मुंबई–नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यातील गोठेघर जवळील पुलाखाली पहिल्याच पावसात पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्याची खोली लक्षात येत नसल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून अपघातग्रस्त झाले आहेत.