सलग सुट्ट्या आणि विकेंडचा योग जुळून आल्यामुळे अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली आहे. विशेषतः नागाव बीच, काशीद बीच, वरसोली बीच आणि रेवदंडा बीच या किनाऱ्यांना पर्यटकांची विशेष पसंती मिळताना दिसत आहे.