<urlset xmlns="https://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9" xmlns:video="http://www.google.com/schemas/sitemap-video/1.1"><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sushma-andhare-questioned-thackeray-camp-leaders-over-mahayuti-political-moves-1702053.html</loc><video:video>
	<video:title>ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T16:55:18+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यतील राजकारणात सध्या खूप मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहेत तर कालच आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आणि आमदार सचिन अहिर यांनी थेट महायुतीकडून उपसभापती अर्ज भरला. सचिन अहिर यांची आज बिनविरोध उपसभापती पदी निवड झाली.  उबाठा गटातील सुषमा अंधारे यांनी संबंधित प्रकरणावर बोलताना नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात आमचीच लोकं महायुतीकडून अर्ज भरत आहेत. सभागृहात आमच्या लोकांकडून आवाज उठवला जात नाही, मात्र हे दुसरीकडे बंड करतात. पडद्यामागे नेमकं काहीतरी घडतंय? या सर्व गोष्टीचं अकाऊंटीग झालंच पाहिजे. टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना सुषमा अंधारे यांनी खंत व्यक्त केली.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/Tawzu1gaSv0</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/Sushama-andhare.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/maharashtra-agriculture-day-cm-devendra-fadnavis-announces-100-daytime-power-supply-for-farmers-by-year-end-1702042.html</loc><video:video>
	<video:title>मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T16:45:26+05:30</video:publication_date>
	<video:description>महाराष्ट्र कृषीदिनानिमित्त आयोजित कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कृषी धोरणांबाबत सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. शेती क्षेत्रातील यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, दर्जेदार बियाणे, पशुपालन आणि दिवसा वीजपुरवठा या विषयांवर सरकारचे धोरण स्पष्ट करत त्यांनी कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले.  मुख्यमंत्री म्हणाले की, शेतीतील यांत्रिकीकरणासाठी देशात सर्वाधिक अर्थसंकल्पीय तरतूद महाराष्ट्र सरकारने केली आहे. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी आता सर्व प्रकारच्या बियाण्यांचे प्रमाणन (Certification) अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयामुळे बनावट बियाण्यांवर आळा बसून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावरही सरकार भर देत असल्याचे सांगत फडणवीस यांनी देशातील कृषी क्षेत्रासाठी तयार करण्यात आलेले पहिले AI अॅप महाराष्ट्राने विकसित केल्याची माहिती दिली. या अॅपच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी होण्यास आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.  फलोत्पादन क्षेत्रात गेल्या ३ वर्षांत राज्याने उल्लेखनीय प्रगती केली असून पशुपालन क्षेत्राचा विस्तार करून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करण्याचा सरकारचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतीचे स्वरूप कसे बदलावे, यावरही सरकार अभ्यास करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची घोषणा करत सांगितले की, राज्यातील शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सध्या राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जात असून, हे वर्ष संपण्यापूर्वी १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.  तसेच सुरुवातीला शेतीसाठी दिवसा ८ तास वीजपुरवठा केला जाईल आणि पुढील टप्प्यात तो वाढवून १२ तासांपर्यंत केला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/CGr-4F0fj_g</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T163722.522.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sunetra-pawar-speech-delayed-twice-during-maharashtra-agriculture-award-event-1702000.html</loc><video:video>
	<video:title>Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T16:31:18+05:30</video:publication_date>
	<video:description>आज महाराष्ट्र कृषीदिन आहे. कृषीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कृषी पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार तसेच इतर अनेक नेते हजर होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार सध्या शेतकऱ्यांसाठी कोण-कोणत्या योजना राबवत आहे आणि भविष्यात कोणत्या योजना राबवल्या जाणार आहेत? तसेच सरकारचे कृषीच्या प्रगतीसाठी काय धोरण आहे, याबाबत माहिती दिली. मात्र या कार्यक्रमात एक घोळ झाल्याचं दिसून आलं. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित प्रोटोकॉल पाळला गेलेला नाही असं दिसून आलं. यावेळी भाषणासाठी नाव पुकारलं मात्र भाषण झालंच नाही, असं सांगितलं जात आहे.  या गोंधळानंतर त्यांचा सत्कार झाला अन् पुन्हा नाव पुकारण्यात आलं, मात्र सत्कारानंतर मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले त्यामुळे त्यांना पुन्हा थांबावे लागले. त्यानंतर आयोजकांना चूक लक्षात आली आणि नंतर कार्यक्रम सुरळीत झाला. मात्र कार्यक्रमात दोनदा सुनेत्रा पवार यांना बोलावलं त्या वेळी भाषण करता आलं नाही. या सबंध प्रकरणानंतर कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? अशा चर्चांना उधाण आलं आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/ObPWfjUuzdY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/Sunetra-pawar-at-programm.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mumbai-nesco-drugs-case-13th-accused-arrested-in-goregaon-vanrai-police-intensify-probe-after-mba-student-death-1702019.html</loc><video:video>
	<video:title>Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T16:20:21+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को ड्रग्ज प्रकरणात वनराई पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत आणखी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील हा १३ वा आरोपी असून, दीपक हमलानी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  पोलिसांच्या माहितीनुसार, सहआरोपीने ड्रग्जचे एक पॅकेट दीपक हमलानी याच्याकडे ठेवण्यासाठी दिले होते. मात्र, त्या पॅकेटमध्ये नेमके काय आहे, याची कोणतीही माहिती नव्हती, असा दावा हमलानीने चौकशीदरम्यान पोलिसांसमोर केला आहे.  हे प्रकरण एप्रिल महिन्यात गोरेगाव येथील नेस्को परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका कॉन्सर्टनंतर समोर आले होते. कॉन्सर्टदरम्यान कथितरित्या एक्स्टसी (Ecstasy) गोळ्यांचे सेवन केल्यानंतर एका एमबीए विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी ड्रग्ज पुरवठा साखळीचा तपास सुरू केला असून आतापर्यंत १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.  या प्रकरणाचा अधिक तपास व नराई पोलीस करत असून, ड्रग्ज रॅकेटशी संबंधित आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/wD5fpSLatLQ</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T161908.580.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sunetra-pawar-praised-sachin-ahir-after-unopposed-deputy-chairman-win-1701929.html</loc><video:video>
	<video:title>अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T15:59:28+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देत, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार सचिन अहिर यांना महायुतीकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी दिली. सचिन अहिर हे ठाकरे गटातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असल्याचं सांगितलं जातं. आता सचिन अहिर यांची आज (१ जुलै) रोजी उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून जगन्नाथ (ज. मो.) अभ्यंकर यांनीही अर्ज भरला होता, परंतु नंतर त्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली.  यावर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भाष्य केले. त्यांनी उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल सचिन अहिर यांचे अभिनंदन केले. त्यांनी सचिन अहिर यांच्या राजकीय कारकिर्दीबाबतही सांगितले. इतकेच नाही तर त्यांच्या राष्ट्रवादीतील कार्यबाबतही सांगितले. अहिर यांच्या बाबत बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, &#039;आदरणीय अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं होतं&#039;. सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी सचिन अहिर यांना अभिनंदन केले तसेच शुभेच्छा दिल्या.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/c5hMe3tcCW8</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/sunetra-pawar-on-sachin-ahire.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/heavy-rain-wreaks-havoc-in-nalasopara-palghar-roads-waterlogged-house-wall-collapses-amid-downpour-1701983.html</loc><video:video>
	<video:title>Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T15:57:21+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईलगतच्या नालासोपारा परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वसई-विरार महानगरपालिका मुख्यालयाकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग पाण्याखाली गेला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.  स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पाणी उपसून वाहतूक पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. पाणी साचल्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.  दरम्यान, पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा जोर कायम असून अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील धुकटन परिसरात एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत घराचे मोठे नुकसान झाले आहे.  भिंत कोसळल्यानंतर घरातील अन्नधान्य, कपडे आणि दैनंदिन वापरातील वस्तू पावसाच्या पाण्यात भिजल्याने कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.  मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर स्थानिक यंत्रणांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/hxbZvJWsauo</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T155118.382.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/black-flags-shown-to-mp-shrikant-shindes-convoy-in-nanded-shiv-sainiks-detained-by-police-1701899.html</loc><video:video>
	<video:title>मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T15:14:08+05:30</video:publication_date>
	<video:description>नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. अंजनखेडा गावात श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला काही शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला.  यावेळी आंदोलकांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.  घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या काही शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, या आंदोलनावर संबंधित पक्षांच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/VQbXAcP49EY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T145714.479.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mumbai-sea-waves-rise-dangerously-high-during-heavy-rainfall-alert-1701916.html</loc><video:video>
