रायगड जिल्ह्यातील आंबा बागायतदारांवर यंदा निसर्गाचा कोप कोसळला आहे. लहरी हवामानामुळे आंब्याचे पीक मोठ्या प्रमाणात धोक्यात आले असून, अलिबागच्या जगप्रसिद्ध हापूस आंब्यालाही याचा मोठा फटका बसला आहे. यंदा तब्बल ८५ टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.