खरीप हंगाम जवळ येत असताना बळीराजा आपल्या शेतात एका नव्या उत्साहाने तयारी करत असून डिझेल तुटवडा आणि चे दर वाढल्याने आता नांगरणी वखरणीचे सुद्धा दर वाढले आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता वाढली असून रोहिणी नक्षत्रालाही प्रारंभ झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यग्र झाले आहेत. दुसरीकडे डिझेल दरवाढीचा परिणाम शेती मशागतीवरी होत असल्याचे चित्र आहे.. गेल्या वर्षी एकरी सुमारे १४०० रुपये असलेला नांगरणीचा खर्च यंदा १७०० रुपयापर्यंत पोहोचला आहे .. यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक ताण निर्माण झाला आहे.