	<video:title>उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T14:56:11+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईत गेल्या 24 तासांपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. हवामान विभागाने पुढील काही तासांसाठीही जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, समुद्राला मोठी भरती आल्याने किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  दादर, परळ, सायन, कुर्ला, अंधेरी आणि बांद्रा परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता. काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला असून लोकल सेवांवरही किरकोळ परिणाम झाला. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना घराबाहेर पडताना अडचणींचा सामना करावा लागला.  मुंबई महानगरपालिकेकडून आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली आहेत. समुद्र किनाऱ्यावर नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मच्छीमारांना देखील पुढील 48 तास समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/zqrPerp5YoM</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/mumbai-dariya-kinara.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/eknath-shinde-gives-sachin-ahir-big-responsibility-shocks-thackeray-camp-1701870.html</loc><video:video>
	<video:title>ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T14:32:31+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत, अशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देत, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार सचिन अहिर यांना महायुतीकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी दिली. सचिन अहिर हे ठाकरे गटातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असल्याचं सांगितलं जातं. आता सचिन अहिर यांची आज (१ जुलै) रोजी उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून जगन्नाथ अभ्यंकर यांनीही अर्ज भरला होता, परंतु नंतर त्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली.  सचिन अहिर यांच्या बिनविरोध निवडीनंतर मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आणि अहिर यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील भाष्य केले. ते म्हणाले, &quot;खऱ्या अर्थाने शिवसैनिकाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे आणि उपसभापतीपदी शिवसैनिक बसल्याचा आनंद आहे,&quot; याआधी नीलम गोऱ्हे यांनी या पदाची गरिमा राखली होती आणि पूर्ण न्याय केला होता, असंही त्यांनी नमूद केलं. यानंतर त्यांनी कविता आणि शायरीच्या माध्यमातूनही सचिन अहिर यांचे अभिनंदन केले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/H3J9-C954P4</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/Eknath-shinde-on-sachin-ahir-.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/raj-thackeray-slams-bjp-over-defection-politics-says-modi-is-the-foundation-holding-everything-together-1701868.html</loc><video:video>
	<video:title>राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं...</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T14:07:35+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यात आणि देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार भाष्य करत फोडाफोडीच्या राजकारणावर तीव्र टीका केली आहे. ठाण्यातील सीकेपी सभागृहात मनसे पदाधिकाऱ्यांना एसआयआरच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारच्या राजकीय रणनीतीवर निशाणा साधला.  राज ठाकरे म्हणाले की, देशातील सध्याचे फोडाफोडीचे राजकारण अत्यंत घाणेरडे असून अशा प्रकारच्या राजकारणाचे परिणाम भविष्यात सत्ताधाऱ्यांनाही भोगावे लागतील. कोणत्याही पक्षाला किंवा नेत्याला सत्ता कायमस्वरूपी मिळत नसते. आज घेतले जाणारे निर्णय आणि अवलंबली जाणारी राजकीय पद्धत भविष्यात कोणता पायंडा पाडेल, याचे भान राजकारण्यांनी ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.  भाजपवर टीका करताना त्यांनी म्हटले की, सध्या पक्षाची राजकीय ताकद मोठ्या प्रमाणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर उभी आहे. &quot;पत्त्यांच्या बंगल्याचा सर्वात खालचा पत्ता निघाला की संपूर्ण बंगला कोसळतो, त्याचप्रमाणे सध्या जे काही टिकून आहे ते मोदींमुळेच आहे,&quot; असे वक्तव्य त्यांनी केले. उद्या सत्ता बदलल्यानंतर भाजपलाही अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.  फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, इतिहासात ज्या-ज्या सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याच पक्षांतून नवे विरोधक निर्माण झाले आणि त्यांनीच पुढे त्या सत्तेला आव्हान दिले. हीच प्रक्रिया आता भाजपमध्येही सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. आणीबाणीच्या काळातील राजकीय परिस्थितीची आठवण करून देत त्यांनी सत्ताधाऱ्यांनी इतिहासातून धडा घेण्याची गरज व्यक्त केली.  यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजकीय रणनीतीवरही अप्रत्यक्ष टीका केली. विविध पक्षांतील नेत्यांना वेगळे करून स्वतंत्र गट निर्माण करण्यामागे भविष्यातील राजकीय समीकरणे डोळ्यासमोर असल्याचा दावा त्यांनी केला. &quot;समोरचे विरोधक संपवण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या पक्षातच नवे विरोधक तयार होतात, हा जगाचा नियम आहे,&quot; असेही राज ठाकरे म्हणाले.  राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून त्यांच्या टीकेला भाजपकडून काय उत्तर दिले जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/9chHColovNg</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T140524.225.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sachin-ahir-elected-unopposed-as-maharashtra-legislative-council-deputy-chairman-after-joining-shinde-sena-2-1701850.html</loc><video:video>
	<video:title>Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T13:55:30+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. नुकतेच शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांच्या निवडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.  विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे आमदार सचिन अहिर, तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र विधान परिषदेतील महायुतीचे संख्याबळ लक्षात घेता सचिन अहिर यांच्या विजयाची शक्यता सुरुवातीपासूनच व्यक्त केली जात होती.  दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला सर्वानुमते निवड करण्याचे आवाहन केले. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सभागृहात महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड निश्चित झाली.  विशेष म्हणजे, शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर लगेचच सचिन अहिर यांनी उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि अवघ्या एका दिवसात त्यांची या महत्त्वाच्या पदावर बिनविरोध निवड झाली आहे.  निवड जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात सचिन अहिर यांचे अभिनंदन केले. त्यांच्या निवडीनंतर महायुतीच्या नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या असून, आगामी काळात सभागृहाचे कामकाज निष्पक्षपणे पार पाडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/qEBUTTenW1Y</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T135416.553.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/uddhav-thackeray-faction-faces-another-shock-amid-major-political-turmoil-1701824.html</loc><video:video>
	<video:title>ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T13:57:53+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राजकारणात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची चर्चा रंगली आहे. आधी 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्यानंतर आता ठाकरे गटातील आणखी काही नेते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत.  विधान परिषदेच्या उपसभापती निवडणुकीसाठी सचिन अहिर यांचा अर्ज महायुतीकडून दाखल करण्यात आला. सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जात होते. त्यामुळे त्यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडीनंतर ठाकरे गट अलर्ट मोडवर गेला आहे.  दरम्यान, आमदार सुनील शिंदे आणि काही नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही इतर आमदारही बंडखोरीच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.  सततच्या राजकीय धक्क्यांमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून पुढील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात आणखी मोठे बदल होण्याच्या चर्चा  आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/ilR3m3Wj0cI</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/Uddhav-Thackeray-8.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sachin-ahir-breaks-silence-on-joining-shinde-sena-reacts-to-deputy-chairman-nomination-maharashtra-politics-1701836.html</loc><video:video>
	<video:title>Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T13:21:37+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राजकारणात सचिन अहिर यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशाची चर्चा जोर धरत असतानाच त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या भूमिकेवर भाष्य केले. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सध्या अधिक प्रतिक्रिया देणे टाळले असले, तरी आगामी जबाबदारीबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.  माध्यमांशी बोलताना सचिन अहिर म्हणाले, “मी गेल्याशिवाय सर्वांना कळणार नाही. माझ्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवत ही संधी दिली आहे, त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करणार आहे.”  पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, सभागृहाचे कामकाज सर्व पक्षांना विश्वासात घेऊन निष्पक्षपणे चालवण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे सध्या या विषयावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.  “प्रथम संबंधित प्रस्ताव मंजूर होऊ द्या, त्यानंतर माझी सविस्तर भूमिका मांडेन,” असेही सचिन अहिर यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय चर्चांना आणखी वेग आला असून पुढील काही दिवसांत या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/yPgk32QUUMY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T130947.593.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/eknath-shinde-likely-leaves-for-delhi-amid-cabinet-expansion-buzz-1701793.html</loc><video:video>
	<video:title>मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T12:45:01+05:30</video:publication_date>
	<video:description>गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. या विस्तारात राज्यातील काही नेत्यांना लॉटरी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. यात अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झालेले ओमराजे निंबाळकर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (१ जुलै) रोजी दुपारीच दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळातील विस्ताराच्या कामासंदर्भात एकनाथ शिंदेंचा हा दौरा असू शकतो. सुरुवातीला मंत्री पद श्रीकांत शिंदे की ओमराजे कोणाला मिळेल अशी चर्चा होती, मात्र आता दोघांना मंत्रिपद मिळेल अशा चर्चा आहेत. एकनाथ शिंदेंच्या आजच्या दिल्ली दौऱ्याच्या माहितीवरून पुन्हा या चर्चांनी जोर धरला आहे.  काही दिवसांपूर्वीच खासदार ओमराजेंना मंत्रिपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला, यावर बोलताना ओमराजे म्हणाले की, मंत्री होणे ही माझी प्राथमिकता नाही, अतिशय प्रामाणिकपणे हे मी कबूल करू इच्छितो. सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी, मतदारसंघाच्या विकासासाठी आणि मतदारसंघाच्या प्रगतीसाठी काम करायचे आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/9e3CXgLXrQE</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/eknath-shinde-shrikant-shinde-omraje-nimbalkar.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/11-major-rule-changes-effective-from-today-new-rules-for-itr-hsrp-lpg-passport-banks-credit-cards-1701780.html</loc><video:video>
