कोकणाप्रमाणेच आता मराठवाड्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाही हवामान बदलाचा मोठा फटका बसताना दिसतोय. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी, कडाक्याची थंडी आणि गारपीट अशा सतत बदलणाऱ्या हवामानामुळे आंबा पिकावर गंभीर परिणाम झालाय. यामुळे आंब्याला अपेक्षित प्रमाणात तौर लागला नाही आणि जो लागला त्याची मोठ्या प्रमाणात गळती झालीये. सध्या नव्याने लागलेले आंबे देखील गळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कोकणाप्रमाणेच मराठवाड्यातील आंबा उत्पादकांचेही पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. हवामानातील सतत बदल, अवकाळी पाऊस, गारपीट आणि थंडीमुळे आंब्याची फुले आणि छोटे फळ मोठ्या प्रमाणात गळून पडत आहेत.