागेल की पक्ष त्यांना अभय देईल, यावर जोरदार चर्चा रंगली आहे. आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली, परंतु झिरवळ या बैठकीलाही अनुपस्थित होते. प्री-कॅबिनेट बैठकीत प्रामुख्याने झिरवळ यांच्या संदर्भातील व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर चर्चा झाली आणि पक्षाची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे. विरोधकांकडून झिरवळ यांचा राजीनामा मागितला जाणार आहे, त्यामुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात असल्याची चर्चाही सुरू आहे. मंत्रिमंडळ आणि पक्षाच्या कॅबिनेट बैठकीला झिरवळ अनुपस्थित राहिल्यामुळे आगामी राजकीय परिस्थितीबाबत चर्चांना उधाण आले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/Q3C14QfUoCg</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-01T130531.709.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/bhondu-baba-ashok-kharat-remanded-to-14-day-judicial-custody-in-nashik-sit-to-continue-interrogation-1638507.html</loc><video:video>
	<video:title>Ashok Kharat Case Big Update | आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; चौकशी सुरू</video:title>
	<video:publication_date>2026-04-01T12:30:00+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यात खळबळ उडवणाऱ्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातची मुदत संपल्यावर त्याला कडक पोलीस बंदोबस्तात नाशिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एसआयटीच्या पथकाने भोंदू खरातला घेऊन नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले होते. याआधी पोलीस कोठडीमध्ये ठेवलेल्या खरातला एसआयटीकडून कोठडीची मागणी देखील करण्यात आली होती. सरकारी वकील शैलेंद्र बागले यांनी युक्तिवाद सादर केला, सुनावणी झाली आणि अखेर न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी मंजूर केली. या कालावधीत एसआयटी भोंदू खरातची चौकशी पुन्हा करणार आहे. एकूणच बघितलं तर, अशोक खरात त्याच्यावरचे गुन्हे जे आहेत ते वाढतच चालले आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/uGVoocTgCPE</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-01T122000.147.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/rahuri-by-election-2026-akshay-kirdile-gets-bjp-ticket-after-shivajirao-kirdiles-demise-1638493.html</loc><video:video>
	<video:title>Rahuri Vidhan Sabha | अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी; लढत चुरशीची होणार?</video:title>
	<video:publication_date>2026-04-01T12:00:22+05:30</video:publication_date>
	<video:description>राहुरी मतदार संघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्प आजाराने 17 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला होता. राजकीय प्रवासाची सुरुवात त्यांनी अगदी सामान्य कार्यकर्ता म्हणून केली होती. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर आता त्यांचा मुलगा अक्षय शिवाजीराव कर्डिले भाजपकडून विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी तिकिट देण्यात आले आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील 2026 च्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. सुरुवातीपासूनच या पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांनाच तिकीट मिळेल असं सांगितलं जात होतं. त्यानुसा अखेर भाजपने त्यांना तिकिट दिले आहे. आता वडिलांच्या जागी अक्षय कर्डिले निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे कर्डिले जागा राखतात की गमावतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विरोधकांनी अजून राहुरीचा उमेदवार घोषित केलेला नाही. महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे राहुरीतील लढत अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/IXvG4_oeu_k</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-01T115117.725.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-slams-maharashtra-government-over-controversial-tararani-remarks-warns-against-forced-conversion-1638477.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay Raut UNCUT | सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... कारण ते... संजय राऊत असं का म्हणाले? काय आहे वाद?</video:title>
	<video:publication_date>2026-04-01T11:38:46+05:30</video:publication_date>
