छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथे पाण्याअभावी शेतकऱ्याला डाळिंबाची बाग तोडण्याची वेळ आली आहे. शेतकरी ज्ञानदेव बढे यांनी सात वर्षांपूर्वी डाळिंबाची बाग उभी केली होती. मात्र यंदा पावसाने पाठ फिरवल्याने बागेला पाणी देणे कठीण झाले.