रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात पूरस्थिती ओसरल्यानंतर आता एक नवीन संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. तालुक्यातील नारंगी नदीपात्रालगतच्या शेतांमध्ये मगरींचा वावर वाढल्याचे समोर आले असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.