भंडारा जिल्ह्यातील वरठी येथे भारत गॅस एजन्सीसमोर सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिलेंडर वितरणाच्या वेळी एजन्सीकडून मेंटेनन्सच्या नावाखाली ग्राहकांना जबरदस्तीने गॅस पाईप खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. आधीच गॅस टंचाईमुळे त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना अशा सक्तीमुळे त्यांचा आर्थिक भार वाढत आहे.