जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून त्याचा मोठा फटका आता केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव तालुक्यात उष्णतेच्या तीव्र झळांमुळे केळी बागा करपू लागल्या आहेत. दुपारच्या कडक उन्हामुळे केळीच्या पानांना भाज लागणे, घडांची वाढ खुंटणे तसेच फळांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याच्या घटना वाढल्या आहेत.