दोन महिन्यात ३० बैलगाडा शर्यतीत नावलौकिक मिळवून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या परभणीच्या नंद्या बैलाचा मृत्यू झाल्याने चारठाणा येथील देशमुख कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी माणसांप्रमाणेच नद्यांवर अंत्यसंस्कार केलेत.देशमुख कुटुंबीय घरातील कुटुंबापेक्षा अधिक निगा या नद्यांची राखत होते, पण नद्यांचे भिरभिर पळणारे पाय आता कायमचे थांबले आहेत. नंद्याचा मालक ऋषी देशमुख यांच्या कानावर नद्यांच नाव जर पडलं तरी त्यांच्या डोळ्यातून आसवं टपकत आहेत. भागवत देशमुख यांचं नद्यांबद्दल बोलताना ह्रदय पिळवटून येत आहे.