मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक, नाना पटोले यांचा हल्लाबोल
एकनाथ शिंदे यांचा टक्का घसण्याची वेळ आली आहे, नाना पटोले यांचा हल्लाबोल
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या युतीबाबत आणि त्यावर होणाऱ्या टीकेबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या दोघांची युती आहे. या झालेल्या युतीशी काँग्रेसचा कोणताही संबंध नाही. या युतीचा कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडे नसल्याने यावर कोणतेही वक्तव्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आठव्या क्रमाकांचे मुख्यमंत्री असल्याचे समोर आले आहे. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, एकनाथ शिंदे यांचा आजून टक्का घसण्याची वेळ आली आहे. राज्याच्या तिजोरीला लुटण्याचे प्रकार सुरू आहे. महाराष्ट्रासाठी उद्योग आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दावोस दौरा केला. या 74 तासांच्या दावोस दौऱ्यासाठी 40 कोटी रूपये खर्च केले आहे. राज्याच्या उद्योगांना इथे दाखवून महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहे. त्यामुळे सातत्याने महाराष्ट्राचा अपमान राज्याच्या सरकारकडून होत असल्याची टीकाही त्यांनी केली.