मी Shivsena सोडून Bjp मध्ये जाणार नाही, Tanaji Sawant यांचं स्पष्टीकरण
मी शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षामध्ये जाणार नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी दिलं आहे. मी भाजप नेत्यांच्या संपर्कात आहे अशा आशयाच्या बातम्या म्हणजे माझ्याविरोधात रचलेलं षटयंत्र आहे, असं वक्तव्य तानाजी सावंतांनी केलं आहे.
मी शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षामध्ये जाणार नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी दिलं आहे. मी भाजप नेत्यांच्या संपर्कात आहे अशा आशयाच्या बातम्या म्हणजे माझ्याविरोधात रचलेलं षटयंत्र आहे, असं वक्तव्य तानाजी सावंतांनी केलं आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. तानाजी सावंत यांनी एसटीचे शासनात विलनीकरण करण्याची मागणी केली आहे. तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनीच विलनीकरणाची मागणी केल्यामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन भाजपनं शिवसेनेला टार्गेट केलेलं आहे. राज्यात परिवहन मंत्रिपद शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे नेते अनिल परब हे परिवहन मंत्री आहेत. या पार्श्वभूमीवर परंडा विधानसभेचे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी हे पत्र लिहिल्यानं चर्चा होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तानाजी सावंत यांची नाराजी सुरु असल्याच्या बातम्या येत होत्या.