राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. एका शेतकऱ्याच्या शेतात तर तळं निर्माण झालं आहे. त्यामुळे हळद आणि भूईमुगाच्या पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारने लक्ष देऊन आर्थिक मदत करण्याची मागणी हे शेतकरी करत आहेत.