	<video:title>New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T12:26:28+05:30</video:publication_date>
	<video:description>आजपासून नव्या आर्थिक महिन्याची सुरुवात झाली असून सर्वसामान्य नागरिक, करदाते, वाहनधारक आणि बँक ग्राहकांसाठी अनेक महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. या बदलांचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावर आणि आर्थिक व्यवहारांवर होणार आहे.  1. काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत.  2. रेल्वेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आता 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.  3. HSRP (High Security Registration Plate) नसलेल्या वाहनांवर आजपासून दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे.  4. टाटा मोटर्सने पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे.  5. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 183 रुपयांची कपात करण्यात आली आहे.  6. नव्या पासपोर्टसाठी 2,500 रुपये, तर तात्काळ पासपोर्टसाठी 5,000 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.  7. आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 असून त्यानंतर विलंब शुल्क लागू होणार आहे.  8. आधार कार्डवरील ई-मेल अपडेटची सुविधा पुढील सहा महिन्यांसाठी मोफत उपलब्ध राहणार आहे.  9. स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स कार्यक्रमात बदल करण्यात आले आहेत.  10. HDFC बँकेच्या निवडक क्रेडिट कार्डधारकांना प्रत्येक तिमाहीत 3 मोफत देशांतर्गत विमानतळ लाउंज सुविधा मिळणार आहे.  11. ग्राहकांच्या नकळत विमा किंवा आर्थिक उत्पादने विक्री (Mis-selling) करणाऱ्या संस्थांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार असून ग्राहकांना पूर्ण परताव्याची तरतूद करण्यात आली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/YtL4cmS7kqM</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T122109.984.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sachin-ahir-filed-deputy-chairman-nomination-from-shinde-sena-amid-security-boost-1701757.html</loc><video:video>
	<video:title>सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T12:18:10+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत सचिन अहिर यांनी थेट शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे महायुतीकडून सचिन अहिर यांना मोठे महत्त्व दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.  विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना ठाकरे गटाकडूनही उमेदवार देण्यात आला असला तरी सचिन अहिर यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. अचानक झालेल्या या राजकीय घडामोडीमुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे.  दरम्यान, सचिन अहिर यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वरळी येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत.अलीकडेच बंडखोरी करणाऱ्या सहा खासदारांच्या ज्याप्रमाणे सुरक्षा दिली जात होती त्याप्रमाणेच अहिर यांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/UlUsSnAQnhk</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/Sanjay-ahir-security-.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-slams-sachin-ahir-after-shinde-sena-entry-shiv-sena-gave-him-everything-maharashtra-politics-1701763.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T12:12:06+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राजकारणात शिवसेना ठाकरे गटातून झालेल्या पक्षांतरांवरून आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच आहे. माजी मंत्री सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली.  संजय राऊत म्हणाले की, पक्षाची उभारणी ही शिवसैनिकांच्या मेहनतीवर होत असते. सचिन अहिर यांना पक्षाने आणि ठाकरे कुटुंबाने भरभरून संधी दिली. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीला बळ दिले, भारतीय कामगार सेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली, तसेच पुणे जिल्ह्याची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. एवढे मान-सन्मान आणि जबाबदाऱ्या मिळूनही त्यांनी पक्ष सोडल्याची खंत राऊत यांनी व्यक्त केली.  पुढे बोलताना राऊत यांनी, सर्व काही मिळाल्यानंतरही पक्ष सोडणे हे विश्वासाला तडा देणारे असल्याचे सांगितले. त्यांनी सचिन अहिर यांच्या राजकीय प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांच्या कारकिर्दीत अनेक वळणे आणि वाद राहिल्याचा आरोप केला.  यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधत, पक्षफोडीनंतर आनंद व्यक्त केला जात असल्याची टीका केली. तसेच ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांपैकी पाच जण मूळचे काँग्रेसचे असल्याचा दावाही त्यांनी केला. या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/8GRp3pzA</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T120632.065.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/petrol-diesel-prices-reduced-from-first-day-of-july-big-relief-1701739.html</loc><video:video>
	<video:title>महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T11:45:07+05:30</video:publication_date>
	<video:description>जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 1 जुलैपासून नायरा एनर्जीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांची तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात केली आहे. मध्य पूर्वेतील तणाव कमी झाल्यामुळे आणि कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत झाल्याने जागतिक बाजारात क्रूड ऑइलच्या किमती कमी झाल्या आहेत. त्याचा परिणाम इंधन दरांवर दिसून येत आहे.  नायरा एनर्जीचे देशभरात 7000 पेक्षा अधिक पेट्रोल पंप आहेत. या सर्व पंपांवर नवीन दर लागू करण्यात आले आहेत. मात्र, स्थानिक करांमुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगळे असू शकतात.  सध्या, मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 111.21 रुपये आहे.  चंदीगडमध्ये पेट्रोलचा दर सर्वात कमी म्हणजे 101.54 रुपये प्रति लिटर आहे. तर हैदराबादमध्ये पेट्रोल 115.69 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.  डिझेलबाबत बोलायचे झाल्यास, 89.47 रुपये प्रति लिटरच्या जवळपास आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/IFKO-SlDQRc</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/petrol-.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/drunk-man-created-panic-inside-mumbai-local-train-during-journey-1701723.html</loc><video:video>
	<video:title>“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T11:20:51+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच पश्चिम रेल्वेमध्ये शुल्लक कारणावरून मयंक लहार नावाच्या तरुणाची हत्या झाली होती. यावेळी लोकलमध्ये उपस्थित सर्वांनी बचावाची भूमिका घेतली. यानंतर एका आठवड्यातच तब्बल तीन चाकू हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. यानंतर आता पनवेल ते सीएसएमटी लोकलमध्ये एका मद्यधुंध सनकी व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला आहे. त्याने एका प्रवाशाला चक्क जीवे मारण्याची धमकी दिली.  पनवेल ते सीएसएमटी लोकलमध्ये काही प्रवासी प्रवास करत होते. यावेळी एका मद्यधुंद व्यक्तीने वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने मोठमोठ्या आवाजात शिवगाळ करण्यास सुरुवात केली. धिंगाणा घालणाऱ्या इसमाने थेट धमकी दिली की, “मी याआधीच चार खून केलेत, यानंतर पुढचा नंबर तुझाच आहे. कर ज्याला जिथं तक्रार करायची आहे... बघ काय होईल?” या लोकलच्या डब्यात काही दिव्यांग प्रवासीसुद्धा होते. या प्रकरणानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून रेल्वे प्रवासादरम्यान सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/jXL8waiBeos</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/panvel-csmt-local-train.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-slams-sachin-ahir-after-switch-to-shinde-sena-he-betrayed-sharad-pawar-too-maharashtra-politics-1701729.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T11:16:37+05:30</video:publication_date>
	<video:description>शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर आता माजी मंत्री सचिन अहिर यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारण आणखी तापले आहे. या घडामोडीनंतर ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सचिन अहिर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.  सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी निवड होण्याची औपचारिक घोषणा अद्याप बाकी असताना राऊत यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी अहिर यांचा राजकीय प्रवास वादग्रस्त आणि कलंकित असल्याचा आरोप करत त्यांच्या पक्षांतरावर टीका केली.  संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सचिन अहिर यांनी शरद पवार यांना कोणतीही कल्पना न देता शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळीही त्यांनी आपल्या राजकीय भविष्यासाठी निर्णय घेतला होता. त्यामुळे, “जे शरद पवार यांचे झाले नाहीत, ते आमचे कसे होतील?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  राऊत यांनी पुढे सांगितले की, शिवसेना, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सचिन अहिर यांना पक्षात योग्य सन्मान आणि जबाबदाऱ्या दिल्या. त्यांना भेटण्यासाठी वेळ दिला जात नव्हता किंवा त्यांचे म्हणणे ऐकले जात नव्हते, असा दावा करणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आदित्य ठाकरे आणि सचिन अहिर यांची नियमित भेट होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.  सचिन अहिर यांनी आपल्या राजकीय भविष्यासाठी पक्ष सोडल्याचे सांगितले असले, तरी या निर्णयामागील कारणांवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना अधिक वेग आला आहे. त्यांच्या पक्षांतरामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना उधाण आले असून या प्रकरणावर पुढे आणखी प्रतिक्रिया येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/-uBySwCu-8c</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T111455.572.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sant-nivruttinath-maharaj-palkhi-arrives-in-nashik-thousands-of-warkaris-march-towards-pandharpur-1701717.html</loc><video:video>
	<video:title>Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T10:59:20+05:30</video:publication_date>