	<video:description>महाराणी ताराराणी यांच्याबाबत झालेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण अधिकच तापले असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वतःला मराठी किंवा मराठा समजतात, पण त्यांच्या उपस्थितीत महाराणी ताराराणी यांचा वंश आणि कुळ बदलण्याचा प्रयत्न झाला. तरीही त्यांनी साधा निषेधही व्यक्त केला नाही.” धर्मांतराच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा आणला आहे, पण तुम्ही आमच्या ताराराणींचे जबरदस्तीने धर्मांतर करत आहात. यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे.” तसेच त्यांनी सवाल उपस्थित करत विचारले की, “सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी असलेल्या झुंजार वीरांगना ताराराणी यांचे धर्मांतर करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? यामागे नेमके काय षडयंत्र आहे?” राऊत यांनी पुढे टीका करत म्हटले की, “आमचे राजे, महाराजे आणि महाराणी यांना परस्पर जैन ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही विचारधारा किती विकृत पातळीवर गेली आहे, हे यातून दिसते. मराठा संघटना आणि मराठी अस्मितेचे पुरस्कर्ते आता कुठे आहेत?” ताराराणींबाबत अशा प्रकारचे वक्तव्य केवळ निषेधापुरते मर्यादित न ठेवता ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा व्हायला पाहिजे. ते त्या ठिकाणी उपस्थित होते, पण त्यांनी साधा शब्दही उच्चारला नाही. कदाचित त्यांना ताराराणी माहित नसतील; त्यांनी ‘ताराबेन’ असे ऐकले असेल. मात्र त्या ताराराणी आहेत, हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आहेत,” असे राऊत म्हणाले. शेवटी, “शूरवीर आणि राष्ट्रसंरक्षक हे महाराष्ट्राच्या मातीतच जन्माला आले आहेत,” असे सांगत राऊत यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/d77mNFY8</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-01T113012.164.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/controversy-over-tararani-remark-sanjay-raut-slams-jain-monk-nayan-padsagar-targets-maharashtra-government-1638462.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay Raut On Jain Muni | ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; संजय राऊतांचा जैन मुनींवर आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा</video:title>
	<video:publication_date>2026-04-01T11:15:23+05:30</video:publication_date>
	<video:description>महाराणी ताराराणी यांच्याबाबत जैन मुनी नयन पद्मसागर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात संतापाची लाट उसळली आहे. विविध राजकीय नेत्यांसह अनेक स्तरांतून या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना जैन मुनींच्या वक्तव्यावर कठोर शब्दांत टीका केली. “या जैन मुनींना असे वक्तव्य का करावेसे वाटले? कदाचित त्यांच्या परंपरेत शूरवीर किंवा वीरांगना नसल्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केले असावे,” असा टोला राऊत यांनी लगावला. राऊत पुढे म्हणाले की, महाराणी ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराज यांच्या पत्नी आहेत. तसेच त्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी सरसेनापती होते. “मग हंबीरराव मोहिते जैन होते का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ताराराणी यांचा जन्म हिंदू मराठा कुळात झाला असून त्यांनी शस्त्रधर्म पाळत राज्य आणि धर्मरक्षणासाठी तलवार हाती घेतली, असेही राऊत यांनी अधोरेखित केले. दरम्यान, राज्यातील सत्ताधाऱ्यांवरही टीका करताना राऊत म्हणाले की, “सध्याच्या फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या राजवटीत महाराष्ट्राचे वेगळ्या पद्धतीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.” या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/YwiLQ5tS3Sk</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-01T110751.259.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ashok-kharat-fraud-case-wife-kalpana-kharat-missing-arrest-likely-soon-in-shirdi-land-scam-1638439.html</loc><video:video>
	<video:title>tv9 Marathi Special Report | अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?, लवकरच अटक होण्याची शक्यता</video:title>
	<video:publication_date>2026-04-01T10:51:43+05:30</video:publication_date>
	<video:description>भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. अशोक खरात पोलिसांच्या ताब्यात असताना त्याच्या मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र त्याची पत्नी कल्पना खरात सध्या घरातून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी कल्पना खरातलाही अटक करण्याची तयारी सुरू केली असून तिचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणात केवळ खरात कुटुंबच नव्हे, तर काही डॉक्टर, सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअर्स देखील एसआयटीच्या रडारवर असल्याचे समजते. शिर्डी येथील जमीन खरेदी व्यवहारात झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण पाच जणांविरुद्ध फसवणूक आणि सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच, कल्पना खरात आणि अशोक तांबे यांनाही लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी कल्पना खरातला बेड्या ठोकल्या जाऊ शकतात.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/gjFwNLxAmwA</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-01T101658.918.jpg</video:thumbnail_loc></video:video></url></urlset>