सातपुड्यातील आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या काठी येथील ऐतिहासिक राजवाडी होळीच्या उत्साहला अवघ्या काही तास शिल्लक असल्याने, होळीसाठी मुख्य आकर्षण असलेला मानाचा बांबू 300 किलोमीटरची खांद्यावर ठेवून पायपीट करून गुजरातच्या जंगलातून काठी गावात दाखल होत आहे. गेल्या चार दिवसांपासून 11 मानकरी अहोरात्र चालत, अनवाणी पायांनी हा बांबू घेऊन येत आहेत.