ग्रीष्म ऋतूची तीव्रता वाढत असताना पंढरपूरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींना उष्णतेपासून संरक्षण मिळावे यासाठी शतकांपासून चालत आलेली चंदन उटी पूजा आजही सुरू आहे. चैत्र महिन्यापासून मृग नक्षत्रापर्यंत दररोज दुपारी विठुरायाच्या सर्वांगाला सुगंधी व शीतल चंदनाचा लेप लावला जातो.