खरीप हंगामात कांद्याला भाव नसल्याने कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. चार महिने रात्रंदिवस केलेल्या मेहनतीला बाजारात मोल मिळाले नाही. घाम, कष्ट आणि आशा यांची किंमत कवडीमोल ठरली. तरीही हार न मानता, पुन्हा एकदा नव्या उमेदीने धुळे तालुक्यातील कांदे उत्पादक शेतकरी रब्बी हंगामातील कांदा लागवडीला लागले आहेत.