सोलापूर मधील मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली आहे. आज त्यांच्या कुटुंबाची अमित ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, भाजपची पातळी एवढी खाली गेलीये की निवडणुकीसाठी ते खून करतायेत. अशा निवडणुका होत असतली तर नको निवडणुका. आम्ही सर्व माघार घेतो तुम्ही जिंका. फडणवीस साहेबांना विनंती आहे त्यांनी एक दिवस प्रचार सोडून इकडे या. बाळासाहेबांना न्याय मिळाला पाहिजे.