सुरुवातीलाच काही कंपनीच्या निकृष्ट बियाण्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट ओढावलं होतं. अशातच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली होती. पण गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचं दमदार आगमन झाल्याने आता सोयाबीन, तूर पिकासह इतर पिकांनाही नवसंजीवनी मिळाली आहे.