छत्रपती संभाजीनगर शहरातील औरंगपुरा परिसरात लग्न समारंभादरम्यान डीजे बंद करण्याच्या कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. रात्री दहा वाजल्यानंतर नियमानुसार डीजे बंद करण्यात आला. मात्र, काही तरुणांनी गाण्यांची फर्माईश करत डीजे सुरू ठेवण्याचा आग्रह धरला. यावरून डीजे चालक आणि वरातीतील तरुणांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले.