पावसाने शेतात पाणी साचून राहिल्याने कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू यांसारख्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर कुजल्या आहेत. जो भाजीपाला बाजारात येत आहे. त्यावरही किडीचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कीड लागल्यामुळे भाजीपाल्याचा दर्जा खालावला असून ग्राहकांना नाईलाजाने जादा पैसे मोजून निकृष्ट दर्जाची भाजी खरेदी करावी लागत आहे.यामुळे गृहिणींचे घरगुती बजेट कोलमडले आहे.