	<video:description>आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज नाशिक शहरात भक्तिमय वातावरणात दाखल झाली. “हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा” आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात हजारो वारकरी टाळ-मृदुंगाच्या निनादात पालखीसोबत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.  त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान केल्यानंतर काल पालखीने महिरावणी येथे मुक्काम केला होता. त्यानंतर आज सकाळी पालखीचे नाशिकमध्ये आगमन होताच संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. भगवे ध्वज, पताका आणि विठ्ठलाच्या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.  नाशिकमध्ये पालखीचे औपचारिक आणि उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी शहराच्या महापौर हिमगौरी आडगे, उपमहापौर विलास शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर, साधू-महंत आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.  स्वागत सोहळ्यादरम्यान जेसीबीच्या साहाय्याने संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या अनोख्या स्वागतामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. वारकऱ्यांनी अभंग, भजन आणि हरिनामाच्या गजरात विठ्ठलभक्तीचा उत्सव साजरा केला.  आता संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पुढील मुक्कामासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली असून, लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने या पवित्र वारीत सहभागी झाले आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/ULTCxnQaG6M</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T104418.196-1.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-reacted-strongly-after-sachin-ahir-filed-nomination-papers-1701710.html</loc><video:video>
	<video:title>मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T10:49:32+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली. काल विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली. सचिन अहिर हे &#039;उबाठा&#039;मधील वरळी येथील नेते आहेत. महत्त्वाचं म्हणजे, त्यांच्या उपसभापती पदासाठीचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नीलम गोऱ्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.  या राजकीय घडामोडीनंतर अनेक सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी उबाठा गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी या सबंध प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांनी सांगितले, &#039;हे सर्व जे पक्षांतर करत आहेत, ते मोठ्या पदासाठीच गेले आहेत. आम्ही त्यांना सगळं दिलं तरी ते गेले... एकनाथ शिंदे यांना तर चक्क मुख्यमंत्री पद मिळालं होतं बंडखोरी करून, तसंच सचिन अहिर यांनाही पद मिळतंय.&#039; &#039;त्यांचा इतिहास अतिशय कलंकित आहे,&#039; असा आरोपदेखील यावेळी संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या आरोपांनंतर मोठी खळबळ उडाली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/PS1ZqDa_0L4</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/Sanjay-raut-on-sachin-ahir.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mumbai-rains-today-heavy-rain-batters-city-as-massive-waves-hit-marine-drive-amid-strong-winds-1701704.html</loc><video:video>
	<video:title>Marine Drive Rain Updates | मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड लाटा, पर्यटकांची गर्दी वाढली</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T10:46:53+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबई आणि उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शहरातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. पावसासोबत वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे जनजीवनावर परिणाम होत असून नागरिकांना प्रवासादरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे.  दरम्यान, मुंबईतील प्रसिद्ध मरीन ड्राईव्ह परिसरातही मुसळधार पावसासह अरबी समुद्राला उधाण आले आहे. जोरदार वाऱ्यांमुळे समुद्रात प्रचंड उंच लाटा उसळताना दिसत असून या लाटांनी किनाऱ्यावर धडक दिल्याने परिसरातील दृश्य अधिकच नाट्यमय झाले आहे. समुद्राच्या रौद्र रूपाचे दर्शन घेण्यासाठी अनेक पर्यटक आणि मुंबईकरांनी मरीन ड्राईव्ह परिसरात गर्दी केली आहे.  मुसळधार पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले असले, तरी प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना समुद्रकिनाऱ्याजवळ अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. भरतीच्या काळात समुद्र अधिक धोकादायक होऊ शकतो, त्यामुळे सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.  हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढील काही तासांतही मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि हवामान विभाग तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/G8INekG4JJc</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-01T104605.887.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/heavy-rain-alert-issued-across-maharashtra-red-and-orange-warnings-1701683.html</loc><video:video>
	<video:title>Latest Rain Update | 24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार; तुमच्या शहरात कोणता अलर्ट?</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T10:12:22+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे घाटमाथा तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही ढगाळ वातावरणासह मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  अशात कोणत्या ठिकाणी येलो, कोणत्या ठिकाणी ऑरेंज आणि कोणत्या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरत आहे. राज्यातील ऑरेंज अलर्टच्या यादीत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि चंद्रपूर ही ठिकाणे आहेत. येलो अलर्ट असलेल्या ठिकाणांमध्ये पालघर, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे घाटमाथा, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, हिंगोली, धाराशिव, नांदेड, लातूर, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, भंडारा आणि गोंदिया या ठिकाणांचा समावेश आहे.  गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत अधूनमधून पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असला तरी काही ठिकाणी पाणी साचणे, वाहतूक मंदावणे आणि नदी-नाल्यांची पातळी वाढण्याच्या घटना समोर येत आहेत. विशेषतः घाट रस्ते आणि पूरप्रवण भागांमध्ये सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/07d3ZEdSw7o</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/rain-alart-.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/omraje-nimbalkar-viral-audio-clip-created-huge-stir-in-politics-1701671.html</loc><video:video>
	<video:title>मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची &#039;ती&#039; ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय वर्तुळात मोठं घडणार?</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T10:03:12+05:30</video:publication_date>
	<video:description>धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह एकूण सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली अन् थेट शिवसेना शिंदे गटाशी हातमिळवणी केली. त्यांच्या या बंडखोरीनंतर राज्याभर खळबळ उडाली. दरम्यान, उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी करणाऱ्या सर्व खासदारांच्या मतदारसंघात दौरा केला. ही बाब अजून ताजी असतानाच त्यांच्या वरळीतील आणखी एका नेत्याने ठाकरेंना धक्का दिल्याच्या चर्चा आहेत.  अशात एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये थेट ओमराजे निंबाळकर यांना एक कार्यकर्ता काहीतरी विचारत असून ओमराजे निंबाळकर त्यांच्या शिंदे गटात जाण्याच्या निर्णयाबाबत सांगत आहेत.  कार्यकर्त्याला ओमराजेंनी सांगितलं, &#039;मला लाईनमन म्हणू नका... मला हिणवू नका... विरोधक असताना तशीच परिस्थिती होती म्हणूनच...&#039; तेव्हा कार्यकर्ता म्हणाला, &#039;विरोधात राहून इतकी वर्षे काम केलं, मग आता का?&#039; तेव्हा ओमराजे म्हणतात, &#039;विरोधात राहिलो इतकी वर्षे, मात्र असा पराभव जो झाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत, इतका वाईट पराभव नव्हता झाला कधी....&#039; ऑडिओ क्लिपमध्ये कार्यकर्ता आणि ओमराजेंचा संवाद होत असल्याचं सांगितलं जात आहे. (सदर ऑडिओ क्लिपची टीव्ही९ मराठी पुष्टी करत नाही)</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/cEpAzowbjag</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/Omraje-Nimbalkar-14.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/uddhav-thackeray-faction-faces-another-setback-after-sachin-ahir-move-1701642.html</loc><video:video>
	<video:title>ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं, थेट वरळीतच....</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T09:32:25+05:30</video:publication_date>
	<video:description>शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गेल्या काही दिवसांत मोठे राजकीय धक्के बसत आहेत. 6 खासदारांनी साथ सोडल्यानंतर आता विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनीही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून काल विधान परिषदेतील उपसभापतीपदासाठी अर्ज भरला. सुत्रांच्या माहितीनुसार ते तीन दिवसांपासून शिंदेंच्या संपर्कात होते. त्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर काल वरळीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला विभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या बैठकीत माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि आमदार सुनील शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. किशोरी पेडणेकर यांनी बोलताना पक्षाशी निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. “आजही इथे सच्चे शिवसैनिक उपस्थित आहेत. शाखेपासून काम करणारे कार्यकर्ते पक्षासाठी मेहनत घेत आहेत,” असे त्या म्हणाल्या.  यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्या बंडाचा उल्लेख करत जुन्या काळातील संघर्षाची आठवण करून दिली. तसेच काही नेत्यांवर अप्रत्यक्ष टीकाही केली. पक्ष संघटना मजबूत ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजूट कायम ठेवावी, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/nZNFtc0gMd8</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/UBT-7.png</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/heavy-rains-disrupt-normal-life-after-trees-collapse-across-kalyan-dombivli-1701626.html</loc><video:video>
	<video:title>राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18...</video:title>
	<video:publication_date>2026-07-01T08:45:42+05:30</video:publication_date>
	<video:description>कल्याण-डोंबिवली परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासांत शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कल्याण आणि डोंबिवली भागात 18 हून अधिक झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.  महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडे हटवण्याचे काम सुरू केले. यामध्ये काही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, काल चेंबूर येथे झाड कोसळ्यामुळे घडलेल्या बस अपघातात एका चिमुकल्याने जीव गमावला होता तर अनेक जखमी झाले होते. त्यामुळे शासन सर्व ठिकाणी झाडांचे सर्वेक्षण करत आहे.  दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांत आणखी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे महापालिकेने आपत्कालीन पथके सज्ज ठेवली आहेत. पावसामुळे काही भागांत पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यातील काही भगांना रेड, तर काहींना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/ggXG7LeoR14</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/Kalyan-dombivli.png</video:thumbnail_loc></video:video></url></urlset>