शुभम लोणकरने बिश्नोई गँगच्या नावाने पाच बॉलिवूड कलाकारांना खंडणीसाठी धमकावल्याचे समोर आले आहे. सूत्रांनुसार, ही गँग मुंबईत आपली पाळेमुळे रुजवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप एकाही कलाकाराने अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही. ही बाब गंभीर असून सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे.