संपूर्ण जून महिना पावसाअभावी कोरडा ठाक गेल्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसापासून सातारा जिल्ह्यात पावसाची रिप रिप सुरू झाली आहे. थोड्या प्रमाणात जमिनीमध्ये पेरणीसाठी घात मिळू लागल्यानंतर शेतकऱ्यांनी जोखीम पत्करून पेरणीला सुरुवात केली आहे. जुलै महिन्यात देखील पाऊस कमी असणार असं हवामान विभागाने सांगून देखील शेतकऱ्यांनी जोखीम पत्करून सोयाबीनची पेरणी सुरू केली आहे.